शहरं
Join us  
Trending Stories
1
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
2
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
3
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
4
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
5
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
6
BCCIचे अध्यक्ष झालेले मिथुन मन्हास आहेत कोण? कधी वीरू-युवीच्या नेतृत्वाखाली खेळले, असा आहे रेकॉर्ड
7
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
8
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
9
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
10
"सरकार मायबाप… आता कसं जगायचं?", अतिवृष्टीने हिरवी स्वप्नं चुराडली; राहेरीतील शेतकऱ्यांचा हंबरडा
11
प्रणितकडे इशारा करत वरुण धवन म्हणाला, 'इसने मेरा भी मजाक उडाया है!', कॉमेडियन म्हणतो...
12
आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा मोठा धक्का! 'या' कंपनीने ११,००० हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं
13
बीसीसीआयला मिळाला नवा अध्यक्ष, या माजी क्रिकेटपटूच्या नावावर झालं शिक्कामोर्तब
14
एस जयशंकर यांच्या संयुक्त राष्ट्रातील भाषणावर पाकिस्तान प्रतिक्रिया देऊन फसले; स्वतःला दहशतवादाचे अड्डे मानले
15
पाकिस्तानच्या नकवींचा कांगावा! म्हणे, इस्त्रायलने आमच्या ऑईल टँकरवर हल्ला केला, नंतर हुतींनी कब्जा केला
16
डोंबिवलीत त्या तरुणाने ११ व्या मजल्यावरुन उडी का मारली; धक्कादायक कारण आले समोर
17
'फुलवंती'सारखंच खऱ्या आयुष्यातही नकळत दुसऱ्या महिलेच्या प्रेमात पडलास तर? गश्मीर म्हणाला...
18
दिवाळीत बाइक खरेदीचा विचार करताय? ८०,००० रुपयांच्या बजेटमधील टॉप ५ पर्याय पाहा!
19
एक खेळाडू सामन्याचा निकाल फिरवू...; आशिया कप फायनलपूर्वी वसीम अक्रमची मोठी भविष्यवाणी
20
मिशन शक्ती : ९ वी ते १२ वीच्या विद्यार्थिनींना मोफत मध्यान्ह भोजन, योगींच्या मार्गदर्शनाखाली अनोखं पाऊल

एक टास्क अनेक समस्या

By admin | Updated: July 23, 2015 18:08 IST

दुष्काळ म्हटलं की भेगा पडलेली रुक्ष जमीन, वाळलेली झाडे, हाड-मास एक झालेली जनावरे आणि स्मशानशांतता पसरलेल्या वस्तीत पावसाची

-  प्रथमेश मुरकुटे
 
दुष्काळ म्हटलं की भेगा पडलेली रुक्ष जमीन, वाळलेली झाडे, हाड-मास एक झालेली जनावरे आणि स्मशानशांतता पसरलेल्या वस्तीत पावसाची आस लावून बसलेले लोक असं काहीतरी चित्र कायम डोळ्यासमोर असायचं. मुंबईमधील सीमेंटच्या जंगलातून  ‘ख:या’ दुष्काळावर मात करण्यासाठी आपल्याला काहीतरी करता येईल या आशेने मी या मोहिमेत सहभागी झालो. जातानाच आम्हा 6-7 जणं खाऊच्या बॅगा भरून मुंबईहून नाशिककडे निघालो.
दुष्काळ आणि अतिवृष्टी या दोन्हीही खरंतर नैसर्गिक आपत्तीच. पण मग दुष्काळाच्या नशिबी महापूर निवारणासाठी मिळतो इतका निधी आणि अतिवृष्टीइतकी प्रसिद्धी याचाही दुष्काळ का?  - या प्रश्नांनी सुरू झालेलं ट्रेनिंग दुष्काळाचा विचार आणि अभ्यास करायला नवीन  डायमेन्शन देत गेलं. दुष्काळ मोजण्याचे वेगवेगळे पॅरामीटर्स कोणते कोणते असू शकतील याचा अभ्यास करत दुष्काळ कसा पाहायचा, शोधायचा आणि मोजायचा याचा अभ्यासही आम्ही केला. एकदा हे  इंडिकेटर्स समजले की मग कोणत्या उपायांचा आधार घेऊन दुष्काळी परिस्थितीवर मात करता येईल याचा विचार करणं आणि समजून घेणं थोडं सोपं झालं. एकंदरीत पाणी व्यवस्थापन  हा यात बराच मोठा आणि महत्त्वाचा रोल प्ले करू शकतं. एकंदरीत पाणी व्यवस्थापन हे ब:यापैकी सोपं आणि कमी खर्चिक काम आहे असं काहीसं लक्षात आलं. रोजगार हमी योजनेमधून तर बरीच पाणी व्यवस्थापनाची काम होऊ शकतात असंही रोहयोसंबंधित घेतलेल्या सत्रत समजलं.  
मग दुष्काळ म्हणजे पाणी उपलब्धता कमी असणं आणि मग उपाय म्हणून पाणी व्यवस्थापन करणं हे ढोबळमानानं लक्षात आलं. पण मग हे दुष्काळग्रस्त गावांमध्ये का केलं नसेल लोकांनी, असा प्रश्न सतावायला लागला. 
डोक्यावर 2-3 हंडे घेऊन निघालेल्या स्त्रियांनी, मोठे मोठे  ॉरेल वाहून आणणा:या दुबळ्या बैलांनी आणि बैलगाडीच्या मागे निरागसपणो धावणा:या लहानग्यांनी पुढच्या रविवारी आमचं गावात स्वागत केलं. 2-3 किमीवर धरण होतं, पण गावाला प्यायला पाणी मिळत नव्हतं. लोकांना 3-4 किलोमीटर चालत जाऊन प्यायला पाणी आणावं लागतं. गावक:यांशी गप्पा मारत गावाची ओळख वाढवण्याचा आणि  गावाचा नकाशा तयार करण्याचं टास्क आम्ही हाती घेतलं होत. डोंगराच्या पायथ्याशी असलेली कुरुंदवाडी आणि आंबेवाडी या दोन गावांमध्ये जाऊन हे टास्क पूर्ण करायचं होतं. या टास्कच्या निमित्ताने गावक:यांशी खूप गप्पा मारल्या. सर्वांनी पाण्याची समस्या असल्याचं आणि  फक्त पावसाळ्यातच शेती करत असल्याचं आवर्जून सांगितलं. एका पिकातून येणा:या उत्पन्नातून आणि नंतर रोहयोची व बाहेरची कामे करून दिवसामागून दिवस नीट जाताहेत यात त्यांना आनंद होता. त्यांची शिकली सवरलेली मुले कामासाठी मुंबई, पुणो, सोलापूर या शहरांमध्ये स्थलांतरित झाली होती. वाढत्या लोकसंख्येबरोबर त्यांच्या शेतांचे पण छोटे छोटे तुकडे झाले होते. एकंदरीत शेती करणं हे कालबाह्य होत चाललंय की काय असं वाटलं काही लोकांशी बोलून. 
आता पावसाळ्यात गावामध्ये पाऊस किती पडला हे गावातील लोकांबरोबर मोजून त्यांच्या शिवारातून किती पाणी वाहून गेलं यावर त्यांच्याशी पावसाळ्यानंतर चर्चा करावी असा प्रयत्न आम्ही करणार आहोत. जेणोकरून या पावसाळ्यानंतर तरी गावात पाणी साठवण्यासाठी काही प्रयत्न करता येतील अशी आशा करतोय.