शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

लग्न नावाचा वन वे

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2018 14:45 IST

हे स्थलांतर मुलीचं आयुष्यच बदलून टाकतं, कायमचं !

- वैष्णवी श्रीकांत तर्कसे, परभणी

स्थलांतर ही एक अशी घटना आहे, जी आयुष्यात आमूलाग्र बदल घडवून आणते. प्रत्येकाचे स्थलांतराचं कारण आणि अनुभव अतिशय वेगवेगळे असतात, कधी परिस्थितीमुळे, कधी शैक्षणिक कारणांमुळे तर कधी अगदीच आवड म्हणून लोक स्थलांतर करत असतात.स्थलांतर नेहमीच ऐच्छिक असेल असंही नाही; पण ते अनिवार्य मात्र नक्कीच असतं. अशाच एका अनिवार्य स्थलांतरणाचा अनुभव प्रत्येक मुलीच्या कपाळी लिहिलेला असतो.ते स्थलांतर म्हणजे लग्न.लग्न करून सासरी जाणं. आपलं घर सोडणं आणि कायमचं निघून जाणं. हे खरंच वन वे तिकीट आहे. क्षणभर विचार केला तर जाणवतं की हे स्थलांतर करायला किती मोठं धाडस लागत असेल.स्थलांतर एरव्ही काही अंशी सुसह्य असतं, कारण त्या प्रकारच्या स्थलांतरणात एक मनस्वी स्वातंत्र्य असतं. आपण ठरवून गाव-शहर बदलतो. स्वतंत्र होतो, अनेकदा एकटेच होतो. पण लग्न करून एखादी मुलगी जेव्हा सासरी जाते तेव्हा तिचं आयुष्य अनेक नात्यांमध्ये बांधलं जातं. सासरी गेल्यावर कुठलाही निर्णय घेताना त्या निर्णयाच्या परिणामांचा सर्वांगाने विचार तिला करावा लागतो. एवढंच नव्हे तर हे स्थलांतर करताना तिला पुष्कळ पूर्वतयारीसुद्धा करावी लागते, जसं की स्वत:च्या स्वभावात थोडाफार बदल करावा लागतो, स्वभाव जर हट्टी असेल तर त्याला मुरड घालावी लागते. सासरच्या लोकांचे स्वभाव लक्षात घेत तिला स्वत:च्या सवयींमध्ये बदल करावे लागतात. सर्वात महत्त्वाचं म्हणजे जुळवून घेण्याची वृत्ती अंगीकारावी लागते. लग्न करून ती एका गावातून दुसऱ्या गावात, शहरात जात असली किंवा अगदी एका गावातच दुसºया घरी जात असली तरी हा स्थलांतरानंतरचा बदल मोठाच असतो. संपूर्ण आयुष्यच बदलून टाकणारा असतो.या प्रकारच्या स्थलांतरणात यू टर्न घेण्याची मुभाच नसते. सासरी जाणं हा वन वे आहे. या वन वेवरून मुलगी पुन्हा मागे फिरूच शकत नसता. जगण्याच्या वन वेवर जोडीदाराच्या साथीने स्वत:च्या आयुष्याची गाडी व्यवस्थितपणे चालवण्याचं सामर्थ्य कमवावं लागतं. ती ते कमावतेही, नवीन जग निर्माण करते.सासरी गेलेल्या मुलीला अनेक प्रकारची माणसं तर भेटतात आणि इतकंच नव्हे तर त्या माणसांच्या रूपानं तिच्या आयुष्यात अनेक नवीन नातीही डोकावतात. ती नाती निभावत असताना तिला अनेक जबाबदाºया निभवाव्या लागतात. त्यासाठी जोडीदाराचा भक्कम आधार मात्र आवश्यक असतो.तिचं हे स्थलांतर अनेक सुखदु:खाचे क्षण देतं. आपलं आयुष्य किती बदललं लग्नानंतर असंही तिला वाटतंच. तेव्हा तिचाही विश्वास बसत नाही की या एका स्थलांतरानं आपल्याला इतक्या गोष्टी शिकवल्या..आयुष्याचा नूरच बदलून टाकला..