शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
IND vs ENG 5th Test Day 2, Stumps : दिवसभरात १५ विकेट्स! यशस्वी खेळीसह टीम इंडियाला दिलासा
3
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
4
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
5
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
6
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
7
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
8
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
9
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
10
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
11
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
12
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
13
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
14
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
15
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
16
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
17
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
18
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
19
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
20
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर

..कृपया इंतजार करें !

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2018 15:08 IST

पूर्वीच्या काही प्रेमकथांत नायक-नायिका दहा-दहा, वीस, पंचवीस वर्षे आपल्या प्रियकराची/प्रेयसीची वाट पाहायचे म्हणे. इथं आता वीस दिवस फोन/व्हॉट्सअ‍ॅपवर बोलणं झालं नाही, तर खतम सगळं !

- श्रेणिक नरदेआपल्या रोजच्या जगण्यात वाट बघण्यातच भरपूर वेळ जातो... पाण्याची बाटली भरताना बाटली नळाला लावल्यापासून भरेपर्यंतचा वेळ.. एखाद्या एटीएमच्या रांगेत नंबर येईपर्यंत घालवलेला वेळ.. असा बराचसा वेळ रोज बिनकामाचा, बिनअर्थाचा जात असतो. आता त्या काळात असं आपण काय महान काम तर करणारच नसतो. बाटली भरेपर्यंत किंवा रांगेत नंबर लागेपर्यंत या काळात काय भव्यदिव्य होत नाही; मात्र एक होतंय की आपण सगळे लोक त्यादरम्यान मोजत असतो आणि अजून एवढा वेळ जाणार, एवढा वेळ लागणार, पुढची लोक किती आहेत ते मोजत असतो.एका माणसाने एटीएमपुढं दोन मिनिटे घेतली तर पुढं असलेली लोक गुणिले दोन मिनिटे अशी गणितं मनातल्या मनात मांडू लागतो. नेमक्या किती वेळाने आपली सुटका होणार हे मोजत असतो. तर आपण तसाही वेळ घालवत असतोच, त्यावेळी आपल्याला काही वाटत नाही; पण तरीही एखाद्या गोष्टीची वाट बघत जो वेळ जात असतो, तो काही आनंददायी नसतो.आज इनस्टंट जमान्यात व्हॉट्सअ‍ॅपवर जरी मेसेज रीड करूनही समोरच्याचा रिप्लाय आला नाही तरी ती चिडचिड होते. ती चिडचिड आपण रोजची अनुभवतोय. आपल्याला रिप्लायची वाट पाहायची नसते. अशा काळाबरोबर जगण्याच्या ओघात आपणाला वाट बघायला सवड नाही. आणि ती आवडही नाही. झटपट निर्णय, येस आॅर नो दोन्ही पैकी एक पर्याय निवडा आणि पुढे व्हा..! हा आजचा भवताल झालाय. त्यात एखाद्या नकाराला होकारात बदलण्याची इच्छा असणं, त्यावर काम करणं, आशा असणं या गोष्टी आज कमी प्रमाणात होतात.