शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
2
दुबार मतदार दिसले तर तिथेच फोडून काढायचे; राज ठाकरे यांचा घणाघात, पडदा हटवला, पुरावे दाखवले
3
MVA MNS Morcha Live: ‘सत्याचा मोर्चा’च्या निमित्ताने संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण झाली: शरद पवार
4
प्रीमियम लूक, ड्युअल स्क्रीन, ५००किमी रेंज; तयार रहा मारुतीची पहिली इलेक्ट्रिक एसयुव्ही येतेय!
5
गौरी खानचं 'टोरी' रेस्टॉरंट : ₹१५०० चे मोमोज, ₹११०० चं सॅलड; मॅश बटाट्याची किंमत ऐकून अवाक् व्हाल
6
Tulasi Vivah 2025: तुलसी विवाहाची तयारी कशी करावी? वाचा तारीख, मुहूर्त, आरती आणि पूजाविधी 
7
रोहित आर्याबाबत मोठा खुलासा! कोथरुडचा घरमालक उलटे १.७५ लाख द्यायला तयार झालेला; शेवटी...
8
मारुतीच्या 'या' SUV नं स्पर्धकांचं टेन्शन वाढवलं, मिळाली 5 स्टार सेफ्टी रेटिंग; ASEAN NCAP क्रॅश टेस्टमध्ये केली कमाल
9
जीएसटी कपात, दसरा अन् दिवाळी; ऑक्टोबरमध्ये पडला 'वाहनांचाही पाऊस'! महिंद्रा, ह्युंदाई, टाटानेच नाही तर स्कोडानेही...
10
दोस्तीतच कुस्ती! ६ महिन्यांपूर्वी लग्न झाले, ५ मिनिटांत घरी पोहोचणार होता; पण रस्त्यातच मित्रांनी संपवले
11
जबरदस्त शक्तीप्रदर्शन होणार...! एकाचवेळी ५५ देश आपल्या युद्धनौका भारताच्या समुद्रात पाठविणार; नौदलाने हुंकार भरला...
12
8th Pay Commission: फिटमेंट फॅक्टर म्हणजे काय रे भाऊ? नवीन वेतन कसं ठरणार? जाणून घ्या
13
Retirement: स्टार खेळाडूनं चाहत्यांना दिला मोठा धक्का, अचानक केली निवृत्तीची घोषणा!
14
प्रबोधिनी एकादशी २०२५: देवउठनी एकादशीला विष्णू खरोखरच ४ महिन्यांच्या योगनिद्रेतून जागे होतात का?
15
"नरेंद्र मोदींची छाती ११२ इंचाची, अवघ्या ५ तासांत पूर्ण पाकिस्तानवर कब्जा केला असता, पण..."
16
पाच वर्षांत अफाट परतावा देणारे शेअर्स कोणते, गुंतवणूकदारांसाठी संकेत काय? तुमच्याकडे आहे का?
17
BCCI: "आणखी दोन-तीन दिवस वाट पाहू, जर ट्रॉफी परत मिळाली नाही तर...", बीसीसीआयची कडवी भूमिका
18
“मविआचे ३१ खासदार निवडून आले, तेव्हा मतचोरी झाली का”; भाजपाचा सवाल, राज ठाकरेंबद्दल म्हणाले... 
19
Andhra Pradesh Stampede: आंध्र प्रदेशच्या व्यंकटेश्वर स्वामी मंदिरात चेंगराचेंगरी; ९ भक्तांचा मृत्यू 
20
आज पुन्हा घसरलं सोनं-चांदी, लग्नसराईला सुरुवात होण्यापूर्वी किती स्वस्त झाला? पटापट चेक करा लेटेस्ट रेट

ग्रामीण भागातल्या मुलींना पोलीस होऊन करायचंय स्वतःला सिद्ध !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2021 08:00 IST

पोलीस भरतीचा ट्राय इण्ट्रो पोलीस भरतीसाठी अकॅडमी गाठणाऱ्या ग्रामीण भागातील मुलीच जास्त. घरचे म्हणतात, तीन वर्षे काय ते शिक, भरती हो, नाहीतर लग्न उरकून टाकू!

