शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हमाले उमर अब्दुल्ला?
3
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
4
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
5
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
6
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
7
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
8
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
9
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
10
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
11
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
12
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
13
"कुठेही लिहिलेलं नाही की, काळे कपडे घालून...!", भाजप नीतीश कुमारांच्या पाठीशी; हिजाबवर बंदी घातली जाणार?
14
Winter Special: १० मिनिटात तयार होणारी तीळ शेंगदाण्याची पौष्टिक आणि रुचकर वडी; पाहा रेसिपी 
15
Jara Hatke: टक्कल पडू नये म्हणून 'या' मंदिरात देवाला अर्पण करतात केसांची बट
16
"चांगली कामगिरी करुनही टीम इंडियात निवड होत नसेल तर..." ईशान किशनने बोलून दाखवली मनातली गोष्ट
17
याला म्हणतात 'धुरंधर'...! या ₹2 च्या शेअरनं गुंतवणूकदारांचं नशीबच बदललं, 5 वर्षांत दिला 19000% चा परतावा
18
विमानतळ क्षेत्रात अदानींची 'उंच झेप'! ११ नवीन विमानतळांसाठी लावणार बोली; IPO कधी येणार?
19
Viral Video: पाच वर्षाच्या चिमुकल्याला फुटबॉलप्रमाणे उडवलं, शेजाऱ्याचं अमानुष कृत्य, घटना कॅमेऱ्यात कैद!
20
Sonam Raghuvanshi : नवा ट्विस्ट! "मी राजाला मारलं नाही, राज माझा भाऊ..."; जामीन अर्जात काय म्हणाली सोनम रघुवंशी?
Daily Top 2Weekly Top 5

जंगलातला तंबू.

By admin | Updated: May 1, 2014 14:53 IST

ओऽऽऽ ठोका आरोळी.. किंवा आपल्या प्रिय व्यक्तीचं नाव घ्या आणि मारा तिला हाक. घनघोर दरीच्या दुसर्‍या टोकाकडून तीच साद आपल्याला परत ऐकायला येते.

