शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

गाडी चालवताना फोनवर बोलणं थांबवू!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2017 06:42 IST

गाडी चालवताना, मान वाकडी करुन, कानात इअर फोनच्या वायरी खुपसून फोनवर बोलू नये हे सगळ्यानांच माहिती असतं.

- चिन्मय लेले

गाडी चालवताना, मान वाकडी करुन, कानात इअर फोनच्या वायरी खुपसून फोनवर बोलू नये हे सगळ्यानांच माहिती असतं. फोनवर बोलत बोलत गाडी चालवू नये, मान तिरकी करकरुन बोलू नये हा तर काय कॉमन सेन्सच आहे. मुळात गाडी चालवताना फोनवर बोलावं असा काय अर्जण्ट फोन कॉल आपल्याला येत असतो? आणि एखादा फोनजर इतकाच अर्जण्ट असेल तर गाडी बाजूला घ्यावी, शांतपणे त्या फोनवर काय बोलायचं ते बोलून घ्यावं आणि मग पुन्हा गाडी चालवावी हे सांगायला कुणी तज्ज्ञ कशाला हवा? पण नाही जगभरातच लोक फोनवर बोलण्यासाठी इतके आतूर असतात की, गाडी चालवताना थोडंसं दुर्लक्ष झालं तरी त्यात आपला जीव जावू शकतो हे त्यांच्या लक्षातही येत नाही. आणि हे फक्त आपल्याचकडे होत असं नाही, जगभरातल्या तरुणांना विचारा की, गाडी चालवताना फोन वापरणं कधी थांबवाल, उत्तर एकच, आमचा फोनवर बोलताना अ‍ॅक्सिडण्ट झाला तरच!अलिकडेच लंडनमध्ये एक सर्व्हे करण्यात आला. त्याचं नाव होतं बी स्मार्टफोन कॅम्पेन. म्हणजे काय तर स्मार्ट फोन वापरताना जरा स्मार्ट व्हा. लंडनमध्ये राहणाºया विविध देशातल्या, विविध धर्मा-वंशाच्या आणि स्थानिक ब्रिटिश तरुणांनाही हाच एक प्रश्न विचारण्यात आला की, गाडी चालवताना फोनवर बोलू नये हे तुम्हाला मान्य आहे का? आणि असेल तर तुम्ही का बोलता फोनवर?त्यावर १० टक्के मुलांनी सांगितलं की, गाडी चालवताना फोनवर बोलू नये असं आम्हाला वाटतं, पण अनेकदा सवयीनं बोलतो. ही सवय मोडायला हवी हे आम्हाला मान्यच आहे.उरलेल्या ३० टक्केंचं म्हणणं की, त्यात काय एवढं, आमचा गाडीवर उत्तम कण्ट्रोल असतो. काही बिघडत नाही बोललं तर? लगेच काय अपघात होत नाही.उरलेले ६० टक्के तर म्हणतात की, बोलू नये हे कळतंच आम्हाला. पण जोवर आमचा गाडी चालवत फोनवर बोलताना अ‍ॅक्सिडण्ट होत नाही, तोवर मात्र आम्ही असंच वागू. झालाच अपघात तर पुढचं पुढे!आता अशी बेर्पवाई असेल तर कुठं कुणाला सामान्य ज्ञान शिकवायचं आणि कुठं कायद्याचे धाक दाखवायचे नाही का? मनाचा ब्रेकच लागत नाही तिथं कोण काय करू शकतं?