शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
2
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
3
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
4
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
5
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
6
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
7
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
8
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
9
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
10
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
11
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
12
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
13
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
14
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
15
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
16
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
17
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
18
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
19
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
20
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

मोबाइल उपवास

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2018 15:02 IST

कोल्हापूरच्या महाविद्यालयांत मोबाइलपासून प्रयत्नपूर्वक दूर राहणाऱ्या मुला-मुलींचा एक ‘शांत’ अनुभव.

-संदीप आडनाईक

अन्न-वस्त्र-निवारा-मोबाइल आणि डेटा या सध्याच्या जीवनावश्यक गरजा आहेत. त्यातही तरुणांच्या जगात तर शेवटच्या दोन गोष्टी प्राधान्यक्रमात पहिल्या दोनांत याव्यात. मात्र दुसरीकडे याच स्मार्टफोनच्या चर्चांत परस्पर संवाद हरवत चालल्याची, एकटेपणाचीही चर्चा आहे. सोशल मीडियात दोन हजार मित्र प्रत्यक्षात कुणीच नाही हे चित्रही भयाण आहे. त्यावर उपाय शोधायला हवा असं ज्याला-त्याला वाटतं. मात्र चर्चांच्या पलीकडे जाऊन कोल्हापुरात एक नवीन उपक्रम आकार घेतो आहे.त्याचं नाव, मोबाइल उपवास.कोल्हापुरातील एका प्राध्यापकाने तीन वर्षांपूर्वी हा एक उपाय शोधत मोबाइलचा वापर कमी करता येईल का, असा प्रयत्न करून पाहिलाय. एरव्ही उपवास धार्मिक कारणांसाठी, श्रद्धेपायी केला जातो आता नव्या डिजिटल काळात मोबाइलचा उपवास करण्या-करवण्याची चर्चा सुरू होताना दिसतेय. हा कोल्हापूरमधला उपक्रमही त्यातलाच एक.कोल्हापुरातली सायबर अर्थात छत्रपती शाहू इन्स्टिट्यूट आॅफ बिझनेस एज्युकेशन अ‍ॅण्ड रिसर्च ही उच्चशिक्षण देणारी संस्था. या संस्थेच्याच दिनकरराव शिंदे समाजकार्य विभागात प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेल्या डॉ. दीपक भोसले यांच्या मनात या मोबाइलच्या उपवासाची कल्पना आली. मोबाइल न वापरता, त्याचा उपवासच करण्याच्या या आपल्या कल्पनेला नव्या ‘कनेक्टेड’ जगात कुणी साथ देईल का, असा त्यांनाही प्रश्नच होता. सुरुवातीला त्यांच्या या कल्पनेची अनेकांनी थट्टाच केली; मात्र मोबाइलचा अतिवापर, त्याच्यावरचं अवलंबित्व, त्यानं तुटलेला परस्पर संवाद हे सारं त्यांनी आसपासच्या माणसांना समजावून सांगायला सुरुवात केली. आपल्या घरापासूनच सुरुवात केली. पत्नी, मुलं यांना सारं तपशिलात समजवल्यावर यांनी मोबाइल उपवास करायचं ठरवलं. घरच्यांनी साथ दिली; पण महाविद्यालयात तरुण मुलांना समजावून सांगणं, राजी करणं काही सोपं नव्हतंच. दीड वर्षापूर्वी त्यांनी यासंदर्भात प्रयत्न सुरू केले. पण एकवेळ गर्लफ्रेंडला बाजूला करतील, परंतु मोबाइल दूर ठेवणार नाही अशी तरुणांची मानसिकता. मात्र हळूहळू भोसले सरांच्या प्रयत्नांना यश आलं, मुलांनाही त्यांच्या म्हणण्यात तथ्य वाटू लागलं. आणि अनेक मुलं या मोबाइल उपवास उपक्रमात सहभागी व्हायला तयार झाले. आता हा उपक्रम कोल्हापुरातील सर्वच महाविद्यालयात कसा राबविता येईल यासाठी भोसले सर प्रयत्न करत आहेत.प्रा. दीपक भोसले सांगतात, मोबाइल अ‍ॅडिक्ट होणाऱ्या तरुण पिढीशी आपला संवाद हरवत चाललाय. हे चित्र बदलायला हवं, त्यासाठी काहीतरी करायला हवं असं मला वाटत होतं. मोबाइलचा अतिवापर ही सध्या मोठी समस्या बनते आहे. तरुण मुलांचं मोबाइलचं अवलंबित्व वाढतं आहे, इतकं की त्यांना त्याशिवाय जगणंच मुश्कील व्हावं. म्हणून मग वाटलं की, निदान काहीकाळ तरी ही मुलं मोबाइल स्वत:पासून लांब ठेवू शकतील का? तसा त्यांनी तो ठेवावा. तोच हा मोबाइल उपवास. म्हणून मग मुलांशी बोलून, त्यांना समजावून सप्टेंबर २0१६ पासून माझ्याच महाविद्यालयात हा उपक्रम सुरू केला. विशेष म्हणजे या सगळ्याची गरज लक्षात आल्यावर मुला-मुलींचा त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. दिवसेंंदिवस त्यांचा या उपक्रमातला सहभागही वाढत आहे. जूनपासून हा उपक्रम शहरातील विविध महाविद्यालयांत राबवता येतो का, यासाठीही आम्ही प्रयत्न करणार आहोत.यानिमित्तानं मोबाइल उपवास करणाºया मुला-मुलींशीही बोलणं झालं. त्यातलं तात्पर्य एकच की, ठरवलं तर काही काळ मोबाइलपासून लांब राहता येतं. लांब राहिल्यानं काही बिघडत नाही. उलट त्यावेळेचा सदुपयोग करण्याची शक्यता निर्माण होते. कोल्हापूरकर तरुण-तरुणींनी सुरू केलेल्या या उपवासातून निदान पर्याय तरी पुढं येतोय. नुस्त्या चर्चेपेक्षा हा पर्याय अधिक कृतिशील आहे.

