शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
2
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
3
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले
4
"मल्लिकार्जून खरगेंनी इतिहासातून धडा घ्यावा", आरएसएसचे दत्तात्रय होसबळे काँग्रेसच्या अध्यक्षांवर भडकले
5
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?
6
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
7
‘आपण काय मेसेज करत आहात? हे व्हॉट्सअ‍ॅपला ठाऊक...’, इलॉन मस्‍क यांचा गंभीर आरोप, केली मोठी घोषणा
8
"दिल्लीचे नामांतर 'इंद्रप्रस्थ' करा"; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भाजप खासदाराचे पत्र, पांडवांचा उल्लेख
9
११ कोटींची लॉटरी जिंकली, पण माणूस कुठे गेला? कोट्याधीश विजेत्याला शोधण्यासाठी कंपनीच घेतेय कष्ट
10
Tulasi Vivah Mangalashtak: तुलसी विवाहात 'ही' मंगलाष्टके आवर्जून म्हणा; मिळेल कन्यादानाचे पुण्य!
11
"वडिलांच्या निधनानंतर ६ महिन्यात संभाजी महाराज लेझीम खेळतील का?", 'छावा'मधल्या 'त्या' दृश्यावर स्पष्टच बोलले दिग्पाल लांजेकर
12
बिहारमध्ये कुणाचं सरकार, भाजपाला किती जागा मिळणार?; समोर आला ताजा सर्व्हे, वाचा
13
Viral Video: ट्रेनमधून प्रवास करताना कधीच 'अशी' चूक करू नका; जीवघेणी घटना कॅमेऱ्यात कैद!
14
Tulsi Vivah 2025 Wishes: तुळशी विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Images, Whatsapp Status शेअर करून आमंत्रित करा आपल्या नातेवाईकांना
15
दुबार मतदार दिसले तर तिथेच फोडून काढायचे; राज ठाकरे यांचा घणाघात, पडदा हटवला, पुरावे दाखवले
16
MVA MNS Morcha Live: ‘सत्याचा मोर्चा’च्या निमित्ताने संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण झाली: शरद पवार
17
Crime: घरात एकटीच होती प्रेयसी, प्रियकर भेटायला गेला, तेवढ्यात आला भाऊ अन्...शेवट भयंकर!
18
प्रीमियम लूक, ड्युअल स्क्रीन, ५००किमी रेंज; तयार रहा मारुतीची पहिली इलेक्ट्रिक एसयुव्ही येतेय!
19
गौरी खानचं 'टोरी' रेस्टॉरंट : ₹१५०० चे मोमोज, ₹११०० चं सॅलड; मॅश बटाट्याची किंमत ऐकून अवाक् व्हाल
20
Tulasi Vivah 2025: तुलसी विवाहाची तयारी कशी करावी? वाचा तारीख, मुहूर्त, आरती आणि पूजाविधी 

सागरी कासवांचे जिगरी दोस्त

By admin | Updated: April 3, 2017 18:47 IST

कासवांच्या संवर्धनासाठी नोकरीही सोडली..

सागरी कासवांचे सागरी पर्यावरणातले अनन्यसाधारण महत्त्व वेगळे सांगायला नको. मात्र संपुर्ण जगात कासवांना मारले जाते, त्यांची अंडी पळवली जातात त्यामुळे सागरी कासवे धोक्यात आली आहेत. सागरी पर्यावरणही त्यामुळे मोठ्या प्रमाणात धोक्यात आले आहे. मात्र कासवांना वाचवण्याचा वसा कोकणांत काही तरुणांनी घेतला आहे. मोहन उपाध्ये व अभिनय केळस्कर ही त्यातील आघाडीची नावं. त्यांच्या प्रयत्नांमुळे कासवांची हानी मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे आणि लोकांमध्येही जनजागृती होते आहे. त्यानिमित्त पाच एप्रिल रोजी त्यांनी ‘कासवमित्र’ पुरस्कारानं गौरविण्यात येणार आहे. 
त्यांच्या प्रयत्नांची ही कहाणी..
‘सह्याद्री निसर्ग मित्र’, चिपळूण ही संस्था 
कासवांच्या संरक्षण, संवर्धनासाठी सुमारे पंधरा वर्षांपासून काम करीत आहे. २००२-०३ साली सह्याद्री निसर्ग मित्रने वनविभागाच्या सहकार्याने काम चालू केले. आज सदर मोहिम यशस्वी होताना दिसत आहे. २००२ ते २०१३ सालापर्यंत सह्याद्रीच्या वतीने महाराष्ट्रातील ८० गावांमध्ये सदर मोहिम राबवण्यात आली. यासाठी वनविभागाचा मोलाचा पाठिंबा होता. कासवांची अंडी चोरणाºयांनाच प्रशिक्षण देऊन त्यांना संवर्धनाच्या कामात जोड्ण्यात आले, हे संस्थेचे सर्वात मोठे यश.
 
