शहरं
Join us  
Trending Stories
1
Womens World Cup 2025 : W W W W..! श्रीलंकेच्या अटापट्टूनं शेवटच्या षटकात फिरवली मॅच! बांगलादेश स्पर्धेतून 'आउट'
2
उमेदवारी अर्ज दाखल करताच त्याच क्षणी २१ वर्ष जुन्या प्रकरणात RJD उमेदवाराला झाली अटक, कारण...
3
Asrani Death: 'अंग्रेजों के जमाने का जेलर' काळाच्या पडद्याआड; ज्येष्ठ अभिनेते असरानी यांचे निधन
4
अभिनेते असरानींची शेवटची पोस्ट, ७ दिवसांपूर्वी या अभिनेत्यासाठी इंस्टाग्रामवर लिहिले होते - "मिस यू..."
5
"आमदाराला कापा बोललो तर राग येतो, रोज शेतकरी मरतोय त्याचा राग का येत नाही?"; बच्चू कडू आक्रमक
6
चीनवर लावलेले १०० टक्के टॅरिफ अमेरिका कमी करणार?; ट्रम्प यांनी शी जिनपिंग यांच्यासमोर ठेवली अट
7
असरानी यांंचं महाराष्ट्राशी होतं विशेष नातं, वेळ मिळेल तेव्हा पुण्यात जाऊन करायचे 'ही' खास गोष्ट
8
'शोले'तील जेलरची भूमिका साकारण्यासाठी असरानींना हिटलरकडून कशी मिळालेली प्रेरणा? वाचा हा किस्सा
9
जवळच्या लोकांच्या उपस्थितीत असरानी यांच्यावर अंत्यसंस्कार, कुटुंबाने पूर्ण केली अभिनेत्याची 'ही' इच्छा
10
भारताचा 'छोटा पॅकेट' पुन्हा करणार 'बडा धमाका'! वैभव सूर्यवंशी आता 'या' स्पर्धेत खेळणार...
11
पुतिन-ट्रम्प यांच्या मोठी बैठक होणार; युक्रेनचे झेलेन्स्की म्हणतात- "मीही यायला तयार पण..."
12
ODI Cricket Record: चामारी अटापट्टूचा मोठा विक्रम; देशासाठी 'अशी' कामगिरी करणारी पहिलीच!
13
बिहारमध्ये महाआघाडीला आणखी एक धक्का, मित्रपक्षाची निवडणुकीतून माघार, आरजेडी- काँग्रेसवर केले गंभीर आरोप 
14
उपोषणकर्त्याला घरी का बोलवलं? संजय शिरसाट म्हणाले, "माझा आणि त्याचा प्रवासाचा वेळ सारखा होता"
15
"विरोधकांच्या ‘लवंग्या-सुरसुरी’चा धुरळा, महायुतीचा ‘ॲटम बॉम्ब’ फुटला की..."; एकनाथ शिंदेंचा इशारा
16
LPG घेऊन जाणाऱ्या जहाजावर भीषण स्फोट; 23 भारतीयांना वाचवले, 2 बेपत्ता
17
Kawasaki: कावासाकीनं लॉन्च केली खतरनाक बाइक; किंमत महिंद्रा थारपेक्षाही जास्त!
18
21 वर्षे जुन्या दरोडा प्रकरणात RJD उमेदवाराला अटक; अर्ज दाखल करताच पोलिसांनी घेतले ताब्यात
19
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामय्या यांच्या कार्यक्रमात १० जण पडले आजारी, समोर आलं असं कारण
20
पुतण्याच्या प्रेमात आंधळी झाली दोन मुलांची आई; पोलीस ठाण्यातच कापली हाताची नस!

माहितीचा अधिकार वापरा आणि खड्याचे दोषी कोण हे विचारा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2019 16:55 IST

एका पावसात रस्त्यात खड्डे पडले, कायम हेच, कधी बदलणार? अशी नुस्ती कटकट करू नका. विचारा सरकारला की, हा खड्डा नेमका कुणाचा दोष?

