शहरं
Join us  
Trending Stories
1
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
2
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
3
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
4
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
5
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
6
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
7
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
8
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
9
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
10
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
11
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
12
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
13
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
14
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
15
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
16
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
17
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
18
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
19
आधार कार्डबाबतची 'ही' चूक केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास! यूआयडीएआयने जारी केले कठोर नियम
20
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच

पुणे ते कन्याकुमारी मार पायडल!

By admin | Updated: December 18, 2015 15:38 IST

रवींद्र राठोड आणि सागर शिंदे. एक नगरचा, दुसरा ठाण्यातला. कॉमन वेड एकच, सायकलिंग. म्हणून दोघांनी ठरवलं, पुणे ते कन्याकुमारी सायकल प्रवास करायचा! आणि साध्या सायकली घेऊन ते निघालेही!

पायी चालताना दम लागावा, असा घाटमाथ्याचा चढ तो सायकलने चढत होता. शेकडो किलोमीटरच्या प्रवासाने आधीच पायाला गोळे आलेले. वेग तर गोगलगाईचाच! हिय्या करत घाट चढलोच. ङिांग तर पुढे होती. सायकल उतरणीला लागली अन् सुसाट सुटलो. हवेला चिरत आणि आजूबाजूच्या वाहनांशी स्पर्धा करत घेतलेला थरारक अनुभव तर काय वर्णावा?
- भन्नाटच! खरं सांगू, जग जिंकणं म्हणजे काय असते, हे त्याच क्षणांनी शिकवले!!
रवींद्र राठोड आणि सागर शिंदे सांगतात, त्यांनी पूर्ण केलेल्या एका स्वपAाची कहाणी. उघडय़ा डोळ्यांनी पाहिलेलं स्वप्न पूर्ण करणारे येडचॅप तरुण! होय येडचॅपच! अडगळीतील सायकली. त्यावर गोवा, कर्नाटक, केरळ व तामिळनाडू ही राज्यं ओलांडत पुणो ते कन्याकुमारी असा 15क्क् किलोमीटरचा प्रवास. कधी अपघातांशी सामना, तर कधी ऊन-पावसाचा अडथळा! रस्त्यात कधी कद्रु माणसांची भेट, तर कधी दिलखुलास प्रेमही! स्वप्न पूर्ण करण्याच्या या वेडेपणाला काय म्हणावे? 
रवींद्र नगरचा. कधीकाळी कामाच्या निमित्ताने पुण्यात असताना पुणोकरांचे सायकलप्रेम अनुभवणारा! सागरही मूळचा नगर जिल्ह्यातील पाथर्डीचा, पण कामानिमित्ताने आता ठाण्यात स्थिरावलेला. आताचे हे जिवलग मित्र एकमेकांसाठी तसे अनोळखीच होते. पुण्याहून कन्याकुमारी सायकलने गाठावे, हा विचार प्रथम चमकला तो रवींद्रच्या डोक्यात. पण सोबतीला दोस्त असावा, म्हणजे एकसे भले दो! पण दुसरा कोण? हा प्रश्न रवींद्रला सागर्पयत घेऊन गेला. कधीतरी त्याने सागरचं सायकलप्रेम वर्तमानपत्रत वाचलं होतं. त्याला शोधणार कसं, हा प्रश्न सोडवला फेसबुकने! रवींद्रने सायकलवारीची कल्पना सागरकडे मांडली. गंमत बघा, सागरही झपाटलेलाच निघाला. इरादा पक्का झाला अन् दोघेही निघाले सायकलवर. स्वत:चं जग जिंकायला! 
