शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलंबियाची ४८ तासांत कोलांटी उडी! शशी थरूरनी शाळाच घेतली; पाकिस्तानच्या बाजुने केलेले वक्तव्य मागे घ्यायला लावले
2
मे महिना संपायला अन् खाद्य तेलाच्या किंमती कमी करायला...; केंद्राने आयात शुल्क निम्म्याने घटविले...
3
पीक नुकसानभरपाईच्या मदत रकमेत आता कपात; तीनऐवजी दोन हेक्टरपर्यंतच मिळणार मदत
4
'या' ४ ठिकाणी पत्नी मिळवून देऊ शकते जबरदस्त नफा; पाहा कोणत्या आहेत या स्कीम्स?
5
"हे असं अर्धवट..."; सुदेश म्हशिलकरांच्या लेखी तक्रारीवर प्राची पिसाटची आगपाखड, चांगलीच भडकली
6
आजचे राशीभविष्य: शनिवार 31 मे 2025; खर्चाचे प्रमाण वाढेल, एखाद्या स्त्रीमुळे त्रास होऊ शकतो
7
'केईएम'मध्ये पुन्हा पाणी साचायला नको, उपाययोजनांसह प्रतिज्ञापत्र सादर करा : हायकोर्ट
8
युद्धनौका, पाणबुड्यांची नावे, ठावठिकाणा वर्माने पाकला पुरवला; कोठडीत रवानगी
9
दुनिया हिला देंगे हम! MI नं 'बेबी ओव्हर'सह GT चा खेळ खल्लास करत मिळवलं क्वालिफायर २ चं तिकीट
10
राज्यात साडेएकवीस हजार शासकीय वाहने भंगारात; अपघातांसह प्रदूषणास बसेल आळा
11
गेट लॉस्ट, मि. मस्क! दुसऱ्याच्या पदच्युतीसाठी किमान चार वर्षे लागतील
12
गाळ टाकण्याच्या जागेतही हेराफेरी; लॉगशीटवर गुंदवली, माल उतरवला दिवे गावात!
13
विलीनीकरणाचा कोणताही प्रस्ताव आमच्याकडे नाही; राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खा. तटकरे यांचे स्पष्टीकरण
14
तुर्की एअरलाइन्ससोबतचा करार रद्द करा, भारत सरकारने इंडिगोला निर्देश दिले
15
मामांचे पितळ उघडे पडले! शंशाक, सुशीलला दिलेल्या शस्त्र परवान्यावर सुपेकरांची सही
16
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तान एकाकी पडला; तालिबानशी संबंध सुधारण्याची घोषणा
17
आधी कॅच घेताना गडबडला; बॅटिंग करताना Hit Wicket झाला! मग नेटकऱ्यांमध्ये रंगली मॅच 'फिक्सिंग'ची चर्चा
18
"राज्यपातळीवरुन 'गोकुळ'च्या राजकारणात हस्तक्षेप झाला नाही..."; सतेज पाटलांनी स्पष्टच सांगितलं

जात-धर्म हाच आजच्या राजकारणाचा आधार आहे, असं वाटतं का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2019 17:36 IST

राजकारणाची दिशा बदलते आहे यावर निम्म्या मुला-मुलींचा विश्वास आहे . मुली जास्त आशावादी! दोघांच्याही मनातलं कन्फ्यूजन मात्र सारखंच!

ठळक मुद्देहां कहूं के ना कहूं, ये कैसी मुश्किल हाय!

-ऑक्सिजन  टीम 

अभ्यासिका की मंदिराचा जीर्णोद्धार?दांडिया आयोजन की तरुणांसाठी वाचनालय? स्पर्धा परीक्षा सराव शिबिरं? हे असे प्रश्न घेऊन गावात तरुण मुलांच्यात होणारे वाद नवे नाहीत. गावातलं ‘राजकारणाचं’ पारडंही कधी इकडं झुकतं तर कधी तिकडे.मत देतानाही तरुण मुलं हाच विचार करतात का?एकीकडे आपल्या रोजगाराचे प्रश्न महत्त्वाचे हे त्यांना मान्यच आहे मग तरी जाती-धर्माच्या अस्मितेचे प्रश्न टोक काढतात ते का? 40 टक्के तरुण-तरुणी सांगतात की हो, जात-धर्म हाच राजकारणाचा आधार आहे असं आम्हाला वाटतं, तर हे विधान काय सांगतं? आपल्या अवतीभोवतीचं चित्र बदलत आहे असं हे तरुण सांगतात की, त्यांची तशी अपेक्षा आहे?त्याच्या अधिक खोलात जाऊन विश्लेषण करायला हवं, मात्र ही आकडेवारी सांगते ते धक्का देणारं आहेच. याबाबतीत तरुणी मात्र तरुणांपेक्षा जास्त आशावादी दिसतात. राजकारणात असलेलं जाती-धर्माचं वर्चस्व यापुढील काळात सरसकट चालू राहणार नाही असं त्यांना वाटतं. वास्तव आणि अपेक्षेचा तोल साधताना तरुणाईची कसरत होतेय, हे नक्की. समाजातल्या बदलांचा या मुलांच्या मानसिकतेवरही परिणाम होताना स्पष्ट दिसतो आहे. 

एकूण प्रतिसाद काय सांगतो?

* हो, हे खरं आहे! - 36.12 %* नाही, परिस्थिती बदलते आहे -  48.42 %* नक्की सांगता येणार नाही -  13.30% * यापैकी नाही -  2.06% एकूण सहभागींपैकी 2.16 %   तरुण-तरुणींनी या प्रश्नाचे उत्तर दिलेलं नाही.

मुली म्हणतात

* हो, हे खरं आहे!- 30.82 % * नाही, परिस्थिती बदलते आहे -  54.87% * नक्की सांगता येणार नाही- 13.45 %

 देशातल्या राजकारणाची प्रत बदलत असल्याचा आशावाद मुलींमध्ये अधिक दिसतो. परिस्थिती बदलते आहे, असा विश्वास व्यक्त करणार्‍या मुलींची संख्या मुलांपेक्षा तब्बल 13 टक्के जास्त आहे; पण हेही खरं, की ‘नक्की सांगता येणार नाही’ असा गोंधळही मुलींच्याच मनात अधिक दिसतो.  मुलगे म्हणतात 

* हो, हे खरे आहे! -  41.45 %* नाही, परिस्थिती बदलते आहे -  41.93% * नक्की सांगता येणार नाही _ 13.14 %तब्बल 4.8 टक्के तरुणांनी या प्रश्नाचे उत्तर देणंच टाळलेलं आहे.

जात-धर्म हाच आजच्या राजकारणाचा आधार आहे की परिस्थिती बदलू लागली आहे; यावरून मुलांचे सरळ सरळ दोन गट पडलेले दिसतात. 

2009 -  ओन्ली फॉर अ‍ॅडल्ट्स : दहा वर्षात नेमकं काय बदललं?

दुर्दैव असं, की काहीच बदललं नाही!

*जात-धर्माचं राजकारण या देशात होतंच असं सांगणारे तरुण तेव्हाही सांगत होते की यापुढे विकासाचे प्रश्न महत्त्वाचे होतील आणि जात-धर्मावरून मत देणं कमी होईल. * तेव्हा तर सव्र्हेत सहभागी 36 टक्के तरुण सांगत होते की या देशात जाती-धर्माचं राजकारण यशस्वीच होणार नाही. * जात किंवा धर्माला व्होट बॅँक म्हणून गृहीत धरणं बंद करा, विकासाचं बोला असंच दहा वर्षापूर्वीचा तो सव्र्र्हेही सांगत होता.