शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
2
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
3
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
4
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
5
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
6
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
7
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
8
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
9
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
10
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
11
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?
12
तालिबानचे नवे फर्मान! इस्लामविरोधी असल्याचे सांगत अफगाण शाळांमधून काढून टाकले ५१ विषय
13
सणासुदीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
14
Shivaji Nagar Metro: 'शिवाजीनगर मेट्रो स्टेशनचे नाव सेंट मेरी करा'; आमदाराच्या मागणीला CM सिद्धरामय्यांचा होकार
15
Navratri 2025 Dates: नवरात्रीची सुरुवात कधीपासून? घटस्थापनेचे महत्त्व, नऊ रंग आणि उत्सवाची पार्श्वभूमी जाणून घ्या
16
Milk Rate: ४ रुपयांनी स्वस्त होणारे का अमूलचं दूध? कंपनीच्या एमडींनी सांगितला संपूर्ण प्लान
17
भारताच्या 'या' राज्यात राहतात सर्वाधिक नेपाळी लोक, सरकारी सोयीसुविधांचाही घेतात लाभ!
18
"तुमची मुलगी नक्षलवादी आहे, तिचे आधारकार्ड द्या !" पोलिसांना माओवाद आणि मार्क्सवाद यातील फरक समजत नाही का?
19
विश्रांतीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार 'अँक्शन मोड'मध्ये! प्रशासनाला दिले महत्त्वाचे आदेश
20
पत्नीचं अफेअर, घराच्या छतावर चाळे करताना पतीने बॉयफ्रेंडसह पकडलं, त्यानंतर दिली ऐकून थरकाप उडेल अशी शिक्षा

सूर्याला उठवण्याचं वेड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 08:00 IST

माझ्या मनात होतं की, अशी जागा कमवायला पाहिजे, जिथं कुणी ऊठ म्हणणार नाही! त्यासाठी मी मार्ग शोधत होतो, तो मार्ग सापडला आणि मला डोंगर हाका मारू लागले!

- अंबादास गायकवाड

मला डोंगर फिरायला जायची आवड होती. मी घरच्यांनाही सोबत घेऊन जायचो. मनात काय माहिती पण वाटत राहायचं की, आपण काहीतरी जगावेगळं करू. परिस्थिती अशी की, जवळचे-नातेवाईक-मित्रही कधीकधी कमी लेखत. कधी आपण चांगलं वागूनही लोक धोका देत. हे सारं बोलायचं कुणाशी? निसर्गाशी बोलायचो. निसर्ग कधी कुणाला धोका देत नाही. मग, त्यालाच मनातल्या गोष्टी सांगायचो. कुणी अपमान केला, कुणी काही बोललं, आपण मनात काही ठरवलं की ते सांगायचो. मनात होतं की आपण मोठं झालं पाहिजे, तेही डोंगरावरच्या झाडापानांना सांगायचो. ५-६ वर्षांपूर्वी असंच डोंगरावर जाऊन बसलो, मनात आलं की अशा जागी जाऊन बसायला पाहिजे की जिथून कुणी ऊठ म्हणणार नाही. मग मी जरा पुस्तक, लेख वाचू लागलो की जे लोक मोठे होतात, नाव-यश कमावतात, ते नक्की काय करतात. तेव्हा कळलं की, हे लोक सूर्याला उठवतात. म्हणजे काय तर हे लोक पहाटे उठतात, आपलं काम करतात, अभ्यास करतात. सूर्य उगवण्यापूर्वी ते उठतात. मीही ठरवलं आपण असं सूर्याला उठवू शकतो का? मग, मी स्वत: पहाटे चार वाजता उठू लागलो. साडेचारला डोंगरावर जायचं, व्यायाम, श्वसनाचे प्रकार करायचो. सूर्य उगवताना बघायचो. ते दृश्य मला फार प्रेरणा द्यायचं. मला मनोमन पटलं होतं की, हे असं सूर्य येण्यापूर्वी उठलं तर आपली प्रगती होईल. त्यासोबत मी एक केलं की, माझ्या कम्फर्ट झोनमधून बाहेर यायचा प्रयत्न केला. जे लोक मला ओळखतात, त्यांच्यापासून ठरवून लांब होत जे लोक ओळखत नाहीत, ज्यांना मी माहिती नाही, जे यशस्वी आहेत, त्यांच्यासोबत राहू लागलो. ते अनेकदा अपमान करत, मला राग येई. माझा स्वभाव ताडकन् बोलण्याचा. मी त्याला आवर घातला. स्वत:ला पुन्हा विद्यार्थी समजून शिकू लागलो. स्वत:वर मेहनत घेणं सुरू केलं.

