शहरं
Join us  
Trending Stories
1
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
2
डोंबिवलीचे आमदार झाले भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष! कल्याण डोंबिवलीत यंदा महापौर कोणाचा?
3
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
4
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
5
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
6
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
7
तो टीम इंडियाचा प्रॉब्लेम!; दुसऱ्या टेस्टआधी बेन स्टोक्सनं पंतसंदर्भातही केलं मोठं वक्तव्य
8
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
9
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
10
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
11
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
12
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
13
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान
14
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
15
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
16
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी
17
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार
18
Paetongtarn Shinawatra: कोण आहे 'ती' व्यक्ती; जिच्याशी फोन कॉल 'लीक' झाल्याने गेलं शिनावात्रा यांचं पंतप्रधानपद
19
“नाना पटोलेंना चर्चेत येण्यासाठी PM मोदी यांच्या नावाचा आधार लागतोय”; एकनाथ शिंदेंचा टोला
20
५०-१०० नव्हे, पाकिस्तानच्या तुरुंगात तब्बल 'इतके' भारतीय कैद! पहिल्यांदाच झाला मोठा खुलासा

काऊन रे पोट्टया?- वाचा नागपुरी प्रेमाची रसिक गोष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2020 17:25 IST

जे सहज असतं, त्याले अवघड करून थ्रिलिंग मोडमध्ये होत्याचं नव्हतं करून टाकणं किंवा त्याच गोंधळात नव्हत्याच होतं करून टाकणं हा नागपुरी प्रेमाचा ठसका आहे!

ठळक मुद्देआपल्या निरागस वृत्तीने नागपूरकर त्या सगळ्यांना सामावूनही घेतात.  आपला नागपूरी ठसका सोडत नाहीत.

