शहरं
Join us  
Trending Stories
1
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
2
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
3
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
4
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
5
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
6
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
7
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
8
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
9
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
10
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
11
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
12
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
13
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
14
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
15
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
16
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
17
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
18
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
19
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
20
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...

जात-धर्म हाच आजच्या राजकारणाचा आधार आहे, असं वाटतं का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2019 17:36 IST

राजकारणाची दिशा बदलते आहे यावर निम्म्या मुला-मुलींचा विश्वास आहे . मुली जास्त आशावादी! दोघांच्याही मनातलं कन्फ्यूजन मात्र सारखंच!

ठळक मुद्देहां कहूं के ना कहूं, ये कैसी मुश्किल हाय!

-ऑक्सिजन  टीम 

अभ्यासिका की मंदिराचा जीर्णोद्धार?दांडिया आयोजन की तरुणांसाठी वाचनालय? स्पर्धा परीक्षा सराव शिबिरं? हे असे प्रश्न घेऊन गावात तरुण मुलांच्यात होणारे वाद नवे नाहीत. गावातलं ‘राजकारणाचं’ पारडंही कधी इकडं झुकतं तर कधी तिकडे.मत देतानाही तरुण मुलं हाच विचार करतात का?एकीकडे आपल्या रोजगाराचे प्रश्न महत्त्वाचे हे त्यांना मान्यच आहे मग तरी जाती-धर्माच्या अस्मितेचे प्रश्न टोक काढतात ते का? 40 टक्के तरुण-तरुणी सांगतात की हो, जात-धर्म हाच राजकारणाचा आधार आहे असं आम्हाला वाटतं, तर हे विधान काय सांगतं? आपल्या अवतीभोवतीचं चित्र बदलत आहे असं हे तरुण सांगतात की, त्यांची तशी अपेक्षा आहे?त्याच्या अधिक खोलात जाऊन विश्लेषण करायला हवं, मात्र ही आकडेवारी सांगते ते धक्का देणारं आहेच. याबाबतीत तरुणी मात्र तरुणांपेक्षा जास्त आशावादी दिसतात. राजकारणात असलेलं जाती-धर्माचं वर्चस्व यापुढील काळात सरसकट चालू राहणार नाही असं त्यांना वाटतं. वास्तव आणि अपेक्षेचा तोल साधताना तरुणाईची कसरत होतेय, हे नक्की. समाजातल्या बदलांचा या मुलांच्या मानसिकतेवरही परिणाम होताना स्पष्ट दिसतो आहे. 

एकूण प्रतिसाद काय सांगतो?

* हो, हे खरं आहे! - 36.12 %* नाही, परिस्थिती बदलते आहे -  48.42 %* नक्की सांगता येणार नाही -  13.30% * यापैकी नाही -  2.06% एकूण सहभागींपैकी 2.16 %   तरुण-तरुणींनी या प्रश्नाचे उत्तर दिलेलं नाही.

मुली म्हणतात

* हो, हे खरं आहे!- 30.82 % * नाही, परिस्थिती बदलते आहे -  54.87% * नक्की सांगता येणार नाही- 13.45 %

 देशातल्या राजकारणाची प्रत बदलत असल्याचा आशावाद मुलींमध्ये अधिक दिसतो. परिस्थिती बदलते आहे, असा विश्वास व्यक्त करणार्‍या मुलींची संख्या मुलांपेक्षा तब्बल 13 टक्के जास्त आहे; पण हेही खरं, की ‘नक्की सांगता येणार नाही’ असा गोंधळही मुलींच्याच मनात अधिक दिसतो.  मुलगे म्हणतात 

* हो, हे खरे आहे! -  41.45 %* नाही, परिस्थिती बदलते आहे -  41.93% * नक्की सांगता येणार नाही _ 13.14 %तब्बल 4.8 टक्के तरुणांनी या प्रश्नाचे उत्तर देणंच टाळलेलं आहे.

जात-धर्म हाच आजच्या राजकारणाचा आधार आहे की परिस्थिती बदलू लागली आहे; यावरून मुलांचे सरळ सरळ दोन गट पडलेले दिसतात. 

2009 -  ओन्ली फॉर अ‍ॅडल्ट्स : दहा वर्षात नेमकं काय बदललं?

दुर्दैव असं, की काहीच बदललं नाही!

*जात-धर्माचं राजकारण या देशात होतंच असं सांगणारे तरुण तेव्हाही सांगत होते की यापुढे विकासाचे प्रश्न महत्त्वाचे होतील आणि जात-धर्मावरून मत देणं कमी होईल. * तेव्हा तर सव्र्हेत सहभागी 36 टक्के तरुण सांगत होते की या देशात जाती-धर्माचं राजकारण यशस्वीच होणार नाही. * जात किंवा धर्माला व्होट बॅँक म्हणून गृहीत धरणं बंद करा, विकासाचं बोला असंच दहा वर्षापूर्वीचा तो सव्र्र्हेही सांगत होता.