शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
2
३४५ राजकीय पक्षांवर टांगती तलवार, निवडणूक आयोग नोंदणी रद्द करणार; वाचा सविस्तर
3
समुद्री महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजगाचा मृत्यू
4
'राजा रघुवंशी याचे आणखी एक प्रेमसंबंध होते'; महिलेने केला मोठा दावा, हत्या प्रकरणी नवा ट्विस्ट
5
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
6
T20I Powerplay New Rule : आता असा ठरवण्यात येणार 'पॉवर प्ले'चा खेळ! जाणून घ्या नवा नियम
7
Video: पाकिस्तानच्या नदीला अचानक पूर आला; फिरायला गेलेले एकाच कुटुंबातील १८ जण वाहून गेले
8
बाजारात तेजीचा 'चौकार'! सेन्सेक्स-निफ्टी सलग चौथ्या दिवशी वाढीसह बंद, 'या' शेअर्सने केलं मालामाल
9
इस्रायलच्या 'ऑपरेशन राइजिंग लॉयन'चा दावा, इराणमध्ये ९००हून अधिक ठिकाणांवर हल्ले, अणुवैज्ञानिकही ठार!
10
अमेरिकेविरोधात रशिया-चीनचा खतरनाक प्लॅन; भारतासाठी धोक्याची घंटा, पुतिन-जिनपिंगचं चाललंय काय?
11
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
12
'ओढत खोलीत घेऊन गेले, पाय पकडले अन्...', कोलकाता बलात्कार पीडितेने सांगितली आपबीती
13
'कोल्हापुरी'सारखी चप्पल विकून वादात अडकली 'प्राडा'; १ लाख रुपयांच्या किंमतीवरून झाला 'राडा'
14
पहिली ते चौथी हिंदी भाषा नको, अजित पवारांची स्पष्ट भूमिका; एकनाथ शिंदेंचं मौन, भाजपामुळे होतेय कोंडी?
15
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
16
वृद्ध महिलांना बांधून ठेवलं, पुरुषांच्या अंगावर कपडेही नाहीत! आश्रमातील धक्कादायक प्रकार उघड
17
मुलं पुढे निघून जातात, ब्रेकअपनंतर मुलींचं लग्न अवघड होतं! अलाहाबाद उच्च न्यायालयानं व्यक्त केली चिंता
18
Viral Video : ताडपत्री अन् झावळ्या बघून झोपडी समजलात का? आत वाकून बघाल तर शॉकच व्हाल!
19
Jagannath Rath Yatra 2025 : जगन्नाथाच्या रथापुढे होते 'सोन्याच्या' झाडूने स्वच्छता; कोणी सुरू केली ही प्रथा? आता कोण करतं? वाचा!
20
Gold Silver Rates 27 June: सोन्या-चांदीच्या दरात आज मोठी घसरण, आता 'इतकी' झाली १० ग्राम सोन्याची किंमत

सागरी कासवांचे जिगरी दोस्त

By admin | Updated: April 3, 2017 18:47 IST

कासवांच्या संवर्धनासाठी नोकरीही सोडली..

सागरी कासवांचे सागरी पर्यावरणातले अनन्यसाधारण महत्त्व वेगळे सांगायला नको. मात्र संपुर्ण जगात कासवांना मारले जाते, त्यांची अंडी पळवली जातात त्यामुळे सागरी कासवे धोक्यात आली आहेत. सागरी पर्यावरणही त्यामुळे मोठ्या प्रमाणात धोक्यात आले आहे. मात्र कासवांना वाचवण्याचा वसा कोकणांत काही तरुणांनी घेतला आहे. मोहन उपाध्ये व अभिनय केळस्कर ही त्यातील आघाडीची नावं. त्यांच्या प्रयत्नांमुळे कासवांची हानी मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे आणि लोकांमध्येही जनजागृती होते आहे. त्यानिमित्त पाच एप्रिल रोजी त्यांनी ‘कासवमित्र’ पुरस्कारानं गौरविण्यात येणार आहे. 
त्यांच्या प्रयत्नांची ही कहाणी..
‘सह्याद्री निसर्ग मित्र’, चिपळूण ही संस्था 
कासवांच्या संरक्षण, संवर्धनासाठी सुमारे पंधरा वर्षांपासून काम करीत आहे. २००२-०३ साली सह्याद्री निसर्ग मित्रने वनविभागाच्या सहकार्याने काम चालू केले. आज सदर मोहिम यशस्वी होताना दिसत आहे. २००२ ते २०१३ सालापर्यंत सह्याद्रीच्या वतीने महाराष्ट्रातील ८० गावांमध्ये सदर मोहिम राबवण्यात आली. यासाठी वनविभागाचा मोलाचा पाठिंबा होता. कासवांची अंडी चोरणाºयांनाच प्रशिक्षण देऊन त्यांना संवर्धनाच्या कामात जोड्ण्यात आले, हे संस्थेचे सर्वात मोठे यश.
 
