शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

मोबाइल उपवास

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2018 15:02 IST

कोल्हापूरच्या महाविद्यालयांत मोबाइलपासून प्रयत्नपूर्वक दूर राहणाऱ्या मुला-मुलींचा एक ‘शांत’ अनुभव.

-संदीप आडनाईक

अन्न-वस्त्र-निवारा-मोबाइल आणि डेटा या सध्याच्या जीवनावश्यक गरजा आहेत. त्यातही तरुणांच्या जगात तर शेवटच्या दोन गोष्टी प्राधान्यक्रमात पहिल्या दोनांत याव्यात. मात्र दुसरीकडे याच स्मार्टफोनच्या चर्चांत परस्पर संवाद हरवत चालल्याची, एकटेपणाचीही चर्चा आहे. सोशल मीडियात दोन हजार मित्र प्रत्यक्षात कुणीच नाही हे चित्रही भयाण आहे. त्यावर उपाय शोधायला हवा असं ज्याला-त्याला वाटतं. मात्र चर्चांच्या पलीकडे जाऊन कोल्हापुरात एक नवीन उपक्रम आकार घेतो आहे.त्याचं नाव, मोबाइल उपवास.कोल्हापुरातील एका प्राध्यापकाने तीन वर्षांपूर्वी हा एक उपाय शोधत मोबाइलचा वापर कमी करता येईल का, असा प्रयत्न करून पाहिलाय. एरव्ही उपवास धार्मिक कारणांसाठी, श्रद्धेपायी केला जातो आता नव्या डिजिटल काळात मोबाइलचा उपवास करण्या-करवण्याची चर्चा सुरू होताना दिसतेय. हा कोल्हापूरमधला उपक्रमही त्यातलाच एक.कोल्हापुरातली सायबर अर्थात छत्रपती शाहू इन्स्टिट्यूट आॅफ बिझनेस एज्युकेशन अ‍ॅण्ड रिसर्च ही उच्चशिक्षण देणारी संस्था. या संस्थेच्याच दिनकरराव शिंदे समाजकार्य विभागात प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेल्या डॉ. दीपक भोसले यांच्या मनात या मोबाइलच्या उपवासाची कल्पना आली. मोबाइल न वापरता, त्याचा उपवासच करण्याच्या या आपल्या कल्पनेला नव्या ‘कनेक्टेड’ जगात कुणी साथ देईल का, असा त्यांनाही प्रश्नच होता. सुरुवातीला त्यांच्या या कल्पनेची अनेकांनी थट्टाच केली; मात्र मोबाइलचा अतिवापर, त्याच्यावरचं अवलंबित्व, त्यानं तुटलेला परस्पर संवाद हे सारं त्यांनी आसपासच्या माणसांना समजावून सांगायला सुरुवात केली. आपल्या घरापासूनच सुरुवात केली. पत्नी, मुलं यांना सारं तपशिलात समजवल्यावर यांनी मोबाइल उपवास करायचं ठरवलं. घरच्यांनी साथ दिली; पण महाविद्यालयात तरुण मुलांना समजावून सांगणं, राजी करणं काही सोपं नव्हतंच. दीड वर्षापूर्वी त्यांनी यासंदर्भात प्रयत्न सुरू केले. पण एकवेळ गर्लफ्रेंडला बाजूला करतील, परंतु मोबाइल दूर ठेवणार नाही अशी तरुणांची मानसिकता. मात्र हळूहळू भोसले सरांच्या प्रयत्नांना यश आलं, मुलांनाही त्यांच्या म्हणण्यात तथ्य वाटू लागलं. आणि अनेक मुलं या मोबाइल उपवास उपक्रमात सहभागी व्हायला तयार झाले. आता हा उपक्रम कोल्हापुरातील सर्वच महाविद्यालयात कसा राबविता येईल यासाठी भोसले सर प्रयत्न करत आहेत.प्रा. दीपक भोसले सांगतात, मोबाइल अ‍ॅडिक्ट होणाऱ्या तरुण पिढीशी आपला संवाद हरवत चाललाय. हे चित्र बदलायला हवं, त्यासाठी काहीतरी करायला हवं असं मला वाटत होतं. मोबाइलचा अतिवापर ही सध्या मोठी समस्या बनते आहे. तरुण मुलांचं मोबाइलचं अवलंबित्व वाढतं आहे, इतकं की त्यांना त्याशिवाय जगणंच मुश्कील व्हावं. म्हणून मग वाटलं की, निदान काहीकाळ तरी ही मुलं मोबाइल स्वत:पासून लांब ठेवू शकतील का? तसा त्यांनी तो ठेवावा. तोच हा मोबाइल उपवास. म्हणून मग मुलांशी बोलून, त्यांना समजावून सप्टेंबर २0१६ पासून माझ्याच महाविद्यालयात हा उपक्रम सुरू केला. विशेष म्हणजे या सगळ्याची गरज लक्षात आल्यावर मुला-मुलींचा त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. दिवसेंंदिवस त्यांचा या उपक्रमातला सहभागही वाढत आहे. जूनपासून हा उपक्रम शहरातील विविध महाविद्यालयांत राबवता येतो का, यासाठीही आम्ही प्रयत्न करणार आहोत.यानिमित्तानं मोबाइल उपवास करणाºया मुला-मुलींशीही बोलणं झालं. त्यातलं तात्पर्य एकच की, ठरवलं तर काही काळ मोबाइलपासून लांब राहता येतं. लांब राहिल्यानं काही बिघडत नाही. उलट त्यावेळेचा सदुपयोग करण्याची शक्यता निर्माण होते. कोल्हापूरकर तरुण-तरुणींनी सुरू केलेल्या या उपवासातून निदान पर्याय तरी पुढं येतोय. नुस्त्या चर्चेपेक्षा हा पर्याय अधिक कृतिशील आहे.

