शहरं
Join us  
Trending Stories
1
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
2
झालं... युपीआय बॅलन्स चेकवर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
3
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?
4
Sonam Raghuvanshi : "... तर तिला फाशी द्या!", सोनम रघुवंशीचा भाऊ काय म्हणाला?
5
युक्रेनसाठी सर्वात भयावह रात्र! रशियाने केला सर्वात मोठा ड्रोन हल्ला, अनेक शहरे उद्ध्वस्त
6
99 टक्क्यांहूनही अधिकने घसरून थेट 60 पैशांवर आला होता हा पॉवर शेअर, आता 2857 टक्क्यांची तुफान तेजी!
7
लॉस एंजेलिसमध्ये भडकला हिंसाचार, पत्रकाराला अचानक लागली गोळी; अंगावर शहारा आणणारं दृष्य कॅमेऱ्यात कैद
8
"पतीला मारले, मग माझं अपहरण करून..." सोनमच्या कहाणीनं राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट
9
Mumbai Local Accident: स्वप्नातंल घर घ्यायला बाहेर पडला अन्...; रेल्वे अपघातात आयटी इंजिनिअरचा दुर्दैवी अंत!
10
कमाल झाली! थ्रो मारला स्ट्राइक एन्डला अन् रन आउटची विकेट मिळाली नॉन स्ट्राइक एन्डला (VIDEO)
11
Sonam Raghuvanshi : राजाच्या चेहऱ्यावर हसू अन् सोनमच्या डोक्यात हत्येचं प्लॅनिंग? लग्नातला 'तो' Video तुफान व्हायरल
12
प्रियकर राज शिलाँगला गेलाच नाही! राजाच्या हत्येची सुपारी अन् सोनमसोबत गुपचूप फोनाफोनी...   
13
२४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक...
14
लेफ्टनंट जनरल राजीव घई यांना मिळाली आणखी एक जबाबदारी; तिन्ही दलांवर असणार लक्ष
15
राजा रघुवंशीचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला समोर, शरीरावर कुठे-कुठे आढळल्या जखमा? 
16
जिओ ब्लॅकरॉक अ‍ॅसेट मॅनेजमेंटनं तयार केली दिग्गजांची टीम, गुंतवणुकीसाठी नवीन वेबसाइटचाही श्रीगणेशा
17
Mumbai Railway Accident: ड्युटी संपवून घराकडे निघाला, तान्हुल्या बाळाला भेटायची ओढ; पण त्याआधीच मृत्यूनं कवटाळलं!
18
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
19
'मेन्यू' तोच; पण 'वेन्यू'ची अदला-बदल! टीम इंडियाच्या आगामी शेड्युलसंदर्भात BCCI नं घेतला हा निर्णय

एआय हाजीर हो म्हटल्यावर रोबोट संसदेत साक्ष द्यायला येतो तेव्हा.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2018 17:52 IST

तुम्ही वैमानिक होण्याचं स्वप्न पाहाल पण तोवर विमानं उडवण्याचं काम रोबोटच करायला लागतील त्यावेळी आपण काय करू?

ठळक मुद्देब्रिटनच्या संसदेत रोबोट साक्ष द्यायला आला, आता पुढे.

कालचीच बातमी आहे की ब्रिटनच्या संसदेमध्ये ‘पेप्पर’ नावाच्या रोबोटला पाचारण करण्यात आलं होतं. एआयवर आधारित प्रणालीचा वापर करणारा हा पहिला ‘साक्षीदार’. ‘एआय हाजिर हो’ म्हटल्यावर हा रोबोट संसदेत आला आणि साक्षही त्यानं दिली. जगातल्या सर्वात जुन्या आणि आद्य लोकशाहीच्या साक्षीनेच ही ‘साक्ष’ झाली!अजून एक महत्त्वाची बातमी म्हणजे नागरी विमान उद्योगात अशी वदंता आणि अभ्यास आहे की वैमानिकांऐवजी रोबोट वापरले तर खर्च कमी होईल. आणि तोही थोडाथोडका नसेल. अभ्यास असं सांगतो की आता ज्या विमानांमध्ये दोन वैमानिक असतात त्याऐवजी एक वैमानिक व 1 रोबोट ठेवला तर 15 अब्ज व दोन्ही वैमानिकांऐवजी रोबोट ठेवले तर 35 अब्ज डॉलर्स वाचतील! लक्षात घ्या ही रक्कम थोडीथोडकी नव्हे. आयबीएम या जगद्विख्यात कंपनीच्या वार्षिक उलाढालीच्या 1/3 एवढी ही रक्कम आहे! म्हणजे आर्थिकदृष्टय़ा हे आकर्षक आहे!

