शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

आयटीत काय करतो ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2017 03:09 IST

आयटीत काम करणारे ७० टक्के इंजिनिअर अन्य शाखांचे आहेत. डिग्री कुठलीही असो, टामटूम प्रशिक्षण देऊन कंपन्या त्यांना कामाला लावतात आणि तरुण इंजिनिअर ही नोकरी करतात. कशासाठी? - पैशासाठी!!

डिग्री ‘इकडची’ जॉब ‘तिकडचा’ 

इंजिनिअरिंग झालं.कॅम्पस सुरू झाले की सगळ्यात जास्त नोकºया कुणाला मिळतात? आणि नोकºयांसोबतच चांगली पॅकेजेस कुणाला मिळतात?- हा प्रश्न इंजिनिअरिंग कॅम्पसमध्ये कुणालाही विचारा, उत्तर एकच- कॉम्प्युटर आणि आयटी. या इंजिनिअर्सना चटकन नोकºया मिळतात. त्याखालोखाल मेकॅनिकल आणि मग इलेक्ट्रॉनिक्स, सिव्हिल, इलेक्ट्रिकल, टेलिकम्युनिकेशन यांसह अन्य शाखांचा नंबर लागतो.आयटी-कॉम्प्युटर सोडून बाकीच्या इंजिनिअर्सना कोण नोकºया देतं?उत्तर शोधलं तर आयटी क्षेत्रात सध्या काम करत असणाºया इंजिनिअर्सपैकी अनेक जण हे कॉम्प्युटर किंवा आयटीव्यतिरिक्त इतर शाखांचे इंजिनिअर आहेत. काही अनुभवी लोकांच्या मते त्यांची संख्या ७० टक्क्यांहून अधिक आहे.मेकॅनिकल केलं तर आयटीत काय करतो, असा जाब विचारून या मुलांना निरुत्तर करणं सहज शक्य आहे. पण आयती चालत आलेली उत्तम पगाराची नोकरी ही मुलं का नाकारतील, हा एक प्रश्न सगळ्यात महत्त्वाचा ठरतो. दुसरा मुद्दा म्हणजे, चार वर्षं घालवून घेतलेल्या पदवी शिक्षणाचा फोलपणाही त्यामुळे ठळकपणे अधोरेखित होतो.शिकताना महत्त्वाची वर्षं एका विशिष्ट शाखेचा अभ्यास करण्यात घालवल्यानंतर पूर्णपणे वेगळ्याच शाखेशी निगडित विषयात निवडलेली नोकरी, त्या शाखेबद्दलची आवड, त्याच्या निवडीमागचे विचार, ही नोकरी करण्यामागची कारणं, ती केल्याने मिळणारं समाधान या सगळ्याच बाबतीत प्रश्न उपस्थित करते.बाकी शाखांमध्ये एवढ्या नोकºया उपलब्ध नाहीत का? असतील तर त्या आयटीइतके पॅकेज देत नाहीत का? - हे प्रश्नही आहेतच. दुसरीकडे यशस्वी इंजिनिअर कोण? जो चांगले पैसे कमावतो तो, हे आपल्या समाजानं तयार केलेलं समीकरण. या साºयातून इंजिनिअर्स मोठ्या प्रमाणात आयटी क्षेत्राकडे आकृष्ट होतात. गेल्या दोन दशकात, विशेषत: जागतिकीकरणानंतर लोकांच्या मनात संपत्ती, यश आणि त्यातून मिळणारी स्थिरता याबाबत विश्वासार्हता निर्माण करण्यात आयटी क्षेत्र इतर उद्योगांच्या तुलनेने सर्वाधिक यशस्वी ठरलं. त्यामुळे इतर शाखांमधील अभियंत्यांचादेखील ओढा या क्षेत्राकडे वाढत गेला; मात्र आता याच क्षेत्रापुढे संकटांचा डोंगर उभा राहिल्याचं चित्र दिसतं आहे. आणि त्यामुळे, कुठलीही डिग्री घेऊन जेमतेम इंजिनिअर झालेले पुढे काय करतील, असा एक मोठा प्रश्न इंजिनिअरिंग क्षेत्रापुढे येऊन उभा ठाकला आहे.दुसरीकडे, आयटीत आॅटोमेशन आल्यानं आता त्यांना या जेमतेम डिग्री इंजिनिअर्सचीही गरज उरलेली नाही. त्यामुळे लोंढा भरती आता थांबू शकते. प्रश्न मात्र तसाच आहे की, प्रचंड प्रमाणात इंजिनिअर तयार करणारी व्यवस्था आता एवढ्या इंजिनिअर्सचं करणार काय?त्यात इंजिनिअर झालेल्यांनाही सरसकट सगळीकडे नोकºया उपलब्ध आहेत असं नाही. शहराशहरांगणीक नोकरीच्या संधी बदलतात. मुंबई, बेंगळुरू, हैदराबाद, पुणे, चेन्नई या पाच महत्त्वाच्या शहरांत नोकºयांच्या सर्वाधिक संधी उपलब्ध आहेत. आणि देशभर सर्वत्र पसरलेली अभियांत्रिकी महाविद्यालयं मात्र मुबलक आहेत. या महाविद्यालयांमधून मिळणाºया शिक्षणाच्या दर्जाविषयीची परिस्थितीदेखील काळजी करण्यासारखी आहे. 'अ२स्र्र१्रल्लॅ े्रल्ल२ि' नावाच्या दिल्लीस्थित एका संस्थेने मागील वर्षी केलेल्या सर्वेक्षणानुसार जेमतेम सात टक्के विद्यार्थी हे मूलभूत अभियांत्रिकी नोकरीसाठी म्हणजेच खºया अर्थानं इंजिनिअर म्हणून काम करण्याच्या लायक आहेत. इंजिनिअर म्हणून संख्यात्मक वाढ चिक्कार असली, तरी इंजिनिअर म्हणून काम करण्याची कौशल्यं मात्र अत्यंत तुरळक आहेत. इंजिनिअरिंग शिक्षणाची दुर्दशा मोठी आहे ही चिंता तर हल्ली सतत वाहिली जातेच, त्याचंच हे एक मोठं ठळक चित्र आहे.राजकीय आणि आर्थिक हेतूंनी गावोगावी उघडलेली इंजिनिअरिंग महाविद्यालये, त्यात गुणवत्तेकडे होत असलेलं दुर्लक्ष, शिक्षणासाठी आवश्यक उपकरणांची वानवा, सोयीसुविधांचा अभाव या सगळ्याच गोष्टी सर्वत्र सर्रास दिसतात. या महाविद्यालयांतून शिकवणाºया शिक्षकांचा दर्जा, त्यांचं ज्ञान हा तर संपूर्ण वेगळ्याच चर्चेचा विषय. दोष केवळ महाविद्यालयांचा नाही, तर तो एकूणच अभियांत्रिकी शिक्षण पद्धतीचा आहे. काळानुरूप न बदललेले अभ्यासक्र म, प्रात्यक्षिकांपेक्षा लेखी अभ्यासावर असलेला अधिक भर या सगळ्यातून उद्योगविश्वाला असलेल्या अपेक्षा विद्यार्थ्यांकडून पूर्ण होत नाहीत. अभ्यासक्र मात अजूनही जुन्या मूलभूत गोष्टींचा अंतर्भाव आहे याकडे सकारात्मक दृष्टीने बघायचं ठरवलं तरी अवघडच; कारण मुलांच्या मूलभूत संकल्पनाही कच्च्या आहेत, ही तक्र ार जवळपास सर्वच शाखांत कायम. मूलभूत ज्ञानाचा आणि नावीन्याचा अभाव विद्यार्थ्यांच्या अभियांत्रिकी नोकरीसाठीच्या मर्यादा स्पष्ट करतात. त्यातूनच चांगली नोकरी मिळण्याच्या अडचणी निर्माण होतात. पण शिक्षण पद्धती, महाविद्यालयं यांच्या चुकांवर बोट ठेवतानाच दुसरीकडे या मुलांसमोर असतो माहितीचा महासागर. मोबाइलवर सगळी माहिती उपलब्ध असतानाही आपल्याच इंजिनिअरिंगच्या शाखेत काय नवीन घडतं आहे, जग कसं बदलतं आहे हे अनेक मुलांना कळतही नाही.इंजिनिअर झाल्यावरच काहींना एकदम जाग येते की, आपल्याला तर काहीच येत नाही. आपल्याला आपलं इंजिनिअरिंगही धड कळलेलं नाही.आणि मग इंजिनिअर होऊन कुठंतरी चिकटणं किंवा काहीतरी टामटूम कोर्स करत राहणं एवढंच अनेकांच्या वाट्याला येतं.

