शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! छगन भुजबळांची महायुती सरकारमध्ये घरवापसी! सकाळी दहा वाजता मंत्रि‍पदाचा शपथविधी
2
ज्योती मल्होत्राच्या मोबाईलममध्ये ISI च्या शाकिरचा नंबर कोणत्या नावाने? पाकिस्तानमध्ये भेटलेले ते दोन अधिकारी कोण?
3
MI vs DC : वानखेडेचं मैदान मारा अन् Playoffs चं तिकीट मिळवा! मुंबई इंडियन्स फक्त एक पाऊल दूर, पण...
4
SRH नं पंतच्या LSG चा खेळ केला खल्लास! आता MI अन् DC मध्ये प्लेऑफ्सची चुरस
5
शस्त्रसंधीची चर्चा भारत-पाकिस्तानमध्येच, डोनाल्ड ट्रम्प यांचा काहीही संबंध नाही; विक्रम मिस्रींनी संसदीय समितीला सगळं सांगितलं
6
IPL 2025 : भर मैदानात अभिषेक अन् दिग्वेश यांच्यात वाजलं; नेमकं काय घडलं? (VIDEO)
7
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
8
साताऱ्यात चीड आणणारी घटना! चुलत भावाकडून १३ वर्षीय बहिणीवर अनेकदा बलात्कार
9
राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्वात लवकरच बदल दिसेल; रोहित पवारांचं विधान
10
कॅपिटल गेन टॅक्स काय असतो, कोणत्या प्रकारे आणि किती द्यावा लागतो? सगळं गणित समजून घ्या
11
लातूर : पाठीमागून येणाऱ्या दुचाकीची भयंकर धडक; आई, मुलासह जावयाचा मृत्यू
12
'मीदेखील या गोष्टीला बळी पडलोय', सरन्यायाधीश प्रोटोकॉल प्रकरणावर उपराष्ट्रपतींची प्रतिक्रिया
13
निक्की आधी बॅटिंगला येऊन पंतचा पुन्हा फ्लॉप शो! Sanjiv Goenka यांनी असा काढला राग
14
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
15
IPL 2025 : विदर्भकराचं स्वप्न झालं साकार! पण विकेटमागे इशान किशननं घोळ घातला, नाहीतर...
16
Rain update: साताऱ्यात धडाम् धूम! वळवाची दमदार हजेरी, शहरातील वीजपुरवठा खंडित
17
ट्रॅक्टर-ऑटोचा भीषण अपघात, तीन जागीच ठार; लातूर-बार्शी महामार्गावरील घटना
18
Shocking: व्हिडीओ कॉलसमोर प्रेमीयुगुलानं केलं विषप्राशन; प्रेयसीचा मृत्यू, प्रियकर आयसीयूमध्ये!
19
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
20
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...

एक टास्क अनेक समस्या

By admin | Updated: July 23, 2015 18:08 IST

दुष्काळ म्हटलं की भेगा पडलेली रुक्ष जमीन, वाळलेली झाडे, हाड-मास एक झालेली जनावरे आणि स्मशानशांतता पसरलेल्या वस्तीत पावसाची