प्रवीण खापरे

मंगेश पाडगावकर म्हणतात ‘प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम असतं’ अन् नागपूरी प्रेमी बापडय़ा म्हणतो ‘काई बी नगं सांगू.. आमचं प्रेम म्हंजी, दूधाचं दही होतं. आनं त्याले फोडणी-सोडणी घालून मठ्ठयावानी असतं. नाई तं, सरसरीत तडका मारून कढीवानी असतं बापू!’यातच नागपूरी प्रेमाचा अ‍ॅक्शनपॅक्ड धमाका लक्षात येतो. जे सहज असतं, त्याले अवघड करून थ्रिलिंग मोडमध्ये होत्याचं नव्हतं करून टाकणं किंवा त्याच गोंधळात नव्हत्याच होतं करून टाकणं म्हणजे नागपूरी प्रेमाचा ठसका होय! हे सांगण जरा विचित्न असेल मात्न ‘जे हाय ते हाय आन जे नाई ते नाई’. इथं प्रेम करावं लागतच नाही, ते होऊन जातं. म्हणजे ‘मले बी एक सखी-साजनी पाईजे नं बापू’ किंवा ‘मले बी एक माया दिलाचा साजण पाईजे न बये’ अशाप्रकारचं.‘तुले जेव्हा बी पायतो, तेव्हा माया दिलाची स्पिड बुलेट ट्रेनवानी होते वं. चाल चाय पिऊ’. हे अशा प्रकारचे डायलॉग सेन्सॉरशिपच्या गराड्यातही इथे शहरानिजकच्या खेड्यात आणि शहरातही अधामधात कानावर पडतात. हो इथे प्रेमाला सेन्सॉरशिप आहेच! प्रेम हे बेमालून होत असलं तरी इथं मालूमपणाने प्रेम करणं म्हणजे मोठ्ठं आकांडतांडव करावं लागतं. सगळेच ओळखीचे असतात नं हो. घरातून निघालेली बापडी किंवा बापडा पंक्चरवाला, सलूनवाला, टपरीवाल्याच्या रडारवर असतात. एवढंच कशाला, ऑटोवालेही ‘काऊन वं पोट्टे / काऊन रे पोट्टया’ असं विचारतातच की! त्याला कारण म्हणजे, ती बापडी आणि तो बापडा, यांच्यातील जोरदार संवादाचे गवाईदारच असतात हे लोक.़ एखादवेळी तो बापडा दुसया एखाद्या मैत्नीणीशी बोलताना दिसला तर या बापडीचा तिळपापडच होतो. ‘तू तियाशी काऊनच बोल्ला. मले भेटाले होत नाई आन तियाशी गुटूरगुटूर करु न रायला’ असा तिचा संताप असतो. त्यावर तो ‘तू नं शकीलीच हायेस. तुयीच मैतरीन ते थे मंग कायल भूनभून करतेस वं. जाऊ दे मले नाई बोलाचं तुयाशी’ अशा त्याच्या तडक वाक्यावर ती नरमते.ही सगळी कथा त्या गवाईदारांपुढेच तर घडत असते. आता म्हणाल, एवढ्या मोठ्या शहरात एवढ्या चौकशा कोण करतो? पण इथे आजही अशा चौकशा केल्या जातात. त्याने पोलीसांचं कामही सोपं होतं.म्हणजे, एखादी पोरगी गेली कुणासोबत पळून! पोरगीच कशाला? पोरही पळून जातात लेकाचे!  तर हे सुत्नरूपाने तैनात असणारे रडार पोलीसांना सगळंच सांगून टाकतात. आणि हा सारा ड्रामा येथे राजरोस बघता येतो. शेवटी सगळंच निभाऊन नेलं जातं. याच सेन्सॉरशिपपासून मार्ग काढत काही पोरासोरांनी शहरातल्या बागा फुलवल्या आणि  त्याला सिनेमांनीही धक्का दिला. सिनेमाचे असे एकेक डायलॉग त्या बागांत कानावर पडतात, की ऐकणारा ऐकतच राहतो. सेमिनरी हिल्सवर असलेलं  जपानी गार्डन, बालोद्यानमध्ये स्पर्धा लागल्यागत बसलेले कपल्स. ‘तू साथ देशील तर मी जगातला सर्वात श्रीमंत असेल’ अशा तहेचे प्रपोजलही ऐकू येतात. ‘ तिकडे जवळच असलेल्या बॉटनिकल गार्डनमध्ये वनस्पती शास्त्न जरा जास्तच विकसित झाले. मात्र तिथं गर्दी वाढली आणि ते ही बंद झालं. जरा खाली उतरलं की तेलंगखेडी बाग आहेच. या ऐतिहासिक बागेत जरा वातावरण मोकळंढाकळं असतं. पुढे अंबाझरी गार्डन. तलावाच्या काठावर इथं बरेच जण इतरांच्या नजरेस येतात.हे असे असले तरी ‘कटती मेरी शाम फुटाळा किनारे’ म्हणावसं वाटणारी फुटाळा चौपाटी आहेच. हा तलाव अनेक प्रेमीयुगुलांनी खुललेला असतो. नजिक असणार्‍या सेमिनरी हिल्सच्या हिरवळीसोबतच तरु ण-तरु णीच्या भेटी रंगतात.  हे असं चालूच राहतंय इथं. नागपुरात ऊन, पाऊस आणि गारठा हे तीनही ऋतू सारख्याच तिव्रतेचे. उन्हाळ्यात ऊन नको असते, पावसाळ्यात पाऊस आणि हिवाळ्यात गारठा नकोसाच वाटतो. मात्न, या ऋतूंचा अतिरेक येथील जनमाणसातही सारखाच रूजला असल्याने, तारूण्यात हा अतिरेक व्हायचाच.नागपूर हे देशाचे केंद्रबिंदू. रेल्वेचे मध्यवर्ती स्थानक इथेच असल्याने, देशभरातून येणाया गाड्या इथेच थांबतात. त्यामुळे, इथे बहुभाषिक प्रेमही त्या त्या शैलीत बघता येतात. कुणी दक्षिणेतून पळून येतात, कुणी उत्तरेतून, कुणी पश्चिमेकडून तर कुणी पूर्वेकडून. आपल्या निरागस वृत्तीने नागपूरकर त्या सगळ्यांना सामावूनही घेतात.  आपला नागपूरी ठसका सोडत नाहीत. यहाँ का पानीच ऐसा है की सब रंग घुल जाते है.