 कॅम्पिंगओऽऽऽ ठोका आरोळी.. किंवा आपल्या प्रिय व्यक्तीचं नाव घ्या आणि मारा तिला हाक. घनघोर दरीच्या दुसर्‍या टोकाकडून तीच साद आपल्याला परत ऐकायला येते. वार्‍याचा तो वेग, समुद्राची गाज, निसर्गाचं संगीत, झर्‍यांचं गीत, घनगर्द जंगल, धरतीवर पोहोचण्याआधीच संपलेला चांदण्याचा प्रकाश, आकाशात पोहोचलेले कडे आणि हातात हात घालून डोंगरांनी केलेली लांबच लांब साखळी.डोंगरदर्‍यातून आणि दगडधोंड्यातून वाहणार्‍या नितळ, स्वच्छ पाण्याचा वेडावणारा गोडवा, मधूनच कुठून तरी दिसलेल्या जंगली प्राण्यांच्या खुणा, त्यांचे अस्तित्व किंवा अगदी समोरून त्यांनी दिलेलं दर्शन.अंगावर सरसरून उभा राहिलेला काटा, काळाकभिन्न अंधार, उघड्यावरच टाकलेली पाठ, तंबूत घालवलेली रात्र, मी म्हणणार्‍या थंडीत शेकोटीच्या साक्षीनं आणि मित्र-मैत्रिणींच्या साथीनं त्या वैराण रात्री गाणी-गप्पांच्या मैफलीत सरलेली अविस्मरणीय रात्र.सिमेंट कॉँक्रीटच्या आपल्या जंगलात असला अनुभव कुठला मिळायला?.त्यासाठी पाठीवर सॅक अडकवून, मित्र-मैत्रिणींचं कोंडाळं जमवून निसर्गाच्या संगतीत काही रात्री घालवाव्याच लागतात.कधी अनुभवलाय हा रोमांच?फार विचार नको, बॅग पॅकिंग करा आणि सुटा.नाहीच विसरता येणार ते क्षण.अनुभव१६ जुलै १९९८ची रात्र.मी कधीच विसरू शकणार नाही.त्या रात्रीनं माझं सगळं आयुष्यच बदलून टाकलं. माझं मूळ गाव परभणी. तिथेच माझं शिक्षण झालं. त्यावेळी मी कॉलेजला होतो. एका कॅम्पमध्ये ‘व्हॉलंटिअर’ म्हणून काही मित्रांबरोबर मेळघाटात गेलो होतो.हातरू. मेळघाटातलं एक अगदी लहानसं आदिवासी गाव. परभणीहून अमरावती, परतवाडा अशा गाड्या बदलत रात्री आठ वाजता हातरूला पोहोचलो. तिथून पुढे चिलाटीला जायचं होतं. दोनच किलोमीटरचं अंतर, पण रात्री तिथे जाणं शक्यच नव्हतं. तिथल्या एका रेस्ट हाउसच्या पडवीत आम्ही मुक्काम ठोकला. पडवी चारही बाजूंनी उघडीच, वर फक्त पत्रा टाकलेला. त्या पडवीतच आम्ही सार्‍यांनी अंग टाकलं.माझ्या आयुष्यातला हा पहिलाच ‘कॅम्प’, एका वेगळ्या अनुभवासाठी आणि स्वत:लाही चाचपून पाहण्यासाठी मी तिथे गेलो होतो.घरापासून इतक्या लांब मी पहिल्यांदाच आलो होतो.सारं काही माझ्या कल्पनेपलीकडचं.माझा जन्म खेड्यातला असला आणि खेडी मी पाहिलेली, अनुभवलेली असली तरी आता मी शहरात राहात होतो. पण असलं गाव आणि खेडं मी पहिल्यांदाच पाहात होतो.संपूर्णपणे आदिवासी गाव, तिथली माणसं जंगलात राहणारी, माणसांना घाबरणारी, शहरी, अपरिचित ‘माणसं’ पाहून पळून जाणारी, आपल्याला न समजणार्‍या अगम्य आदिवासी भाषेत बोलणारी.तिथलं जंगलही तसंच. अफाट. चारही बाजूंनी फक्त झाडी आणि जंगल. ‘जंगल’ मी पाहिलं होतं, पण याला ‘जंगल’ म्हणतात, हे मला पहिल्यांदाच कळलं. पाऊस इतका धो धो कोसळत होता की, असा प्रपाती पाऊस पाहून मला भीतीच वाटली. खेड्यातल्या रात्री मला नव्या नव्हत्या, पण इथली रात्र. आणि तिथला काळोख. अंधार इतका दाट असतो मला माहीतच नव्हतं.आम्ही पडवीत झोपलेलो. सगळंच काही नवीन आणि अपरिचित. त्यात ‘उघड्या’वर झोपलेलो. भयाण अंधारी रात्र आणि छाताडावर ताडताड नाचणारा पाऊस. खरंच खूप भीती वाटत होती. टक्क जागा. रात्रभर एक सेकंदही डोळ्याला डोळा लागला नाही. थकव्यामुळे पहाटे चार वाजता डोळ्यावर थोडी झापड आली, १५-२0च मिनिटं, पण थोड्याच वेळात थोडासा गलका सुरू झाला. लगेच उठलोही, तर कळलं, पडवीपासून जवळच असलेल्या बकरीला वाघानं फाडून खाल्लं होतं. अंतर फक्त काही फूट! डोक्यात विचार आला, त्या काळोखात वाघानं आपल्यावरच झडप घातली असती तर?. - एकदम काळीजच हललं.वाटलं, कशाला मरायला आलो, आपण इथे?.- माझ्या पहिल्याच कॅम्पचा हा थरारक अनुभव. पण काही दिवस तिथे राहिलो, काही महिन्यांनी नंतरही पुन्हा एकदा तिथे आलो.कोण, कुठला मी, कधी जंगल आणि आदिवासीही न पाहिलेला एक कोवळा तरुण.पण त्यावेळी कुठे माहीत होतं, त्या घनदाट जंगलातले आदिवासी आणि आजही रस्ता, वीज नसलेला हा परिसरच माझं आयुष्य होणार आहे. मला वेड लावणार आहे.१९९८च्या डिसेंबरपासून मी त्या जंगलातच राहायला गेलो. आदिवासींमधला एक झालो. १६ वर्षं झाली, आजही मी तिथेच आहे.- रामेश्‍वर फड, ‘मेळघाट मित्र’ चिलाटी, परतवाडा, अमरावतीकाय करावं / टाळावं?1. रामेश्‍वरचा अनुभव थोडा वेगळा आहे, तो ‘कॅम्प’ ला गेला आणि तिथलाच झाला, पण कुठल्याही कॅम्पला जाण्याआधी कोणाबरोबर आपण जात आहोत, त्यांचं रेप्युटेशन काय, हे बघायला हवं.2. मित्र-मैत्रिणींचं कोंडाळं जमवून आपण स्वत:च जाणार असू, तर त्यात कोणीतरी किमान एक जाणकार हवा. 3. निसर्गात आपण जात आहोत, तर तिथे निसर्गाचेच नियम पाळायला हवेत, आपल्या घातक आणि वाईट ‘सवयी’ किमान इथे तरी बाजूलाच ठेवायला हव्यात.प्रशिक्षण कुठे, कोण देईल?महाराष्ट्रात आजकाल अगदी लहान गावापासून तर मोठय़ा शहरापर्यंत अनेक जण कॅम्पचं आयोजन करत असतं. ‘खात्री’ करून त्यांच्याबरोबर जायला हरकत नाही.