नातेसंबंधातही या गोष्टी आज होताना दिसत नाही. कारण थांबण्याचा किंवा वाट बघण्याचा, एकमेकांना जाणून घेण्याला लागणाऱ्या वेळेचा कंटाळा येतो. पूर्वीच्या काही प्रेमकथांत नायक-नायिका दहादहा- वीस, पंचवीस वर्षे आपल्या प्रियकराची, प्रेयसीची वाट बघितल्याचं वाचून धक्का बसतो. आता एक वर्ष हा कालावधी जरी मोठा धरला तरी दहा-वीस, पंचवीस दिवस जर काही संवाद झाला नाही तर ते नातं संपल्यात जमा होतं. फोन, मेसेज, व्हॉट्सअ‍ॅप, मेसेंजर, व्हीडीओ कॉलिंग आदी माध्यमातून रोजचा संवाद चालू असतोच. संवाद म्हणण्यापेक्षा संवादाचा भडीमार चालू असतो.अतिसंवादाने आदर, नात्यातील प्रेम कमी होतं आणि या इलेक्ट्रॉनिक माध्यमातून गैरसमज जोरात पसरतात. इथं ‘कायमचं’ असं काही नाही. रोज बदलणारे ट्रेण्ड आणि प्रवाहात राहण्यासाठी आपण केलेली धडपड यातून भवतालात गैरसमजुती वाढावयास लागलेल्या दिसून येतात. काही नाती आभासी सुरू होऊन आभासातच संपून जातात. त्यातून आलेल्या नैराश्यातून आज काय काय होतंय हे आपण बघतोच. विश्वासाने संवाद व्हायचा, तो आता शंकास्पद होतोय.विविध माध्यमातून फोटो, व्हीडीओ अगदी केलेले मेसेज आहेत, पण जर त्यातून संवाद संपत असेल किंवा नात्यात कटुता येत असली तर आपण काय काय मेसेज पाठवलेय, कॉलवर काय काय बोललोय ते कॉल रेकॉर्ड तर झाले नसतील? आपल्या मेसेजचा स्क्र ीनशॉट बॅकअप तर घेतला नसेल? आपण पाठविलेले फोटो, व्हीडीओ तिकडे स्टोअर असतील? पुढचा माणूस ते पसरवणार तर नाही ना? अशा लाख चिंता आजच्या संवादातून येतात. ही काळजी जर संवादात येत असली तर तो संवाद एखाद्या मर्यादेपलीकडे जात नाही.किंवा तो संवाद जरी प्रेमापोटीचा असला तरी नंतर निर्माण होणाºया काळजीने आजचे लोक चिंतित दिसतात. तिथं विश्वास, समर्पण, प्रेम, दिल खोलके बात याही गोष्टी किती प्रमाणात होत असतील ही तशी शंकाच.आज सोशल मीडिया हा जगभरातील संवादाचं साधन होत असून, दिवसाची सुरुवात मोबाइलपासून ते शेवटही मोबाइल बघून होते. पण, तो कसा हाताळावा, काय करावं, काय करू नये हा ज्याचा त्याचा अधिकार जरी असला तरीही भावनाआवेगात किंवा दुसºयावरच्या प्रेम, विश्वासापोटी आपण काय देतोय, काय नाही याची थोडीशी कल्पना असावी.गेसिंग पासवर्ड, व्हॉट्स स्कॅन अ‍ॅप्लिकेशन आणि इतर हॅकिंगच्या सोप्या-सहज उपलब्ध असणाºया पर्यायानं आपल्यावर सतत कुणाची तरी नजर असू शकते. ही शक्यताही गृहीत धरायला हवी. पण स्ट्राँग पासवर्ड आणि इतर काळजी घेणं हे प्रत्येकाला ठाऊक असेलच असं नाही. त्या माहिती नसण्याचा गैरफायदा घेऊन एखाद्याचं जीवनही बरबाद होतं. किंवा चिंतेत जगणं होतं, नैराश्य येतं, गुन्हेगारी विचार येतात आणि यातून काही जणांची पावलं नको तिकडे वळून भलतंच काही होतं. आज या जवळपास मानवी जीवन व्यापलेल्या गोष्टींवर कुणी गांभीर्याने विचार करताना दिसत नाही. जलदगतीने संवाद जवळपास सर्व प्रकारचा मीडिया (टेक्स्ट, फोटो, व्हीडिओ) कुठूनही कुठंही पाठवता येतो हे जरी फायदेशीर असलं तरीसुद्धा त्याची दुसरी बाजू ही तितकीच भयंकर रूप दाखवते.हे एवढं सारं, ते आजच्या प्रेमातही झिरपत आलंय.. shreniknaradesn41@gmail.com