शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

सागरी कासवांचे जिगरी दोस्त

By admin | Updated: April 3, 2017 18:47 IST

कासवांच्या संवर्धनासाठी नोकरीही सोडली..

सागरी कासवांचे सागरी पर्यावरणातले अनन्यसाधारण महत्त्व वेगळे सांगायला नको. मात्र संपुर्ण जगात कासवांना मारले जाते, त्यांची अंडी पळवली जातात त्यामुळे सागरी कासवे धोक्यात आली आहेत. सागरी पर्यावरणही त्यामुळे मोठ्या प्रमाणात धोक्यात आले आहे. मात्र कासवांना वाचवण्याचा वसा कोकणांत काही तरुणांनी घेतला आहे. मोहन उपाध्ये व अभिनय केळस्कर ही त्यातील आघाडीची नावं. त्यांच्या प्रयत्नांमुळे कासवांची हानी मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे आणि लोकांमध्येही जनजागृती होते आहे. त्यानिमित्त पाच एप्रिल रोजी त्यांनी ‘कासवमित्र’ पुरस्कारानं गौरविण्यात येणार आहे. 
त्यांच्या प्रयत्नांची ही कहाणी..
‘सह्याद्री निसर्ग मित्र’, चिपळूण ही संस्था 
कासवांच्या संरक्षण, संवर्धनासाठी सुमारे पंधरा वर्षांपासून काम करीत आहे. २००२-०३ साली सह्याद्री निसर्ग मित्रने वनविभागाच्या सहकार्याने काम चालू केले. आज सदर मोहिम यशस्वी होताना दिसत आहे. २००२ ते २०१३ सालापर्यंत सह्याद्रीच्या वतीने महाराष्ट्रातील ८० गावांमध्ये सदर मोहिम राबवण्यात आली. यासाठी वनविभागाचा मोलाचा पाठिंबा होता. कासवांची अंडी चोरणाºयांनाच प्रशिक्षण देऊन त्यांना संवर्धनाच्या कामात जोड्ण्यात आले, हे संस्थेचे सर्वात मोठे यश.
 
कासव संवर्धनासाठी कोकणातील वेळास येथे कासव महोत्सवही चालू करण्यात आला. तसेच त्यांच्या होस्टेलचीही सुरूवात करण्यात आली. दहा वर्षाच्या यशस्वी कामानंतर सदर मोहिम सातत्याने शाश्वत स्वरूपात चिरकाळ चालावी यासाठी ती स्थानिक लोकांच्या ताब्यात देण्यात आली. वनविभागाच्या सहकार्याने तसेच स्थानिक ग्राम पंचायतीमुळे ती यशस्वी होत आहे. 
सागरी कासव संवर्धनाचे हे काम १५ वर्षे सातत्याने चालू आहे. संपूर्ण महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर या कामातून कासवांची एक हजारहून अधिक घरटी संरक्षीत करण्यात येऊन ४५ हजार पेक्षा जास्त पिल्ले समुद्रात सोडण्यात यश आले आहे. 
कासवांच्या संवर्धनात काही तरुणांचा मोठा सहभाग आहे. कासवाचे एकही अंडे चोरीला जाऊ नये किंवा कासवांची शिकार होऊ नये, जन्माला आलेली पिले पुन्हा समुद्रात जावीत यासाठी या तरुणांनी कायम संघर्ष केला आणि जीवतोड मेहनत केली. त्याचं प्रत्यंतर आता येऊ लागलं आहे. 
त्यांच्या याच कामानिमित्त दोन कासवमित्रांना निसर्ग संवर्धन मंडळाने कासव मित्र पुरस्कारानं गौरवित करण्याचं ठरवलं आहे. 
वेळास येथील मोहन उपाध्ये व आंजर्ला येथील  अभिनय केळस्कर यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. सदर पुरस्कार पाच एप्रिल रोजी आंजर्ला येथे होणाºया एका विशेष कार्यक्र मात प्रदान करण्यात येणार आहे. रोख रु पये पाच हजार, मानपत्र व स्मृतीचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
कासवांच्या संवर्धनासाठी मोहन उपाध्येनं तर मुंबई येथील नोकरी सोडून तो वेळास मध्ये परत आला. वेळासमधील ग्रामस्थांना बरोबर घेऊन नवनवीन कल्पना अमलात आणल्या. वेळास बरोबर आजुबाजूच्या गावात कासव संरक्षण यशस्वी केले. वेळासचा कासव महोत्सव व होमस्टे या सर्व कामात त्याचा पुढाकार होता.
अभिनय केळस्करनं २००६ साली आंजर्ले येथे सह्याद्रीच्या कासव संरक्षण मोहिमेत सहभाग घेतला. कामामध्ये सातत्य दाखवुन आजुबाजूच्या गावातसुद्धा कासव संरक्षण यशस्वी केले. आंजर्ले येथे गेल्या वर्षीपासून कासव महोत्सवास सुरु वात केली. या सर्व कामात त्याने ग्रामस्थ्यांना बरोबर घेतले.
 
या सर्वच गोष्टींचा विधायक परिणाम होऊन कासवांच्या संख्येत वाढ होत आहे. 
या दोन्ही तरुणांच्या धडपडीमुळे आणखीही तरुण कासव संवर्धनाच्या कामात ओढले गेले आहेत.