शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
3
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
4
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
5
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
6
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
7
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
8
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
9
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
10
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
11
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
12
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
13
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
14
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
15
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
16
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
17
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
18
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
19
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
20
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल

इंजिनिअर पोरांची न गेलेली ट्रिप!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2019 16:15 IST

इंजिनिअर पोरांच्या जगात कोण कसली मिसाल बनेल काय सांगता येत नाही, त्यात शेवटचं वर्ष म्हणजे तर काय? काय तेच तर कळत नाही !

- संकेत थोरात

.तर मी आज तुम्हाला एक ष्टोरी सांगणार आहे. हवं तर गोष्टच म्हणा ना. तर ही सगळी कथा इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षात येऊन ठेपलेल्या एका क्लासच्या परिघाभोवती गरगर फिरत राहते.मुळात याला क्लास का म्हणावं (?) असा प्रश्नही तुम्हाला या ष्टोरीच्या शेवटाला पडेल अशी माझी लैच ठाम खात्नी आहे. परंतु असे असले तरी लौकिकार्थाने का होईना; हा एक क्लासच आहे, या मुद्दय़ावर आपण थोडावेळ का होईना रीतसरपणे ठाम होऊया. तर असा हा क्लास एकाच वेळी विविध प्रकारच्या नमुन्यांनी खच्चून भरलेला आणि भारलेला आहे. त्याला रिजनल टचसुद्धा आहे, बरं का. सबब त्याच्याबद्दल बोलताना ‘वो अपने आप में ही एक कसनुशी मिसाल है’, असं काहीसं बरळलं तर वावगं ठरणार नाही.

तर महाराष्ट्राच्या दुष्काळी भागाचा केंद्रबिंदू म्हणजे मराठवाडा. त्या मराठवाडय़ात उद्योगाची पायाभरणी व्हावी किंबहुना त्यासाठी लागणारं कुशल मनुष्यबळ इथल्याच मातीत तयार व्हावं म्हणून एकोणीसशेच्या कितव्या तरी साली औरंगाबादेत शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाची मुहूर्तमेढ रोवली गेली. आजर्पयत महाविद्यालयाने अनेक अभियंत्यांच्या अनेक पिढय़ा घडवल्या आहेत. आजही पीडब्लूडी किंवा एमेसीबीतून एखादी बॅच रिटायर व्हायला आली तर त्यात निम्म्याहून अधिक अभियंते याच कॉलेजचे माजी विद्यार्थी निघतील. अर्थात त्यात अभिमान वाटावा असं फारसं काही राहिलं नाही. एकूणच जगात होणार्‍या बदलांचा वेग पाहता सरकारी नोकर्‍यांचाही काही भरवसा नाही. अन्यथा बीएसएनएल कर्मचार्‍यांचे कितेक महिन्यांचे तुंबलेले पगार हे कशाचे द्योतक म्हणायचे?असो.तर अशा या सरकारी महाविद्यालयात कुठल्याशा तरी ब्रँचच्या शेवटच्या वर्षात असलेला क्लास त्याचं शेवटचं महाविद्यालयीन वर्ष एन्जॉय करतो आहे. ज्याला मी इथे शेवटचं वर्ष म्हणत आहे, तेच मुळात संपत आलेलं आहे. जेमतेम एक महिना राहिला असेल फक्त. एकदा का परीक्षा होऊन सुटय़ा लागल्या की, सब खतम.मग कोण आयुष्यभरासाठी 9 ते 5 घासत बसणार? कुणी एमबीएला जाऊन कॉलेज लाईफचा राहता राहिला आस्वाद एकदाचा घेऊन टाकणार. कुणी त्यातही जीआरई देऊन परदेशात एमएस करायला जाणार. तसा हा प्राणी विरळाच म्हणायचा! इथे दुष्काळ मराठवाडय़ाच्या पाचवीला पूजला असताना कोण असल्या जीआरईसदृश कर्जाऊ उचापत्या करणार, म्हणा ! ते काहीही असो, ज्यांना वरचं काही जमलं नाही ते हमखास गेट, एमपीएससी किंवा तत्सम स्पर्धा परीक्षारूपी मंदिराच्या गरगर प्रदक्षिणा घालणार यात शंकाच नाही.

तर अशा अधांतरी भविष्यामुळे भावी इआर लोकांच्या कॉलेज लाइफच्या शेवटाचा इस्कोट होत असताना पाहून क्लासच्या वर्गप्रतिनिधीला अचानक ट्रीप काढण्याचा चेव येतो. ( इआर म्हणजे काय? डीआरची नक्कल आहे. डॉक्टर लोक्स स्वतर्‍च्या नावाआधी डीआर लावतात, हे जगजाहीरच आहे. मग आम्ही इंजिनिअर लोक्सही त्यांच्यापेक्षा काही कमी नाही हे दाखवायचा एक बारकूला प्रयत्न म्हणजे नावाआधी इआर लावणं. तर लावू द्या!)  वर्गप्रतिनिधीला वाटतंच की, अत्यंत एकजुटीनं यंदा क्लासची ट्रीप घेऊन जायचीच. मग अशा आणाभाका व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर घेतल्या जातात. स्टाफच्या परमिशन्स मिळवल्या जातात. लोकेशन्स सेट केली जातात. भावी खर्चाचे एस्टीमेट्सही काढले जातात. पण कुठेतरी माश्या शिंकल्यामुळे ट्रीपचा टोटल फियास्को होऊन जातो. एव्हाना माश्यांनी मैदान मारलेलं असतं. आणि पुन्हा एकदा शेवटाची कडू सुरुवात झालेली असते. ट्रीपचं काय? कधीही काढता येईल; पण कडू शेवटाचं काय करायचं?काही प्रश्नांची उत्तरं न मिळालेलीच बरी असतात, मित्ना.  लेट इट बी गो. म्हणा त्यांना निदान कल्टी तरी मारता येते.आणि इआर लोकांचं हे असं चक्र सुरूच राहतं.