शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
2
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
3
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
4
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
5
IND W vs SA W Final : वनडे 'क्वीन' स्मृतीनं रचला इतिहास! मितालीचा विक्रम मोडत ठरली 'नंबर वन'
6
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
7
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
8
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास
9
"राज ठाकरे हे फेक नॅरेटीव्हच्या बाबतीत राहुल गांधींशी स्पर्धा करत आहेत का?", भाजपाचा सवाल
10
'ऑपरेशन सिंदूरद्वारे विस्फोट पाकिस्तानात, अन् झोप उडाली काँग्रेसची', पीएम मोदींचा घणाघात...
11
IND vs AUS : वॉशिंग्टनची अति 'सुंदर' बॅटिंग! विक्रमी विजयासह टीम इंडियानं केली ऑस्ट्रेलियाची बरोबरी
12
सरकारी निवासस्थानी प्रेयसीसोबत झोपले होते अधिकारी, पत्नीने रंगेहात पकडले आणि घरात कोंडले, त्यानंतर... 
13
शिंदेसेना म्हणजे दिल्या भाकरीचे अन् सांगितल्या कामाचे; अंबादास दानवेंची खरमरीत टीका
14
धोक्याची घंटा! फोन, लॅपटॉपचा जास्त वापर घातक; तरुणांमध्ये वाढली 'ड्राय आईज'ची समस्या
15
'सरकारने SIT ची घोषणा केली, पण नियुक्तीच नाही'; सुषमा अंधारे फलटण पोलीस ठाण्यात जाऊन विचारणार जाब
16
लोअर बर्थ आरक्षणाचे नियम बदलले! 'या' प्रवाशांना मिळणार प्राधान्य; बसणे-झोपण्याच्या वेळेतही बदल
17
IND vs SA Womens World Cup 2025 Final :आफ्रिकेनं जिंकला टॉस, फायनल जिंकण्यासाठी टीम इंडिया सेट करणार टार्गेट
18
Crime: पोलिसांनी गाडी थांबवली, माजी आमदार म्हणाले,"कागदपत्रे नाहीत, गाडीही चोरीची!"
19
"दिल्लीमध्ये बसून गणित करणाऱ्यांनी येऊन बघावं, हवा कोणत्या दिशेची आहे?"; PM मोदींकडून बिहारच्या जनतेला मोठी आश्वासनं
20
'गाझा' नंतर आता इस्रायलची नजर या मुस्लिम देशावर, भयंकर हल्ला करण्याची धमकी

निर्माल्य दिंडी आणि श्रमदानाला सलाम

By admin | Updated: August 29, 2014 10:37 IST

गणोश मंडळ म्हटलं की त्याचा अध्यक्ष हा त्या परिसरातील सर्वांत लोकप्रिय ‘तरूण’ हे समीकरणच आहे. त्यामुळे महिलांचा मंडळांतील प्रत्यक्ष सहभाग हा विरळच,

वीर हनुमान गणेश मंडळ, 
खामगाव
 
गणोश मंडळ म्हटलं की त्याचा अध्यक्ष हा त्या परिसरातील सर्वांत लोकप्रिय ‘तरूण’ हे समीकरणच आहे. त्यामुळे महिलांचा मंडळांतील प्रत्यक्ष सहभाग हा विरळच, हिंदूचा सर्वांत मोठा उत्सव, दुर्देवानं दंगलीचं प्रमाणही याच काळात जास्त. मुस्लीमबांधव तर यासार्‍यापासून दूरच राहतात. खामगावातील वीर हनुमान गणेश मंडळ मात्र याला अपवाद आहे. या मंडळाने द्वारकाबाई चेके यांना एका वर्षी अध्यक्ष करून महिलांचा सन्मान केला तर एकदा शेख बब्बू शे.रब्बानी अध्यक्षपद दिलं. कधी शंकर धुरंदर सारखा मागासवर्गीय तरूण, तर कधी जसवंत सिंग सारखा शिख बांधव या मंडळाच्या अध्यक्षपदी राहिला आहे. अशी वेगळी ओळख सांगणार्‍या या मंडळाने २९ वर्षांपासून सामाजिक बांधिलकी जपत गणेशोत्सव साजरा केलाय. जातीय सलोखा व शांतता टिकवून ठेवण्यात नेहमीच पुढाकार घेतला. विशेष म्हणजे मंडळाचे कार्यकर्ते कुणाच्याही मागे वर्गणीसाठी ससेमिरा लावत नाहीत. ऐच्छिक रूपाने मिळणारी वर्गणी व o्रमदान हे या मंडळाचे वैशिष्ट्य. सन २0१२ मध्ये मिळालेल्या गणराया पुरस्काराच्या २५ हजारांच्या रकमेत या मंडळाकडील जमा रक्कम तसेच काही दानशुरांच्या मदतीने या मंडळाने आता ‘स्वर्गरथ’ खरेदी केला आहे. हा रथ खामगाव व परिसरात अत्यंयात्रेत ना नफा ना तोटा या पद्धतीने वापरला जातो. रक्तदानासाठी मंडळाचे कार्यकर्ते सदैव पुढे असतात. गणेशोत्सवाच्या काळात त्या नगरातील सार्वजिनक स्वच्छता करून उत्सवाचा आनंद द्विगुणीत करतात. या मंडळाने मोठ मोठे डिजे आतापर्यंत कधीही वापरले नाही. संपूर्ण दारूमुक्त असलेल्या या मंडळाच्या मिरवणुकीत शारीरिक कसरतींवर दिला जातो.
 या मंडळाची मूर्तीही अनोखीच असते. बांबू, भांडी, कागद, कोरफड, क्रीडा साहित्य अशा साधनांचा वापर करून या मंडळाची गणेशमूर्ती साकारते. गेल्या वर्षी १५ फुटांची बांबूची मूर्ती होती व यावर्षी कागद व मातीपासून बनविलेली ११ फुटांची मूर्ती नवे आकर्षण ठरणार आहे. विशेष म्हणजे मंडळाच्या स्थापनेपासून या मंडळाने प्लॉस्टर ऑफ पॅरीसची मूर्ती बसविलेली नाही. पुजेसाठी लागणारी लहान मूर्ती सुद्धा मातीचीच असेल हा नियम आहे.
दहा दिवस गणपतीची प्राणप्रतिष्ठा केल्यानंतर मूर्तीच्या विसर्जनानंतर निर्माल्याचा प्रश्न मोठा गंभीर होतो, त्यामुळे निर्माल्य जमा करून स्वच्छतेचा संदेश देणारी या मंडळाची निर्माल्य दिंडीसुद्धा अत्यंत महत्त्वाची मानली जाते. मंडळाचे कार्यकर्ते दिंडी काढून निर्माल्य गोळा करतात.
 मनजितसिंग, राजेंद्र कोल्हे, पुरूषोत्तम सातव, प्रमोद जैन या युवकांनी तरूणाई फाउंडेशन स्थापन करून समाजसेवक बाबा आमटे यांच्या विचारांचा वसा उचलला आहे. त्यामुळे यांच्या प्रत्येक कार्यात o्रमदानाचे महत्त्व सर्वाधिक आहे. पर्यावरण रक्षणाचा कृतीयुक्त संदेश देण्यासाठी दरवर्षी हे खामगाव ते शेगाव ही १८ किमीची स्वच्छता दिंडी पालखी मार्ग स्वच्छ करतात.