शहरं
Join us  
Trending Stories
1
इसकी टोपी उसके सर और उसकी...; कोकाटे आणि दत्तात्रय भरणे यांच्यातील मंत्रि‍पदाची आदलाबदली!
2
प्रांजल खेवलकरच्या लॅपटॉपमध्ये अनेक महिलांचे पार्टी अन् त्यानंतरचे आक्षेपार्ह व्हिडिओ!
3
IND vs ENG 5th Test Day 1 Stumps: नायर-वॉशिंग्टन जोडी जमली अन् टीम इंडियावरील मोठं संकट टळलं!
4
विधानसभेच्या निकालांमध्ये तफावत नाही; ईव्हीएम तपासणीनंतर निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण
5
माल चाहिए क्या? xxx वाला? विचारल्यानंतर खेवलकर म्हणाले होते, 'ठेवून घ्या'! चॅटिंग आलं समोर
6
Karun Nair Fifty : 'त्रिशतकवीर' करुण नायरच्या भात्यातून ३१४६ दिवसांनी आली 'फिफ्टी'!
7
Nashik Crime: भयंकर! पत्नीला गुंगीचे औषध पाजून नग्नावस्थेत बनवले व्हिडिओ, दोन वर्ष डान्स बारमध्ये नाचायला लावले
8
उत्तर प्रदेशमधील मंत्र्यांनी आपल्याच सेक्रेटरीला पाठवलं तुरुंगात, कारण वाचून तुम्ही म्हणाल...
9
सरकारी नोकरी शोधणाऱ्यांसाठी उत्तम संधी, लवकरच ओआयसीएलमध्ये मोठी भरती!
10
IND vs ENG: टीम इंडियासोबत पाचव्या कसोटीत 'चिटींग'? पंच कुमार धर्मसेना यांच्यावर नेटकऱ्यांचा आरोप
11
"भगवा नाही, सनातनी किंवा हिंदुत्ववादी दहशतवाद म्हणा"; अमित शाहांचा उल्लेख करत पृथ्वीराज चव्हाणांचे गंभीर विधान
12
सात वर्षांत ४२ वेळा तिने दिला नकार, अखेर ४३व्यावेळी त्यानं केलं असं काही, नकारच देऊ शकली नाही ती
13
Shubman Gill Run Out : साईला कॉल देत गिलनं उगाच केली घाई! इंग्लंडला फुकटात मिळाली विकेट (VIDEO)
14
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजपची रणनीती! माजी खासदार-आमदारांवर सोपवली मोठी जबाबदारी
15
IND vs ENG : 'ती' साथ देणार अशा परिस्थितीत त्यानं विश्रांती घेतली; सोशल मीडियावर बुमराह झाला ट्रोल
16
आमदाराच्या कारची दुचाकीला धडक, रेल्वे पुलावरून खाली कोसळून तरुणाचा मृत्यू, मृत तरुण भाजपा नेत्याचा भाऊ  
17
बांगलादेशी मॉडेलला भारतात अटक! पोलिसांनी राहत्या घरावर टाकली धाड अन् आत जे सापडलं...
18
Anilkumar Pawar ED Raid: अनिलकुमार पवार यांना त्यांच्या आईने गिफ्ट केलेला नाशिकमधील प्लॉट जप्त
19
कृषीखातं पुन्हा धनंजय मुंडेंकडे? सह्याद्री अतिथीगृहावर भेटीगाठींना वेग!
20
निवडणूक जिंकणं कठीण की पत्नीचं मन? राघव चड्डांनी दिलं असं उत्तर, परिणीतीही झाली अवाक्

वाटसरू...जिथं गेलो तिथं जगायला शिकलो..

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2017 05:00 IST

चौथीत असताना घर सोडलं, त्यानंतर पाचवेळा स्थलांतर केलं, पण कुठंही गेलो तरी उपरेपणा जाणवला नाही. कारण मी जिथं गेलो तिथं जगायला शिकलो..

