शहरं
Join us  
Trending Stories
1
इम्रान खानच्या तुरुंगात अडचणी आणखी वाढणार! पाकिस्तानने २४ तासात घेतले ५ मोठे निर्णय
2
"'मी गोमांस खातो, कोण मला अडवतं?', म्हणणाऱ्या मंत्र्यासोबत अमित शाह जेवताहेत, हिम्मत असेल तर...!"; उद्धव ठाकरे यांचं थेट आव्हान
3
IND vs SA 2nd T20I : अखेर सूर्या भाऊनं डाव साधला! टॉसचा बॉस होण्यासाठी यावेळी आजमावला हा फंडा
4
"खुर्चीसाठी स्वत:चं पायपुसणं करून घेणाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांवर बोलू नये"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार
5
'हवा' टाईट...! विमानातून स्कायडायव्हरची उडी अन् पॅराशूट पंखात अडकलं, पुढे काय झालं? (VIDEO)
6
बांग्लादेशात निवडणुकीचे बिगुल वाजले; 'या' तारखेला मतदान, मात्र शेख हसीनांच्या पक्षावर बंदी
7
तपोवनातील वृक्षतोडीविरोधात आता अण्णा हजारे मैदानात; विचारणा करत म्हणाले, “कुंभमेळा...”
8
“लाडक्या बहिणींना २१०० रुपये द्यावे, अन्यथा CM फडणवीसांनाच घरी बसावे लागेल”: उद्धव ठाकरे
9
शालेय सहलींसाठी STलाच उदंड प्रतिसाद; एका महिन्यात तब्बल २२४३ बस आरक्षित, १० कोटींची कमाई
10
अमित शाह यांनी '102 डिग्री' ताप असतानाही संसदेत 'मत चोरी'वर दिलं उत्तर, सभागृह सोडून गेले राहुल गांधी
11
IPL 2025 Auction : ‘छप्पर फाड’ कमाई करण्यासाठी परदेशी खेळाडूनं खेळला असा डाव; सगळेच झाले थक्क!
12
SDM नां केली मारहाण, ४ गर्लफ्रेंड, त्यापैकी ३ प्रेग्नंट, बोगस IAS चा प्रताप, कोण आहे तो?  
13
नवा ट्रेंड! स्किन केअरसाठी 'हे' खास ड्रिंक पीत आहेत Gen-Z; पण खरंच किती होतो फायदा?
14
देवेंद्र फडणवीसांनी 'पांघरूण खातं' सुरु करावं आणि त्याचं मंत्री व्हावं- उद्धव ठाकरे
15
दिल्ली दंगलीतील आरोपी उमर खालिदला दिलासा; न्यायालयाकडून जामीन मंजूर
16
उत्तर प्रदेशसह या ६ राज्यांमध्ये SIR साठीची मुदत वाढवली, निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय  
17
"रोहित शर्मा मैदानात जेव्हा 'तसा' वागतो, ते खूप विचित्र वाटतं"; यशस्वी जैस्वाल अखेर बोललाच
18
“प्राचीन मंदिर पाडून RSSचे कार्यालय”; उद्धव ठाकरेंची अमित शाहांवर टीका, ‘तो’ फोटोही दाखवला
19
अण्णा हजारे पुन्हा उपोषणाला बसणार, सशक्त लोकायुक्तावरून राज्य सरकारला दिला असा इशारा...  
20
थंडीत फ्रीज बंद करणं पडू शकतं महागात; वीज वाचवण्याच्या नादात करू नका 'ही' चूक
Daily Top 2Weekly Top 5

मन की बात

By admin | Updated: March 26, 2015 21:21 IST

आपले हसरे क्षण हीच आपली पूंजी.ती रडक्या आठवणींवर का खर्च करायची?

माणसं आयुष्यात येतात.जातात.
काही माणसं येतात फक्त एक ‘निमित्त’ होऊन;
काही कामापुरती, काही कारणांपुरती!
काम संपलं की, जातात निघून!!
आणि काही माणसं मात्र ऋतूंसारखी.
येतात आणि जगण्याचा मौसमच बदलून टाकतात.
आपण त्यांच्या रंगात रंगतो,
त्या मौसमाचेच होऊन जातो!
काही माणसं मात्र ‘जगणं’ होऊन येतात;
आपलं जगणं त्यांच्या जगण्याचाच भाग होऊन जातं;
ते येतात आणि आयुष्यभर राहतात.
कधी प्रत्यक्षात; तर कधी आठवणी बनून.
पण ती माणसं आयुष्यभर राहण्यासाठीच येतात.
***
निमित्त होऊन आलेली माणसं;
घटकाभरच्या प्रवासात भेटल्यासारखी.
प्रवास मजेत होतं, खूप गप्पा होतात,
मस्त गट्टी जमते, आपण हरखून जातो;
पण प्रवास संपतो,
त्या माणसाचा किंवा आपला थांबा येतो 
आणि ती माणसं निघून जातात,
अनोळखी चेहर्‍यात हरवून जातात.
मग ती माणसं आपल्या आयुष्यात नाहीत
म्हणून रडून, थांबून कसं चालेल?
उलट विचार करुन पहा;
ती व्यक्ती थोडेच दिवस  का आपल्या आयुष्यात?
इमोशनली ढपलेल्या आपल्या जगण्याला
थोडासा आनंदाचा शिपका द्यायला?
कठीण प्रसंगात तुम्हाला मदत करायला?
आपलं कुणीच नाही जवळचं असं वाटत असताना
तुमच्यासाठी काय वाट्टेल ते करण्याची तयारी दाखवायला?
तुम्ही किती स्पेशल आहात, हे तुम्हाला समजावून द्यायला?
**
आपलं प्रत्येकाचं कारण असेलही वेगळं.
पण अशी निमित्तानं आलेली माणसं
आपलं जगणं उजळून टाकताता काही काळासाठी!
आणि मग निघून जातात.
***
त्यांच्या जाण्याचा खूप त्रास होतो.
आपण खूप त्रागाही करतो
स्वत:ला किंवा त्या व्यक्तीला दोष देतो.
आणि जे मिळालेलं असतं ते ही नाकारत बसतो.
**
असं का करायचं?
आपण जे जगतो ते भरपूर जगायचं.
आपल्यासोबत असलेल्या माणसांना 
बांधून घालण्यापेक्षा,
अपेक्षांची ओझी लादण्यापेक्षा जाऊ द्यावं, जायचं असेल तर.
आणि म्हणावं की, चार क्षण का होईना;
किती आनंद मिळाला.
किती सुंदर झाला प्रवास.
***
आपले हसरे क्षण
हीच आपली पूंजी.
ती रडक्या आठवणींवर का खर्च करायची?
( इंटरनेटवर फॉरवर्ड होत असलेल्या ‘रिझन-सिझन’ मेसेजचा मुक्त अनुवाद)