शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
2
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
3
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
4
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
5
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
6
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
7
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
8
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
9
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
10
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
11
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
12
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
13
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
14
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
15
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
16
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
17
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
18
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
19
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
20
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO

स्थलांतरही आत्मविश्वास निर्माण करतो. मोनालीचा प्रवास हेच तर सांगतो.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2018 03:00 IST

लहानपणीच पुण्यात आले.स्थलांतरानं मला आत्मनिर्भर केलं. आता अमेरिकेला निघालेय,सोबत आहेच,आत्मविश्वास.

- मोनाली म्हेत्रे

स्थलांतरामुळे फक्त व्यक्तिमत्त्व विकासच नव्हे तर मनाचा विकासही होतो. स्थलांतर करताना आप्तांना सोडून दूर जाण्याचा प्रसंग येतो; पण यामुळेच जीवन जगण्याची नवी उमेद, उत्साह, नवा दृष्टिकोन मिळतो. सर्व प्रसंगांना एकट्यानं व धीरानं तोंड देण्याचं बळ मिळतं.

मी मूळची फलटणची. प्राथमिक शिक्षण फलटणमध्येच झाले. शाळेत हुशार असल्यानं पाचवीपासून पुढील शिक्षणासाठी आई-बाबांनी माझा प्रवेश पुण्यातील महर्षी कर्वेंच्या संस्थेत घेण्याचा निर्णय घेतला. एवढय़ा लहान वयातच घरापासून दूर राहण्याचा प्रसंग माझ्यावर आला. पहिले वर्ष खडतर गेलं; परंतु महिलार्शम शाळेचे संस्कार व शिक्षण पद्धतीमुळे शिक्षणात मन रमलं. रोज सायंकाळी रामरक्षा, भीमरूपी, गणेशस्तोत्र हॉस्टेलमध्ये पाठ करून घेतले जाई. या संस्थेत सातारा, नाशिक, नागपूर, वाघोली, औरंगाबाद, नांदेड अशा दूर दूर ठिकाणांहून शिक्षणासाठी आलेल्या प्रेमळ मैत्रिणी मिळाल्या. तसंच संस्थेच्या कडक शिस्तीमुळे सर्व गोष्टी वेळेवर करण्याची सवय लागली. लहानपणीच आपल्या स्वभावाविरोधी व समान गुणधर्म असणार्‍या लोकांमध्ये वावरायची सवय झाल्यामुळे माझ्यामध्ये वेगळाच असा आत्मविश्वास निर्माण झाला.

पुढे अकरावी-बारावी आणि इंजिनिअरिंगसुद्धा पुण्यातच झालं. इंजिनिअरिंगला असताना मित्र-मैत्रिणींनी माझ्यातील सुप्त गुण ओळखून डान्स, स्पोर्ट्समध्ये सहभाग घेण्यास प्रवृत्त केलं. त्यामुळे स्टेज डेअरिंग वाढलं. गुरुंच्या मार्गदर्शनामुळे पुढील प्रवासास दिशा मिळाली. पुण्यात मन रमलं; परंतु आज पुन्हा एकदा स्थलांतर करण्याची वेळ मजवर येऊन ठेपली आहे. 

सध्या माझे अँडमिशन ‘युनिव्हर्सिटी ऑफ टेक्सास, अर्लिंगटन’ (कल्पना चावलानं पदवी घेतली ती युनिव्हर्सिटी) येथे झालं आहे. येत्या ऑगस्टमध्ये मी अमेरिकेकडे प्रयाण करणार आहे. पुढच्या पदवीसाठी, तेही निश्चिंत! लहानपणीच्या आई-बाबांच्या निर्णयामुळेच आज मी अगदी निर्भयपणे पुढील स्थलांतराचा निर्णय घेऊ शकले. एकटेपणाची भीती गेली. सर्व स्पर्धा परीक्षा पूर्ण करून, शैक्षणिक कर्ज घेणं, अँडमिशन प्रोसेस पूर्ण करणं, फ्लाइट तिकीट बुक करणं, युनिव्हर्सिटी कॅम्पसमध्ये राहण्यासाठी अपार्टमेंट मिळवणं या सर्व गोष्टी स्वत: एकटीनं करू शकले.हा आत्मविश्वास हीच तर स्थलांतराची पुंजी आहे.