शहरं
Join us  
Trending Stories
1
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
2
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
3
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
4
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
5
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
6
VIDEO: पाहावं ते नवलंच... मुलीने चक्क केली ख्रिसमस ट्री हेअरस्टाईल, नेटकऱ्यांना हसू आवरेना
7
बेस प्राईस अवघी ३० लाख, पण लिलावात या ५ खेळाडूंवर पडला पैशांचा पाऊस, बनले करोडपती
8
गीझर-हीटरमुळे तुमचे वीज बिल जास्त येतंय? या स्मार्ट टिप्स वापरून पैसे वाचवा
9
IPL 2026: ऑक्शनमध्ये चेन्नईचा मोठा डाव! १४ कोटी खर्च केले, पण परफेक्ट खेळाडू निवडला, धोनीची जागा घेणार?
10
BJP Assets: 2014 पूर्वी भाजपाच्या तिजोरीत किती पैसा होता? 11 वर्षांत किती वाढला? जाणून थक्क व्हाल!
11
आत्मनिर्भर भारताच्या दिशेने मोठे पाऊल, भारतातील पहिला स्वदेशी 64- बिट मायक्रोप्रोसेसर Dhruv64 लाँच
12
तब्बल ८ कोटी २० लाखांची बोली, दिल्ली कॅपिटल्सने संघात घेतलेला अकीब नबी दार कोण?
13
बाँडी बिचवर हल्ला करणाऱ्या साजिदचं भारताशी कनेक्शन समोर, २७ वर्षांपूर्वी सोडलं होतं हैदराबाद
14
आईने पाय धरले, तर वडिलांनी गळा आवळला; निवृत्त पोलिस अधिकाऱ्याने मुलीला संपवले, कारण...
15
Foldable Smartphones: सॅमसंग गॅलेक्सी ते गुगल पिक्सेलपर्यंत, यावर्षी लॉन्च झालेले प्रीमियम फोल्डेबल स्मार्टफोन!
16
"त्याला वर्षभर संधी, मला २-३ मॅचनंतर बाहेर काढलं..."; शुबमन गिलला संघाबाहेर न केल्याचा संताप
17
धोक्याची घंटा! फोन वाजला, उचलला पण समोरुन आवाजच नाही आला; Silent Calls चा नवा स्कॅम
18
मुंबईत महायुतीची बैठक संपली; भाजपा-शिंदेसेनेचा फॉर्म्युला ठरला, शेलारांनी आकडाही सांगितला
19
18 डिसेंबरपासून 'या' वाहनांवर बंदी! PUC शिवाय पेट्रोल नाही, 7 लाखांचा दंड; दिल्ली सरकारचा निर्णय
20
IPL 2026 Auction: Mumbai Indians ने घेतला पहिला खेळाडू; Rohit Sharma ला मिळाला नवा जोडीदार
Daily Top 2Weekly Top 5

रेशन कार्डाचं काय झालं?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2019 07:10 IST

आपल्याला नियम माहीत झाले, याबाबत कायद्याची काय बंधने आहेत हे माहीत झाले की आपण कायद्याचा धाक वापरू शकतो. चांगल्या अर्थाने कायदा हातात घेऊ शकतो. 

ठळक मुद्दे 182004950 या टोलफ्री फोनवरील करू शकता.