-संतोष मिठारी

रांगडेपणासाठी प्रसिद्ध असलेल्या कोल्हापूरच्या मुलींच्या व्यक्तिमत्त्वाचा ठसकाही तसा रांगडाच. इथं त्या स्पर्धा परीक्षांपासून कुस्तीच्या आखाड्यापर्यंत आपली गुणवत्ता सिद्ध करत आहेतच; पण सध्या अनेकींना क्रेझ दिसते ती पोलीस भरतीची. कमी वयात सरकारी नोकरीची शाश्वती, वर्दीचं आकर्षण, काहीतरी वेगळं करून दाखवण्याची धमक म्हणूनही तरुणी पोलीस भरतीकडे पाहू लागल्या आहेत. त्यातही ग्रामीण भागातील मुलींचीच संख्या जास्त आहे. १८ ते २५ वयोगटामधील आहेत. गेल्या सात वर्षांपासून पोलीस भरतीकडे मुलींचा कल वाढता आहे. जिल्ह्यात दरवर्षी सुमारे ७० हजार जण पोलीस भरतीची तयारी करतात. त्यात सुमारे १४ हजार इतकी मुलींची संख्या असते. आणि कुठून येतात या मुली तर ग्रामीण, दुर्गम भागात राहणाऱ्या, शालेय, महाविद्यालयीन स्तरावर कब्बड्डी, जिम्नॅस्टिक, खो-खो, ॲथलेटिक्स, हॅण्डबॉलच्या खेळणाऱ्या मुली ‘जॉब ऑप्शन’ म्हणून पोलिसात जायचा रस्ता निवडतात. करवीर, पन्हाळा, शाहूवाडी, चंदगड, गडहिंग्लज या तालुक्यांतील मुलींची संख्या यातही इतरांपेक्षा जास्त. शेतकरी, मध्यमवर्गीय किंवा निम्न मध्यमवर्गीय घरातल्या या मुली. पोलीस भरतीची तयारी करायची म्हणून काहीजणी कोल्हापूर गाठतात तर काहीजणी रोज २० - २५ किलोमीटरचा प्रवास कोल्हापूर शहरात दररोज ये-जा करतात. काहीजणी कुठंकुठं डाटा एंट्री ऑपरेटर, रिस्पेनिस्ट, मार्केटिंग, अशी कामं करतात आणि त्या पैसे जमवून शहरात सुरू असलेल्या भरतीचं प्रशिक्षण देणाऱ्या अकॅडमीत प्रवेश घेतात.

शारीरिक चाचणीच्या तयारीसह लेखी परीक्षेची तयारीही या अकॅडमीत करून घेतली जाते. अनेकजणी बारावी झाली की, लगेच किंवा काहीजणी दहावीनंतरच या अकॅडमीत प्रवेश घेतात. पोलीस भरती प्रशिक्षक भरत कांबळे सांगतात, ‘ बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर दोन- तीन वर्षे तयारी केली की शासकीय सेवेत जाण्याची संधी म्हणून मध्यमवर्गीय, सर्वसामान्य कुटुंबांतील मुली पोलीस भरतीचा विचार करतात. त्यातही ग्रामीण भागातील मुलींना हा पर्याय अधिक सोपा वाटतो.’ याच मताला स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक अभय पाटीलही दुजोरा देतात. ते म्हणतात, ‘क्रीडा क्षेत्राशी संबंधित आणि ग्रामीण भागातील मुलींचं प्रमाण पोलीस भरतीचा विचार करणाऱ्यांत जास्त आहे.’

मात्र सोपं नसतं या मुलींसाठी हे सारं. बहुतांश मुली घरकामात, आई-वडिलांना शेतीच्या कामात मदत करून, शिक्षण सांभाळत पोलीस भरतीची अकॅडमीतही जाऊन शिकतात. इथं शारीरिक चाचणी हा पहिला टप्पा असतो. त्यामुळे या मुली रोज सकाळी तीन तास प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली कसून सराव करतात. त्यात १०० मीटर, ८०० मीटर धावणे, गोळाफेक यांचा सराव असतो. त्यानंतर तीन ते चार तास लेखी परीक्षेचा अभ्यास करतात. या भरतीच्या तयारीसाठी एक मुलगी वर्षाला सरासरी ६० हजार रुपये खर्च करते. त्यात लेखी परीक्षेच्या क्लासेसची वर्षाची पाच हजार रुपये, फिजिकल (शारीरिक चाचणी) साठी सहा हजार रुपये खर्च होतो. ‌प्रवास, निवास आदींचा दरमहा साडेतीन ते चार हजार रुपये खर्च होतो.

मात्र, एवढं करूनही प्रत्येकीला संधी मिळते का? तर बारावीनंतर ग्रॅज्युएट होइपर्यंतचे तीन वर्षे घरचेही वाट पाहतात. या तीन वर्षांत भरतीचे प्रयत्न मुलीनं केले तर अनेकजण पाठिंबाही देतात; पण तेवढ्यात नाहीच झालं काही काही की पालक मुलींचे लग्न उरकून मोकळे होतात. लग्नानंतर सासरी राहून काही मुली भरतीची तयारी करतात; पण त्यांचं प्रमाण कमी आहे. त्यामुळे प्रत्येकीसाठी मिळणारी एकेक संधी महत्त्वाची असते. मात्र, पदं कमी, उमेदवार जास्त या चक्रात काही मुलींचं भरतीचं स्वप्नही स्वप्नच राहतं.

------------------------------------------------------------------------------------------------

मी शेतकरी कुटुंबातील आहे. पोलीस होण्याचं माझं लहानपणापासूनचं स्वप्न आहे. सध्या मी पदवीच्या पहिल्या वर्षात शिकत आहे. गेल्या तीन वर्षांपासून मी भरतीची तयारी करत आहे. भरतीतील मुलींचा टक्का वाढविण्यासाठी शासनाने त्यांना कॉलेजपातळीवरच भरती प्रशिक्षण देण्याची व्यवस्था करायला हवी.

-पल्लवी खोत, वड्डवाडी-दऱ्याचे वडगाव

 

( संतोष लोकमतच्या कोल्हापूर आवृत्तीत वार्ताहर आहे.)

santaji.mithari@gmail.com