मोबाइल उपवास कसा करतात?या उपवासाची सगळ्यात पहिली अट म्हणजे महाविद्यालयाच्या वेळेत मोबाइलचा वापर करणार नाही. हीच या उपवासाची सुरुवात.महाविद्यालयाच्या वेळापत्रकानुसार दर महिन्याला ‘मोबाइल उपवास’ केला जातो. ज्यात दिवसातील पाच तास किंवा त्याहून अधिक वेळ मोबाइलपासून दूर राहण्याचा प्रयत्न करणं अपेक्षित आहे.मोबाइल न वापरल्यानं कट्ट्यावर पुन्हा गप्पांचे फड रंगू लागलेत. परस्पर संवाद वाढतोय.वर्गात शिक्षक शिकवत असताना मोबाइल न वापरल्यानं अभ्यासाकडेही लक्ष वाढलंय.

मोबाइल उपवास करणारीमुलं काय म्हणतात...समाजकार्य पदवीचा दुसऱ्या वर्षाचा विद्यार्थी प्रवीण चौगुले सांगतो, या मोबाइल उपवास उपक्रमात मी गेल्या दोन वर्षांपासून सहभागी आहे. या उपक्रमामुळे माझा मोबाइलचा अतिवापर कमी झाला. मी मित्रांशी, नातेवाइकांशी, शिक्षकांशी थेट बोलायला लागलो.**मनीषा ठाणेकर सांगते, ज्या दिवशी मोबाइल हातात नसतो, त्यादिवशी काहीतरी चुकल्यासारखं वाटतं; पण त्या दिवशी मैत्रिणींसमवेत भरपूर गप्पा होतात.**किरण बनसोडे. पदवी घेऊन तो कॉलेजमधून बाहेर पडलाय. स्वत:चा व्यवसाय सुरू करण्याच्या तयारीत आहे. तो सांगतो, अजूनही मी एक दिवस मोबाइल उपवास ठेवण्याचा कसोशीने प्रयत्न करतो आहे. आतापर्यंत तरी तो यशस्वी ठरलाय. शांत वाटतं. मोबाइलवर खेळणं कमी झाल्यानं कामाकडे लक्ष वाढलं.**प्रियांका घाटगे सांगते, मोबाइलचा अतिवापर होतोय हे खरं. विशेषत: सोशल मीडिया आणि मोबाइलचा वापर वाढला आहे. यामुळे नातीगोती, मैत्री विसरून आम्ही स्वत:मध्ये गुरफटून गेलो आहोत. एक दिवस जर मोबाइल बंद ठेवला तरी त्याचा फायदा होतो. मुख्य म्हणजे शांत वाटतं.**पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी केनियातून कोल्हापुरात आलेल्या केविन ओकिओ. तो सांगतो, ‘मोबाइल उपवास’ ही संकल्पना मला फारशी पटली नव्हती. सध्या तंत्रज्ञानाचं युग असताना मोबाइलपासून दूर राहणं हा विरोधाभास वाटत होता. मात्र, अन्य विद्यार्थी मित्रांचे अनुभव ऐकल्यानंतर मीदेखील या उपक्रमात सहभागी झालो.**रेखा डावरे म्हणाली, हा माझ्यासाठी अतिशय भन्नाट अनुभव होता. मोबाइलशिवाय कधी एखादा दिवस दूर राहावे लागेल, ही कल्पनाच मला सहन झाली नसती; परंतु मित्रांच्या आग्रहाखातर मी एकदा हा प्रयोग करून पाहिला. त्यानंतर सातत्याने वर्षभर मी जाणीवपूर्वक मोबाइलपासून दूर राहतेय. त्याचा फायदा मला आणि माझ्या कुटुंबीयांना झालाय.**तृप्ती पाटील सांगते, मोबाइल हे एक व्यसन झालं आहे. मोबाइल दूर ठेवल्यामुळे मी स्वत:लाच जास्त वेळ देऊ लागले. हा व्यक्तिमत्त्व विकासाचाच भाग आहे. माझी इतरांना ऐकण्याची क्षमता आणि संयमही वाढला आहे.( लेखक लोकमतच्या कोल्हापुर आवृत्ती उपमुख्य उपसंपादक आहेत. sandip.adnaik@gmail.com)