शहरं
Join us  
Trending Stories
1
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिला सर्वोच्च सन्मान
2
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
3
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
4
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
5
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
6
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
7
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
8
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
9
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
10
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
11
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
12
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
13
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
14
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
15
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
16
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
17
हरियाणामधील भाजपा सरकार संकटात, काँग्रेसने आणला अविश्वास प्रस्ताव, उद्या होणार चर्चा, असं आहे बहुमताचं गणित
18
एक योजना महात्मा गांधी के नाम...! मनरेगाचं नाव बदलण्याच्या धामधुमीतच ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
19
अमेरिकेकडून आणखी एक जहाजावर हल्ला, ४ जणांचा मृत्यू, व्हेनेझुएलाने घेतला मोठा निर्णय  
20
"प्रज्ञा सातव यांच्या राजीनाम्याची घटना दुर्दैवी, सत्तेच्या आणि पैशाच्या जोरावर भाजपा…’’ नाना पटोले यांची टीका   
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण भागातल्या मुलींना पोलीस होऊन करायचंय स्वतःला सिद्ध !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2021 08:00 IST

पोलीस भरतीचा ट्राय इण्ट्रो पोलीस भरतीसाठी अकॅडमी गाठणाऱ्या ग्रामीण भागातील मुलीच जास्त. घरचे म्हणतात, तीन वर्षे काय ते शिक, भरती हो, नाहीतर लग्न उरकून टाकू!

-संतोष मिठारी

रांगडेपणासाठी प्रसिद्ध असलेल्या कोल्हापूरच्या मुलींच्या व्यक्तिमत्त्वाचा ठसकाही तसा रांगडाच. इथं त्या स्पर्धा परीक्षांपासून कुस्तीच्या आखाड्यापर्यंत आपली गुणवत्ता सिद्ध करत आहेतच; पण सध्या अनेकींना क्रेझ दिसते ती पोलीस भरतीची. कमी वयात सरकारी नोकरीची शाश्वती, वर्दीचं आकर्षण, काहीतरी वेगळं करून दाखवण्याची धमक म्हणूनही तरुणी पोलीस भरतीकडे पाहू लागल्या आहेत. त्यातही ग्रामीण भागातील मुलींचीच संख्या जास्त आहे. १८ ते २५ वयोगटामधील आहेत. गेल्या सात वर्षांपासून पोलीस भरतीकडे मुलींचा कल वाढता आहे. जिल्ह्यात दरवर्षी सुमारे ७० हजार जण पोलीस भरतीची तयारी करतात. त्यात सुमारे १४ हजार इतकी मुलींची संख्या असते. आणि कुठून येतात या मुली तर ग्रामीण, दुर्गम भागात राहणाऱ्या, शालेय, महाविद्यालयीन स्तरावर कब्बड्डी, जिम्नॅस्टिक, खो-खो, ॲथलेटिक्स, हॅण्डबॉलच्या खेळणाऱ्या मुली ‘जॉब ऑप्शन’ म्हणून पोलिसात जायचा रस्ता निवडतात. करवीर, पन्हाळा, शाहूवाडी, चंदगड, गडहिंग्लज या तालुक्यांतील मुलींची संख्या यातही इतरांपेक्षा जास्त. शेतकरी, मध्यमवर्गीय किंवा निम्न मध्यमवर्गीय घरातल्या या मुली. पोलीस भरतीची तयारी करायची म्हणून काहीजणी कोल्हापूर गाठतात तर काहीजणी रोज २० - २५ किलोमीटरचा प्रवास कोल्हापूर शहरात दररोज ये-जा करतात. काहीजणी कुठंकुठं डाटा एंट्री ऑपरेटर, रिस्पेनिस्ट, मार्केटिंग, अशी कामं करतात आणि त्या पैसे जमवून शहरात सुरू असलेल्या भरतीचं प्रशिक्षण देणाऱ्या अकॅडमीत प्रवेश घेतात.

शारीरिक चाचणीच्या तयारीसह लेखी परीक्षेची तयारीही या अकॅडमीत करून घेतली जाते. अनेकजणी बारावी झाली की, लगेच किंवा काहीजणी दहावीनंतरच या अकॅडमीत प्रवेश घेतात. पोलीस भरती प्रशिक्षक भरत कांबळे सांगतात, ‘ बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर दोन- तीन वर्षे तयारी केली की शासकीय सेवेत जाण्याची संधी म्हणून मध्यमवर्गीय, सर्वसामान्य कुटुंबांतील मुली पोलीस भरतीचा विचार करतात. त्यातही ग्रामीण भागातील मुलींना हा पर्याय अधिक सोपा वाटतो.’ याच मताला स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक अभय पाटीलही दुजोरा देतात. ते म्हणतात, ‘क्रीडा क्षेत्राशी संबंधित आणि ग्रामीण भागातील मुलींचं प्रमाण पोलीस भरतीचा विचार करणाऱ्यांत जास्त आहे.’

मात्र सोपं नसतं या मुलींसाठी हे सारं. बहुतांश मुली घरकामात, आई-वडिलांना शेतीच्या कामात मदत करून, शिक्षण सांभाळत पोलीस भरतीची अकॅडमीतही जाऊन शिकतात. इथं शारीरिक चाचणी हा पहिला टप्पा असतो. त्यामुळे या मुली रोज सकाळी तीन तास प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली कसून सराव करतात. त्यात १०० मीटर, ८०० मीटर धावणे, गोळाफेक यांचा सराव असतो. त्यानंतर तीन ते चार तास लेखी परीक्षेचा अभ्यास करतात. या भरतीच्या तयारीसाठी एक मुलगी वर्षाला सरासरी ६० हजार रुपये खर्च करते. त्यात लेखी परीक्षेच्या क्लासेसची वर्षाची पाच हजार रुपये, फिजिकल (शारीरिक चाचणी) साठी सहा हजार रुपये खर्च होतो. ‌प्रवास, निवास आदींचा दरमहा साडेतीन ते चार हजार रुपये खर्च होतो.

मात्र, एवढं करूनही प्रत्येकीला संधी मिळते का? तर बारावीनंतर ग्रॅज्युएट होइपर्यंतचे तीन वर्षे घरचेही वाट पाहतात. या तीन वर्षांत भरतीचे प्रयत्न मुलीनं केले तर अनेकजण पाठिंबाही देतात; पण तेवढ्यात नाहीच झालं काही काही की पालक मुलींचे लग्न उरकून मोकळे होतात. लग्नानंतर सासरी राहून काही मुली भरतीची तयारी करतात; पण त्यांचं प्रमाण कमी आहे. त्यामुळे प्रत्येकीसाठी मिळणारी एकेक संधी महत्त्वाची असते. मात्र, पदं कमी, उमेदवार जास्त या चक्रात काही मुलींचं भरतीचं स्वप्नही स्वप्नच राहतं.

------------------------------------------------------------------------------------------------

मी शेतकरी कुटुंबातील आहे. पोलीस होण्याचं माझं लहानपणापासूनचं स्वप्न आहे. सध्या मी पदवीच्या पहिल्या वर्षात शिकत आहे. गेल्या तीन वर्षांपासून मी भरतीची तयारी करत आहे. भरतीतील मुलींचा टक्का वाढविण्यासाठी शासनाने त्यांना कॉलेजपातळीवरच भरती प्रशिक्षण देण्याची व्यवस्था करायला हवी.

-पल्लवी खोत, वड्डवाडी-दऱ्याचे वडगाव

 

( संतोष लोकमतच्या कोल्हापूर आवृत्तीत वार्ताहर आहे.)

santaji.mithari@gmail.com