शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

दिवाळीनंतर सुस्तावलेलं रुटीन

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2017 09:34 IST

दिवाळीनंतरच्या आठवड्यात आपण पुन्हा रुटीनला भिडतो. पुढचे चार-पाच दिवस मोबाइलमधले कुटुंबाचे दिवाळीचे फोटो पाहतो, शुभेच्छांच्या फॉरवर्ड इमेजेस डिलीट करत बसतो.. पण मन?ते दिवाळीतच असतं.. हाताला फटाक्यांचा वास उरतो, जिभेवर लाडवाची, चकलीची चव असते तशा आठवणीही..त्या पुन्हा पुढच्या दिवाळीची वाट पाहू लागतात..

- ओंकार करंबेळकर

‘अरे शिमग्याला नाही, पालखीला नाही, गणपतीला नाही आता किमान दिवाळीला तरी मला म्हातारीला तोंडं दाखवा रे!’- अशी कडक भाषेत पोस्टकार्ड लिहिणारी, नातवंडांसाठी आंब्या-फणसाची साटं करून ठेवणारी, एरवी स्वत: तूपभात लोणच्या पलीकडे अधिकचे दोन घास न खाणारी; पण नातू किंवा मुलगा घरी येणार म्हणून कंबर कसणारी अशी आजी/काकू/मावशी नाहीतर आई असतेच प्रत्येकाच्या आयुष्यात.आणि दिवाळीत ती वाट पाहते लेकरांची.दिवाळी चार दिवसांची ती येते, जाते.आपण पुन्हा आपल्या व्यापाला लागतो. आॅफिसात जुंपले जातो. कॉलेज, हॉस्टेलमध्ये मित्रांमध्ये रमतो.पण त्या चार दिवसांची दिवाळी थोडी सोबत येते..आणि पहिल्या आठवड्यात आपल्याही नकळत आपल्या डोळ्यांना ओल येते. आठवणी पायात पायात करतात.आताशा बिझी असल्याचा पट्टा वर्षभर दुसरं काही करूच देत नाही. बदलत्या वेगवान काळात आपल्यामध्ये, घरांमध्ये, नात्यांमध्ये, कुटुंबांमध्ये मोठे बदल झाले आहेत. जिममध्ये ट्रेडमिल नावाचा सतत पळणारा पट्टा असतो, त्याच्या वेगाने तुम्हाला चालावं किंवा पळावं लागतं. जरा लक्ष ढळलं किंवा तुमचा चालण्याचा जोर कमी झाला, तर अडखळायला होतं किंवा तुम्ही खाली पडता तरी. आपण सगळेच आता नोकरी किंवा शिक्षण नावाच्या वेगवान ट्रेडमिलवर स्वत:ला उभं केलं आहे. सतत आपलं शेड्युल टाइट. त्यादरम्यान फोनमधल्या विशलिस्टमध्ये अनेक गोष्टी घालत आपण हे सारं दिवाळीत करू म्हणतो. उत्सवापेक्षा बारा महिन्यांचा शीण घालवण्याचा हक्काचा काळ असं स्वरूप आता दिवाळीला आलंय. वर्षभर ठरवलेल्या मित्र, नातेवाइकांच्या भेटी याच काळात होतात. सणाच्या उत्साहाबरोबर आरामामुळे एक प्रकारचे सुस्तावलेपणही येत असतं. लहानपणच्या दिवाळीच्या आठवणी येऊ लागतात. भावंडांशी केलेली भांडणं, किल्ले डोळ्यांसमोर यायला लागतात. यावर्षी दिवाळीपर्यंत साथीला असलेल्या पावसामुळे एखादी जुनी पावसाळी दिवाळी आठवते. त्यावर्षी मऊ पडलेले फटाके किंवा चिवड्याचे चामट झालेले पोहे, पाऊस बघत खिडकीत बसून लोण्यात बुडवून खाल्लेल्या चकल्याही आठवतात.आणि दिवाळी संपून गेली तरी दिवाळीचा असा हॅँगओव्हर मनावर राहतोच. फराळाच्या डब्यातलं फराळ, ते तळाला जातं; पण खाली उरतंच काहीतरी...तसं मनात बरंच काही उरतंच.होस्टेलवर किंवा आॅफिसात अनेकजण घरचा फराळ आणतात. मग तो मिक्स करून पुन्हा एकदा फराळावर यथेच्छ आडवा हात मारला जातो. उरलेल्या चिवड्याची मिसळही करून होते. डब्याच्या खाली तुपामुळे एकमेकाला चिकटून एकच गोळा झालेले लाडू किंवा तळाशी असलेल्या खारट चिवड्याचा मसाला जिभेवर दाबायची इच्छा बळावायला लागते. दिवाळी अंक वाचताना मध्येच भावंडांमध्ये रंगलेला पत्त्यांचा डाव आठवतो. पाच-तीन-दोन पासून सुरुवात होत सगळे डाव खेळून होतात. चिडाचिडी करून होते. ती आठवून आता हसू येतं. दिवाळी अशी हळूहळू हलकेच सुस्तावत आपल्यासोबत चालते. पत्ते खेळताना, गप्पा मारताना जुन्या आठवणी- गमती आठवतात. मग त्यावर खोखो हसणं आठवतं. हे वरवर साधे हलकेफुलके प्रसंग असले तरी आपल्यासाठी ते चार्जिंग पॉइंट्स असतात. पुढच्या दिवाळीपर्यंत हे क्षण चार्जिंग पुरवतात.

सण, आनंद, समाधान कदाचित हेच असावं. फटाके, नवे कपडे, वस्तू यांच्यापेक्षा हे एकत्र येणं, जमणं, गप्पा, दंगामस्ती, खळखळून हसणं, सर्वांनी पुन्हा सैलावून मोकळं-ढाकळं होणं हाच दिवाळीचा हेतू असावा. हे सगळं होणं म्हणजेच दिवाळी सुफळ झाली असं म्हणावं लागेल.आणि मग आपण दिवाळीनंतरच्या आठवड्यात कामाला भिडतो. पुढचे चार-पाच दिवस मोबाइलमधले दिवाळीचे फोटो पाहतो, शुभेच्छांच्या फॉरवर्ड इमेजेस डिलीट करत बसतो..

आणि दिवाळीत हाताला फटाक्यांचा वास उरतो.किंवा जिभेवर लाडवाची, चकलीची चव असते.तशा दिवाळीच्या आठवणीही कामात मध्येच येतात, जातात..आता काही दिवसात त्या आठवणी पुसट होतील..पण दिवाळीनं दिलेला ब्रेक. चार्ज होत कामाला लागण्याचं बळ, घरच्यांसोबतच्या निवांत गप्पा आणि त्यातलं मन:पूत हसू हे सारं मात्र आपल्यासोबतच असतं..पुढच्या दिवाळीपर्यंत..पुन्हा भेटण्यासाठी! onkark2@gmail.com 

टॅग्स :diwaliदिवाळी