-  प्रथमेश मुरकुटे
 
दुष्काळ म्हटलं की भेगा पडलेली रुक्ष जमीन, वाळलेली झाडे, हाड-मास एक झालेली जनावरे आणि स्मशानशांतता पसरलेल्या वस्तीत पावसाची आस लावून बसलेले लोक असं काहीतरी चित्र कायम डोळ्यासमोर असायचं. मुंबईमधील सीमेंटच्या जंगलातून  ‘ख:या’ दुष्काळावर मात करण्यासाठी आपल्याला काहीतरी करता येईल या आशेने मी या मोहिमेत सहभागी झालो. जातानाच आम्हा 6-7 जणं खाऊच्या बॅगा भरून मुंबईहून नाशिककडे निघालो.
दुष्काळ आणि अतिवृष्टी या दोन्हीही खरंतर नैसर्गिक आपत्तीच. पण मग दुष्काळाच्या नशिबी महापूर निवारणासाठी मिळतो इतका निधी आणि अतिवृष्टीइतकी प्रसिद्धी याचाही दुष्काळ का?  - या प्रश्नांनी सुरू झालेलं ट्रेनिंग दुष्काळाचा विचार आणि अभ्यास करायला नवीन  डायमेन्शन देत गेलं. दुष्काळ मोजण्याचे वेगवेगळे पॅरामीटर्स कोणते कोणते असू शकतील याचा अभ्यास करत दुष्काळ कसा पाहायचा, शोधायचा आणि मोजायचा याचा अभ्यासही आम्ही केला. एकदा हे  इंडिकेटर्स समजले की मग कोणत्या उपायांचा आधार घेऊन दुष्काळी परिस्थितीवर मात करता येईल याचा विचार करणं आणि समजून घेणं थोडं सोपं झालं. एकंदरीत पाणी व्यवस्थापन  हा यात बराच मोठा आणि महत्त्वाचा रोल प्ले करू शकतं. एकंदरीत पाणी व्यवस्थापन हे ब:यापैकी सोपं आणि कमी खर्चिक काम आहे असं काहीसं लक्षात आलं. रोजगार हमी योजनेमधून तर बरीच पाणी व्यवस्थापनाची काम होऊ शकतात असंही रोहयोसंबंधित घेतलेल्या सत्रत समजलं.  
मग दुष्काळ म्हणजे पाणी उपलब्धता कमी असणं आणि मग उपाय म्हणून पाणी व्यवस्थापन करणं हे ढोबळमानानं लक्षात आलं. पण मग हे दुष्काळग्रस्त गावांमध्ये का केलं नसेल लोकांनी, असा प्रश्न सतावायला लागला. 
डोक्यावर 2-3 हंडे घेऊन निघालेल्या स्त्रियांनी, मोठे मोठे  ॉरेल वाहून आणणा:या दुबळ्या बैलांनी आणि बैलगाडीच्या मागे निरागसपणो धावणा:या लहानग्यांनी पुढच्या रविवारी आमचं गावात स्वागत केलं. 2-3 किमीवर धरण होतं, पण गावाला प्यायला पाणी मिळत नव्हतं. लोकांना 3-4 किलोमीटर चालत जाऊन प्यायला पाणी आणावं लागतं. गावक:यांशी गप्पा मारत गावाची ओळख वाढवण्याचा आणि  गावाचा नकाशा तयार करण्याचं टास्क आम्ही हाती घेतलं होत. डोंगराच्या पायथ्याशी असलेली कुरुंदवाडी आणि आंबेवाडी या दोन गावांमध्ये जाऊन हे टास्क पूर्ण करायचं होतं. या टास्कच्या निमित्ताने गावक:यांशी खूप गप्पा मारल्या. सर्वांनी पाण्याची समस्या असल्याचं आणि  फक्त पावसाळ्यातच शेती करत असल्याचं आवर्जून सांगितलं. एका पिकातून येणा:या उत्पन्नातून आणि नंतर रोहयोची व बाहेरची कामे करून दिवसामागून दिवस नीट जाताहेत यात त्यांना आनंद होता. त्यांची शिकली सवरलेली मुले कामासाठी मुंबई, पुणो, सोलापूर या शहरांमध्ये स्थलांतरित झाली होती. वाढत्या लोकसंख्येबरोबर त्यांच्या शेतांचे पण छोटे छोटे तुकडे झाले होते. एकंदरीत शेती करणं हे कालबाह्य होत चाललंय की काय असं वाटलं काही लोकांशी बोलून. 
आता पावसाळ्यात गावामध्ये पाऊस किती पडला हे गावातील लोकांबरोबर मोजून त्यांच्या शिवारातून किती पाणी वाहून गेलं यावर त्यांच्याशी पावसाळ्यानंतर चर्चा करावी असा प्रयत्न आम्ही करणार आहोत. जेणोकरून या पावसाळ्यानंतर तरी गावात पाणी साठवण्यासाठी काही प्रयत्न करता येतील अशी आशा करतोय.