शहरं
Join us  
Trending Stories
1
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
2
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
3
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
4
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
5
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
6
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
7
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
8
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
9
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
10
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
11
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
12
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
13
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
14
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
15
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
16
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
17
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
18
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
19
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
Daily Top 2Weekly Top 5

गणपतीच्या डेकोरेशनला सुटी, तरुण कार्यकर्त्यांचा पूरग्रस्तांना मदतीचा हात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2019 15:20 IST

गणपती मंडळाचे तरुण कार्यकर्ते म्हणजे नुस्ता कल्ला! वर्गणीसाठी फाटणार्‍या पावत्या आणि डेकोरेशनची धावपळ. यंदा कोल्हापुरात मात्र तरुण कार्यकर्त्यांनी स्वयंस्फूर्तीनं या सार्‍याला फाटा दिला आहे.

ठळक मुद्देडेकोरेशन, मिरवणुका, डीजे हे सारं बाद करून पूरग्रस्तांची घरं उभी राहावीत म्हणून आता हे हात राबणार आहेत !

इंदूमती गणेश 

गणपतीच्या डेकोरेशनची चर्चाच नाही तर फायनल तयारी करण्याचे हे कोल्हापुरातले दिवस. आपलं सगळ्यात भारी झालं पाहिजे म्हणत झपाटल्यासारखं काम करणारी पोरं. उद्यमनगर, राजारामपुरी, शाहूपुरीचे तांत्रिक देखावे, मंगळवार पेठ, बुधवार पेठ, कसबा बावडय़ातील सजीव देखावे, लक्ष्मीपुरी म्हणजे विद्युत रोषणाई, काल्पनिक मंदिरे, शिवाजी चौक तरुण मंडळाचा 21 फुटी मानाचा महागणपती, शतकोत्तर परंपरा असलेली गणेश मंडळे, तालीम संस्था, घरगुती गौरी-गणपतीची  सुरेख देखाव्यांची सजावट. असा नुसता माहौल. घरगुती डेकोरेशनलाही लाखभर रुपये खर्च झाले तरी हरकत नाही असं म्हणत झटणारं इथलं पब्लिक.त्यात गणेश विसर्जन मिरवणुका म्हणजे तर स्वतंत्न विषय. स्वातंत्र्य दिनाच्या संचलनातील महाराष्ट्राच्या देखाव्याची प्रतिकृती, कुणाकडे केरळच्या लोककलाकारांचे आकर्षण तर कुणी कोकणच्या दशावतार ग्रुपला दिलेले निमंत्नण, वेगवेगळ्या राज्यांतील कलावंतांचे सादरीकरण. मुंबई-पुण्याच्या ढोलपथकांचे वादन किंवा धनगरी ढोल. डोळे दीपवणारे लेझर शो. तीस तीस तास चालणारी गणेश विसर्जन मिरवणूक. त्यासाठी तरुण कार्यकत्र्याना दिल्या जाणार्‍या रुमालापासून कपडय़ांर्पयतची वेगळेपण जपणारी मंडळे. तरुण मुली आणि महिलांचा उत्स्फूर्त सहभाग, लेझीमपासून मर्दानी खेळांर्पयत सगळ्यात त्याही पुढं.