शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

चहाला 'अमृततुल्य' उपाधी मिळण्यामागची 'अपौराणिक' कहाणी; (कड्डक) चाय पे (लाईट) चर्चा

By ज्योत्स्ना गाडगीळ | Updated: December 15, 2020 17:29 IST

जागतिक चहा दिनानिमीत्त थोडासा चहाटळपणा. मंडळी, जरा हलकेच घ्या!

ज्योत्स्ना गाडगीळ

अमृततुल्य कॉफी किंवा अमृततुल्य सरबत असे वर्गीकरण न होता चहाला अमृततुल्य ही उपाधी का मिळाली, यामागील सत्य जागतिक चहा दिनानिमित्त मला सांगू द्या. ही अमृततुल्य चहा वाल्यांची जाहिरात नाही, हेही लक्षात घ्या. समस्त चहा प्रेमींना इतिहास कळावा, एवढाच कपभर हेतू!

तर अमृततुल्य या शब्दात अमृत हा उल्लेख आढळतो आणि तो उल्लेख पाहता आपल्याला आठव होतो, तो समुद्रमंथनातून निघालेल्या अमृतकुंभाचा! हा अमृतकुंभ दुसरा तिसरा काहीही नसून चहाचा कुंभ रटरटत होता, हे नजरेसमोर आणा. चहा पावडर, वेलची, चहा मसाला, किसून ठेचलेलं आलं आणि योग्य प्रमाणात साखर व दुध याचं पुरेपूर मंथन झाल्यामुळे वासुकीसकट, रस्सीखेच खेळून दमलेल्या सूर आणि असुरांना चहाची तलफ आली आणि त्यांच्यात वाद सुरू झाले. 

मुद्दा असा, की त्याआधी याच घिसाडघाईतून १४ रत्न निघाली होती. पण, त्यावर जेवढा वाद झाला नाही, तो अमृततुल्य चहाचा वेळी झाला. मात्र, त्याआधी नुकतेच निघालेले हलाहल, अर्थात ग्रीन टी नामक पुचाट द्रव्य प्यायला कोणीच तयारी दाखवली नाही. असुरांनी तर सपशेल माघार घेतली. शेवटी महादेवांनी मोठा धीर करून तो हिरवा प्याला ओठी लावला आणि गटागट प्राशन केला. त्यावेळी या विषाचे काही कण पृथ्वीवर सांडले, त्याचे काही अंश प्राण्यांमध्ये, वनस्पतींमध्ये आणि माणसांमध्ये सुद्धा उतरले. तेच लोक आजही ग्रीन टी चे हलाहल पचवण्याचे सामर्थ्य बाळगू शकत आहेत. (संदर्भ- विषाने विष मरते) देवांच्या वतीने हे औदार्य महादेवांनी दाखवले,  त्यामुळे ते कायम फिट राहिले आणि देवांची बाजू वरचढ राहिली.

स्वाभाविकपणे पुढे जे रत्न बाहेर आले, ते म्हणजे चहामृत, त्यावर देवांनी आधी क्लेम केला. मात्र, असुरांना चहाच्या दरवळाने जी काही मोहिनी घातली, त्यामुळे ते अधीर होऊन देवांच्या सभेत जाऊन, वेषांतर करून, मांडीला मांडी ठोकून चहाच्या प्रतीक्षेत बसले. 

भगवान विष्णूंनी असुरांचा धुर्तपणा ओळखला आणि वैकुंठीचे अमृत असुरांच्या ओठी लागू नये, म्हणून दैत्यांना बिनसाखरेचा चहा पिऊ घातला. गाढवाला गुळाची चव काय, म्हणतात ते असं! ते वेडे अमृत मिळाल्याच्या आनंदात नाचत सुटले. मात्र देवांनी चहा नीट उकळेपर्यंत संयम बाळगला, म्हणून त्यांच्या वाट्याला अमृततुल्य चहाचा प्याला आला. अशी ही साठा उत्तराची कहाणी, पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण! 

त्यामुळे इथून पुढे जे कोणी गोड चहा पितात, त्यांनी स्वतःला देव आणि बिनसाखरेचा चहा पितात त्यांनी स्वतःला दानव समजायला अजिबात हरकत नाही. तसेच, एवढं वाचून चहाची मोहिनी झालीच, तर गॅस लावून, त्यावर चहाचं भांड ठेवून त्यात स्वतःच दूध, पाणी, साखर, चहा पावडर, मसाला यांचे मंथन करून अमृततुल्य प्याला ओठी लावायलाही हरकत नाही. 

ही अपौराणिक कथा सांगितल्याबद्दल आभार मानू नका, जमल्यास चहाचे बोलावणे पाठवा, ते निश्चितच स्वीकारले जाईल. 

-तुमचीच 'चहा'ती!