शहरं
Join us  
Trending Stories
1
कुठल्याही क्षणी अटकेची शक्यता असताना माणिकराव कोकाटे पडले आजारी; लीलावती रुग्णालयात दाखल
2
रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! वेटिंग-RAC तिकिटाची स्थिती आता १० तास आधी कळणार
3
कर्जदारांना 'अच्छे दिन'! भारतीय अर्थव्यवस्था 'गोल्डीलॉक्स' स्थितीत; गव्हर्नर मल्होत्रा म्हणाले...
4
काँग्रेसची कार्यकर्ती, वरपर्यंत ओळख असल्याचं सांगून आणायची प्रेमासाठी दबाव, त्रस्त पोलीस इन्स्पेक्टरची महिलेविरोधात तक्रार
5
मुंबई इंडियन्सची 'ती गोष्ट 'जितेंद्र भाटवडेकर'च्या मनाला लागली? रोहितसोबतचा फोटो शेअर करत म्हणाला...
6
‘टॅरिफला आता हत्यार बनवले जातेय’, निर्मला सीतारमण यांनी सांगितला 'ट्रम्प टॅरिफ'मागील खेळ...
7
वंदे भारत की राजधानी, कोणत्या ट्रेनच्या लोको पायलटला सर्वाधिक पगार मिळतो? आकडा पाहून व्हाल थक्क
8
ICICI Prudential AMC IPO Allotment: कसं चेक कराल अलॉटमेंट स्टेटस? जीएमपीमध्येही जोरदार तेजी
9
गणवेशावरून चिडवलं, घरी येताच चौथीत शिकणाऱ्या प्रशांतने...; आईवडिलांच्या पायाखालची जमीनच सरकली
10
“काँग्रेसचे पाक प्रेम उतू चाललेय, ऑपरेशन सिंदूरचा हिशोब विचारणारे देशद्रोही”: एकनाथ शिंदे
11
Meesho च्या शेअरला अपर सर्किट; इश्यू प्राईजच्या दुप्पट झाली किंमत, सह-संस्थापक बनले अब्जाधीश
12
ढाका येथील भारतीय उच्चायुक्तालयाला धमकी, सरकारने बांगलादेशी अधिकाऱ्याला समन्स बजावले
13
विराट-अनुष्काने घेतली प्रेमानंद महाराजांकडून दीक्षा, गळ्यात तुळशी माळ; जाणून घ्या त्याचे महत्व
14
Payal Gaming: कोण आहे पायल गेमिंग? १.२० मिनटांचा MMS लीक झाल्यानंतर आली चर्चेत!
15
Video: BJP आमदाराच्या मुलाचा शाही विवाह सोहळा; तब्बल ७० लाखांच्या फटाक्यांची केली आतषबाजी
16
ओला-उबरला टक्कर! १ जानेवारीपासून 'भारत टॅक्सी' ॲप होणार लाँच; प्रवाशांना स्वस्त प्रवास आणि ड्रायव्हर्सची होणार जास्त कमाई
17
लग्नानंतर एका वर्षात शोभिता धुलिपाला देणार गुडन्यूज? सासरे नागार्जुन म्हणाले, "योग्य वेळ..."
18
भारतीय बाजारात उद्याच स्वस्तातली सात सीटर कार लाँच होणार; अर्टिगा, ट्रायबरला मिळणार टक्कर...
19
स्वस्त 'पर्सनल लोन'च्या शोधात आहात? 'या' ५ बँकांमध्ये मिळतोय सर्वात कमी व्याजदर; १२ लाखांचा EMI किती?
20
क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंविरोधात अटक वॉरंट, कोणत्याही क्षणी अटक होणार, आमदारकीही जाणार?
Daily Top 2Weekly Top 5

सागरी कासवांचे जिगरी दोस्त

By admin | Updated: April 3, 2017 18:47 IST

कासवांच्या संवर्धनासाठी नोकरीही सोडली..

