शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
2
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
3
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
4
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
5
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
6
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
7
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
8
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
9
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
10
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
11
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
12
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
13
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
14
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
15
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
16
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
17
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
18
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
19
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
20
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी

3 वर्षे 3 दिवस आणि 35 देश अशी सफर करणाऱ्या विष्णुदास चापकेला भेटा.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2019 16:55 IST

35 देश फिरून नुकताच भारतात परतलेला विष्णुदास चापके सांगतोय, आयुष्य बदलून टाकणार्‍या जगभ्रमंतीतले अनुभव.

ठळक मुद्देप्रवासाचं एक स्वप्न पूर्ण झालं. आता हा ‘ठहराव’ही हवासा, आपलासा वाटतो आहे.

विष्णुदास चापके

जग पाहायला निघालो. गेलो. जाऊन आलो. लोक आयुष्यात जुगार लावतात. मी आयुष्यच जुगारात लावायला निघालो होतो. मला अजून आठवतात ते दिवस. मी ठरवलं आपण जग पाहायचं. त्याआधी पत्रकार म्हणून एका इंग्रजी वृत्तपत्रात काम करत होतो. त्या काळच्या एका घटनेनं हे जग पाहण्याचं वेड माझ्या डोक्यात शिरलं. कमांडर दिलीप दोंडे सागरमार्गे पृथ्वी प्रदक्षिणा करून आले होते. असा पराक्रम करणारे ते पहिलेच भारतीय आणि सहावे आशियाई नागरिक. मोहीम फत्ते करून आले म्हणून मला त्यांची मुलाखत घ्यायला सांगण्यात आलं. मी गेलो. निघताना मी त्यांना विचारलं, ‘तुमच्यासारखं मलाही करता येईल?’ ते हसले आणि म्हणाले, ‘अवघड काय आहे त्यात, निघ!’तेव्हापासून माझ्या मनात हे जग पाहायला जायचं स्वप्न रुजलं. नोकरी सोडली आणि घरच्यांशी बोलून 19 मार्च 2016 रोजी निघालो.तो दिवस आणि भारतात परत आलो तो दिवस.3 वर्षे 3 दिवस. एवढा हा प्रवास झाला. 35 देश मी फिरलो. अमेरिका, कॅनडा, पाकिस्तान या देशांचा व्हिसा नाही मिळाला त्यामुळे तिथे न जाता पृथ्वी प्रदक्षिणा करून आलो. आता कुणी विचारतं, की एवढं जग फिरलास? काय कमावलंस?फार सोपं आहे या प्रश्नाचं उत्तर. एका वाक्यात सांगतो, मी मनशांती कमावली!मी जे स्वप्न पाहिलं ते मी पूर्ण केलं; याहून मोठं समाधान ते काय? छान समाधानी वाटतंय मला!आणि माझ्यात बदल काय झाला?

