शहरं
Join us  
Trending Stories
1
कुठल्याही क्षणी अटकेची शक्यता असताना माणिकराव कोकाटे पडले आजारी; लीलावती रुग्णालयात दाखल
2
रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! वेटिंग-RAC तिकिटाची स्थिती आता १० तास आधी कळणार
3
कर्जदारांना 'अच्छे दिन'! भारतीय अर्थव्यवस्था 'गोल्डीलॉक्स' स्थितीत; गव्हर्नर मल्होत्रा म्हणाले...
4
ICICI Prudential AMC IPO Allotment: कसं चेक कराल अलॉटमेंट स्टेटस? जीएमपीमध्येही जोरदार तेजी
5
गणवेशावरून चिडवलं, घरी येताच चौथीत शिकणाऱ्या प्रशांतने...; आईवडिलांच्या पायाखालची जमीनच सरकली
6
“काँग्रेसचे पाक प्रेम उतू चाललेय, ऑपरेशन सिंदूरचा हिशोब विचारणारे देशद्रोही”: एकनाथ शिंदे
7
Meesho च्या शेअरला अपर सर्किट; इश्यू प्राईजच्या दुप्पट झाली किंमत, सह-संस्थापक बनले अब्जाधीश
8
ढाका येथील भारतीय उच्चायुक्तालयाला धमकी, सरकारने बांगलादेशी अधिकाऱ्याला समन्स बजावले
9
विराट-अनुष्काने घेतली प्रेमानंद महाराजांकडून दीक्षा, गळ्यात तुळशी माळ घातलेला फोटो व्हायरल!
10
Payal Gaming: कोण आहे पायल गेमिंग? १.२० मिनटांचा MMS लीक झाल्यानंतर आली चर्चेत!
11
Video: BJP आमदाराच्या मुलाचा शाही विवाह सोहळा; तब्बल ७० लाखांच्या फटाक्यांची केली आतषबाजी
12
ओला-उबरला टक्कर! १ जानेवारीपासून 'भारत टॅक्सी' ॲप होणार लाँच; प्रवाशांना स्वस्त प्रवास आणि ड्रायव्हर्सची होणार जास्त कमाई
13
लग्नानंतर एका वर्षात शोभिता धुलिपाला देणार गुडन्यूज? सासरे नागार्जुन म्हणाले, "योग्य वेळ..."
14
भारतीय बाजारात उद्याच स्वस्तातली सात सीटर कार लाँच होणार; अर्टिगा, ट्रायबरला मिळणार टक्कर...
15
स्वस्त 'पर्सनल लोन'च्या शोधात आहात? 'या' ५ बँकांमध्ये मिळतोय सर्वात कमी व्याजदर; १२ लाखांचा EMI किती?
16
क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंविरोधात अटक वॉरंट, कोणत्याही क्षणी अटक होणार, आमदारकीही जाणार?
17
खुशखबर! थिएटरनंतर आता OTTवर दाखल होतोय 'धुरंधर', जाणून घ्या कुठे आणि कधी पाहता येणार?
18
PM मोदी जॉर्डन-ओमान दौऱ्यावर, तर जयशंकर इजराइलमध्ये; भारताचा जगाला स्पष्ट संदेश..!
19
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दागिने घेताना १०० वेळा विचार करावा लागणार; चांदी २ लाखांच्या पार, सोन्याच्या दरातही मोठी तेजी
20
मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी बुरखा हटवल्याने महिला डॉक्टर धक्क्यात; सरकारी नोकरी नाकारून सोडले राज्य
Daily Top 2Weekly Top 5

NOT Your डायरी

By admin | Updated: February 15, 2017 18:05 IST

आपल्या भावना, चिडचिड, आपला उद्वेग नियंत्रित करता येत नाही. म्हणून मग भडभडून बोलावं तसं अनेकजण आपल्या व्यक्तिगत जगण्याचा पसारा फेसबुकवर मांडून बसतात. साऱ्या दुनियेला सांगतात आपबिती.

