शहरं
Join us  
Trending Stories
1
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
2
झालं... युपीआय बॅलन्स चेकवर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
3
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?
4
Sonam Raghuvanshi : "... तर तिला फाशी द्या!", सोनम रघुवंशीचा भाऊ काय म्हणाला?
5
युक्रेनसाठी सर्वात भयावह रात्र! रशियाने केला सर्वात मोठा ड्रोन हल्ला, अनेक शहरे उद्ध्वस्त
6
99 टक्क्यांहूनही अधिकने घसरून थेट 60 पैशांवर आला होता हा पॉवर शेअर, आता 2857 टक्क्यांची तुफान तेजी!
7
लॉस एंजेलिसमध्ये भडकला हिंसाचार, पत्रकाराला अचानक लागली गोळी; अंगावर शहारा आणणारं दृष्य कॅमेऱ्यात कैद
8
"पतीला मारले, मग माझं अपहरण करून..." सोनमच्या कहाणीनं राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट
9
Mumbai Local Accident: स्वप्नातंल घर घ्यायला बाहेर पडला अन्...; रेल्वे अपघातात आयटी इंजिनिअरचा दुर्दैवी अंत!
10
कमाल झाली! थ्रो मारला स्ट्राइक एन्डला अन् रन आउटची विकेट मिळाली नॉन स्ट्राइक एन्डला (VIDEO)
11
Sonam Raghuvanshi : राजाच्या चेहऱ्यावर हसू अन् सोनमच्या डोक्यात हत्येचं प्लॅनिंग? लग्नातला 'तो' Video तुफान व्हायरल
12
प्रियकर राज शिलाँगला गेलाच नाही! राजाच्या हत्येची सुपारी अन् सोनमसोबत गुपचूप फोनाफोनी...   
13
२४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक...
14
लेफ्टनंट जनरल राजीव घई यांना मिळाली आणखी एक जबाबदारी; तिन्ही दलांवर असणार लक्ष
15
राजा रघुवंशीचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला समोर, शरीरावर कुठे-कुठे आढळल्या जखमा? 
16
जिओ ब्लॅकरॉक अ‍ॅसेट मॅनेजमेंटनं तयार केली दिग्गजांची टीम, गुंतवणुकीसाठी नवीन वेबसाइटचाही श्रीगणेशा
17
Mumbai Railway Accident: ड्युटी संपवून घराकडे निघाला, तान्हुल्या बाळाला भेटायची ओढ; पण त्याआधीच मृत्यूनं कवटाळलं!
18
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
19
'मेन्यू' तोच; पण 'वेन्यू'ची अदला-बदल! टीम इंडियाच्या आगामी शेड्युलसंदर्भात BCCI नं घेतला हा निर्णय

साड्डा हक.

By admin | Updated: January 22, 2015 18:43 IST

‘साड्डा हक एथ्थे रख’ असं बजवायला या देशातलं तारुण्य कमी करत नाही! बाकी जाऊ द्या, माझ्या हक्काचं, माङया वाटय़ाचं मला द्या, असं म्हणत सरकारवर दबाव टाकणारं इथलं तारुण्य !

‘साड्डा हक एथ्थे रख’ असं बजवायला या देशातलं तारुण्य कमी करत नाही!
बाकी जाऊ द्या, माझ्या हक्काचं, माङया वाटय़ाचं मला द्या, असं म्हणत सरकारवर दबाव टाकणारं इथलं तारुण्य !
मुळात या देशाची ताकद अशी की, सरकारच लोकांनी, लोकांमधून निवडून दिलेलं, त्यामुळं लोकांना उत्तरं द्यायला बांधील!
आणि या देशात राज्यघटनेशिवाय मोठं काही नाही, आणि कायद्यासमोर सारे समान हे तत्त्व प्राणपणानं जपलं जातं. हीच खरी तर इथली ताकद. म्हणून तर बडे खासदार-मंत्री-अधिकारी या देशात गजाआड होऊ शकतात.
दिल्लीत झालेल्या निर्भयाप्रकरणानंतर देशभरातलं तारुण्य रस्त्यावर उतरलं. त्यातून महिलांवरील अत्याचारासंदर्भात कठोर कायदा झाला; आणि त्यानंतर काहीच दिवसात, देशातल्या एका बडय़ा मासिकाचा संपादकाविरुद्ध लैंगिक अत्याचाराची केस दाखल झाली. बडा तहलका झाला आणि आजही तो बडा पत्रकार गजाआड आहे. एक बडा उद्योगश्री जामिनासाठी जंग जंग पछाडतो आहे, पण कायद्यानं त्याला जामीन मिळणं अवघड झालं आहे.
ही आहे या देशातली कायद्याची ताकद.
त्या कायद्याला सारे समान. आणि दुसरीकडे देशानं स्वीकारलेली कल्याणकारी राज्याची संकल्पना. अंत्योदयाची एक मनस्वी इच्छा.
जागतिकीकरणाच्या काळात ही कल्याणकारी राज्याची संकल्पना काहीशी मागे पडत असली तरी आजही सरकार तळागाळातल्या शेवटच्या माणसाच्या विकासासाठी बांधील आहे.
त्यातून वेगवेगळ्या योजना साकारत आहे. सध्या राबवल्या जात असलेल्या पंतप्रधान जनधन योजनेविषयी अनेक आक्षेप नोंदवले जात असले तरीही हातावर पोट असलेल्या अनेक माणसांना त्यातून बॅँकेत अकाउण्ट उघडण्याची संधी मिळाली. आपल्यालाही या नव्या व्यवस्थेत काही स्थान आहे असा विश्वास लाभला हे नाकारणंही अवघड आहे.
रोजगार हमी योजना, माहितीचा अधिकार, वनहक्क कायदा, यासारख्या अनेक योजनांमधून  आर्थिकदृष्टय़ा तळाशी असलेल्या माणसालाही आपल्या हक्कांसाठी लढता येऊ शकतं. त्यासाठी मदत मिळू शकते.
आपण नेहमी सरकारी योजना अमलबजावणीला दोष देतो, या योजना राबवण्यात होणा:या भ्रष्टाचारासंदर्भात बोलतो, ते सारं खरंही आहे. मात्र तरीही यासगळ्या योजना, त्यातून सामान्य माणसाला मिळणारे अधिकार ही आपली ताकद आहे आणि ती योग्य पद्धतीनं वापरलीच गेली पाहिजे हे काही आपण लक्षात घेत नाही.
आपणच जागरूकपणो कायदा समजावून घेतला, नियमावर बोट ठेवलं, योजना कशा राबवल्या जातात याकडे लक्ष ठेवलं, तर या योजनांतून अनेक माणसांना जगण्याचे अधिकार मिळू शकतात.
त्यातल्या काही महत्त्वाच्या योजनांवर हा एक दृष्टिक्षेप.
 
