शहरं
Join us  
Trending Stories
1
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
2
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
3
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
4
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
5
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
6
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
7
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
8
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
9
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
10
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
11
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
12
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
13
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
14
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
15
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
16
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
17
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
18
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
19
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
20
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका

मन की बात

By admin | Updated: March 26, 2015 21:21 IST

आपले हसरे क्षण हीच आपली पूंजी.ती रडक्या आठवणींवर का खर्च करायची?

माणसं आयुष्यात येतात.जातात.
काही माणसं येतात फक्त एक ‘निमित्त’ होऊन;
काही कामापुरती, काही कारणांपुरती!
काम संपलं की, जातात निघून!!
आणि काही माणसं मात्र ऋतूंसारखी.
येतात आणि जगण्याचा मौसमच बदलून टाकतात.
आपण त्यांच्या रंगात रंगतो,
त्या मौसमाचेच होऊन जातो!
काही माणसं मात्र ‘जगणं’ होऊन येतात;
आपलं जगणं त्यांच्या जगण्याचाच भाग होऊन जातं;
ते येतात आणि आयुष्यभर राहतात.
कधी प्रत्यक्षात; तर कधी आठवणी बनून.
पण ती माणसं आयुष्यभर राहण्यासाठीच येतात.
***
निमित्त होऊन आलेली माणसं;
घटकाभरच्या प्रवासात भेटल्यासारखी.
प्रवास मजेत होतं, खूप गप्पा होतात,
मस्त गट्टी जमते, आपण हरखून जातो;
पण प्रवास संपतो,
त्या माणसाचा किंवा आपला थांबा येतो 
आणि ती माणसं निघून जातात,
अनोळखी चेहर्‍यात हरवून जातात.
मग ती माणसं आपल्या आयुष्यात नाहीत
म्हणून रडून, थांबून कसं चालेल?
उलट विचार करुन पहा;
ती व्यक्ती थोडेच दिवस  का आपल्या आयुष्यात?
इमोशनली ढपलेल्या आपल्या जगण्याला
थोडासा आनंदाचा शिपका द्यायला?
कठीण प्रसंगात तुम्हाला मदत करायला?
आपलं कुणीच नाही जवळचं असं वाटत असताना
तुमच्यासाठी काय वाट्टेल ते करण्याची तयारी दाखवायला?
तुम्ही किती स्पेशल आहात, हे तुम्हाला समजावून द्यायला?
**
आपलं प्रत्येकाचं कारण असेलही वेगळं.
पण अशी निमित्तानं आलेली माणसं
आपलं जगणं उजळून टाकताता काही काळासाठी!
आणि मग निघून जातात.
***
त्यांच्या जाण्याचा खूप त्रास होतो.
आपण खूप त्रागाही करतो
स्वत:ला किंवा त्या व्यक्तीला दोष देतो.
आणि जे मिळालेलं असतं ते ही नाकारत बसतो.
**
असं का करायचं?
आपण जे जगतो ते भरपूर जगायचं.
आपल्यासोबत असलेल्या माणसांना 
बांधून घालण्यापेक्षा,
अपेक्षांची ओझी लादण्यापेक्षा जाऊ द्यावं, जायचं असेल तर.
आणि म्हणावं की, चार क्षण का होईना;
किती आनंद मिळाला.
किती सुंदर झाला प्रवास.
***
आपले हसरे क्षण
हीच आपली पूंजी.
ती रडक्या आठवणींवर का खर्च करायची?
( इंटरनेटवर फॉरवर्ड होत असलेल्या ‘रिझन-सिझन’ मेसेजचा मुक्त अनुवाद)