कासव संवर्धनासाठी कोकणातील वेळास येथे कासव महोत्सवही चालू करण्यात आला. तसेच त्यांच्या होस्टेलचीही सुरूवात करण्यात आली. दहा वर्षाच्या यशस्वी कामानंतर सदर मोहिम सातत्याने शाश्वत स्वरूपात चिरकाळ चालावी यासाठी ती स्थानिक लोकांच्या ताब्यात देण्यात आली. वनविभागाच्या सहकार्याने तसेच स्थानिक ग्राम पंचायतीमुळे ती यशस्वी होत आहे. 
सागरी कासव संवर्धनाचे हे काम १५ वर्षे सातत्याने चालू आहे. संपूर्ण महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर या कामातून कासवांची एक हजारहून अधिक घरटी संरक्षीत करण्यात येऊन ४५ हजार पेक्षा जास्त पिल्ले समुद्रात सोडण्यात यश आले आहे. 
कासवांच्या संवर्धनात काही तरुणांचा मोठा सहभाग आहे. कासवाचे एकही अंडे चोरीला जाऊ नये किंवा कासवांची शिकार होऊ नये, जन्माला आलेली पिले पुन्हा समुद्रात जावीत यासाठी या तरुणांनी कायम संघर्ष केला आणि जीवतोड मेहनत केली. त्याचं प्रत्यंतर आता येऊ लागलं आहे. 
त्यांच्या याच कामानिमित्त दोन कासवमित्रांना निसर्ग संवर्धन मंडळाने कासव मित्र पुरस्कारानं गौरवित करण्याचं ठरवलं आहे. 
वेळास येथील मोहन उपाध्ये व आंजर्ला येथील  अभिनय केळस्कर यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. सदर पुरस्कार पाच एप्रिल रोजी आंजर्ला येथे होणाºया एका विशेष कार्यक्र मात प्रदान करण्यात येणार आहे. रोख रु पये पाच हजार, मानपत्र व स्मृतीचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
कासवांच्या संवर्धनासाठी मोहन उपाध्येनं तर मुंबई येथील नोकरी सोडून तो वेळास मध्ये परत आला. वेळासमधील ग्रामस्थांना बरोबर घेऊन नवनवीन कल्पना अमलात आणल्या. वेळास बरोबर आजुबाजूच्या गावात कासव संरक्षण यशस्वी केले. वेळासचा कासव महोत्सव व होमस्टे या सर्व कामात त्याचा पुढाकार होता.
अभिनय केळस्करनं २००६ साली आंजर्ले येथे सह्याद्रीच्या कासव संरक्षण मोहिमेत सहभाग घेतला. कामामध्ये सातत्य दाखवुन आजुबाजूच्या गावातसुद्धा कासव संरक्षण यशस्वी केले. आंजर्ले येथे गेल्या वर्षीपासून कासव महोत्सवास सुरु वात केली. या सर्व कामात त्याने ग्रामस्थ्यांना बरोबर घेतले.
 
या सर्वच गोष्टींचा विधायक परिणाम होऊन कासवांच्या संख्येत वाढ होत आहे. 
या दोन्ही तरुणांच्या धडपडीमुळे आणखीही तरुण कासव संवर्धनाच्या कामात ओढले गेले आहेत.