शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
3
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
4
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
5
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
6
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव
7
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
8
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
9
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
10
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
11
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
12
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
13
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
14
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
15
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
16
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
17
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
18
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
19
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
20
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट

हम है ‘राही’ प्यार के- टुरिझम अँण्ड हॉस्पिटॅलिटी सर्व्हिसेस

By admin | Updated: May 14, 2014 14:53 IST

जगातल्या कुठल्याही देशात तुम्ही जा, गरीब किंवा श्रीमंत. एक गोष्ट तुम्हाला नक्कीच जाणवेल. तिथल्या एअरपोर्टवर तर आपल्याला प्रत्यक्ष पाहायलाच मिळेल. भारतात येण्यासाठी अनेकांचा ओढा असतो.

जगातल्या कुठल्याही देशात तुम्ही जा, गरीब किंवा श्रीमंत. एक गोष्ट तुम्हाला नक्कीच जाणवेल. तिथल्या एअरपोर्टवर तर आपल्याला प्रत्यक्ष पाहायलाच मिळेल. भारतात येण्यासाठी अनेकांचा ओढा असतो. कारणं अनेक असतील. कोणाला निव्वळ पर्यटनासाठी म्हणून भारतात यायचं आहे, कोणाला इथल्या अध्यात्मात रस आहे, कोणाला इथल्या पुरातन संस्कृतीत रस आहे, कुणाला भारतातल्या नव्या वातावरणात मोठय़ा प्रमाणात पैसा आणि बिझनेस दडलेला दिसतो आहे, कुणाला इथलं अँडव्हेन्चर खुणावतं आहे, कुणाला इकोटुरिझम भुरळ घालतं आहे, तर लहान-मोठय़ा आजारांनी हैराण झालेल्यांना स्वस्त आणि खात्रीशीर इलाजासाठी भारतात यायचं आहे. मेडिकल टुरिझमच्या वाढीचा वेग तर अक्षरश: थक्क करणारा आहे. उपचारांसाठी जगभरातून जवळजवळ पहिल्या क्रमांकांची पसंती भारताला आहे आणि तब्बल तीस टक्क्यांपेक्षाही अधिक राक्षसी वेगाने भारतातले मेडिकल टुरिझम फोफावते आहे. 
या उद्योगातून भारताला मोठय़ा प्रमाणात परकीय गंगाजळी तर मिळते आहेच, पण या उद्योगानं खूप मोठय़ा प्रमाणात रोजगारही पुरवला आहे. त्यात सातत्याने वाढ होत आहे. 
ही वाढ किती आहे?
आकड्यांत आणि तेही वर्ल्ड ट्रॅव्हल अँण्ड टुरिझम कौन्सिलच्या अभ्यासानुसार सांगायचं तर सात लाख कोटी रुपयांची उलाढाल सध्याच या उद्योगाच्या माध्यमातून होते आहे आणि त्यातून ४0 कोटी लोकांना रोजगार मिळतो आहे. वार्षिक आठ टक्के दराने या उद्योग-व्यवसायात वाढ होते आहे. ती कायम राहील आणि येत्या किमान दहा-पंधरा वर्षांत तरी वाढीचा वेग कमी होणार नाही, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. जगात सध्या अत्यंत वेगाने भारतात हा उद्योग वाढतो आहे आणि रोजगाराच्या अनंत संधीही त्यामुळे निर्माण झाल्या आहेत. फास्टेस्ट ग्रोइंग टुरिझम इंडस्ट्री म्हणून  जगभरात आताच भारताला तिसरा क्रमांक मिळालेला आहे. देशांतर्गत आणि देशाबाहेरून भारतात येणार्‍या पर्यटकांची संख्या मोठय़ा वेगाने वाढते आहे. सर्वच पर्यटकांची महाराष्ट्र, तामिळनाडू आणि दिल्ली या राज्यांना आणि त्यातही मुंबई, दिल्ली, चेन्नई आणि आग्रा या शहरांना सर्वाधिक पसंती आहे. जगभरातले पर्यटक जणू भारताच्या प्रेमातच पडले आहेत. 
दुधात साखर म्हणजे खुद्द भारत सरकारही या क्षेत्राच्या वाढीसाठी खूपच संवेदनशील आणि आग्रही आहे. त्यामुळे टुरिझमबरोबरच ‘हॉस्पिटॅलिटी’ (आतिथ्यशीलता) क्षेत्रातही आंतरराष्ट्रीय मार्केट उपलब्ध होतं आहे. या वारूवर आत्ताच स्वार झालात तर जगावर राज्य कराल !.
 
 
फूड अँण्ड बेव्हरिज सर्व्हिस
पर्यटनाबरोबरच पर्यटक आजकाल खाद्य-पेयालाही तितकंच किंबहुना कांकणभर अधिकच महत्त्व देतात. खान-पान सेवा चांगली नसल्यामुळेच अनेक प्रवासी कंपन्यांनी गटांगळ्या खाल्ल्याचीही उदाहरणे आहेत. त्यामुळेच या सेवेला अनन्यसाधारण महत्त्व आलं आहे. 
 
फ्रंट ऑफिस स्टाफ
पर्यटनाला तर प्रत्येकालाच जायचं असतं. पण सगळ्याच गोष्टींची त्यांना माहिती असेलच असं नाही. त्यामुळे प्रवासी कंपन्या, तशी सेवा देणार्‍यांच्या कार्यालयांत इच्छुक पर्यटकांचा राबता मोठय़ा प्रमाणात असतो. त्यांचं आगत-स्वागत आणि त्यांच्या शंकांचं समाधान करून योग्य सेवा पुरवणं हे अत्यंत महत्त्वाची बाब. त्यासाठी हुशार, चुणचुणीत तरुणाईला आपल्याकडे खेचण्यासाठी सारेच उतावीळ झालेत. आपल्याकडे हे कौशल्य असेल तर या जागा तुमच्यासाठीच.
 
टिकेटिंग अँण्ड सेल्स
प्रवाशांना पर्यटनाला घेऊन जायचं आणि त्यांना उत्तम सेवा द्यायची तर त्याची सुरुवात किमान महिना-दोन महिना आधीच होते. तिकिटं बुक करण्यापासून तर ऐनवेळी ती मिळविण्यापर्यंत आणि पर्यटकांना उत्तम सेवा देऊन त्यांना आपल्याकडे खेचण्यासाठी मोठी  कसरत करावी लागते. ही कसरत करू शकणार्‍यांसाठी संधीची दारं कालही सताड उघडी होती, आजही आहेत, उद्या तर त्यांच्यासाठी पायघड्या अंथरल्या जातील.
 
टूर गाईड्स
पर्यटनाला जाणं ही गोष्ट आता चैनीची राहिलेली नाही. रोजच्या धबडग्यातून उसंत मिळावी आणि फ्रेश होऊन पुन्हा कामाच्या राहाटगाडग्याला जुंपण्यासाठीही अनेक जण आता सहकुटुंब पर्यटनाला जातात. काही जण प्रवासी कंपन्यांबरोबर, काही जण स्वत:च तर काही जण आपल्याला हव्या त्या ठिकाणी जाणं पसंत करतात. त्यांच्यासाठी ‘टेलरमेड टूर्स’ आयोजित करून देणं हा सध्या एक खूप मोठा व्यवसाय झालेला आहे. पुढच्या काळात त्यात आणखीच ‘बरकत’ आहे.