शहरं
Join us  
Trending Stories
1
PBKS vs DC : दिल्लीकर समीरची मॅच विनिंग फिफ्टी; पंजाबचं टेन्शन वाढलं! Qualifier 1 च्या शर्यतीत नवं ट्विस्ट
2
Vaishnavi Hagawane: वैष्णवीच्या बाळाला एकनाथ शिंदेंनी घेतलं जवळ, आईवडिलांना दिला धीर; काय घडलं?
3
IPL 2025 Qualifier 1 Race : आता MI चे कट्टर चाहतेही करतील CSK ला चीअर; कारण...
4
हे वागणं बरं नव्हं... खासदारांनी नाराजीचा सूर आळवत रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना धरले धारेवर 
5
'दोषींना पाठिशी घालणाऱ्यांवरही कारवाई करणार', एकनाथ शिंदेंनी घेतली वैष्णवी हगवणेच्या आईवडिलांची घेतली भेट
6
टायपिंगमधून सुटका! तुम्ही जो विचार कराल तो दिसेल स्क्रीनवर; मनातील विचारांनी मोबाइलही चालवता येणार
7
तीन वर्षांच्या मुलाला अंधार असलेल्या खोलीत नेले अन्...; उल्हासनगरात डान्स टीचरचा अल्पवयीन मुलावर अत्याचार
8
अंबा एक्सप्रेसची ओव्हरहेड वायर तुटली! विदर्भ एक्स्प्रेस, नागपूर-पुणे एक्स्प्रेससह अनेक गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले
9
EPF News: 7 कोटींपेक्षा जास्त लोकांसाठी गुड न्यूज! केंद्र सरकारने पीएफवरील व्याजाची केली घोषणा
10
मोठी कारवाई! मराठवाड्यातील चार जिल्ह्यात ४ कोटी ४८ लाखांचा माल जप्त, ४६४ जणांना अटक
11
'...तर कमी लोक मेले असते', पहलगाममध्ये कुंकू पुसलं गेलेल्या महिलांबद्दल भाजप खासदाराचं वादग्रस्त विधान
12
नाव ऐकून गुन्हेगारांना भरायची धडकी! नागपूरचे माजी पोलीस आयुक्त एस.पी. यादव यांचे मुंबईत निधन
13
वैष्णवी मृत्यु प्रकरण : 'कार, दोन पिस्तूल, चांदीची भांडी...' हगवणेंच्या घरून पोलिसांनी जप्त केलं घबाड
14
जिथं संधी मिळते तिथं तो 'बेस्ट'च देतो! टेस्टमधून डावललेल्या श्रेयस अय्यरनं पुन्हा दाखवली आपली ताकद
15
केरळजवळच्या समुद्रात बुडतंय परदेशी जहाज, तटरक्षक दलाने ९ जणांना वाचवले 
16
Mahayuti: छगन भुजबळ यांना काटशह देण्यासाठी शिंदेंच्या शिवसेनेकडून नरेंद्र दराडे, राजकारण काय?
17
"ज्यांना अजून देश समजला नाही त्यांना परराष्ट्र धोरण काय समजणार?’’, बावनकुळेंची राहुल गांधींवर बोचरी टीका  
18
"मला बऱ्याच दिवसांपासून हे सांगायचं होतं की, मी अनुष्कासोबत रिलेशनशिपमध्ये'; तेज प्रताप यादवांनी दिली प्रेमाची कबुली
19
Sai Sudharsan: भारतीय संघात निवड झाल्यानंतर साई सुदर्शनची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला?
20
Crime: लग्न मोडल्याच्या रागातून दिवसाढवळ्या तरुणीची निर्घृण हत्या, घरात घुसून चिरला गळा

रेशन कार्डाचं काय झालं?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2019 07:10 IST

आपल्याला नियम माहीत झाले, याबाबत कायद्याची काय बंधने आहेत हे माहीत झाले की आपण कायद्याचा धाक वापरू शकतो. चांगल्या अर्थाने कायदा हातात घेऊ शकतो. 

ठळक मुद्दे 182004950 या टोलफ्री फोनवरील करू शकता.

