शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH vs DC : दिल्लीच्या फलंदाजांनी नांगी टाकली; पण पावसाच्या बॅटिंगमुळे हैदराबाद फक्त बॉलिंग करून 'आउट'
2
"९० हजार सैनिकांचे पायजमे आजही तिथे टांगलेले आहेत’’, मुनीर आणि पाकिस्तानचं बलूच नेत्याकडून वस्रहरण   
3
IPL 2025 Playoffs Race : आता ४ जागेसाठी ७ दावेदार! कोणत्या संघासाठी कसे आहे प्लेऑफ्सचे समीकरण?
4
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवीचं कौतुक
5
दोन्ही दिल्लीकर एकाच क्रीजमध्ये; रन आउटसाठी स्टँडमध्ये काव्या मारनची 'दातओठ खात' तळमळ (VIDEO)
6
"वेगळे राजकारण करून पॅनलला गालबोट लावण्याचा प्रयत्न केल्यास माझ्या दारात येऊ नका",अजित पवार यांचा इशारा
7
SRH vs DC : पॅट कमिन्सचा विकेट्सचा खास पॅटर्न! स्पेल बघून काव्या मारनही झाली शॉक
8
निकाल ऐकण्यापूर्वीच विद्यार्थिनीने संपवलं जीवन, नापास झाल्याच्या भीतीतून उचलले पाऊल
9
Shivalik Sharma: क्रिकेटरला अटक; लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप
10
रेल्वे स्थानकाच्या पायऱ्यांवर पाकिस्तानी ध्वज चिकटवला; पाहताच महिलेने घातला गोंधळ, व्हिडीओ व्हायरल
11
SRH vs DC : "डिअर क्रिकेट प्लीज प्लीज ..." दुसऱ्यांदा पदरी भोपळा पडल्यावर करूण नायर झाला ट्रोल
12
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
13
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
14
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
15
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
16
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
17
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
18
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
19
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
20
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला

मन की बात

By admin | Updated: March 26, 2015 21:21 IST

आपले हसरे क्षण हीच आपली पूंजी.ती रडक्या आठवणींवर का खर्च करायची?

माणसं आयुष्यात येतात.जातात.
काही माणसं येतात फक्त एक ‘निमित्त’ होऊन;
काही कामापुरती, काही कारणांपुरती!
काम संपलं की, जातात निघून!!
आणि काही माणसं मात्र ऋतूंसारखी.
येतात आणि जगण्याचा मौसमच बदलून टाकतात.
आपण त्यांच्या रंगात रंगतो,
त्या मौसमाचेच होऊन जातो!
काही माणसं मात्र ‘जगणं’ होऊन येतात;
आपलं जगणं त्यांच्या जगण्याचाच भाग होऊन जातं;
ते येतात आणि आयुष्यभर राहतात.
कधी प्रत्यक्षात; तर कधी आठवणी बनून.
पण ती माणसं आयुष्यभर राहण्यासाठीच येतात.
***
निमित्त होऊन आलेली माणसं;
घटकाभरच्या प्रवासात भेटल्यासारखी.
प्रवास मजेत होतं, खूप गप्पा होतात,
मस्त गट्टी जमते, आपण हरखून जातो;
पण प्रवास संपतो,
त्या माणसाचा किंवा आपला थांबा येतो 
आणि ती माणसं निघून जातात,
अनोळखी चेहर्‍यात हरवून जातात.
मग ती माणसं आपल्या आयुष्यात नाहीत
म्हणून रडून, थांबून कसं चालेल?
उलट विचार करुन पहा;
ती व्यक्ती थोडेच दिवस  का आपल्या आयुष्यात?
इमोशनली ढपलेल्या आपल्या जगण्याला
थोडासा आनंदाचा शिपका द्यायला?
कठीण प्रसंगात तुम्हाला मदत करायला?
आपलं कुणीच नाही जवळचं असं वाटत असताना
तुमच्यासाठी काय वाट्टेल ते करण्याची तयारी दाखवायला?
तुम्ही किती स्पेशल आहात, हे तुम्हाला समजावून द्यायला?
**
आपलं प्रत्येकाचं कारण असेलही वेगळं.
पण अशी निमित्तानं आलेली माणसं
आपलं जगणं उजळून टाकताता काही काळासाठी!
आणि मग निघून जातात.
***
त्यांच्या जाण्याचा खूप त्रास होतो.
आपण खूप त्रागाही करतो
स्वत:ला किंवा त्या व्यक्तीला दोष देतो.
आणि जे मिळालेलं असतं ते ही नाकारत बसतो.
**
असं का करायचं?
आपण जे जगतो ते भरपूर जगायचं.
आपल्यासोबत असलेल्या माणसांना 
बांधून घालण्यापेक्षा,
अपेक्षांची ओझी लादण्यापेक्षा जाऊ द्यावं, जायचं असेल तर.
आणि म्हणावं की, चार क्षण का होईना;
किती आनंद मिळाला.
किती सुंदर झाला प्रवास.
***
आपले हसरे क्षण
हीच आपली पूंजी.
ती रडक्या आठवणींवर का खर्च करायची?
( इंटरनेटवर फॉरवर्ड होत असलेल्या ‘रिझन-सिझन’ मेसेजचा मुक्त अनुवाद)