शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
3
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
4
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
5
क्रिकेटच्या देवाकडून जेमी-हरमनप्रीतला शाब्बासकी! ऐतिहासिक विजय युवी, एबी आणि गंभीरलाही भावला
6
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
7
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
8
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
9
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
10
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
11
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
12
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
13
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
14
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
15
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
16
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
17
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
18
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
19
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
20
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा

सूर्याला उठवण्याचं वेड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 08:00 IST

माझ्या मनात होतं की, अशी जागा कमवायला पाहिजे, जिथं कुणी ऊठ म्हणणार नाही! त्यासाठी मी मार्ग शोधत होतो, तो मार्ग सापडला आणि मला डोंगर हाका मारू लागले!

- अंबादास गायकवाड

मला डोंगर फिरायला जायची आवड होती. मी घरच्यांनाही सोबत घेऊन जायचो. मनात काय माहिती पण वाटत राहायचं की, आपण काहीतरी जगावेगळं करू. परिस्थिती अशी की, जवळचे-नातेवाईक-मित्रही कधीकधी कमी लेखत. कधी आपण चांगलं वागूनही लोक धोका देत. हे सारं बोलायचं कुणाशी? निसर्गाशी बोलायचो. निसर्ग कधी कुणाला धोका देत नाही. मग, त्यालाच मनातल्या गोष्टी सांगायचो. कुणी अपमान केला, कुणी काही बोललं, आपण मनात काही ठरवलं की ते सांगायचो. मनात होतं की आपण मोठं झालं पाहिजे, तेही डोंगरावरच्या झाडापानांना सांगायचो. ५-६ वर्षांपूर्वी असंच डोंगरावर जाऊन बसलो, मनात आलं की अशा जागी जाऊन बसायला पाहिजे की जिथून कुणी ऊठ म्हणणार नाही. मग मी जरा पुस्तक, लेख वाचू लागलो की जे लोक मोठे होतात, नाव-यश कमावतात, ते नक्की काय करतात. तेव्हा कळलं की, हे लोक सूर्याला उठवतात. म्हणजे काय तर हे लोक पहाटे उठतात, आपलं काम करतात, अभ्यास करतात. सूर्य उगवण्यापूर्वी ते उठतात. मीही ठरवलं आपण असं सूर्याला उठवू शकतो का? मग, मी स्वत: पहाटे चार वाजता उठू लागलो. साडेचारला डोंगरावर जायचं, व्यायाम, श्वसनाचे प्रकार करायचो. सूर्य उगवताना बघायचो. ते दृश्य मला फार प्रेरणा द्यायचं. मला मनोमन पटलं होतं की, हे असं सूर्य येण्यापूर्वी उठलं तर आपली प्रगती होईल. त्यासोबत मी एक केलं की, माझ्या कम्फर्ट झोनमधून बाहेर यायचा प्रयत्न केला. जे लोक मला ओळखतात, त्यांच्यापासून ठरवून लांब होत जे लोक ओळखत नाहीत, ज्यांना मी माहिती नाही, जे यशस्वी आहेत, त्यांच्यासोबत राहू लागलो. ते अनेकदा अपमान करत, मला राग येई. माझा स्वभाव ताडकन् बोलण्याचा. मी त्याला आवर घातला. स्वत:ला पुन्हा विद्यार्थी समजून शिकू लागलो. स्वत:वर मेहनत घेणं सुरू केलं.

काही जवळचे मित्र म्हणायचे, पागल झालास का? लग्न झालं, लेकरं झाली तुला, डीप्रेशन आलंय का, कशाला नाही ते विचार करतोस?’

त्यांची काळजी चुकीची नव्हती. वडील गेले, मी महाराष्ट्र औद्योगिक महामंडळात अनुकंपा तत्त्वावर नोकरीला लागतो. शिपाई म्हणून, शिक्षण चालू ठेवलं. मग क्लार्क आणि नंतर असिस्टंटचं प्रमाेशन मिळालं. गाव सोलापूर जिल्ह्यात वळसण, मी औरंगाबादला स्थायिक झालो. सगळं तसं चांगलं चाललं होतं. पण मला काहीतरी मोठं, युनिक करायचं होतं. माझ्या डोक्यात तेच विचार होते. मी आईशी, बायकोशी बोलायचो. पण, मोठं काही दिसत नव्हतं. आई म्हणायची, हेही दिवस जातील, मोठं काहीतरी तुला दिसेल, तू फक्त हताश, निराश होऊ नकोस. प्रयत्न करणं थांबवू नकोस.

