शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
2
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
3
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
4
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
5
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
6
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
7
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
8
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
9
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
10
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
11
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!
12
Viral Video: रीलसाठी कायपण! थेट धावत्या रेल्वेसमोर...; तरुणाच्या व्हिडीओचा शेवट भयंकर
13
शेअर असावा तर असा! लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशीही गुंतणुकदार मालामाल, लागलं २०% चं अपर सर्किट
14
करून दाखवलं! प्रेग्नेन्सीमध्ये प्रिलिम्सची तयारी; डिलिव्हरीच्या १७ दिवसांनी UPSC मेन्स, झाली IAS
15
चेहरा एकच, मतदान ४ ठिकाणी! २ कर्नाटकात, १ मुंबईत आणि १ उत्तर प्रदेशात; कोण आहे हा युवक?
16
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, अन्यथा..., निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश
17
“देशाच्या राजकारणात १५ दिवसांत मोठे बदल दिसतील”; प्रकाश आंबेडकरांचा दावा, विरोधकांवर टीका
18
धक्कादायक! कुत्र्यांनी एका बकरीला मारले, बदला म्हणून त्या माणसाने २५ कुत्र्यांना गोळ्याच घातल्या
19
भयंकर! बारमध्ये घुसून तरुणावर चाकूने सपासप वार, ३ वर्षांपूर्वी झालेल्या भांडणाचा काढला राग
20
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश

एआय हाजीर हो म्हटल्यावर रोबोट संसदेत साक्ष द्यायला येतो तेव्हा.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2018 17:52 IST

तुम्ही वैमानिक होण्याचं स्वप्न पाहाल पण तोवर विमानं उडवण्याचं काम रोबोटच करायला लागतील त्यावेळी आपण काय करू?

ठळक मुद्देब्रिटनच्या संसदेत रोबोट साक्ष द्यायला आला, आता पुढे.

कालचीच बातमी आहे की ब्रिटनच्या संसदेमध्ये ‘पेप्पर’ नावाच्या रोबोटला पाचारण करण्यात आलं होतं. एआयवर आधारित प्रणालीचा वापर करणारा हा पहिला ‘साक्षीदार’. ‘एआय हाजिर हो’ म्हटल्यावर हा रोबोट संसदेत आला आणि साक्षही त्यानं दिली. जगातल्या सर्वात जुन्या आणि आद्य लोकशाहीच्या साक्षीनेच ही ‘साक्ष’ झाली!अजून एक महत्त्वाची बातमी म्हणजे नागरी विमान उद्योगात अशी वदंता आणि अभ्यास आहे की वैमानिकांऐवजी रोबोट वापरले तर खर्च कमी होईल. आणि तोही थोडाथोडका नसेल. अभ्यास असं सांगतो की आता ज्या विमानांमध्ये दोन वैमानिक असतात त्याऐवजी एक वैमानिक व 1 रोबोट ठेवला तर 15 अब्ज व दोन्ही वैमानिकांऐवजी रोबोट ठेवले तर 35 अब्ज डॉलर्स वाचतील! लक्षात घ्या ही रक्कम थोडीथोडकी नव्हे. आयबीएम या जगद्विख्यात कंपनीच्या वार्षिक उलाढालीच्या 1/3 एवढी ही रक्कम आहे! म्हणजे आर्थिकदृष्टय़ा हे आकर्षक आहे!

मागील आठवडय़ात एका सेवाभावी संस्थेसाठी करिअर नियोजन कार्यशाळा मी घेतली. त्यात एक बारामतीची मुलगी -जिला आर्थिक अडचणीमुळे शिष्यवृत्ती मिळाली होती ती सहभागी झाली होती.  तिनं सांगितलं की शेतजमिनीचा काही भाग विकून तिच्या कुटुंबानं तिला वैमानिक होण्याच्या करिअरसाठी काही लाख रुपये उभारून दिलेत. कुटुंबानं मुलीच्या स्वप्नासाठी ही मजल मारली याचं कौतुक आहे, त्या मुलीच्या धडाडीचंही कौतुक आहे. पण विमानं चालवायच्या क्षेत्रात होऊ घातलेल्या बदलाची मात्र त्या मुलीला काही कल्पनाच नाही. काहीच वर्षात वैमानिकांऐवजी रोबोट विमानं चालवतील याबद्दल तिला काहीच माहिती नव्हती. ही गोष्ट काळजी करण्यासारखीच नाही का? तिच्यासाठी आणि आपल्यासाठीही.मला तर असं वाटतं की बर्‍याच रोजगारसंधींबाबत ही परिस्थिती कमी-अधिक प्रमाणात आणि कमी-अधिक कालखंडात येऊ शकते. म्हणून वाचकहो आपण सावध राहायला हवं. रोजगाराच्या संधी खूप कमी होतील असे भाकीत नसून रोजगाराचं, नोकरी आणि कामाचं स्वरूप बर्‍याच प्रमाणात बदलेल हे भाकीत अनेक शास्त्रज्ञ, अर्थतज्ज्ञ करत आहेत.परवाच पंतप्रधान मोदींनी ‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’च्या कार्यक्रमात दिल्लीत असं सांगितलं की भारतानं ‘इंडस्ट्री 40’चं खुल्या दिलानं स्वागत करायला हवं. इंडस्ट्री 1.0 आणि 2.0 च्या काळात भारत पारतंत्र्यात होता आणि इंडस्ट्री 3.0 च्या वेळी आपण नुकतंच स्वतंत्र होऊन समाजवादी जोखडात अडकले होतो; पण आजच्या इंडस्ट्री 4.0 काळात भारत जोमानं विकसित होतोय आणि हीच आपली संधी आहे. भारतात सध्या टेलेडेन्सिटी ही 93 टक्के आहे. 50 कोटी लोकांकडे मोबाइल आहे. आपल्याला मराठी माणूस म्हणून अजून विशेष अभिमानाची गोष्ट म्हणजे, जगातील चौथं केंद्र जे ‘इंडस्ट्री 4.0’साठी बनेल ते महाराष्ट्रात बनणार आहे. तशी घोषणा पंतप्रधानांनी केली. पहिलं केंद्र सॅन फ्रान्सिस्को, दुसरं टोक्यो, तिसरं बिजिंगला आहे. चौथं केंद्र महाराष्ट्रात प्रामुख्याने ड्रोन्स, एआय व ब्लॉकचेन या तंत्रज्ञानांवर काम करेल. या तीनही तंत्रज्ञानांचा ऊहापोह आपण या लेखमालेत आधी केला आहेच.ब्लॉकचेन याचा वापर आभासी चलनं तयार करण्यात, त्यांचा विनिमय करण्यात व त्याची सुरक्षा यासाठी होतो हे आपल्याला माहिती आहेच. ब्लॉकचेनचा वापर करून तयार झालेल्या प्रणालीचा वापर नीट झाला तर  भ्रष्टाचाराला आळा बसू शकेल तेही राष्ट्रीयस्तरावर. परंतु इतकं पुढे जाण्याची गरज नाही. परवाचीच बातमी आहे की आपल्या भारतात अगदी बंगलुरूमध्ये ‘केम्प फोर्ट मॉल’मध्ये आभासी चलनातील काम करणारी कंपनी ‘उनोकॉईन’ यांनी बिटकॉइन/इथेडियम्चे एटीएम मशीन बसवलंय. ओटीपी वापरून तुम्ही आभासी चलन डिपॉझिट करू शकता व काढू शकता!‘एआय हाजिर हो’ असं म्हणे म्हणे र्पयत इंडस्ट्री 4.0 आपल्या दारात पोहोचून जुनं झालंय ते असं!!