शहरं
Join us  
Trending Stories
1
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
2
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
3
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
4
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
5
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
6
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
7
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
9
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
10
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
11
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
12
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
13
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
14
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
15
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
16
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
17
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
18
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
19
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...

इंजिनिअर पोरांची न गेलेली ट्रिप!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2019 16:15 IST

इंजिनिअर पोरांच्या जगात कोण कसली मिसाल बनेल काय सांगता येत नाही, त्यात शेवटचं वर्ष म्हणजे तर काय? काय तेच तर कळत नाही !

- संकेत थोरात

.तर मी आज तुम्हाला एक ष्टोरी सांगणार आहे. हवं तर गोष्टच म्हणा ना. तर ही सगळी कथा इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षात येऊन ठेपलेल्या एका क्लासच्या परिघाभोवती गरगर फिरत राहते.मुळात याला क्लास का म्हणावं (?) असा प्रश्नही तुम्हाला या ष्टोरीच्या शेवटाला पडेल अशी माझी लैच ठाम खात्नी आहे. परंतु असे असले तरी लौकिकार्थाने का होईना; हा एक क्लासच आहे, या मुद्दय़ावर आपण थोडावेळ का होईना रीतसरपणे ठाम होऊया. तर असा हा क्लास एकाच वेळी विविध प्रकारच्या नमुन्यांनी खच्चून भरलेला आणि भारलेला आहे. त्याला रिजनल टचसुद्धा आहे, बरं का. सबब त्याच्याबद्दल बोलताना ‘वो अपने आप में ही एक कसनुशी मिसाल है’, असं काहीसं बरळलं तर वावगं ठरणार नाही.

तर महाराष्ट्राच्या दुष्काळी भागाचा केंद्रबिंदू म्हणजे मराठवाडा. त्या मराठवाडय़ात उद्योगाची पायाभरणी व्हावी किंबहुना त्यासाठी लागणारं कुशल मनुष्यबळ इथल्याच मातीत तयार व्हावं म्हणून एकोणीसशेच्या कितव्या तरी साली औरंगाबादेत शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाची मुहूर्तमेढ रोवली गेली. आजर्पयत महाविद्यालयाने अनेक अभियंत्यांच्या अनेक पिढय़ा घडवल्या आहेत. आजही पीडब्लूडी किंवा एमेसीबीतून एखादी बॅच रिटायर व्हायला आली तर त्यात निम्म्याहून अधिक अभियंते याच कॉलेजचे माजी विद्यार्थी निघतील. अर्थात त्यात अभिमान वाटावा असं फारसं काही राहिलं नाही. एकूणच जगात होणार्‍या बदलांचा वेग पाहता सरकारी नोकर्‍यांचाही काही भरवसा नाही. अन्यथा बीएसएनएल कर्मचार्‍यांचे कितेक महिन्यांचे तुंबलेले पगार हे कशाचे द्योतक म्हणायचे?असो.तर अशा या सरकारी महाविद्यालयात कुठल्याशा तरी ब्रँचच्या शेवटच्या वर्षात असलेला क्लास त्याचं शेवटचं महाविद्यालयीन वर्ष एन्जॉय करतो आहे. ज्याला मी इथे शेवटचं वर्ष म्हणत आहे, तेच मुळात संपत आलेलं आहे. जेमतेम एक महिना राहिला असेल फक्त. एकदा का परीक्षा होऊन सुटय़ा लागल्या की, सब खतम.मग कोण आयुष्यभरासाठी 9 ते 5 घासत बसणार? कुणी एमबीएला जाऊन कॉलेज लाईफचा राहता राहिला आस्वाद एकदाचा घेऊन टाकणार. कुणी त्यातही जीआरई देऊन परदेशात एमएस करायला जाणार. तसा हा प्राणी विरळाच म्हणायचा! इथे दुष्काळ मराठवाडय़ाच्या पाचवीला पूजला असताना कोण असल्या जीआरईसदृश कर्जाऊ उचापत्या करणार, म्हणा ! ते काहीही असो, ज्यांना वरचं काही जमलं नाही ते हमखास गेट, एमपीएससी किंवा तत्सम स्पर्धा परीक्षारूपी मंदिराच्या गरगर प्रदक्षिणा घालणार यात शंकाच नाही.

तर अशा अधांतरी भविष्यामुळे भावी इआर लोकांच्या कॉलेज लाइफच्या शेवटाचा इस्कोट होत असताना पाहून क्लासच्या वर्गप्रतिनिधीला अचानक ट्रीप काढण्याचा चेव येतो. ( इआर म्हणजे काय? डीआरची नक्कल आहे. डॉक्टर लोक्स स्वतर्‍च्या नावाआधी डीआर लावतात, हे जगजाहीरच आहे. मग आम्ही इंजिनिअर लोक्सही त्यांच्यापेक्षा काही कमी नाही हे दाखवायचा एक बारकूला प्रयत्न म्हणजे नावाआधी इआर लावणं. तर लावू द्या!)  वर्गप्रतिनिधीला वाटतंच की, अत्यंत एकजुटीनं यंदा क्लासची ट्रीप घेऊन जायचीच. मग अशा आणाभाका व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर घेतल्या जातात. स्टाफच्या परमिशन्स मिळवल्या जातात. लोकेशन्स सेट केली जातात. भावी खर्चाचे एस्टीमेट्सही काढले जातात. पण कुठेतरी माश्या शिंकल्यामुळे ट्रीपचा टोटल फियास्को होऊन जातो. एव्हाना माश्यांनी मैदान मारलेलं असतं. आणि पुन्हा एकदा शेवटाची कडू सुरुवात झालेली असते. ट्रीपचं काय? कधीही काढता येईल; पण कडू शेवटाचं काय करायचं?काही प्रश्नांची उत्तरं न मिळालेलीच बरी असतात, मित्ना.  लेट इट बी गो. म्हणा त्यांना निदान कल्टी तरी मारता येते.आणि इआर लोकांचं हे असं चक्र सुरूच राहतं.