* सर्वसामान्य गरीब बेरोजगार हातांना काम मिळावं यासाठी 2क्क्5मध्ये कायद्यानं सगळ्यांना कामाची हमी मिळाली आणि संपूर्ण देशभरात ‘ग्रामीण रोजगार हमी योजना’ (नरेगा, आता मनरेगा) अस्तित्वात आली. जगातली आणि मानवी इतिहासातली ही पहिली सर्वात मोठी योजना, जिनं कोटय़वधी नागरिकांना राहत्या ठिकाणी कामाचा हक्क मिळवून दिला. विकासकामांसाठी असलेल्या याच एकटय़ा योजनेंतर्गत सर्वसामान्य लोकांसाठी सर्वाधिक बचत खाती बॅँकेत उडघडण्यात आली. जगातल्या कोणत्याही योजनेत यापेक्षा जास्त बचत खाती जोडण्यात आलेली नाहीत.
 
* गरिबातलं गरीब मूलही शाळेत जावं आणि रमावं यासाठी तयार करण्यात आलेली ‘माध्यान्य भोजन’ योजना. मुलांना शाळेतच पोटभर पौष्टिक आहार मिळावा हा मुख्य हेतू. दररोज बारा लाख शाळकरी मुलांना भोजन देणारी ही जगातली सगळ्यात मोठी योजना आहे.
 
* वृक्षसंवर्धन आणि वृक्षलागवड योजनेंतर्गत पश्चिम बंगालमधील डुंगरपूर येथील सर्वसामान्य स्वयंसेवकांनी 24 तासात सहा लाख झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. वनविभागाच्या साहाय्याने अंमलात आलेल्या या योजनेंतर्गत एक जागतिक इतिहास रचला आहे.
 
* दूरसंचार योजनेला सरकारने दिलेल्या चालनेमुळे अनेक क्रांतिकारी बदल घडून आले. जगातल्या कोणत्याही देशापेक्षा भारतात न्यूज चॅनेल्सची संख्या तर सर्वाधिक आहेच, पण मोबाइल कॉलचा दरही भारतात सर्वात कमी आहे.
 
* पर्यायी ऊर्जास्नेतांची गरज भरमसाठ वेगानं वाढत असताना भारतही या मार्गावर अग्रेसर आहे. पवनऊर्जेचा वापर करणारा भारत हा जगातला चौथ्या क्रमांकावरचा देश आहे. 
 
* सौरऊर्जेचा वापरही भारतात वेगानं वाढतो आहे. हाच वेग कायम राहिला तर सन 2क्22 र्पयत दोन कोटी सौरदिवे घराघरांत बसलेले असतील. त्यामुळे दरवर्षी एक अब्ज लिटर केरोसिनची बचत होईल.
 
* सर्वाधिक सौरऊर्जानिर्मिती करणा:या देशांत भारत आज नवव्या क्रमांकावर आहे. 
 
* जागतिक स्पर्धेच्या पाश्र्वभूमीवर भारतीय सॉफ्टवेअर इंडस्ट्री सर्वाधिक वेगानं वाढते आहे. अनेक विकसित आणि विकसनशील देशांना ही सेवा पुरवली जात आहे. हा उद्योग नुसता वाढतच नाहीय, तर देशातल्या कोणत्याही उद्योगापेक्षा कार्यक्षम सेवाही पुरवीत आहे. 
 
* 2005मध्ये अस्तिवात आलेल्या माहितीचा अधिकार कायद्यानं सर्वसामान्यांचं जीवनच बदलून गेलं. प्रशासनापुढे वचकून असलेल्या सर्वसामान्यांनी या कायद्याचं हत्यार हाती येताच स्वबळावर हिंमतीनं लढा दिला आणि जिंकलाही. ती प्रक्रिया अद्यापही सुरू आहे. 
 
पण तरीही.
 
 
* भारतात बायकांवर होणा:या अत्याचारांचं प्रमाण प्रचंड आहे. आणि देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत तर ते देशात सर्वाधिक आहे.
 
*देशात 100 फास्ट ट्रॅक न्यायालयं आहेत. मात्र आजही तीन कोटी केसेस पेंडिंग आहेत. त्यातला 25,000 केसेस या बलात्काराच्या आहेत.
 
*हुंडाबळीचा कायदा होऊन इतकी वर्षे झाली तरीही, या देशात हुंडाबळीचे प्रमाण मोठे आहे.