शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
2
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
3
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
4
"देशाला दिशा देण्याऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
5
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
6
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
7
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
8
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
9
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
10
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
11
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
12
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
13
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला
14
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!
15
मथुरा श्रीकृष्ण जन्मभूमी प्रकरण: हिंदू पक्षाला झटका, शाही ईदगाहला वादग्रस्त ढाचा घोषित करण्याची मागणी HC नं फेटाळली
16
ENG vs IND : जलद शतकी खेळीसह Jamie Smith चा पराक्रम! १४८ वर्षांत असं पहिल्यांदा घडलं
17
'रामायण'मध्ये दिग्गज कलाकारांची फौज रावणावर तुटून पडणार, अमिताभसह कोण साकारणार कोणती भूमिका?
18
'बिहार की बेटी', PM मोदींनी उल्लेख केलेल्या त्रिनिदादच्या पंतप्रधान कोण? बिहारशी काय संबंध?
19
एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीसांनी घेतले शरद पवारांचे नाव
20
Video: मोठी बातमी! एकनाथ शिंदेंकडून पुण्यात 'जय महाराष्ट्र' पाठोपाठ 'जय गुजरात'चा नारा; आधीच मराठी-हिंदी वाद...

ऋतू हिरवा, ऋतू बरवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2020 17:19 IST

शांताबाईंची कविता प्रशांत सरोवरात अलगद एकापाठोपाठ एक कमळं उमलत जावीत तशी आपल्यासमोर उलगडत जाते.. त्यांच्या कवितेने आपलं भणंग आयुष्य सुजाण, शहाणं, निग्रही केलं आहे..

ठळक मुद्देमज फूल ही रु तावे हा दैवयोग आहे.

लीना पांढरे

टाळेबंदीचा बंदिस्त, विषण्ण करून टाकणारा काळ. तशात चक्रीवादळाच्या थडकणा:या बातम्या. रात्नभर मुसळधार पाऊस कोसळत होता. शेजारच्या कंपाउंडमधील  काळी मांजरी केविलवाणी ओरडत होती. पहाटे पहाटे ती व्यायली. नुकतीच जन्मलेली, डोळे मिटलेली पिल्लं तोंडात धरून ती इकडे-तिकडे आसरा शोधू लागली आणि मला शांताबाईंची कविता अचानक आठवली.‘नुकतीच कोठे मांजर व्याली, सांन जीव कोवळे, काचेवरती कसे दाटले अवेळचे कावळे.’जन्म आणि लगेच त्या कोवळ्या जिवांवरील मरणाचं सावट किती नेमकेपणाने मांडले शांताबाईंनी. शांता शेळके यांना या इहलोकाचा निरोप घेऊन उणीपुरी 18 वर्षे उलटली. 6 जून 2002 रोजी अशाच पावसाळी कुंद, दाटून आलेल्या वेळी त्यांनी आपला निरोप घेतला. शांताबाईंचं व्यक्तिमत्त्व भारदस्त खानदानी आणि आदबशीर होतं. डोक्यावरून घेतलेला पदर, भाळावरील ठसठशीत कुंकू, कानात टपो:या मोत्यांच्या कुडय़ा, सस्मित चेहरा आणि आश्वस्त करणारी शांत नजर.शांताबाईंसारखीच त्यांची कविताही आहे. चांदण्या रात्नी उंच देठावर उमललेल्या निशिगंधासारखी. शालीन, तालेवार आणि खानदानी कविता उंची अत्तरासारखी. जन्मभर आपल्यात खोलवर परिमळत राहाणारी.कविता हा शब्दसुद्धा परक्या लिपीसारख्या असणा:या कितीतरी मराठी माणसांना शांताबाईंची गीतं अगदी बालवाडीच्या वर्गापासूनच भेटायला लागतात. किलबिल किलबिल पक्षी बोलती, पप्पा सांगा कुणाचे, आणि नंतर शाळेतला कुठलाही कार्यक्रम ‘जय शारदे वागिश्वरी’ या सरस्वतीस्तवनानेच सुरू व्हायचा. त्यानंतर ‘गणराज रंगी नाचतो’पासून ‘शूर आम्ही सरदार’ अशी वीरश्री अंगात संचार करणारी गाणी त्याच वयात भेटली. थोडसं मोठं झाल्यानंतर शाळेच्या रंगमंचावर गुडघ्यार्पयत जरीची साडी नेसून ‘वादळ वारं सुटलं गो’, ‘माङया सारंगा राजा ’  किंवा ‘मी डोलकर डोलकर डोलकर दर्याचा राजा’ यावर ठेका धरला. नंतर स्वत:बद्दल खुळचट घमेंड बाळगण्याची  कॉलेजची स्वप्नाळू वर्षे. ‘शालू हिरवा पाचू नी मरवा’ अशा भावगीतांपासून ‘जाईन विचारत रानफुला, भेटेल तिथे गं सजण मला’किंवा ‘ही वाट दूर जाते स्वप्नामधील गावा, माङया मनातला का तेथे असेल रावा’ अशा तारुण्यसुलभ गीतांबरोबर धुंद मदीर करून टाकणा:या शृंगारिक लावण्याही शांताबाईंनी लिहिलेल्या आहेत. आशाबाईंनी गायलेली लावणी आठवते?रेशमाच्या रेघांनी, लाल काळ्या धाग्यांनी, कर्नाटकी कशिदा मी काढीला,हात नगा लावू माङया साडीला.त्यांची गीतं ऐकताना कायमच ‘ऋतू हिरवा, ऋतू बरवा’ वाटत राहिला.‘घर रानी साजणा’ असला तरीसुद्धा.पण त्याच लेखणीतून जिवाची तार छेडणा:या माणिक वर्मा यांच्या स्वरात शांताबाई यांनी विनवले होते.

‘मी तुझी होते कधी हे सर्व तू विसरून जा, चांदण्या रात्नीतले ते स्वप्न तू विसरून जा .’आशाच्या व्याकूळ सुरातून म्हटलेले गीत, जिवलगा राहिले रे दूर घर माङो.जितेंद्र अभिषेकी यांनी मांडलेली शांताबाईंची फिर्याद. काटा रु ते कुणाला आक्रं दतात कोणी. मज फूल ही रु तावे हा दैवयोग आहे.’-अशी किती उदाहरणं सांगता येतील.शांताबाईंची कविता ही अस्सल स्त्नीत्व व्यक्त करणारी आत्मनिष्ठ आणि रोमॅटिक कविता आहे. ती  कुठेही सामाजिक, वैचारिक, राजकीय क्षितिजांना गवसणी घालायला गेलेली नाही आणि ती अजिबात दुबरेध नाही. शांताबाईंची कविता प्रशांत सरोवरात अलगद एकापाठोपाठ एक कमळं उमलत जावीत तशी आपल्यासमोर उलगडत जाते. बाईंची सर्व सांस्कृतिक संचितं, त्यांची संस्कृतप्रचुर भाषा, लोकगीतं, स्त्नीगीतं, जात्यावरच्या ओव्या, संतांचे अभंग, मेघदूत, उत्तररामचरित सारख्या महाकाव्यच्या गडद खुणा हे सर्व संस्कारधन त्यांच्या कवितेतून प्रगट होते.शांताबाईंच्या कवितेने  आमचं भणंग आयुष्य सुजाण, शहाणं, निग्रही केलं आहे आणि सहजपणो जगण्याला भिडणा:या साध्यासुध्या निर्मळ स्वीकारशीलतेच्या  व्रताचा वसा त्यांच्या कवितेने आम्हाला दिला आहे.

( लेखिका प्राध्यापक आहेत.)