कासव संवर्धनासाठी कोकणातील वेळास येथे कासव महोत्सवही चालू करण्यात आला. तसेच त्यांच्या होस्टेलचीही सुरूवात करण्यात आली. दहा वर्षाच्या यशस्वी कामानंतर सदर मोहिम सातत्याने शाश्वत स्वरूपात चिरकाळ चालावी यासाठी ती स्थानिक लोकांच्या ताब्यात देण्यात आली. वनविभागाच्या सहकार्याने तसेच स्थानिक ग्राम पंचायतीमुळे ती यशस्वी होत आहे. 
सागरी कासव संवर्धनाचे हे काम १५ वर्षे सातत्याने चालू आहे. संपूर्ण महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर या कामातून कासवांची एक हजारहून अधिक घरटी संरक्षीत करण्यात येऊन ४५ हजार पेक्षा जास्त पिल्ले समुद्रात सोडण्यात यश आले आहे. 
कासवांच्या संवर्धनात काही तरुणांचा मोठा सहभाग आहे. कासवाचे एकही अंडे चोरीला जाऊ नये किंवा कासवांची शिकार होऊ नये, जन्माला आलेली पिले पुन्हा समुद्रात जावीत यासाठी या तरुणांनी कायम संघर्ष केला आणि जीवतोड मेहनत केली. त्याचं प्रत्यंतर आता येऊ लागलं आहे. 
त्यांच्या याच कामानिमित्त दोन कासवमित्रांना निसर्ग संवर्धन मंडळाने कासव मित्र पुरस्कारानं गौरवित करण्याचं ठरवलं आहे. 
वेळास येथील मोहन उपाध्ये व आंजर्ला येथील  अभिनय केळस्कर यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. सदर पुरस्कार पाच एप्रिल रोजी आंजर्ला येथे होणाºया एका विशेष कार्यक्र मात प्रदान करण्यात येणार आहे. रोख रु पये पाच हजार, मानपत्र व स्मृतीचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
कासवांच्या संवर्धनासाठी मोहन उपाध्येनं तर मुंबई येथील नोकरी सोडून तो वेळास मध्ये परत आला. वेळासमधील ग्रामस्थांना बरोबर घेऊन नवनवीन कल्पना अमलात आणल्या. वेळास बरोबर आजुबाजूच्या गावात कासव संरक्षण यशस्वी केले. वेळासचा कासव महोत्सव व होमस्टे या सर्व कामात त्याचा पुढाकार होता.
अभिनय केळस्करनं २००६ साली आंजर्ले येथे सह्याद्रीच्या कासव संरक्षण मोहिमेत सहभाग घेतला. कामामध्ये सातत्य दाखवुन आजुबाजूच्या गावातसुद्धा कासव संरक्षण यशस्वी केले. आंजर्ले येथे गेल्या वर्षीपासून कासव महोत्सवास सुरु वात केली. या सर्व कामात त्याने ग्रामस्थ्यांना बरोबर घेतले.
 
या सर्वच गोष्टींचा विधायक परिणाम होऊन कासवांच्या संख्येत वाढ होत आहे. 
या दोन्ही तरुणांच्या धडपडीमुळे आणखीही तरुण कासव संवर्धनाच्या कामात ओढले गेले आहेत.