शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
2
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
3
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
4
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
6
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
7
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
8
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
9
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
10
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
11
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
12
सुट्टीसाठी तळमळणाऱ्या मंत्र्यांना ‘डिसेंबर’ हुडहुडी!
13
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
14
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
15
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
16
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
17
कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष
18
घरांच्या विक्रीला ‘ब्रेक’; पुणे, मुंबईत मोठी घसरण; नव्या विमानतळामुळे...
19
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
20
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
Daily Top 2Weekly Top 5

धुंद पाऊस, कणीस आणि...

By admin | Updated: June 30, 2016 12:34 IST

पावसाळ्याला नुकतीच कुठे सुरवात झाली आहे. या पावसाळ्या च्या कुंद वातावरणात, मनाला आल्हाद देणाऱ्या गारव्यात काहीतरी गरम हे हवचं. चहा हा बेस्ट आॅप्शन असला तरी खरी गंमत आहे ती गरमागरम कणीस खाण्यात..

-भक्ती सोमण

पावसाळ्याला नुकतीच कुठे सुरवात झाली आहे. या पावसाळ्या च्या कुंद वातावरणात, मनाला आल्हाद देणाऱ्या गारव्यात काहीतरी गरम हे हवचं. चहा हा बेस्ट आॅप्शन असला तरी खरी गंमत आहे ती गरमागरम कणीस खाण्यात...मनाशी चित्र रंगवून बघा. पाऊस खूप कोसळतोय, याक्षणी आवडत्या व्यक्तीबरोबर नाहीतर मित्र-मैत्रिणींबरोबर बाईक काढून लॉंग ड्राईव्हला जायचं. माळशेज, लोणावळा,खंडाळा अशा कितीतरी ठिकाणी तर पाऊसाबरोबरच धुकेही पसरलेले असते. त्यामुळे तो गारवा मनाला आल्हाददायक करतो. तृप्त करतोच करतो. यात खरी मजा येते ती कणीस खायला. पावसाचा आनंद लुटत असताना तिथल्या ठेल्यांवर कणीसवाले बसलेले असतात. शेगडीवर कणीस भाजताना ती गरम वाफ हवीहवीशी वाटते. मग ते भाजलेले कणीस, त्यावर मीठ, लिंबू, तिखट पेरून जी मजा आणते, त्याला खरच तोड नाही. पावसाळा एन्जॉय करताना मजा करावी तर अशीच असेच होऊन जाते. पावसाळ्यात कणसाचे दाणेही खूप येतात. मग या दाण्यांचे सूप, कॉर्न कबाब, भजी असे कितीतरी पर्याय अनेकांच्या घरात रंगतात. हा पाऊस सारखासारखा पडत रहावा असेच वाटते. काही वेळा असंही होतं की, काही दिवस पाऊसच पडत नाही. आपण छत्रीविना बाहेर पडतो. आपलं काम संपत नाही तो पुन्हा आभाळ भरून तो धुवाधार बरसू लागतो. अशावेळी चौपाटीवर जाऊन त्याचा आनंद घ्यावासा वाटतो. लाटांच्या सानिध्यात धम्माल करावीशी वाटते आणि हो कणीस पण खावसं वाटतं. कारण तेच तर पावसाबरोबर तन आणि मन प्रसन्न करत असतं. दुपारच्या वेळी घरी असताना पाऊस असेल तर घरातही किती मजा आहे हे कळतं. वातावरण कुंद होतं. आपण आळसावतो. मग छान झोप घेऊन चहा प्यावासा वाटतो. तेवढ्यात खालून कणीसवाला ओरडतो. आपल्यालाही छत्री घेऊन ते खाली जाऊन खाण्याचा मोह आवरत नाही. पण यावेळी सोबतीला असते ती घरातली मंडळी. त्यांच्याबरोबर कणीस खात , मस्त गप्पा मारता मारता, पुन्हा चहा पिता पिता तो दिवसही मस्त रंगतो. पण आठवत राहतं कणीसच.त्यामुळे पावसा तू बरस, त्या गारव्यात धुंद होताना कणीस खाण्याची मजा घ्यायची आहे सर्वांनाच. नाही का!