शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray : "धर्माच्या नावावर लोकांना आंधळं केलं की..."; राज ठाकरेंची खास पोस्ट, रंगली जोरदार चर्चा
2
"लोकसंख्या धोरण लवकरात लवकर लागू करणे आवश्यक, तरच..."; RSS ची सरकारकडे मागणी, होसबळे म्हणाले...
3
उद्धव ठाकरेंचा मराठवाड्यात ४ दिवस "दगाबाज रे" संवाद दौरा, शेतकऱ्यांशी साधणार संवाद
4
डोक्यात रॉड मारून मोठ्या भावाची हत्या, मग गर्भवती वहिनीवर बलात्कार, नंतर तिलाही संपवलं...
5
अग्नितांडव! मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण आग; लहान मुलांसह २३ जणांचा मृत्यू
6
५,८०० कोटींच्या २००० रुपयांच्या नोटा अजूनही लोकांकडे पडून! अजूनही बदलण्याची संधी
7
तिरुपतीच्या धर्तीवर पंढरपुरात होणार दर्शन मंडप; वारकऱ्यांना मिळणार कमी वेळेत विठ्ठलाचे दर्शन
8
King Title Reveal: वाढदिवशी शाहरुखचं चाहत्यांना सरप्राईज! 'किंग'चा पहिला प्रोमो रिलीज, व्हिडीओ बघाच
9
Manoj Tiwari : "शिवीगाळ केली, वाहनांवर हल्ला"; मनोज तिवारींच्या रोड शोमध्ये प्रचंड गोंधळ, RJD वर गंभीर आरोप
10
सोमवारी प्रदोष व्रत २०२५: महादेव पूजनासह ‘या’ ७ गोष्टी आवर्जून करा; काही कमी पडणार नाही!
11
"ख्रिश्चनांचं हत्याकांड थांबवलं गेलं नाही तर...!"; डोनाल्ड ट्रम्प यांची आता ‘या’ देशाला थेट हल्ल्याची धमकी
12
"लेकाच्या कठीण प्रसंगी देश विरोधात असताना...", शाहरुखबद्दल हिमानी शिवपुरी काय म्हणाल्या?
13
सोमवारी प्रदोष व्रत २०२५: केवळ लाभ होईल, नशीब साथ देईल; प्रभावी शिव मंत्रांचा नक्की जप करा!
14
९ वर्षांच्या मुलीने मारली चौथ्या मजल्यावरून उडी, शाळेने पुरावे केले नष्ट; धक्कादायक Video
15
EMI वर 'श्रीमंती'चा देखावा! ७०% आयफोन, ८०% गाड्या कर्जावर; सीए नितीन कौशिक यांचा गंभीर इशारा
16
ब्रिटनमध्ये धावत्या ट्रेनमध्ये हल्ला, अनेकांवर चाकूने वार, प्रवाशांमध्ये घबराट, दोन संशयित अटकेत  
17
कार्तिक सोमप्रदोष व्रत २०२५: महादेव प्रसन्न होतील, सर्व मनोकामना पूर्ण करतील; ‘असे’ करा व्रत!
18
शिरोळमध्ये ऊस आंदोलनाचा भडका; ऊस वाहनांचे टायर पेटवले, हवा काढली
19
शाहरुख खानचा वाढदिवस, 'मन्नत'बाहेर चाहत्यांची तुफान गर्दी; युके-जपानवरुनही आले फॅन्स
20
"मी अवतारात आले आहे...'; शर्ट परिधान करुन रेड कार्पेटवर आली प्राजक्ता माळी, व्हिडीओ व्हायरल

नियमानुसार तक्रार करायला आणि दाद मागायला भ्यायचं कशाला?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2019 06:35 IST

आपल्या हक्कांसाठी जागरूक असताना नियमानुसार तक्रार करायला आणि दाद मागायला भ्यायचं कशाला?

ठळक मुद्दे. आपला हक्क आपलं मत ठामपणे सांगावं,  हक्क सोडू नये; पण त्यासाठी समोरच्याचा अपमान करण्याची गरज नसते.