सागरी कासवांचे सागरी पर्यावरणातले अनन्यसाधारण महत्त्व वेगळे सांगायला नको. मात्र संपुर्ण जगात कासवांना मारले जाते, त्यांची अंडी पळवली जातात त्यामुळे सागरी कासवे धोक्यात आली आहेत. सागरी पर्यावरणही त्यामुळे मोठ्या प्रमाणात धोक्यात आले आहे. मात्र कासवांना वाचवण्याचा वसा कोकणांत काही तरुणांनी घेतला आहे. मोहन उपाध्ये व अभिनय केळस्कर ही त्यातील आघाडीची नावं. त्यांच्या प्रयत्नांमुळे कासवांची हानी मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे आणि लोकांमध्येही जनजागृती होते आहे. त्यानिमित्त पाच एप्रिल रोजी त्यांनी ‘कासवमित्र’ पुरस्कारानं गौरविण्यात येणार आहे. 
त्यांच्या प्रयत्नांची ही कहाणी..
‘सह्याद्री निसर्ग मित्र’, चिपळूण ही संस्था 
कासवांच्या संरक्षण, संवर्धनासाठी सुमारे पंधरा वर्षांपासून काम करीत आहे. २००२-०३ साली सह्याद्री निसर्ग मित्रने वनविभागाच्या सहकार्याने काम चालू केले. आज सदर मोहिम यशस्वी होताना दिसत आहे. २००२ ते २०१३ सालापर्यंत सह्याद्रीच्या वतीने महाराष्ट्रातील ८० गावांमध्ये सदर मोहिम राबवण्यात आली. यासाठी वनविभागाचा मोलाचा पाठिंबा होता. कासवांची अंडी चोरणाºयांनाच प्रशिक्षण देऊन त्यांना संवर्धनाच्या कामात जोड्ण्यात आले, हे संस्थेचे सर्वात मोठे यश.
 
कासव संवर्धनासाठी कोकणातील वेळास येथे कासव महोत्सवही चालू करण्यात आला. तसेच त्यांच्या होस्टेलचीही सुरूवात करण्यात आली. दहा वर्षाच्या यशस्वी कामानंतर सदर मोहिम सातत्याने शाश्वत स्वरूपात चिरकाळ चालावी यासाठी ती स्थानिक लोकांच्या ताब्यात देण्यात आली. वनविभागाच्या सहकार्याने तसेच स्थानिक ग्राम पंचायतीमुळे ती यशस्वी होत आहे. 
सागरी कासव संवर्धनाचे हे काम १५ वर्षे सातत्याने चालू आहे. संपूर्ण महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर या कामातून कासवांची एक हजारहून अधिक घरटी संरक्षीत करण्यात येऊन ४५ हजार पेक्षा जास्त पिल्ले समुद्रात सोडण्यात यश आले आहे. 
कासवांच्या संवर्धनात काही तरुणांचा मोठा सहभाग आहे. कासवाचे एकही अंडे चोरीला जाऊ नये किंवा कासवांची शिकार होऊ नये, जन्माला आलेली पिले पुन्हा समुद्रात जावीत यासाठी या तरुणांनी कायम संघर्ष केला आणि जीवतोड मेहनत केली. त्याचं प्रत्यंतर आता येऊ लागलं आहे. 
त्यांच्या याच कामानिमित्त दोन कासवमित्रांना निसर्ग संवर्धन मंडळाने कासव मित्र पुरस्कारानं गौरवित करण्याचं ठरवलं आहे. 
वेळास येथील मोहन उपाध्ये व आंजर्ला येथील  अभिनय केळस्कर यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. सदर पुरस्कार पाच एप्रिल रोजी आंजर्ला येथे होणाºया एका विशेष कार्यक्र मात प्रदान करण्यात येणार आहे. रोख रु पये पाच हजार, मानपत्र व स्मृतीचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
कासवांच्या संवर्धनासाठी मोहन उपाध्येनं तर मुंबई येथील नोकरी सोडून तो वेळास मध्ये परत आला. वेळासमधील ग्रामस्थांना बरोबर घेऊन नवनवीन कल्पना अमलात आणल्या. वेळास बरोबर आजुबाजूच्या गावात कासव संरक्षण यशस्वी केले. वेळासचा कासव महोत्सव व होमस्टे या सर्व कामात त्याचा पुढाकार होता.
अभिनय केळस्करनं २००६ साली आंजर्ले येथे सह्याद्रीच्या कासव संरक्षण मोहिमेत सहभाग घेतला. कामामध्ये सातत्य दाखवुन आजुबाजूच्या गावातसुद्धा कासव संरक्षण यशस्वी केले. आंजर्ले येथे गेल्या वर्षीपासून कासव महोत्सवास सुरु वात केली. या सर्व कामात त्याने ग्रामस्थ्यांना बरोबर घेतले.
 
या सर्वच गोष्टींचा विधायक परिणाम होऊन कासवांच्या संख्येत वाढ होत आहे. 
या दोन्ही तरुणांच्या धडपडीमुळे आणखीही तरुण कासव संवर्धनाच्या कामात ओढले गेले आहेत.