 - आॅक्सिजन टीम

आपल्या भावना, चिडचिड, आपला उद्वेगनियंत्रित करता येत नाही. म्हणून मग भडभडून बोलावं तसं अनेकजण आपल्या व्यक्तिगत जगण्याचा पसाराफेसबुकवर मांडून बसतात.साऱ्या दुनियेला सांगतातआपबिती.परिणाम,कधी लोक उपदेश देतात,कधी सहानुभूती व्यक्त करतात,तर कधी टिंगल करतात.आणि कधी तर त्या साऱ्यावरूनब्लॅकमेलही करतात..हे फेसबुक आहे, तुमची पर्सनल डायरी नव्हे..- असं वयात येणाऱ्या मुलांना आता शाळाशाळांत जाऊन सांगायची वेळ आली आहे अशी चर्चा गेले काही दिवस समाजमाध्यमतज्ज्ञ आणि समाजवर्तनतज्ज्ञांत जोर धरते आहे..त्या चर्चेला पुन्हा तोंड फोडलं ते अलीकडच्या एका घटनेनं..एक किशोरवयीन मुलगी, अडनिड्या वयातली. तिनं फेसबुकवर लिहिलं की, मला मरावंसं वाटतंय!त्यावर तिच्या मित्रयादीतल्या लोकांनी काय लिहिलं तर, मर पटकन. गो, किल युवरसेल्फ. तसाही जगून काय उपयोग? मेलीस तर कुणी अत्यंदर्शनालाही येणार नाही..मानसिकदृष्ट्या एकाकी असलेली ही मुलगी. आपण कुणालाच आवडत नाही. आपण मेलो तरी लोकांना फरक पडणार नाही या विचारानं अशा वाटेवर पुढं निघून गेली की तिनं आत्महत्त्याच केली..ही अशी एक घटना. पण जे आत्महत्त्या करत नाहीत, मात्र सोशल मीडियात सतत होणाऱ्या हेटाळणीनं त्रस्त असतात त्यांचं काय? जे आपल्या मनात जे जे येतं ते, आपल्यासंदर्भात जे जे घडतं ते ते सारं सोशल मीडियात शेअर करतात. ते कशामुळे?डायरी लिहिल्यासारखं स्वत:विषयी (आणि संपर्कातल्या इतरांविषयीही) टाइमलाइनवर लिहून काढतात. आणि मग त्या शेअर करण्याची सवय लागते. मात्र हे ओव्हरशेअरिंग करून आपण जगाला स्वत:विषयी काय काय सांगतो आहे याचं मात्र भान राहत नाही. द वॉल स्ट्रीट जर्नल या वृत्तपत्रात अलीकडेच या विषयांवर एक मालिका प्रसिद्ध झाली. एलिझाबेथ बर्नस्टेन या पत्रकाराने लिहिलेली ही अभ्यासमाला. त्यांनी सोशल मीडियात रोज शेअर होणाऱ्या स्टेटसचा अभ्यास तर केलाच; पण इतरांनी लिहिलेली माहिती रोजच्या रोज वाचणाऱ्यांचाही अभ्यास केला. त्यांचं म्हणणं आहे की, आपल्या मनावर या गोष्टीचा दोन प्रकारे परिणाम होतो. ओव्हरशेअरिंग या नव्याच आजारानं आपल्याला गाठलेलं आहे. ओव्हरशेअरिंग करणाऱ्यांचा पहिला प्रकार म्हणजे काहीजण वाट्टेल ते लिहित सुटतात. त्यातले अनेकजण डिप्रेस्ट. आपल्या दु:खाच्या, अपमानाच्या, वेदनांच्या कहाण्या सांगतात. आणि लिहून, पोस्ट करून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करतात. खरंतर अशा माणसांना आपल्या भावना, चिडचिड, आपला उद्वेग नियंत्रित करता येत नाही. म्हणून ते भडभडून बोलावं तसं भडभडूनच लिहितात.आणि दुसरा प्रकार वाचणारे. असे अनेकजण जे उगाच हे सारं वाचत राहतात. ती निगेटिव्हिटी स्वत:च्या मनात भरून घेतात. त्यावर विचार करत दु:खीही होतात.हे असं बहुसंख्यांच्या बाबतीत घडतं. पण त्यामुळे इतरांच्या दु:खालाही गांभीर्यानं न घेण्याची आणि ‘टेक केअर’ म्हणून विषय अत्यंत कॅज्युअली घेण्याची वृत्ती वाढते आहे.त्यातून मग अनेकदा अपमान, भावनांची खिल्ली उडवली जाणे, फुकट उपदेश असेही प्रसंग घडतात.परिणाम?एकाकीपणा वाढतो. मन जास्त उदास होतं. आणि आपण आपल्या आयुष्याची डायरीच चव्हाट्यावर उघडून ठेवतो..ती उघडायची की नाही, हा निर्णय सुदैवानं अजून तरी आपल्या हातात आहे..