5 नोव्हेंबर 2015! रवींद्र नगरहून, तर सागर ठाण्याहून सायकलने पुण्यात पोहचला. मनात ओसंडून वाहणारा उत्साह, खिशात जेमतेम रक्कम, साध्याच सायकली आणि वाट्टेल त्या संकटाला सामोरं जाण्याच्या तयारीसह कन्याकुमारीच्या दिशेने पहिलं पायडल मारलं. ध्येय एकच होतं, कन्याकुमारीचा सनसेट! पण हा प्रवास सोपा नाही, याची जाणीव पहिल्याच दिवसानं करून दिली. पोट:या सुजल्या होत्या, पण मन थांबायला तयार होईना! परतीचा विचार तर कधीच लॉक केला होता. 
त्यांनी वेगाचा पहिला थरार अनुभवला तो महाराष्ट्र ओलांडून गोवा गाठताना! याच वेगाने हत्तीचे बळ दिले होते. पण प्रवासातील खडतर अनुभव अद्याप बाकी होते. 
कर्नाटक गाठलं, तेव्हा प्रवासाने परीक्षा घेतली. रवींद्र सागरच्या 6क् किलोमीटर पुढे निघून गेला होता. उडपीजवळ रवींद्रचा अपघाताशी सामना झाला. काही वेळ तो गांगरलाच. घरापासून शेकडो मैल दूर या अनोळखी प्रदेशात एकवेळ धीर सुटतो की काय, असा विचार मनाला शिवून गेला. पण ‘माणसं’ भेटली आणि रवींद्र सावरला. त्यांनी शेजारीच मंदिरात आश्रय दिला. शुश्रूषा केली. तेव्हा लक्षात आलं की, प्रदेश भलेही अनोळखी असेल, माणसं मात्र ओळखीची झाली.
तोर्पयतच्या प्रवासात कुठंही पावसानं गाठलं नव्हतं, पण कन्याकुमारीच्या आसपास गाठलंच. पण आता थांबायचं नाही हे मनाशी ठरवत, पाऊसधारा चिरत त्यांनी प्रवास सुरूच ठेवला. अखेर स्वप्नातील दिवस ठरला, तो 18 नोव्हेंबर! दुपारी कन्याकुमारी गाठून विवेकानंद स्मारकासमोर उभं राहून समुद्राकडे ङोपावलेला लालबुंद सूर्याचा गोळा त्यांनी डोळ्यात साठवला. 
हे सारं रवींद्र आणि सागर उत्साहात सांगत असतात! आणि म्हणतात, प्रवासात वाईट अनुभव आले पण ते आम्ही विसरलो. चांगलं ते लक्षात ठेवून सायकलवरच्या प्रवासाचा आनंद फक्त मनात भरून घेतलाय. परतीच्या प्रवासात पुण्याहून सागर ठाण्याकडे आणि रवींद्र नगरच्या दिशेने निघाला. तो सांगतो, पहाटे पाचच्या सुमारास शिक्रापूरजवळ सायकलचं टायर फुटलं. नवा टाकला तेव्हा 9 वाजले होते. पुन्हा रांजणगावजवळ सायकलची चेन तुटली. घराजवळ होतो, म्हणून बिनधास्त होतो. पण मदतीला कोणीही नव्हतं. चार किलोमीटर सायकल ढकलून आणली. नवी चेन टाकली, तेव्हा खिसा शब्दश: रिकामा झाला होता. तरीही सायकल चालण्याच्या स्थितीत नव्हती. बसने नगर गाठावेसे वाटले, पण बस वाहक नाही म्हणाला.  शेवटी मजल-दरमजल करत दुपारी 3 वाजता नगर गाठलं.
आता या सा:याला कोणी वेडेपणा म्हणो किंवा आणखी काही, पण मनात होतं ते पूर्ण करण्यासाठी आम्ही पायडल मारलं! आमच्यासाठी हे जग जिंकण्यासारखंच होतं!’
रवींद्र अन् सागर ही त्यांची गोष्ट सांगतात, तेव्हा त्यांचा हा आनंददायी वेडेपणा आपल्यालाही मान्यच करावा लागतो.
 
- साहेबराव नरसाळे 
(लेखक लोकमत नगर आवृत्तीत सहायक उपसंपादक आहेत.)