शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

निर्माल्य दिंडी आणि श्रमदानाला सलाम

By admin | Updated: August 29, 2014 10:37 IST

गणोश मंडळ म्हटलं की त्याचा अध्यक्ष हा त्या परिसरातील सर्वांत लोकप्रिय ‘तरूण’ हे समीकरणच आहे. त्यामुळे महिलांचा मंडळांतील प्रत्यक्ष सहभाग हा विरळच,

वीर हनुमान गणेश मंडळ, 
खामगाव
 
गणोश मंडळ म्हटलं की त्याचा अध्यक्ष हा त्या परिसरातील सर्वांत लोकप्रिय ‘तरूण’ हे समीकरणच आहे. त्यामुळे महिलांचा मंडळांतील प्रत्यक्ष सहभाग हा विरळच, हिंदूचा सर्वांत मोठा उत्सव, दुर्देवानं दंगलीचं प्रमाणही याच काळात जास्त. मुस्लीमबांधव तर यासार्‍यापासून दूरच राहतात. खामगावातील वीर हनुमान गणेश मंडळ मात्र याला अपवाद आहे. या मंडळाने द्वारकाबाई चेके यांना एका वर्षी अध्यक्ष करून महिलांचा सन्मान केला तर एकदा शेख बब्बू शे.रब्बानी अध्यक्षपद दिलं. कधी शंकर धुरंदर सारखा मागासवर्गीय तरूण, तर कधी जसवंत सिंग सारखा शिख बांधव या मंडळाच्या अध्यक्षपदी राहिला आहे. अशी वेगळी ओळख सांगणार्‍या या मंडळाने २९ वर्षांपासून सामाजिक बांधिलकी जपत गणेशोत्सव साजरा केलाय. जातीय सलोखा व शांतता टिकवून ठेवण्यात नेहमीच पुढाकार घेतला. विशेष म्हणजे मंडळाचे कार्यकर्ते कुणाच्याही मागे वर्गणीसाठी ससेमिरा लावत नाहीत. ऐच्छिक रूपाने मिळणारी वर्गणी व o्रमदान हे या मंडळाचे वैशिष्ट्य. सन २0१२ मध्ये मिळालेल्या गणराया पुरस्काराच्या २५ हजारांच्या रकमेत या मंडळाकडील जमा रक्कम तसेच काही दानशुरांच्या मदतीने या मंडळाने आता ‘स्वर्गरथ’ खरेदी केला आहे. हा रथ खामगाव व परिसरात अत्यंयात्रेत ना नफा ना तोटा या पद्धतीने वापरला जातो. रक्तदानासाठी मंडळाचे कार्यकर्ते सदैव पुढे असतात. गणेशोत्सवाच्या काळात त्या नगरातील सार्वजिनक स्वच्छता करून उत्सवाचा आनंद द्विगुणीत करतात. या मंडळाने मोठ मोठे डिजे आतापर्यंत कधीही वापरले नाही. संपूर्ण दारूमुक्त असलेल्या या मंडळाच्या मिरवणुकीत शारीरिक कसरतींवर दिला जातो.
 या मंडळाची मूर्तीही अनोखीच असते. बांबू, भांडी, कागद, कोरफड, क्रीडा साहित्य अशा साधनांचा वापर करून या मंडळाची गणेशमूर्ती साकारते. गेल्या वर्षी १५ फुटांची बांबूची मूर्ती होती व यावर्षी कागद व मातीपासून बनविलेली ११ फुटांची मूर्ती नवे आकर्षण ठरणार आहे. विशेष म्हणजे मंडळाच्या स्थापनेपासून या मंडळाने प्लॉस्टर ऑफ पॅरीसची मूर्ती बसविलेली नाही. पुजेसाठी लागणारी लहान मूर्ती सुद्धा मातीचीच असेल हा नियम आहे.
दहा दिवस गणपतीची प्राणप्रतिष्ठा केल्यानंतर मूर्तीच्या विसर्जनानंतर निर्माल्याचा प्रश्न मोठा गंभीर होतो, त्यामुळे निर्माल्य जमा करून स्वच्छतेचा संदेश देणारी या मंडळाची निर्माल्य दिंडीसुद्धा अत्यंत महत्त्वाची मानली जाते. मंडळाचे कार्यकर्ते दिंडी काढून निर्माल्य गोळा करतात.
 मनजितसिंग, राजेंद्र कोल्हे, पुरूषोत्तम सातव, प्रमोद जैन या युवकांनी तरूणाई फाउंडेशन स्थापन करून समाजसेवक बाबा आमटे यांच्या विचारांचा वसा उचलला आहे. त्यामुळे यांच्या प्रत्येक कार्यात o्रमदानाचे महत्त्व सर्वाधिक आहे. पर्यावरण रक्षणाचा कृतीयुक्त संदेश देण्यासाठी दरवर्षी हे खामगाव ते शेगाव ही १८ किमीची स्वच्छता दिंडी पालखी मार्ग स्वच्छ करतात.