- मिलिंद थत्ते

पूर्वी आपली अन्न सुरक्षा शेतकर्‍याच्या हातात होती. शेतातले पीक आणि निसर्गातली फळे-कंद-पाने-मासे-पक्षी-प्राणी यावर सर्वाच्या उदरभरणाची सोय होत असे. आता काळ बदलला. सरकारने अन्न सुरक्षेची जबाबदारी घेतली. अन्नधान्य पिकविणार्‍या शेतकर्‍याला योग्य भाव द्यायचा आणि तेच धान्य जनतेला परवडेल अशा दराने उपलब्ध करून द्यायचे ही जबाबदारी शासनाने घेतली.  सार्वजनिक शिधा वाटप किंवा रास्त भाव धान्य दुकानांची म्हणजेच रेशनची व्यवस्था गेल्या कित्येक पिढय़ा आपण वापरत आहोत. 2015 साली महाराष्ट्र लोकसेवा हक्क कायदा झाला. या कायद्याने शासनाच्या प्रत्येक विभागाला व कार्यालयाला सांगितले की, तुम्ही कोणत्या सेवा देता, प्रत्येक सेवा किती दिवसात देता, व त्याला जबाबदार अधिकारी/कर्मचारी कोण, त्या सेवेकरिता फी/पैसे किती - ही माहिती तुमच्या कार्यालयात फलकावर लावा. त्यानुसार सेवा मिळाली नाही तर नागरिक सेवाहक्क कायदा मोडल्याची तक्रार करू शकतात. तुम्ही ग्रामपंचायतीत किंवा तहसीलदार कार्यालयात किंवा कुठल्याही सरकारी यंत्रणेत जाऊन असा बोर्ड वाचून या. बोर्ड नसला तर बोर्ड नाही याचीच तक्र ार दाखल करा ‘आपले सरकार’ पोर्टलवर!22 जून 2016 रोजी अन्न व नागरी पुरवठा विभागाने एक जीआर (शासननिर्णय) प्रसिद्ध केला. जीआर सर्चचे अ‍ॅप वापरत असाल, तर त्यावर 201606221559589806 हा संकेतांक टाकून हा जीआर मिळेल. नाही तर असं करा -  ेंँां.िॅ5.्रल्लया वेबसाइटवर जाऊन उजवीकडच्या सूचनाफलकातून ‘लोकसेवा हक्क अंतर्गत पुरविल्या जाणार्‍या सेवा’ हे डाउनलोड करा. आता मी पुढे जे सांगतो आहे, ते सगळं याच जीआरमधलं आहे. तवा पयलं डाउनलोड मारा नि मग हे वाचा!* नवीन रेशनकार्डचा अर्ज दिल्यापासून ते कार्ड मिळण्याचा काळ फक्त 30 दिवसांचा आहे. * अर्ज स्वीकारण्याचा दिवस 1,* मग दिवस 2 ते 22  या काळात पुरवठा किंवा रेशन निरीक्षक यांनी पडताळणी करायची आहे.* मग 3  दिवस सहाय्यक रेशन किंवा पुरवठा निरीक्षक अधिकारी, मग 3 दिवस पुरवठा अधिकारी किंवा तहसीलदार, आणि तिसावा दिवस रेशनकार्ड देण्याचा. * यासाठी कोणती कागदपत्रे लागतील, किती फी लागेल हेही याच जीआरच्या नवव्या पानावर दिले आहे. * नवीन सुनेचे किंवा नवीन जन्मलेल्या बाळाचे नाव शिधापत्रिकेवर लावायचे असेल तर फक्त 3 दिवस लागणारेत. * आता हे सगळे असे प्रत्यक्षात होत नाही हे मलाही माहीत आहे. गुटखाबंदीचा कायदा केल्यावर आपोआप गुटखा बंद होतो का? नाही ना? पण गुटख्याला विरोध करणार्‍या नागरिकांना त्यामुळे बळ मिळते आणि नियम मोडणार्‍यांना धाक बसतो. तसेच रेशनच्या नियमांचे आहे. आपल्याला नियम माहीत झाले, याबाबत कायद्याची काय बंधने आहेत हे माहीत झाले की आपण कायद्याचा धाक वापरू शकतो. चांगल्या अर्थाने कायदा हातात घेऊ शकतो. 

************************

सेवाहक्क कायद्यात ठरलेल्या मुदतीत किंवा किमतीत आपल्याला रेशन मिळाले नाही तर आपण ती तक्र ार आपण वर दिलेल्या mahafood  वेबसाईटवर किंवा 182004950 या टोलफ्री फोनवरील करू शकता. वेबसाईटवरच्या तक्रारीचा पाठपुरावाही तेथेच करता येतो. तुमची स्वतर्‍ची भले काही तक्रार नसेल, पण तुमच्या गावातल्या एखाद्या गरीबाची तर सोडवू शकाल ना? कायदा वाजवला नाही तर गंजतो, म्हून म्हन्लो येकदा तरी वाजवाच!