मराठवाड्यातील बीड जिल्ह्यातील धारूर तालुक्यात बालाघाट डोंगररांगांच्या पायथ्याशी वसलेले देवठाणा हे माझं गाव. गावात पहिंली ते चौथीपर्यंतची जिल्हा परिषद प्राथमिक शाळा. तिथंच माझं तिसरीपर्यंत शिक्षण झालं. आजोबांवर वारकरी संप्रदायाचा प्रभाव होता. त्यामुळे लहानपणीच मला तुकाराम महाराजांच्या अभंगांची ओळख झाली. मी कीर्तनकार व्हावं ही त्यांची इच्छा होती. मात्र वडिलांवर डाव्या विचारांचा प्रभाव आणि त्यांना शिक्षणाची विशेष आवड असल्यानं माझी रवानगी तिसरीनंतर अंबाजोगाईला झाली. हे माझं पहिलं स्थलांतर. योगेश्वरी नूतन विद्यालयात मी चौथीला प्रवेश घेतला. अंबाजोगाई माझ्या गावापेक्षा मोठं, मात्र तसं छोटंसंच शहर होतं.नवीन नवीन मी घाबरून गेलो. मात्र लवकरच मी इथल्या शहरी वातावरणात एकरूप झालो. शाळेत मी हुशार विद्यार्थी होतो. मला आठवतंय चौथीचा निकाल लागला आणि मी शाळेत दुसरा आलो तेव्हा मी राहत असलेल्या वसतिगृहातले संभाजी लांडे सर मला खांद्यावर घेऊन नाचले होते. ती प्रेरणा आजही मी माझ्या मनात जिवंत ठेवली आहे. आठवीत असताना त्यावेळेस आम्हाला इतिहासाला कराड सर होते. ते अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे काम करत होते. त्यांचा माझा व्यक्तिमत्त्वावर विशेष प्रभाव पडला तो आजही कायम आहे.नववीत मला नवोदय विद्यालय, गढी (ता. गेवराई, जि. बीड) येथे प्रवेश मिळाला. हे झालं माझं दुसरं स्थलांतर. बारावीपर्यंत माझं शिक्षण तिथंच. आम्हाला दहावीला गणिताला विनोद सर होते. त्यांच्यामुळे मला गणिताची प्रचंड आवड निर्माण झाली. बारावीनंतर अभियांत्रिकी सीईटीच्या तयारीसाठी एक वर्ष लातूरला गेलो. येथे नरहरे सरांचं विशेष मार्गदर्शन मिळालं.मला पुण्यात शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात अर्थात सी.ओ.ई.पी.त प्रवेश मिळाला. मी पुण्यात आलो. तिथून जवळच आळंदी आणि देहू होते. या गावांशी माझी भावनिक जवळीक होती. पुण्यातील दहीहंडीचा, गणपती उत्सवाचा मनसोक्त आनंद लुटला. जवळचे किल्ले पाहिले. मात्र पुण्यात आल्यावर प्रथमच मराठवाड्याचं मागासलेपण जाणवलं. लक्षात येत गेलं. पुढे पदवी पूर्ण झाली आणि माझी निवड महावितरणमध्ये कनिष्ठ अभियंता म्हणून झाली. उस्मानाबाद जिल्ह्यात माझी नियुक्ती झाली. मी पुन्हा स्थलांतर केलं. तुळजापूर व परंडा तालुक्यात असताना विद्युत रोहित्र दुरु स्ती, नवीन वीज जोडणी यामुळे शेतकºयांच्या नेहमी संपर्कात आलो. शासकीय अधिकारी म्हणून काम करताना मी माझ्यातला शेतकºयाचा मुलगा कायम जिवंत ठेवला.दरम्यान माझी एम.पी.एस.सी. मार्फत सहायक अभियंता म्हणून राज्य शासनात निवड झाली.आता मी पाचव्यांदा स्थलांतर करत अकोला मुख्यालयी रु जू झालो. प्रथमच मला विदर्भ पाहायला, अनुभवायला मिळाला. इथली माणसं प्रेमळ, कष्टाळू व प्रामाणिक आहेत. वºहाडी भाषा बोलण्याचा प्रयत्न आता मी करतोय.स्थानिक भाषा, परंपरा, रीती, परिस्थिती समजून घेतली की आपल्या वाट्याला उपरेपणा येत नाही हा माझा अनुभव आहे.चौथीत घर सोडून स्थलांतर केलेला दिवस मला आजही आठवतोय. घरची संस्काराची शिदोरी सोबत घेऊन एक वाटसरू बनून निश्चित ध्येय पूर्ण करण्याचा प्रवास आजही सुरूच आहे. आज शासनात चांगल्या अधिकारी पदावर कार्यरत आहे. आई- वडिलांचं स्वप्न पूर्ण केलं याचा आनंद मनाशी घेऊन प्रवास सुरू आहे..

- अजित सुदासराव सोळंके, सहायक अभियंता, जलसंपदा विभाग, महाराष्ट्र शासन.रा. देवठाणा, ता. धारूर, जि. बीड