शहरं
Join us  
Trending Stories
1
सीरियावरील हल्ल्यांमुळे इराण संतापला; इस्रायलला जन्माची अद्दल घडवण्यासाठी आखला प्लॅन
2
ना कॉल ना गिफ्ट...! शमीची पोस्ट बघून हसीन जहाँच्या मनात आली ही गोष्ट, म्हणाली...
3
STनेच होणार विदर्भातील नागरिकांची नागद्वार यात्रा, दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची फोनवर चर्चा
4
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
5
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
6
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
7
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
8
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
9
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
10
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
11
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
12
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
13
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
14
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
15
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
16
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
17
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
18
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
19
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
20
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड

सोशल मीडीयातल्या या चार चुगल्या तुमची नोकरी घालवू शकतात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2019 13:03 IST

सोशल मीडियात आपण काय कमेंट्स करतो याचा आणि नोकरी मिळण्याचा काय संबंध?

ठळक मुद्दे अटेन्शन सिकर लोकांनाही काम देण्यात कुणाला रस नसतो. त्यामुळे जरा जपून!

- निशांत महाजन

नुकतीच निवडणूक झाली. निकाल लागले. कोण जिंकलं, कोण हरलं यावर आपण सार्‍यांनी हिरिरीने वाद घातले, कमेंट्स केल्या.मग ते होत असतानाच पाऊस सुरू होता, तर त्यावरही आपण पोस्ट केल्या.ते सुरूच असताना दिवाळी सुरू झाली. मग पुढचे पाच दिवस आपण तेजानं दिवे उजळले. आपले, फराळाचे आणि अजून कसकसले फोटो टाकले. पोस्ट लिहिल्या, इतरांच्या पोस्टवर आपण लाइकठोकले, कमेंट्स केल्या. आपण चर्चा केली, गप्पा मारल्या.हे सारं छान झालं की नाही, आपल्याला सगळ्यातलं सगळं कळतं म्हणून आनंद वाटला की नाही. मुळात आपल्याला प्रत्येक गोष्टीवर मतं आहेत आणि ती आपण बेधडक व्यक्त करतो. कुणाची पाबंदी नाही हे सारंही आपल्याला महत्त्वाचंच वाटतं. हीच तर सोशल मीडियाची खरी ताकद आहे.हे सारं इथवर ठीकच आहे. त्यात गैर किंवा चुकीचं काही नाही.मात्र हा सारा जो काही डेटा आपण ऑनलाइन तयार करून ठेवतो आहोत, त्यातून उद्या आपल्याला नोकरीची संधी मिळणार असेल किंवा हातची जाणार असेल तर?तुम्हाला तर माहितीच आहे, आता ते काही ओपन सीक्रिट उरलेलं नाही की हल्ली नोकरी देतानाच काय पण लग्नासाठी स्थळाला होकार देतानाही लोक इतरांचे सोशल मीडिया अकाउण्ट आधी तपासून पाहतात. कोण बोलतंय, कुणाशी बोलतंय, किती जवळकीने गप्पा होत आहे, त्यातली भाषा कशी आहे, शब्दांची निवड कशी आहे, किती सलगी आहे, फोटोत कपडे कसे घातले आहेत हे सारं तपासलं जातं. इतरांकडे काय बोट दाखवायचं हे सारं आपणही करतोच.तेच आता नोकरी देतानाही होत आहे, या एकाच मुद्दय़ाकडे मात्र लक्ष द्यायला हवं. आणि आपल्याला नोकरी मिळणार की आपण कटाप होणार हे सारं बर्‍यापैकी इथल्या पोस्ट्सवरही ठरणार असतं हे लक्षात ठेवलेलं बरं!आता तुम्ही विचाराल की, मग काय सोशल मीडियात काही बोलायचंच नाही का? मग नेटवर्किग कसं होणार? मुळात हातात साधन आहे तर ते वापरायचं नाही का?तर वापरायचं.पण सजगपणे वापरायचं.आणि चार मुख्य चुका करायच्या नाहीत.अलीकडेच एन्फ्ल्युएन्स नावाच्या एका बडय़ा मार्केटिंग कंपनीनं एक सव्र्हे केला. सोशल मीडियात व्यक्त होताना किंवा आपल्याविषयी बोलताना लोक काय चुका करतात आणि त्यांचा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या ओळखीवर, करिअरवर आणि एकूणच त्यांच्याकडे पाहण्याच्या लोकांच्या नजरेवर काय परिणाम होतो यासंदर्भात ते काळजी व्यक्त करतात. आणि सांगतात की, या चार गोष्टी सांभाळा, अन्यथा करिअरवर दुष्परिणाम होऊ शकतात.त्या 4 चुका कोणत्या?

1. इतरांच्या कमेंट्सवर आक्रमणकुणीतरी एखादी पोस्ट लिहितं, ती आपल्याला पटत नाही. आपण आपलं मत मांडतो इथवर ठीक. मात्र त्याचं बुलिंग करायचं, शिव्याशाप द्यायचे, भाषा पातळी सोडून वापरायची, मुद्दा मिटवायचाच नाही, खेचत राहायचा आणि दुसर्‍या माणसाला नकोसं करून सोडायचं. हे असं ‘बुलिंग’ तुम्ही करत असाल तर सावधान. तुम्हाला मार वाटतही असेल की आपली बाजू योग्य आहे, तो माणूस चुकतोय पण किती ताणायचं आणि काय भाषेत बोलायचं याचं भान राखलं नाही, तर हेकेखोर आणि ट्रोलच लेबल लागू शकते. शक्यतो अशा बुलिंग करणार्‍यांना, ट्रोलर्सना कुणी नोकरी देईल अशी आता परिस्थिती नाही.

2. भेदभाव करणार्‍या पोस्टअनेकांना वाटतं, आपला स्वभाव फार मिश्कील, मग बायकांवर कमेंट्स करणार्‍या पोस्ट लिहिल्या जातात, जोक मारले जातात. कधी तरुणांवर, कधी राजकीय कार्यकत्र्यावर तर कधी रंगावरून, जातीवरून, धर्मावरून पोस्ट लिहिल्या जातात. भेदभाव करणार्‍या, जाहीर अशी भूमिका घेऊन इतरांना कमी करणार्‍या, रेशियल किंवा जेंडर बायस पोस्ट करणार्‍यांना यापुढे कार्यालयीन कामकाज संस्कृतीतून वगळलं जाण्याचीच शक्यता आहे.

3. अतिआक्रमक लेखन

काहीजणांना फार भारी वाटतं, ते सोशल मीडियावर तलवार घेऊनच येतात. कुणालाही काहीही बोलतात, अपमान करतात, उद्धटासारखं बोलतात. त्यांना इतर लोक लाइक करतात, ते वाद घालतात, त्याचीही चर्चा होते. मात्र अशा अतिआक्रमक आणि बेताल बोलणार्‍यांनाही नोकरीच्या संधी दुर्मीळ होत जातील.

4. अतिपर्सनल शेअरिंग

ही गोष्ट खरं तर कॉमनसेन्स आहे. खासगी आयुष्याची जाहिरात सोशल मीडियात किती करायची याची एक मर्यादा हवी. अतीच खासगी माहिती, रडगाणी अगदी सर्दी- खोकला झाला, आज काय खाल्लं, आज कोण काय म्हणालं हे लिहिणारे अटेन्शन सिकर ठरतात. अशा अटेन्शन सिकर लोकांनाही काम देण्यात कुणाला रस नसतो. त्यामुळे जरा जपून!