शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
4
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
5
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
6
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
7
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
8
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
9
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
10
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
11
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
12
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
13
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
14
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
15
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
16
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
17
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
18
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
20
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू

पृथ्वीनं बदला घ्यायचं ठरवलं तर?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2018 17:58 IST

रिव्हेंज ऑफ गाइया हे पुस्तक वाचून पाहा, पृथ्वीची वेगळीच गोष्ट कळेल!

ठळक मुद्देपृथ्वीवरची जीवसृष्टी धोक्यात आली तर त्याला मानवच जबाबदार असेल.

प्रज्ञा शिदोरे 

मागच्याच आठवडय़ात आयपीसीसी अर्थात इंटर-गव्हम्रेण्टल पॅनल फॉर क्लायमेट चेंजने एक अहवाल प्रसिद्ध केला. या अहवालानुसार पृथ्वीचं तपमान पुढच्या 30 वर्षात आणखी 1 अंशानं वाढणार आहे. तपमान वाढलं तर आपल्याला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आणखीनच प्रकर्षाने जाणवायला लागेल. पण तो त्याचा फार छोटा परिणाम आहे. तपमान वाढल्यामुळे नद्या वाटतील, भूगर्भातलं पाणी आटायला लागेल, ध्रुवांवरचा बर्फ वितळायला लागल्यामुळे समुद्राकाठची शहरं धोक्यात येतील. शास्त्नज्ञांच्या मते हा बदल ‘नैसर्गिक’ आहे, आणि पृथ्वीचं तपमान असंच वाढत राहत. पण काहींच्या मते मानवाच्या कृतींमुळे हा बदल आणखी वेगानं होतो आहे. आणि यामुळे जर पृथ्वीवरची जीवसृष्टी धोक्यात आली तर त्याला मुख्यतर्‍ मानवच जबाबदार असेल.याविषयी जेम्स लव्हलॉक नावाच्या निसर्गतज्ज्ञानं एक थेअरी किंवा शक्यता मांडली.  त्याने त्याच्या ‘गाइया’ या पुस्तकात अशी मांडणी केली की पृथ्वी ही एक सजीव प्राणी आहे. ही मांडणी तो अनेक उदाहरणांच्या साहाय्याने करतो. तो म्हणतो की जसं एखाद्या जीवाला आपलं बरं वाईट कळतं, तसंच पृथ्वीचंही आहे. त्याच्या पुढच्या पुस्तकात, ज्याचं नाव ‘द रिव्हेंज ऑफ गाईया’ तो म्हणतो, मानवाच्या कृतीमुळे पृथ्वीचा र्‍हास होतो आहे आणि  त्यामुळे आपली पृथ्वी आता प्रतिकार करते आहे.  हा प्रतिकार म्हणजे आपण जे वातावरणातले बदल अनुभवतो किंवा टोकाचं ऋतुमान अनुभवतो, ते हे सारं, त्याचाच भाग आहे.अनेक शास्त्नज्ञांनी हे ‘प्सुडो सायन्स’ म्हणून ठरवलेली ही थिअरी, सध्या जगात पुन्हा चर्चेत आहे.तेव्हा ही दोन्हीही पुस्तकं नक्की वाचण्याजोगी आहेत.