- मिलिंद थत्ते

लोकशाही विकसित होत असताना नागरिकांच्या तक्र ार निवारणासाठी अनेक व्यवस्था निर्माण होत असतात. जसजसा आपण नागरिक या व्यवस्थांचा वापर करू, तशा त्या व्यवस्था स्थिर आणि प्रभावी होत जातील. यातल्या बहुतेक व्यवस्था या प्राधिकरण स्वरूपाच्या असतात. प्राधिकरण म्हणजे ज्यांना स्वतंत्र निर्णयाचे अधिकार आहेत ते. जसे की मोबाइल किंवा फोनबाबतच्या तक्र ारींसाठी भारतीय दूरसंचार विनियामक प्राधिकरण म्हणजेच ट्राय आहे. तसेच इतर अनेक विषयात अशी प्राधिकरणं आहेत. यातलं एक महत्त्वाचं प्राधिकरण आहे - राज्य पोलीस तक्रार प्राधिकरण. एक निवृत्त न्यायमूर्ती, एक निवृत्त प्रशासनिक अधिकारी, एक निवृत्त पोलीस अधिकारी व एक सामाजिक कार्यकर्ता - अशी या प्राधिकरणाची रचना आहे. सर्वोच्च न्यायालयासमोर प्रकाश सिंग वि. केंद्र सरकार या खटल्यात असं दिसून आलं की कोर्टात येणार्‍या तक्र ारींपैकी बरीच मोठी संख्या पोलिसांबाबत असलेल्या तक्रारींची आहे. या तक्र ारी दरवेळी न्यायालयात येण्यापेक्षा यासाठी वेगळी व्यवस्था असावी, असा आदेश न्यायालयाने दिला. त्यातून प्रत्येक राज्यात ‘राज्य पोलीस तक्र ार प्राधिकरण’ तयार झाले. महाराष्ट्रातही असे प्राधिकरण मुंबईत आहे आणि प्रत्येक जिल्ह्यात ‘जिल्हा पोलीस तक्र ार प्राधिकरण’असणंही बंधनकारक आहे. हे प्राधिकरण न्यायालयाप्रमाणेच काम करतं. पण तिथे वकिलाची गरज नसते आणि एकच विषय ते हाताळत असल्यामुळे न्यायालयापेक्षा वेगात प्रक्रि या होऊ शकते. उपआयुक्त किंवा त्यावरील दर्जाच्या पोलीस अधिकार्‍यांबाबत तक्र ार असेल तर राज्य प्राधिकरणाकडे थेट तक्र ार करता येते. त्याखालच्या दर्जाच्या अधिकार्‍यांबाबत तक्र ार असेल तर जिल्हा प्राधिकरणाकडे दाद मागता येते. प्राधिकरणाने दिलेले आदेश पोलिसांना व राज्य सरकारला बंधनकारक असतात. पोलिसांनी विनावॉरंट अटक केली, कोठडीत ठेवले, गुन्हा नोंदवून घेण्यास टाळाटाळ केली किंवा कोणत्याही प्रकारचा गंभीर अत्याचार केला तर तक्र ार प्राधिकरणाकडे नागरिक तक्र ार करू शकतात. साध्या कागदावर लिहिलेल्या अर्जाद्वारे ही तक्र ार करता येते. 

मागील एका लेखात म्हटले होते तसे - पोलिसांचा धाक गुन्हेगारांना असला पाहिजे. आपण गुन्हा केला नसेल तर भिण्याचं काय कारण? पोलीस अधिकारी वा कर्मचारी ही माणसंच आहेत. त्यांच्यावर दडपणं, ताण असतात. त्यांनाही मान-अपमानाची भावना असणारच. म्हणून आपण सुजाण नागरिकांनी पोलिसांशी संवाद करताना किंवा कोणत्याही सरकारी व्यक्तींशी बोलताना त्यांचा अपमान करू नये. आपला हक्क आपलं मत ठामपणे सांगावं,  हक्क सोडू नये; पण त्यासाठी समोरच्याचा अपमान करण्याची गरज नसते. यालाच ‘सविनय कायदेपालन’ म्हणतात.

****************

राज्य पोलीस तक्र ार प्राधिकरणाचा पत्ता असा - महाराष्ट्र राज्य पोलीस तक्र ार निवारण प्राधिकरणचौथा मजला, कुपरेज टेलिफोन एक्स्चेंज, महर्षी कर्वे रोड, नरीमन पॉइंट, मुंबई, 400021 ई-मेल mahaspca@gmail.com फोन 02222820045 / 46/47