मी तेच केलं. काश्मीरमध्ये, पहलगामला जवाहर इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनेअरिंग आहे. मी त्यांच्याशी संपर्क केला. त्या संस्थेत प्रवेश घेतला. तिथं जाऊन शिकलो. तिथं मला अनेक मित्र भेटले जे म्हणाले की, तू जो विचार करतोस ते चूक नाही. ट्रेकिंगच्या क्षेत्रात तू मोठं यश कमवू शकतोस, प्रयत्न कर. मग, मला कळलं की आपण योग्य ट्रॅकवर आहोत. ट्रेकिंग क्षेत्रातल्या अनेक नामवंतांनीही मला मार्गदर्शन केलं. माझी आई, बायको, बहीण, भाऊ हे कुटुंबही सोबत होतं. त्यांचा माझ्यावर विश्वास होता. त्यानंतर मी लडाखमधलं एक मोठं शिखरही सर करून आलो. तेव्हा मनात आलं की, आपण देशासाठी काहीतरी करू.

त्यानंतर मला किलीमांजारो शिखर मोहिमेची माहिती समजली आणि मी त्याचा ध्यास घेतला. वाटलं असं उंच ठिकाणी हातात तिरंगा घेऊन जाऊ, की इतरांनाच कशाला आपल्यालाही स्वत:चा अभिमान वाटेल.

मग मी माझा व्यायाम, सराव, आहार यांचं टाइमटेबल बनवलं. आपल्या अवतीभोवती जे घडतं ते सारं सकारात्मकच आहे, असं ठरवलं. मनात निगेटिव्ह विचार आले की त्यांना बाजूला केलं. सतत आपल्याच वाटेला कमीपणा का येतो असा विचार न करता, आपण काहीतरी खास करू असं मानून चालू लागलो. घरच्यांसोबतच माझ्या डिपार्टमेण्टचे सहकारी, वरिष्ठ सोबत होते. त्यांनी मला सांभाळून घेतलं, प्रोत्साहन दिलं. मी सकारात्मक झालो तसं सारं सकारात्मक घडू लागलं; आणि म्हणता म्हणता मी किलीमांजारो मोहिमेवर गेलो.

एवढी मोठी मोहीम फत्ते करून आलो.

आता वाटतं की, या मोहिमेच्या यशाबद्दल इतरांना काय सांगू शकेन?

कष्ट, मेहनत, ट्रेकिंगचा सराव हे तर सारं आवश्यक असतंच. पण, त्याहून महत्त्वाचं हे असतं की, जेव्हा आपण नकारात्मक विचार करतो, पडती बाजू असते तेव्हा खरंतर व्यसनांपासून लांब राहायला हवं. ते महत्त्वाचं. त्याचवेळी घरचे, मित्र, मार्गदर्शक जे सांगतात, ते ऐकायचं. ते पटेलच असं नाही, पटलंच पाहिजे असंही नाही. पण, उलट उत्तर न देता, शब्दानं शब्द न वाढवता गप्प राहून ऐकायचं. भांडण करून वातावरण बिघडवून टाकायचं नाही. त्यांना आपली काळजी आहे, त्यांचं म्हणणं ऐकून त्यावर विचार करायचा.

सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जी माणसं यशस्वी होतात, ती कायम विद्यार्थी असतात, हे मला पटलं आहे. शिकत राहायचं, समजून घ्यायचं. शिकण्याचा ध्यास सोडायचा नाही. या मोहिमेच्या यशानं मलाही हेच शिकवलं आहे. यशस्वी होणं या दिशेनं जातं हे मला पटलं आहे.

(शब्दांकन - ऑक्सिजन टीम)