शहरं
Join us  
Trending Stories
1
Gambhira Bridge Collapse : भयानक Video! गुजरातमध्ये गंभीरा पूल कोसळला, अनेक वाहने पाण्यात पडली; तिघांचा मृत्यू, शोध सुरु 
2
'चीन, पाकिस्तान आणि बांगलादेशची एकी भारतासाठी धोकादायक', CDS प्रमुख चौहान यांचं मुद्द्यावर बोट
3
मेट्रो प्रकल्पाला गती देण्यासाठी २५० परप्रांतीय मजूर मुंबईत दाखल; काहींना विमानाने मुंबईत आणले
4
ही तर सोनमपेक्षा एक पाऊल पुढे! बॉयफ्रेंडसाठी पतीला विष दिलं अन् कुणालाही कळण्याआधी केला खेळ खल्लास!
5
Stock Market Today: ७६ अंकांनी घसरून उघडला सेन्सेक्स; ३ सेक्टर्समध्ये तेजी, का अस्थिर आहे मार्केट?
6
भारत बंद होण्याआधीच इंडिया आघाडीचा चक्का जाम; बिहारमध्ये निवडणूक आयोगाविरोधात रस्ते बंद, रेल्वे रोखल्या
7
Pension Scheme: वृद्धापकाळात दरमहा ₹२०,५०० चं पेन्शन देईल ही स्कीम; पाहा याचे जबरदस्त ५ फायदे
8
Alia Bhatt : अभिनेत्री आलिया भटच्या माजी पर्सनल असिस्टंटला अटक; ७६ लाखांच्या फसवणुकीचा गंभीर आरोप
9
"मृणालची इमेज खराब होणार नाही अशी आशा", अजय देवगणसोबतचा डान्स पाहून केलं ट्रोल
10
लेकीला वाचवण्यासाठी आईने घरही विकलं, तरीही...; कोण आहे निमिषा प्रिया? येमेनमध्ये होणार फाशीची शिक्षा
11
लग्नाच्या पहिल्या रात्रीच पती नपुंसक असल्याचे समजले, तिने मोठ्या जावेला सांगितले, मग दीर आला...
12
Sanjay Gaikwad : आमदार संजय गायकवाडांचा राडा, आमदार निवास कँटिनमधील कर्मचाऱ्याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण
13
स्मृती ईराणींचा राजकारणातून अभिनयाकडे युटर्न, १७ वर्षांनंतरच्या कमबॅकवर म्हणाल्या- 'पार्ट टाइम अ‍ॅक्ट्रेस'
14
लग्नाच्या ३ वर्षांतच पायल रोहतगीचा होणार घटस्फोट? ७ वर्ष लहान कुस्तीपटूशी थाटलेला संसार
15
"माझ्यासाठीच नाही, तर १४० कोटी भारतीयांसाठीही..."; ब्राझीलचा सर्वोच्च सन्मान मिळाल्यावर काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
16
अरे देवा! ज्या सावत्र आईचा आशीर्वाद घ्यायचा, तिच्यासोबत पळाला अल्पवयीन मुलगा; केलं लग्न
17
Kangana Ranaut : "लोकांना तिला निवडून दिल्याबद्दल पश्चात्ताप होतोय"; कंगना राणौतवर काँग्रेसचा जोरदार हल्लाबोल
18
पुणे : बाहेरून दिसायचा स्पा, आत चालायचा देह व्यापार; १८ मुलींची सुटका, परदेशी मुलींचाही समावेश
19
Video - संतापजनक! राजस्थानमध्ये उद्घाटनापूर्वीच वाहून गेला नवा रस्ता; पावसाने केली पोलखोल
20
अहमदाबाद विमान दुर्घटनेच्या प्राथमिक चौकशी अहवालात काय?; कारण अद्यापही गुलदस्त्यात

वाटतं जावं पळून, अशी तुमची चिडचिड झाली आहे का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2020 15:42 IST

कंटाळा आला जगण्याचा, असं वाटतं नको हे सगळं. जावं कुठं तरी पळून. हे घरात बसणं नको, ही कटकट नको, हे घरकाम नको, हे बोअर आयुष्य नको

ठळक मुद्देजायचं का पळून?