काही जवळचे मित्र म्हणायचे, पागल झालास का? लग्न झालं, लेकरं झाली तुला, डीप्रेशन आलंय का, कशाला नाही ते विचार करतोस?’

त्यांची काळजी चुकीची नव्हती. वडील गेले, मी महाराष्ट्र औद्योगिक महामंडळात अनुकंपा तत्त्वावर नोकरीला लागतो. शिपाई म्हणून, शिक्षण चालू ठेवलं. मग क्लार्क आणि नंतर असिस्टंटचं प्रमाेशन मिळालं. गाव सोलापूर जिल्ह्यात वळसण, मी औरंगाबादला स्थायिक झालो. सगळं तसं चांगलं चाललं होतं. पण मला काहीतरी मोठं, युनिक करायचं होतं. माझ्या डोक्यात तेच विचार होते. मी आईशी, बायकोशी बोलायचो. पण, मोठं काही दिसत नव्हतं. आई म्हणायची, हेही दिवस जातील, मोठं काहीतरी तुला दिसेल, तू फक्त हताश, निराश होऊ नकोस. प्रयत्न करणं थांबवू नकोस.

मी तेच केलं. काश्मीरमध्ये, पहलगामला जवाहर इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनेअरिंग आहे. मी त्यांच्याशी संपर्क केला. त्या संस्थेत प्रवेश घेतला. तिथं जाऊन शिकलो. तिथं मला अनेक मित्र भेटले जे म्हणाले की, तू जो विचार करतोस ते चूक नाही. ट्रेकिंगच्या क्षेत्रात तू मोठं यश कमवू शकतोस, प्रयत्न कर. मग, मला कळलं की आपण योग्य ट्रॅकवर आहोत. ट्रेकिंग क्षेत्रातल्या अनेक नामवंतांनीही मला मार्गदर्शन केलं. माझी आई, बायको, बहीण, भाऊ हे कुटुंबही सोबत होतं. त्यांचा माझ्यावर विश्वास होता. त्यानंतर मी लडाखमधलं एक मोठं शिखरही सर करून आलो. तेव्हा मनात आलं की, आपण देशासाठी काहीतरी करू.

त्यानंतर मला किलीमांजारो शिखर मोहिमेची माहिती समजली आणि मी त्याचा ध्यास घेतला. वाटलं असं उंच ठिकाणी हातात तिरंगा घेऊन जाऊ, की इतरांनाच कशाला आपल्यालाही स्वत:चा अभिमान वाटेल.

मग मी माझा व्यायाम, सराव, आहार यांचं टाइमटेबल बनवलं. आपल्या अवतीभोवती जे घडतं ते सारं सकारात्मकच आहे, असं ठरवलं. मनात निगेटिव्ह विचार आले की त्यांना बाजूला केलं. सतत आपल्याच वाटेला कमीपणा का येतो असा विचार न करता, आपण काहीतरी खास करू असं मानून चालू लागलो. घरच्यांसोबतच माझ्या डिपार्टमेण्टचे सहकारी, वरिष्ठ सोबत होते. त्यांनी मला सांभाळून घेतलं, प्रोत्साहन दिलं. मी सकारात्मक झालो तसं सारं सकारात्मक घडू लागलं; आणि म्हणता म्हणता मी किलीमांजारो मोहिमेवर गेलो.

एवढी मोठी मोहीम फत्ते करून आलो.

आता वाटतं की, या मोहिमेच्या यशाबद्दल इतरांना काय सांगू शकेन?

कष्ट, मेहनत, ट्रेकिंगचा सराव हे तर सारं आवश्यक असतंच. पण, त्याहून महत्त्वाचं हे असतं की, जेव्हा आपण नकारात्मक विचार करतो, पडती बाजू असते तेव्हा खरंतर व्यसनांपासून लांब राहायला हवं. ते महत्त्वाचं. त्याचवेळी घरचे, मित्र, मार्गदर्शक जे सांगतात, ते ऐकायचं. ते पटेलच असं नाही, पटलंच पाहिजे असंही नाही. पण, उलट उत्तर न देता, शब्दानं शब्द न वाढवता गप्प राहून ऐकायचं. भांडण करून वातावरण बिघडवून टाकायचं नाही. त्यांना आपली काळजी आहे, त्यांचं म्हणणं ऐकून त्यावर विचार करायचा.

सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जी माणसं यशस्वी होतात, ती कायम विद्यार्थी असतात, हे मला पटलं आहे. शिकत राहायचं, समजून घ्यायचं. शिकण्याचा ध्यास सोडायचा नाही. या मोहिमेच्या यशानं मलाही हेच शिकवलं आहे. यशस्वी होणं या दिशेनं जातं हे मला पटलं आहे.

(शब्दांकन - ऑक्सिजन टीम)