१. अन्य ब्रॅँचला भाव नाही हे कुणी ठरवलं?

२. पाच आकडी पगार ही चांगला इंजिनिअरअसल्याची खूण आहे का?

३. पाच वर्षे ज्या शाखेत शिक्षण घेतलं,त्यातलं काहीच इंजिनिअरला येऊ नयेअसं का होतंय?

४. गल्लीतल्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्रवेश घेऊन आपण काय मिळवणार, विचारा स्वत:ला!

भारत सरकारचा महत्त्वाकांक्षी ‘मेक इन इंडिया’ प्रकल्प सध्या चर्चेत आहे. येत्या पाच वर्षांच्या काळात उत्पादन क्षेत्रात नव्या दहा कोटी नोकºयांच्या संधी उपलब्ध होतील असं सरकारचं म्हणणं आहे. स्टार्टअप इंडिया, डिजिटल इंडिया यांसारख्या उपक्र मांतून आणखी संधी उपलब्ध होतील असे दावे केले जातात.खरंच इतक्या मोठ्या प्रमाणात नोकºया उपलब्ध होतील का? हा वादाचा मुद्दा असला तरी संधी उपलब्ध होतील हे नक्की. कारण उत्पादन क्षेत्र वाढलं तर त्यातून सर्वच अभियांत्रिकी शाखांना नव्या संधी मिळतील अशी आशा आहे. मात्र त्या संधी स्वीकारण्याची इंजिनिअर्सची तरी तयारी आहे का, हा एक मोठा प्रश्न आहे. अभियांत्रिकी क्षेत्रात उद्योगांची वाढ ही एकमेकांच्या साहाय्याने होत असते. एका उद्योगाच्या गरजेतून बाकी इतर उद्योग उभे राहत असतात. ही प्रक्रि या पुढे चालत राहते. त्यामुळे नव्या नोकºया निर्माण करण्याची जबाबदारी चांगल्या अभियंत्यांच्या जोरावर हे उद्योगच पार पाडू शकतात. फक्त प्रश्न उरतो एवढाच की, असे मूलभूत ज्ञानाने परिपूर्ण, नावीन्याची आस असलेले, प्रयोगशील, ‘चांगले अभियंते’ आपल्याकडे आहेत का?- दुर्दैवानं या प्रश्नाचं उत्तर फारसं आशादायक नाही!