शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

लॉकडाउन? त्यात सीमकार्ड बिघडलं तर.?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2020 16:04 IST

सीम कार्ड एरर देतंय? मग उपाय म्हणून ते एका फोनमधून दुसऱ्या  फोनमध्ये टाकू नका. अजून बिघडेल.

ठळक मुद्देअनेक मुलं सिम बदल करकरून फोन वापरतात, ते याकाळात टाळणंच उत्तम.

-निशांत महाजन

नुसती कल्पना करून पहा.हे लॉकडाउन सुरूच आहे आणि तुमचं सिमकार्ड खराब झालं. फोन बंद. डेटा पॅक बंद. बाहेर दुकानं बंद.आणि आता आपला जगाशी काही संपर्कच नाही.कल्पनेनेही घाम फुटतो आणि म्हणावंसं वाटतं की, जरा शुभ शुभ बोला. कशाला वंगाळ बोलता.पण तरी असं झालं तर.म्हणजे फोन तर एकदम डबाच होऊन जाईल.कितीही महागडा असला स्मार्टफोन; पण त्यात सिमकार्ड नसेल तर खेळ खल्लासच. असं कुणाच्या वाटय़ाला काही येऊ नये, सगळ्यांचे फोन चालूदेत, कार्ड चालूदेत.पण वेळ काही सांगून नाही येत, त्यामुळे समजा कार्डला काही प्रॉब्लेम झालाय, की फोनला,की आपलं सिम खराब झालं आहे हे जरा तपासून पाहून वेळीच कामाला लागलेलं बरं.आणि आताचं लॉकडाउन पाहता कार्डची काळजी घेतलेलेही बरी. सिम म्हणजे काय तर सबस्क्रायबर आयडेण्टीटी मॉडेल. ही एक पोर्टेबल मेमरी चीप असते.ते सिमकार्ड हीच आपली ओळख. अनेक देशात तर सिमकार्ड असेल तर ते पाहून लोकांना आता लॉकडाउनच्या काळात काही सवलतीही मिळत आहेत.त्यामुळे आपलं हे सिम महत्त्वाचं.त्याची काळजी कशी घ्यायची हे पाहू.1) म्हणजे आपल्या सिमकार्डची सतत काढ घाल करू नका. कधी या फोनमध्ये कधी त्या फोनमध्ये असं करू नका.2) शक्यतो सिमकार्डला हात लावू नये, त्याचा खेळ करू नये.3) आपल्या फोनचं एकदम अनेकदा नेटवर्क जातं आणि ‘इनसर्ट सिम’ किंवा ‘नो सिम.’ असा मेसेज येतो. तसा मेसेज आला की अनेकजण चार फोनमध्ये आपलं कार्ड टाकून तिथं तरी ते चालतंय का हे बघतात.तसं करू नका. कार्ड काही खराब झालंय का बघा, तरीही एरर आली तर ते फोनमध्ये घालू नका.4) काहीजण स्वत: तज्ज्ञ असतात, ते मित्रंना सांगतात अरे उन्हाळा आहे सिमने माइश्चर धरलं असेल. तर अनेकदा सिम पुसून काढलं मऊ फडक्याने तर ते काम करायला लागतं, असा अनेकांचा अनुभवही आहे. तसं करून पहायला हरकत नाही.पण हा काही त्यावरचा उपाय नाही. मोबाइल कंपनीशी संपर्क करून नवीन सिमकार्ड मागणंच अशावेळी योग्य.  आपण आपला स्मार्टफोन रिस्टार्ट करतो आणि मोबाइल नेटवर्क पकडायला लागतो.5) सिम आणि फोन ही जपून वापरायची गोष्ट आहे, त्याला चिकट हात न लावणो, काळजी घेणो उत्तम. याकाळात तर शक्यतो दुस:याच्या मोबाइललाही हात लावू नये, लावल्यास हात धुणं उत्तम. सिमपेक्षा जास्त काळजी स्वत:ची घ्या.6) अनेक मुलं सिम बदल करकरून फोन वापरतात, ते याकाळात टाळणंच उत्तम.