मोबाइल उपवास कसा करतात?या उपवासाची सगळ्यात पहिली अट म्हणजे महाविद्यालयाच्या वेळेत मोबाइलचा वापर करणार नाही. हीच या उपवासाची सुरुवात.महाविद्यालयाच्या वेळापत्रकानुसार दर महिन्याला ‘मोबाइल उपवास’ केला जातो. ज्यात दिवसातील पाच तास किंवा त्याहून अधिक वेळ मोबाइलपासून दूर राहण्याचा प्रयत्न करणं अपेक्षित आहे.मोबाइल न वापरल्यानं कट्ट्यावर पुन्हा गप्पांचे फड रंगू लागलेत. परस्पर संवाद वाढतोय.वर्गात शिक्षक शिकवत असताना मोबाइल न वापरल्यानं अभ्यासाकडेही लक्ष वाढलंय.

मोबाइल उपवास करणारीमुलं काय म्हणतात...समाजकार्य पदवीचा दुसऱ्या वर्षाचा विद्यार्थी प्रवीण चौगुले सांगतो, या मोबाइल उपवास उपक्रमात मी गेल्या दोन वर्षांपासून सहभागी आहे. या उपक्रमामुळे माझा मोबाइलचा अतिवापर कमी झाला. मी मित्रांशी, नातेवाइकांशी, शिक्षकांशी थेट बोलायला लागलो.**मनीषा ठाणेकर सांगते, ज्या दिवशी मोबाइल हातात नसतो, त्यादिवशी काहीतरी चुकल्यासारखं वाटतं; पण त्या दिवशी मैत्रिणींसमवेत भरपूर गप्पा होतात.**किरण बनसोडे. पदवी घेऊन तो कॉलेजमधून बाहेर पडलाय. स्वत:चा व्यवसाय सुरू करण्याच्या तयारीत आहे. तो सांगतो, अजूनही मी एक दिवस मोबाइल उपवास ठेवण्याचा कसोशीने प्रयत्न करतो आहे. आतापर्यंत तरी तो यशस्वी ठरलाय. शांत वाटतं. मोबाइलवर खेळणं कमी झाल्यानं कामाकडे लक्ष वाढलं.**प्रियांका घाटगे सांगते, मोबाइलचा अतिवापर होतोय हे खरं. विशेषत: सोशल मीडिया आणि मोबाइलचा वापर वाढला आहे. यामुळे नातीगोती, मैत्री विसरून आम्ही स्वत:मध्ये गुरफटून गेलो आहोत. एक दिवस जर मोबाइल बंद ठेवला तरी त्याचा फायदा होतो. मुख्य म्हणजे शांत वाटतं.**पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी केनियातून कोल्हापुरात आलेल्या केविन ओकिओ. तो सांगतो, ‘मोबाइल उपवास’ ही संकल्पना मला फारशी पटली नव्हती. सध्या तंत्रज्ञानाचं युग असताना मोबाइलपासून दूर राहणं हा विरोधाभास वाटत होता. मात्र, अन्य विद्यार्थी मित्रांचे अनुभव ऐकल्यानंतर मीदेखील या उपक्रमात सहभागी झालो.**रेखा डावरे म्हणाली, हा माझ्यासाठी अतिशय भन्नाट अनुभव होता. मोबाइलशिवाय कधी एखादा दिवस दूर राहावे लागेल, ही कल्पनाच मला सहन झाली नसती; परंतु मित्रांच्या आग्रहाखातर मी एकदा हा प्रयोग करून पाहिला. त्यानंतर सातत्याने वर्षभर मी जाणीवपूर्वक मोबाइलपासून दूर राहतेय. त्याचा फायदा मला आणि माझ्या कुटुंबीयांना झालाय.**तृप्ती पाटील सांगते, मोबाइल हे एक व्यसन झालं आहे. मोबाइल दूर ठेवल्यामुळे मी स्वत:लाच जास्त वेळ देऊ लागले. हा व्यक्तिमत्त्व विकासाचाच भाग आहे. माझी इतरांना ऐकण्याची क्षमता आणि संयमही वाढला आहे.( लेखक लोकमतच्या कोल्हापुर आवृत्ती उपमुख्य उपसंपादक आहेत. sandip.adnaik@gmail.com)