- मिलिंद थत्ते 

रस्ता आताच झाला. पावसाळ्याच्या जस्ट आधी आणि खड्डे पडलेसुद्धा! काय कंत्राटदाराने पैसे खाल्ले का अभियंत्यांनी खाल्ले, काय कळंना. ते गेले त्यांची कमाई करून नि आम्हाला हितं रोज जीव मुठीत धरून त्या रस्त्यावरून जावे लागते ना बे! अपघात होतील, म्हातारे-कोतारे पडतील, मग बातम्या येतील अन मग कायसुदीक फरक नाय पडनार. पुढची 10 वर्षे तरी रस्ता तसाच सहन करावा लागतोय.

-अशी बडबड करून बोटं मोडायची किंवा बोटात लेखणी घ्यायची नि एक माहिती अधिकार ठोकायचा. बोला काय केल्यानं आपल्या आवतीभोवतीचं चित्र बदलेल?बोला, हाय का तयारी? मग असं करा - माहिती अधिकाराचा नमुना अर्ज घ्या. तसाच अर्ज हाताने लिहिला तरी चालतो. टाइप केलेला, छापलेलाच पाहिजे असं काही नाही. त्यात तुमच्या जवळच्या सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयाचं नाव, पत्ता व वर जनमाहिती अधिकारी असं लिहून टाका. 1) मग अर्जदार म्हणून तुमचे नाव, पत्ता लिहा. 2) माहितीचा कालावधी - ‘तो रस्ता बांधायच्या आधीपासून ते आजच्या तारखेपर्यंत’ असा लिहा. 3) माहितीचा तपशील लिहिताना कुठून ते कुठूनचा रस्ता ते लिहा व त्या रस्त्याशी संबंधित पुढील माहिती मिळावी असे लिहा. म्हणजे, अ) सदर रस्ता बांधकामाच्या करारांची/कंत्राटाची प्रत, ब) दोषदायित्व कालावधी, क) वर्कऑर्डरची (काम सुरू करण्याचा आदेश)  प्रत. 4) माहिती अधिकाराच्या अर्जात तपशील लिहिताना उगा पसारा करू नये. 150 शब्दाच्या आत आपले लिहून झाले पाहिजे.5)  नेमके मुद्दे किंवा दस्तावेज लिहिणं महत्त्वाचं. 6) वरच्या मसुद्यात ‘दोषदायित्व कालावधी’ म्हणजेच डिफेक्ट लायबिलिटी पिरिएड असा शब्द आहे. कोणतेही बांधकाम केल्यानंतर ठरावीक काळासाठी त्या बांधकामात दोष आल्यास जबाबदारी कंत्राटदाराची असते. तुमचा रस्ता आताच झाला आणि सहा महिन्यांच्या आतच खड्डे पडले तर नक्कीच हे दोषदायित्व कालावधीत बसते. तुमच्या माहिती अधिकारात हा शब्द आला म्हणजे तुम्हाला फसवणं सोपं नाही हे यंत्रणेला कळतं.7) अर्जात माहितीचा तपशील लिहून झाला की, ‘माझा अर्ज दुस-या माहिती अधिका-याकडे वर्ग करायचा झाल्यास कलम 6(3) खाली तशी कारवाई करून मला सूचित करावे’ असं वाक्य लिहा. आता कुठलाही माहिती अधिकारी, ‘आमच्या हापिसला ही माहिती भेटत नाही दुसरीकडे जा’ असं तुम्हाला म्हणू शकत नाही. 8) तुम्ही कुठेही अर्ज दाखल केलात तरी तो अर्ज योग्य त्या ठिकाणी पाठविण्याची जबाबदारी त्या माहिती अधिकार्‍याची असते. आपण वणवण करायचं काम नाही. 9) लक्षात ठेवायचं लोकशाहीत आपण नागरिक म्हणजे खास माणसं! फक्त आपली ताकद आपण वापरली पाहिजे.

    (लेखक ‘वयम्’ चळवळीचे कार्यकर्ते आहेत.)

 milindthatte@gmail.com