शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नेपाळी तारुण्य रस्त्यावर कित्येक तास ठाण मांडून बसले ! कशासाठी ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2020 16:49 IST

एकीकडे कोरोनाचं संकट, दुसरीकडे लॉकडाऊन, तिसरीकडे सरकारला चढलेला राष्ट्रवादाचा ज्वर यात नेपाळी तारुण्य पिचतं आहे.

ठळक मुद्देनेपाळमध्ये अलीकडेच तरुणांनी आंदोलन केलं.

कलीम अजीम  

नेपाळ सध्या तिहेरी संकटाचा सामना करत आहे. कोरोनामुळे देशात अस्वस्थता असताना चीनने हद्दीत घुसखोरी केली आहे. त्यात विरोधक व सत्ताधारी पक्षातील नेत्यांकडून सरकार पाडण्याचा कट रचला जातोय. याशिवाय भारतासोबत सीमावादही त्यांनी सुरूकेला आहे. एकीकडे कोरोनाचा संसर्ग रोखण्यात सरकार अपयशी ठरल्याचा आरोप करत जनता आक्रोश करत आहे. दुसरीकडे साठेबाजी, महागाई आणि बेरोजगारीसारखे प्रश्नही आहेत. या सर्वाकडे दुर्लक्ष करून पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांची नेपाळी राष्ट्रवाद मांडण्याची धडपड सुरू आहे. या सर्वाचा परिणाम देशात म्हणजे राजकीय अस्थिरता आणि आरोग्य संकट या दोहोंनी नेपाळला वेढलं आहे.नेपाळने भारताविरोधात भूमिका घेणं स्थानिक नेपाळी माणसांना अमान्य आहे. बीबीसीच्या रिपोर्टनुसार भारतात आश्रयाला असलेले व काम करणारे नेपाळी लोक बदलत्या घटनाक्र मामुळे अस्वस्थ झालेले आहेत.गेल्या आठवडय़ात नेपाळ सरकारने पुन्हा एकदा कोरोनासाठी भारताला जबाबदार ठरवले. दोन आठवडय़ापूर्वी पंतप्रधान ओली यांनी संसदेत सांगितलं होतं की, ‘बाहेरून (भारतातून) येणा:या घुसखोरामुळे कोविड-19 रोगराईला रोखणं अवघड होत आहे.’ नेपाळचा आरोप आहे की, 85 टक्के कोरोना रुग्ण भारतातून आले आहेत.काठमांडू पोस्टचं म्हणणं आहे की, ‘भारतातून अवैधरीत्या येणारे लोक देशात संसर्ग पसरवत आहेत. स्थानिक लोक व पार्टी नेते तपासणीशिवाय भारतीय लोकांना सीमेपलीकडे आणत आहेत.’वल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार नेपाळमध्ये बारा हजार कोरोनाबाधित असून, त्यातील तीन हजार बरे झाले आहेत तर 28 जणांचा मृत्यू झाला.नेपाळ हेल्थ मिनिस्ट्रीच्या मते 77 जिल्हे कोरोना संक्रमित झाले आहेत. दोन कोटी लोकसंख्या असलेल्या या देशात 27 जून या एकाच दिवशी तब्बल 463 नवे रुग्ण नोंदवले गेले आहेत.आणि यासा:यात उभं आहे नेपाळी तारुण्य. लॉकडाऊन तर नेपाळमध्येही देशव्यापी आहे. तरीही रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. 1क् जूनला तरु णांनी रस्त्यावर उतरून भलेमोठं आंदोलनही केलं.पहिल्या सोनौली बार्डरजवळील रूपन्देही, भैरहवासारख्या अनेक ठिकाणी युवकांनी आंदोलन केलं.दुस:या दिवशी आंदोलनाचा भडका इतर भागातही उडाला. राजधानी काठमांडूमध्ये अशाच प्रकारचे मोठे आंदोलन उभे राहिले. शिवाय पोखरा आणि चितवनसारख्या भागातही तरुणांचा मोठा जमाव सरकारविरोधात रस्त्यावर होता.सरकारचा निष्काळजीपणा, सर्जिकल वस्तूंच्या खरेदीत अनियमितता तसेच विदेशी मदत निधीत फेरफार केल्याचा आरोप आंदोलकांनी केला.विशेष म्हणजे हे तरुण कुठल्याही राजकीय पक्षाच्या बॅनरखाली संघटित झाले नव्हते. फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करत हजारो तरुण सरकारविरोधात एकवटले. काठमांडू पोस्टच्या मते, तरुणांच्या हातात विरोध व निषेधाचे फलक होते. महामार्ग व रस्त्याच्या मध्यभागी तरु ण-तरु णींचे लोंढे बैठक मारून कितीतरी तास बसले होते.हे आंदोलन सलग तीन दिवस सुरू होते. पोलिसांनी आंदोलकांविरोधात बळाचा वापर केला. पण ते बंद होण्याऐवजी वाढतच गेले. एका विशाल विरोध प्रदर्शनात त्याचे रूपांतर झाले. आंदोलनात लॉकडाऊनच्या काळात भारतातून नेपाळला गेलेल्या युवकांची संख्यादेखील लक्षणीय होती.कोरोना नियंत्नणाच्या नावाखाली तीन महिन्यांपासून माणसं घरात कोंडली आहेत, आणि तरीही संसर्गवाढीसाठी नागरिकांनाच दोष देणं, जबाबदार धरणं चुकीचं आहे, असं या तरुणांचं म्हणणं आहे.नेपाळी युवकांचा आरोप आहे की, देशहिताचा मुद्दा पुढे करून सरकार नागरिकांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करत आहेत तर पंतप्रधान ओली म्हणतात, कित्येक वर्षापासून रखडत असलेला भारतासोबतचा सीमावाद निर्णायक टप्प्यावर आहे. संवादातून तो सुटू शकतो. त्यांनी देशाचा नवा नकाशा तयार करून संसदेकडून मंजूर करून घेतला आहे. ज्यात भारताने आपला भूप्रदेश असल्याचा दावा केलेला लिपुलेख, लिम्पियाधुरा आणि कालापानी हा भाग नेपाळने तो आपला भाग असल्याचं जाहीर केलं.

शिवाय 395 किलोमीटरच्या जागेवर आपला हक्क सांगितला आहे. दुसरीकडे नेपाळने भारतीयांसाठी नवा नागरी कायदा लागू केला आहे. तसेच हिंदी भाषेवर बंदी आणण्याची तयारी केली आहे.म्हणजे एकीकडे लोकांचा जगण्यासाठीचा आक्रोश, दुसरीकडे सरकारचा राष्ट्रवादी उन्माद असं चित्र आहे.या घटनेवरून नेपाळमध्ये दोन गट पडले आहेत. एकाचे म्हणणो आहे की, सरकारचा निर्णय योग्य आहे तर दुसरा गट सरकारने उगाच वाद उत्पन्न करू नये या मताचा आहे. सत्ताधारी गटातील ओलीविरोधक व विरोधी पक्षाचा आरोप आहे की राष्ट्रवादाच्या नावावर जनतेला वेठीस धरलं जात आहे.नेपाळी तरुणासमोरही बेरोजगारी, आरोग्य, अनिश्चितता फेर धरून नाचते आहेच. त्यांच्या परिस्थितीची उत्तरं मात्र कुणीही द्यायला तयार नाही.(कलीम मुक्त पत्रकार आहे.)