मागील आठवडय़ात एका सेवाभावी संस्थेसाठी करिअर नियोजन कार्यशाळा मी घेतली. त्यात एक बारामतीची मुलगी -जिला आर्थिक अडचणीमुळे शिष्यवृत्ती मिळाली होती ती सहभागी झाली होती.  तिनं सांगितलं की शेतजमिनीचा काही भाग विकून तिच्या कुटुंबानं तिला वैमानिक होण्याच्या करिअरसाठी काही लाख रुपये उभारून दिलेत. कुटुंबानं मुलीच्या स्वप्नासाठी ही मजल मारली याचं कौतुक आहे, त्या मुलीच्या धडाडीचंही कौतुक आहे. पण विमानं चालवायच्या क्षेत्रात होऊ घातलेल्या बदलाची मात्र त्या मुलीला काही कल्पनाच नाही. काहीच वर्षात वैमानिकांऐवजी रोबोट विमानं चालवतील याबद्दल तिला काहीच माहिती नव्हती. ही गोष्ट काळजी करण्यासारखीच नाही का? तिच्यासाठी आणि आपल्यासाठीही.मला तर असं वाटतं की बर्‍याच रोजगारसंधींबाबत ही परिस्थिती कमी-अधिक प्रमाणात आणि कमी-अधिक कालखंडात येऊ शकते. म्हणून वाचकहो आपण सावध राहायला हवं. रोजगाराच्या संधी खूप कमी होतील असे भाकीत नसून रोजगाराचं, नोकरी आणि कामाचं स्वरूप बर्‍याच प्रमाणात बदलेल हे भाकीत अनेक शास्त्रज्ञ, अर्थतज्ज्ञ करत आहेत.परवाच पंतप्रधान मोदींनी ‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’च्या कार्यक्रमात दिल्लीत असं सांगितलं की भारतानं ‘इंडस्ट्री 40’चं खुल्या दिलानं स्वागत करायला हवं. इंडस्ट्री 1.0 आणि 2.0 च्या काळात भारत पारतंत्र्यात होता आणि इंडस्ट्री 3.0 च्या वेळी आपण नुकतंच स्वतंत्र होऊन समाजवादी जोखडात अडकले होतो; पण आजच्या इंडस्ट्री 4.0 काळात भारत जोमानं विकसित होतोय आणि हीच आपली संधी आहे. भारतात सध्या टेलेडेन्सिटी ही 93 टक्के आहे. 50 कोटी लोकांकडे मोबाइल आहे. आपल्याला मराठी माणूस म्हणून अजून विशेष अभिमानाची गोष्ट म्हणजे, जगातील चौथं केंद्र जे ‘इंडस्ट्री 4.0’साठी बनेल ते महाराष्ट्रात बनणार आहे. तशी घोषणा पंतप्रधानांनी केली. पहिलं केंद्र सॅन फ्रान्सिस्को, दुसरं टोक्यो, तिसरं बिजिंगला आहे. चौथं केंद्र महाराष्ट्रात प्रामुख्याने ड्रोन्स, एआय व ब्लॉकचेन या तंत्रज्ञानांवर काम करेल. या तीनही तंत्रज्ञानांचा ऊहापोह आपण या लेखमालेत आधी केला आहेच.ब्लॉकचेन याचा वापर आभासी चलनं तयार करण्यात, त्यांचा विनिमय करण्यात व त्याची सुरक्षा यासाठी होतो हे आपल्याला माहिती आहेच. ब्लॉकचेनचा वापर करून तयार झालेल्या प्रणालीचा वापर नीट झाला तर  भ्रष्टाचाराला आळा बसू शकेल तेही राष्ट्रीयस्तरावर. परंतु इतकं पुढे जाण्याची गरज नाही. परवाचीच बातमी आहे की आपल्या भारतात अगदी बंगलुरूमध्ये ‘केम्प फोर्ट मॉल’मध्ये आभासी चलनातील काम करणारी कंपनी ‘उनोकॉईन’ यांनी बिटकॉइन/इथेडियम्चे एटीएम मशीन बसवलंय. ओटीपी वापरून तुम्ही आभासी चलन डिपॉझिट करू शकता व काढू शकता!‘एआय हाजिर हो’ असं म्हणे म्हणे र्पयत इंडस्ट्री 4.0 आपल्या दारात पोहोचून जुनं झालंय ते असं!!