- अनन्या भारद्वाज

कंटाळा आला जगण्याचा, असं वाटतं नको हे सगळं. जावं कुठं तरी पळून. हे घरात बसणं नको, ही कटकट नको, हे घरकाम नको, हे बोअर आयुष्य नको. वाटतं जावं पळून.- असं आताशा येतं ना तुमच्या मनात. वाटतं नको ही रूटीनची कटकट. त्यात हा कोरोना. त्याचा कहर. घरात तंगीबिंगी, घरकाम करा, घरातच बसा, काहीतरी नवीन शिक, हातात वेळ आहे तर हा घरच्यांचा डोस.नोकरी लागेल का, परीक्षा होईल का, कुणी जॉब देईल का,  आहे ती रिलेशनशिप तरी टिकेल का?असे अनेक प्रश्न तुमच्या मनात येत असतीलच.आणि वाटत असेल जावं पळून?पण सांगा, कुठं पळणार? कुठं जाणार पळून? हा कोरोना तर सगळीकडे आहे, जगभरात आहे. कुठं जाताही येणार नाही, अगदी जिल्हाही सोडता येणार नाही, अशी जिल्हाबंदी आहे.मग पळून जायचं कुठं? आणि कसं?बरं घरात असं काही म्हणावं तर घरचे म्हणणार जा, बाहेर कुणी विचारतंय का बघ, काय धमक्या देतो पळायच्या, पळायला आहेच कुठं तुला जागा?म्हणजे थोडक्यात काय तर पळायलाही जागा नाही.पण म्हणून आपण या भावनेचाच विचार करायला हवा की पळून जायचं म्हणजे नेमकं कुठं जायचं? कसं जायचं? कुणापासून पळायचं?असहायता, नैराश्य, कधी समस्या, कधी माणसं, कधी मोठंच काहीतरी कमावण्याचं स्वपA, कधी अगदीच नको होणं परिस्थिती यापायी अनेकांना पळून जावंसं वाटतं. सध्याचं आयुष्य, माणसं, परिस्थिती यासा:याचा तिटकारा आला आहे असं वाटतं.कुणाचं तोंड पाहू नये असंही वाटतं. कितीही जीव रमवला ऑनलाइन, कितीही घातलं तोंडाला कुलूप तरी वाटतं नको हे सारं. पार तिडीकच जाते डोक्यात.पण मग उपाय शोधायलाही सुरुवात होते.

आता तर पळणंही शक्य नाही मग आपण नेटवर शोधाशोध करतो. हाऊटू हेल्प युअरसेल्फ, हाऊ टू हिल युअरसेल्फ, पॉङिाटिव्ह थिंकिंग, रिलॅक्स कसं व्हावं यासाठीच्या टिप्स काय असतात? पुस्तकं वाचा, ऑनलाइन गेम्स खेळा, असंही काहीजण करून पाहतात.पण तरी बोअरडम काही कमी होत नाही.वाटतं, आता आहे ते मागे सोडून आपण निघून गेलो, या गुंत्यात नाहीच अडकलं तर कदाचित आपलं जगणं बदलेल.आता नाही जरा परिस्थिती सुधारली की पळू.मग आपण आपल्या सोयीच्या सोयीसोयीने यशस्वी झालेल्यांच्या गोष्टी वाचतो. सिनेमे पाहतो. त्यांचा संघर्ष पाहतो, वाटतं हे एवढं तर मलाही जमेल.त्यात आपण हे विसरतो की आज कुणी घरातून पळाला, म्हणजे लगेच उद्या त्याला यश मिळालं असं होत नाही. सगळेच बसलेले फटके कुणी सांगत नाही.आपली मानसिक स्थिती जर लो असेल, आधीच गाडी खडकत असेल, रडतखडत चालत असेल तर आपण डायरेक्ट पळून जाऊन सुसाट कसं धावायला लागणार?म्हणजे घरात आपण चार पाऊलं चालत नाही आणि बाहेर जाऊन आपण लगेच मॅराथॉन जिंकणार असं कसं होईल?पण आपण असे प्रश्न स्वत:ला विचारत नाही.उत्तम तब्येत, नीट प्लॅनिंग, उत्तम परिस्थितील आर्थिक थोडं का होईना पाठबळ किंवा आपण जमवलेले पैसेआणि नेमकं आपण काय करणार हे ठरलेलं असताना काहीतरी वेगळं करून पाहणं वेगळं.पण डोक्यात वारं आलं म्हणून पळत सुटणं म्हणजे आपटी खाणंच आहे.पण मग यावर उपाय काय? परिस्थिती बदलायचा प्रयत्न करायचाच नाही का?असंच कुजत जगायचं का?तर अजिबात नाही.त्यावर उपाय म्हणजे, आपल्याला न आवडणारी घरातली माणसं असली, तरी ती मायेची असतात.त्यांना आपल्याविषयी थोडं तरी प्रेम असतं, बाहेर आपण अनोळखी लोकांनी जुळवून घ्यायला तयार आहोत तर मग आपल्याच घरातल्या माणसांशी मायेनं बोलायला, कधी जरा पडतं घेत त्यांचं म्हणणं ऐकून तरी घ्यायला काय हरकत आहे?कधी कधी नात्यात साचलेपण येतं. एकमेकांना गृहीत धरायला लागतो आपण.त्यापेक्षा अगदी लहान बहीण भाऊ, मोठे बहीण भाऊ, नात्यातले कुणी, आईबाबा यासा:यांशी बोलायला लागा. डायरेक्ट मनातलं नाही तर इकडचं तिकडचं, जरा गप्पा मारा.सहजच फोन करा. जमलं तर आपलं मन मोकळं करा.  त्यांनी काही सांगितलं तर ऐकून पहा. ते करूनही पहा. पळून जाण्यापेक्षा आपल्या निगेटिव्ह विचारांपासून पळा. लांब व्हा.आहे त्या परिस्थितीत टिच्चून उभा राहीन असं म्हणा, आणि कामाला तर लागा.घरात साफसफाई करणं, भांडीच घासणं, घरात जाळी काढणं, कपडे धुणं अगदी कोणतंही काम करा. त्यानं जरा मन तर हलकंच होईल, घरही आपलं वाटेल.त्या घरात रुजायचा प्रयत्न करा.आणि पळू नका, स्वत:पासून पळणं कधीच जमणार नाही..त्यापेक्षा या घरबंद काळात जरा जगून तर बघा, वेगळ्या रीतीने.