शहरं
Join us  
Trending Stories
1
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
2
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
3
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
4
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
5
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
6
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
7
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
8
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
9
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
10
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
11
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
12
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
13
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
14
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
15
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
16
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
17
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
18
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
19
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
20
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
Daily Top 2Weekly Top 5

खाऊचा चमचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2018 09:41 IST

ताटात, वाटीत नाही, तर चमचाभरच खा असं म्हणणारा एक इटुकला ट्रेण्ड. 

- भक्ती सोमण

लहान असताना आई एक घास काऊचा, एक घास चिऊचा असं म्हणत आपल्याला भरवते. पुढं आपण स्वत:च्या हातानं, ताट-वाटी-चमच्यानंही जेऊ लागतो. भसाभसा वाढून घेतो, टाकायचं कसं म्हणून खातो. हॉटेलातही तेच. अनेकदा सगळ्या ग्रेव्ही सारख्याच. अनेकदा अन्न उरतं, वाया जातं. बुफेत वाया जाणाºया अन्नाविषयी बोलायलाच नको.पण हे चित्र आता पालटतंय.

अनेकांना वाटतंय की, अन्नाशी अशी नासाडी बरी नव्हे. काहीजण तर खाण्याविषयी फार कॉन्शस. त्यांना सतत वजनाचा काटा दिसतो. ते मोजून-मापून खातात. त्यावर आता अनेकजण भन्नाट प्रयोग करू लागलेत. त्याविषयी गेल्या काही महिन्यांपासून ऐकून होते; पण प्रत्यक्ष बघायला मिळालं ते एका पार्टीत.

त्या पार्टीला अर्धेअधिक पदार्थ हे खोलगट चमच्यातून दिले (सर्व्ह) जात होते. तिथे ५-६ प्रकारचे काउण्टर्स होते. एका काउण्टरवर पनीर, भाज्या मिक्स केलेला सॅलेडचा काउण्टर होता. तर एका काउण्टरवर छोट्या आकाराच्या ब्रेडवर तेवढाच छोटा बटाटेवडा होता. एक काउण्टरवर पास्ता होता, तर एकावर गुलाबजाम. असे हे सगळे पदार्थ हारीने आणि आकर्षक रंगसंगतीने त्या चमच्यात मांडले होते. हे खायचं कसं, हा प्रश्न साहजिकच पडला. म्हणून लोकांचं अनुकरण करून एक प्लेट घेतली त्यात आवडीप्रमाणे सॅलेडचा चमचा घेऊन तो घास खाल्ला. आवडलं म्हणून पुुन्हा घेतलं. मग असंच बाकीच्या पदार्थांचेही घास घेतले. त्या सगळ्याची चव अतिशय सुंदर होती. बरं, खाताना वाया जाणं हा प्रकारच नव्हता. एकंदर परिस्थितीचा अंदाज घेतला तर लोकांना अशाप्रकारे खायला आवडतंय हे दिसून येत होतं. यासाठी लागणारा चमचा हा सुपासाठी लागणारा खोलगट रंगीबेरंगी किंवा आवडीप्रमाणे खोलगट पदार्थ ठेवता येईल असा असतो.

या घासभर खाण्याच्या आणि तेही बदलत्या ट्रेण्डविषयी सुप्रसिद्ध शेफ अमेय महाजनी म्हणाला, हा मुख्यत: युरोपियन ट्रेण्ड आहे; पण आता ग्लोबलायजेशन आणि इन्स्टाग्राममुळे लोकांना याविषयी आकर्षण निर्माण झालं आहे. असं म्हणतात की माणसाचं जेवण ९० टक्के डोळ्यांवर आणि १० टक्के चवीवर अवलंबून असतं. चमच्याने दिल्या जाणाºया पदार्थात रंगसंगती इतकी कलात्मक असते की ते पाहूनच खावेसे वाटतात. शिवाय चवही चांगलीच असते. तसंच एकावेळी खूप पदार्थ घेऊन ते वाया घालवण्यापेक्षा तुम्हाला ज्या आकारात पदार्थ हवाय त्या आकारात तो चमच्यात एका घासात खाता येतो.

खाते पिते घर का आदमी दिसण्यासाठी भरपूर खाणं हे जसं महत्त्वाचं असतं, तसंच अन्न वाया जाऊ नये हेदेखील महत्त्वाचं आहे. म्हणूनच पदार्थ चमच्यात देण्याचा ट्रेण्ड हा सध्या जाम चालतो आहे. हे वाचल्यावर असं वाटेलं की, पदार्थ एकदाच घ्यायचा का? तर तसं नाही. पदार्थ आवडला असेल तर पाहिजे तेवढ्या वेळा तो चमचा घेता येऊ शकतो बरं का..

(भक्ती लोकमतच्या मुंबई आवृत्तीत उपसंपादक आहे.)