- मिलिंद थत्ते

पूर्वी आपली अन्न सुरक्षा शेतकर्‍याच्या हातात होती. शेतातले पीक आणि निसर्गातली फळे-कंद-पाने-मासे-पक्षी-प्राणी यावर सर्वाच्या उदरभरणाची सोय होत असे. आता काळ बदलला. सरकारने अन्न सुरक्षेची जबाबदारी घेतली. अन्नधान्य पिकविणार्‍या शेतकर्‍याला योग्य भाव द्यायचा आणि तेच धान्य जनतेला परवडेल अशा दराने उपलब्ध करून द्यायचे ही जबाबदारी शासनाने घेतली.  सार्वजनिक शिधा वाटप किंवा रास्त भाव धान्य दुकानांची म्हणजेच रेशनची व्यवस्था गेल्या कित्येक पिढय़ा आपण वापरत आहोत. 2015 साली महाराष्ट्र लोकसेवा हक्क कायदा झाला. या कायद्याने शासनाच्या प्रत्येक विभागाला व कार्यालयाला सांगितले की, तुम्ही कोणत्या सेवा देता, प्रत्येक सेवा किती दिवसात देता, व त्याला जबाबदार अधिकारी/कर्मचारी कोण, त्या सेवेकरिता फी/पैसे किती - ही माहिती तुमच्या कार्यालयात फलकावर लावा. त्यानुसार सेवा मिळाली नाही तर नागरिक सेवाहक्क कायदा मोडल्याची तक्रार करू शकतात. तुम्ही ग्रामपंचायतीत किंवा तहसीलदार कार्यालयात किंवा कुठल्याही सरकारी यंत्रणेत जाऊन असा बोर्ड वाचून या. बोर्ड नसला तर बोर्ड नाही याचीच तक्र ार दाखल करा ‘आपले सरकार’ पोर्टलवर!22 जून 2016 रोजी अन्न व नागरी पुरवठा विभागाने एक जीआर (शासननिर्णय) प्रसिद्ध केला. जीआर सर्चचे अ‍ॅप वापरत असाल, तर त्यावर 201606221559589806 हा संकेतांक टाकून हा जीआर मिळेल. नाही तर असं करा -  ेंँां.िॅ5.्रल्लया वेबसाइटवर जाऊन उजवीकडच्या सूचनाफलकातून ‘लोकसेवा हक्क अंतर्गत पुरविल्या जाणार्‍या सेवा’ हे डाउनलोड करा. आता मी पुढे जे सांगतो आहे, ते सगळं याच जीआरमधलं आहे. तवा पयलं डाउनलोड मारा नि मग हे वाचा!* नवीन रेशनकार्डचा अर्ज दिल्यापासून ते कार्ड मिळण्याचा काळ फक्त 30 दिवसांचा आहे. * अर्ज स्वीकारण्याचा दिवस 1,* मग दिवस 2 ते 22  या काळात पुरवठा किंवा रेशन निरीक्षक यांनी पडताळणी करायची आहे.* मग 3  दिवस सहाय्यक रेशन किंवा पुरवठा निरीक्षक अधिकारी, मग 3 दिवस पुरवठा अधिकारी किंवा तहसीलदार, आणि तिसावा दिवस रेशनकार्ड देण्याचा. * यासाठी कोणती कागदपत्रे लागतील, किती फी लागेल हेही याच जीआरच्या नवव्या पानावर दिले आहे. * नवीन सुनेचे किंवा नवीन जन्मलेल्या बाळाचे नाव शिधापत्रिकेवर लावायचे असेल तर फक्त 3 दिवस लागणारेत. * आता हे सगळे असे प्रत्यक्षात होत नाही हे मलाही माहीत आहे. गुटखाबंदीचा कायदा केल्यावर आपोआप गुटखा बंद होतो का? नाही ना? पण गुटख्याला विरोध करणार्‍या नागरिकांना त्यामुळे बळ मिळते आणि नियम मोडणार्‍यांना धाक बसतो. तसेच रेशनच्या नियमांचे आहे. आपल्याला नियम माहीत झाले, याबाबत कायद्याची काय बंधने आहेत हे माहीत झाले की आपण कायद्याचा धाक वापरू शकतो. चांगल्या अर्थाने कायदा हातात घेऊ शकतो. 

************************

सेवाहक्क कायद्यात ठरलेल्या मुदतीत किंवा किमतीत आपल्याला रेशन मिळाले नाही तर आपण ती तक्र ार आपण वर दिलेल्या mahafood  वेबसाईटवर किंवा 182004950 या टोलफ्री फोनवरील करू शकता. वेबसाईटवरच्या तक्रारीचा पाठपुरावाही तेथेच करता येतो. तुमची स्वतर्‍ची भले काही तक्रार नसेल, पण तुमच्या गावातल्या एखाद्या गरीबाची तर सोडवू शकाल ना? कायदा वाजवला नाही तर गंजतो, म्हून म्हन्लो येकदा तरी वाजवाच!