एका वाक्यात सांगायचं, तर मजा आली. मी तीन दिवसांपेक्षा जास्त दिवसांचं प्लॅनिंगच करत नव्हतो. पुढं काय, भविष्यात काय, हे प्रश्नच माझ्या आयुष्यातून संपले होते. कुठलाही प्लॅन तीन दिवसांचा. आणि जास्तीत जास्त प्लॅनिंग म्हणजे पुढच्या देशाचा व्हिसा मिळवण्यासाठी करावी लागणारी धावपळ. बाकी प्लॅनिंग शून्य. प्लॅनिंग लागतंय कशाला? आपण अंधारात निघतो, हातात टॉर्च घेऊन. इटुकला, पावलापुरता प्रकाश असतो. दहा-बारा पावलं पुढचं दिसतं, आपण नीट पुढं जातो. मग फार पुढचं दिसायला पाहिजे, ही घाई तरी कशाला? या प्रवासात माझ्या हे लक्षात आलंय, की फार प्लॅनिंग काही कामाचं नाही. प्लॅन वर्कआऊटच होत नाहीत. आपण फार प्लॅनिंग करतो, पण ते प्रत्यक्षात उतरत नाही म्हणून दुर्‍ख होतं. त्यापेक्षा प्लॅनिंग न करता, छोटा प्लॅनने मोठय़ा गोष्टी घडल्या की आनंद होतो. जे हवं ते मिळालं, जे माहितीच नव्हतं तेही मिळालं, आपण खुश! मस्त वाटतं.मी असा होतो का, मुंबईत पत्रकार म्हणून काम करायचो तेव्हा होतो का असा? मी मुळात फार उतावळा होतो. काहीसा अ‍ॅग्रेसिव्हही. वादावादीला, हुज्जत घालायला, आपली मतं सांगायला सतत तयार. माझंच कसं खरं हे समोरच्याला पटवून देण्यात मला फार रस होता. जे हवं ते हवंच आणि आज, आता, लगेच हवं अशा अ‍ॅटिटय़ूडनं जगायचो. कुणावर सहजी विश्वास ठेवायचो नाही. पत्रकारितेचा व्यावसायिक गुण प्रत्यक्ष जगण्यातही उतरला होताच. अगदी घरातल्या माणसांनी कुणी काही माहिती दिली तरी मी ती क्रॉस चेक करून घ्यायचो. नवख्या माणसांवर विश्वास ठेवणं तर फार लांबची गोष्ट होती.आता मी कुणावरही, अगदी कुणावरही विश्वास ठेवू शकतो. सहज. शांत झालोय. कुणी माझ्यावर आरडलं-ओरडलं तरी मी शांत राहतो. स्वतर्‍लाच सांगतो, की ‘लेट हिम कुल डाऊन’ मग बोलू. काहीच प्रतिक्रिया देत नाही. हे प्रतिक्रियाच न देणं माझ्या आयुष्यातच नव्हतं. ते मी शिकलोय. मुख्य म्हणजे कुणी अगदी म्हणालंच की 2 अधिक 2 पाच होतात. तरी मी म्हणेन, की ठीक आहे, तुझं खरं. तुझंच बरोबर. त्याच्याशी वाद घालत बसण्यापेक्षा मी प्रार्थना करेन, की कधीतरी या माणसाची सारी गणितं बरोबर येतील, कधीतरी त्यालाही योग्य मार्ग सापडेल. या प्रवासानं मला ही समज दिली. ही ‘शांतता’ दिली!आणि आपल्या देशात असणं म्हणजे काय याची जाणीवही भारतीय मातीत पाय ठेवल्यावर झाली. म्यानमार आणि भारतामधल्या नो मॅन्स लॅण्डमध्ये मी खूप फोटो काढले. मी म्यानमारमार्गे ‘मोरेह’ला पोहोचलो. मणिपूरमधलं म्यानमार बॉर्डरवरचं गाव. तिथं माझ्या पासपोर्टवर भारतात परत आल्याचा शिक्का बसला आणि मला वाटलं, आता पासपोर्टचं काम नाही. वाटलं, आय अ‍ॅम ब्रिदिंग लाइक विदाऊट व्हिसा! मी बिनधास्त श्वास घेऊ शकतो, आता मला श्वास घेण्यासाठी कुणाच्या परवानगीची गरज नाही. होतं काय, तुम्ही सतत व्हिसावर असता म्हणजे परवानगीनं त्या देशात राहत असता, काही दिवसांत व्हिसा संपला, की निघायचं. पासपोर्ट ही सतत जवळ बाळगण्याची गोष्ट. इफ यू लॉस्ट पासपोर्ट, यू आर गॉन. जिवापेक्षा पासपोर्टला जास्त जपावं लागतं. ते संपलं. आता हा मुक्त श्वास घेताना मला फार फार भारी वाटतंय.जगभर काय काय खाल्लं. पण परत आल्यावर पहिलं भारी वाटलं ते आपला उकळलेला दुधाचा चहा पिऊन. सगळ्या प्रवासात मी तो डिप डिपचा चहा प्यालो. फक्त इराण आणि उझबेकिस्तानमध्ये असा उकळलेला चहा प्यायलो होतो, पण ते उंटाचं दूध होतं, ते बाधलं. आता परत आल्यावर चहा प्यालो, तर तो पचला.म्हणजे आता परत मी रुटीनमध्ये येतोय.प्रवासाचं एक स्वप्न पूर्ण झालं. आता हा ‘ठहराव’ही हवासा, आपलासा वाटतो आहे.(शब्दांकन -ऑक्सिजन टीम)