यंदा मात्र हा असा माहौल नाही.कोल्हापूरच्या गणेशोत्सवाची खास बात असते. सांस्कृतिक वारसा, परंपरेची कास धरून नव्याचा स्वीकार. राजर्षी शाहूंची पुण्याई अभिमानाने मिरवताना त्यांच्या विचारांचा वसा कृतीतून जपणारे रांगडे कोल्हापूरकर. पण यंदा मात्र सार्‍याचीच रया गेली आहे. कधीही न पुसणारा ओरखडा ओढला यंदा महापुरानं. तो महापूर आता ओसरला आहे; पण मागे राहिलेल्या लाखो नागरिकांच्या डोळ्यात अश्रूंचा महापूर मात्र आजही कायम आहे. डोळ्यादेखत घर-संसार, लेकराप्रमाणे सांभाळलेली गुरं-ढोरं, सोन्यासारखी शेती वाहून कुजून गेली. ते सारं पाहवत नाही.पण आता पडल्या घरात विस्कटलेल्या संसाराची घडी पुन्हा बसवण्यासाठी त्यांच्या मदतीला उभी राहिली आहेत गणेश मंडळं. उत्सवासाठी गेल्या महिन्याभरापासून मंडळांची तयारी सुरू होती. देखावा, मिरवणुकांचेही नियोजन झालं होतं. देखावेही तयार होत होते; मात्न या आपत्तीनंतर जवळपास सर्वच मंडळांनी गणेशोत्सवाचे नियोजन रद्द केलं आहे. कोल्हापूर शहरातील सर्व गणेश मंडळांनी यंदा गणेशोत्सवाचा सगळा डामडौल, देखावे, रोषणाई, मोठय़ाने निघणार्‍या मिरवणुका, सजावटी, ईष्र्येने केलं जाणारं वेगळेपण हे सगळं प्लॅनिंग रद्द करून अत्यंत साध्या पद्धतीने हा सण साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. सगळे हेवेदावे, गट-तट विसरून जवळपास दोनशे मंडळांनी एकत्न बैठक घेऊन हा ठराव केला आहे.पुरामुळे गणेशोत्सवातील सगळे कार्यक्रम आम्ही रद्द केले आहेत. मांडव उभारून केवळ श्रींच्या मूर्तीची प्रतिष्ठापना आणि पूजाविधी केले जातील. मंडळाच्या वतीने कधीच वर्गणी घेतली जात नाही. यंदा हा सगळा निधी पूरग्रस्तांसाठी वापरला जाईल, असं संभाजीनगर तरुण मंडळाचे अध्यक्ष अजित सासणे सांगतात.राधाकृष्ण तरुण मंडळाच्या वैशिष्टय़ाप्रमाणे यंदाही भव्य काल्पनिक मंदिराचा देखावा उभारण्यात येणार होता. आता या सेटचं काम थांबविण्यात आले आहे. या भागातच अनेक नागरिक पूरग्रस्त असल्यानं त्यांना बाहेर काढणे, स्वच्छतेसाठी मदत करणे, जीवनावश्यक वस्तू पुरविणे यात कार्यकर्ते गुंतले आहेत.जुनी बुधवार पेठ तालमीचा चिंचपोकळीचा राजा आणि एस. पी. बॉइज ग्रुपचा चिंतामणी या दोन्ही गणेशमूर्तींचे भव्य मिरवणुकीने आगमन होणार होते. आता त्या रद्द करून महापुरावर देखावा करण्यात येणार आहे. तटाकडील तालीम मंडळाने पारंपरिक बँडवर गणेशमूर्तींचे आगमन आणि विसर्जन मिरवणूक काढण्याचं ठरवलं आहे.राजारामपुरी शिवाजी तरु ण मंडळाचे दुर्गेश लिंग्रस म्हणाले, मंडळाचे यंदाचे 50 वे वर्ष असल्याने 5-6 लाख रुपये खर्चून गणपतीचा भव्य दरबार साकारण्यात येणार होता; आता हे नियोजन रद्द करून साधे मंडप उभारण्यात येणार आहेत. 2005  साली मंडळाने पूरग्रस्तांसाठी निधी दिला होता, यंदादेखील वर्गणीच्या रकमेतून पूरग्रस्तांना मदत केली जाईल.गणपती मंडळं म्हणजे तरुण मुलांची गर्दी. त्यांचा प्रसंगी धांगडधिंगा. मिरवणुका, नाचणं हे सारंच डोळ्यासमोर येतं. पण यंदा हे तरुण कार्यकर्ते हे सारं बाजूला ठेवून पूरग्रस्तांच्या मदतीला सरसावले आहेत.  यंदा पुरामुळे उद्योगधंद्यालाही कोटय़वधींचा फटका बसल्याने अनेक मंडळांनी वर्गणी न मागण्याचा निर्णय घेतला आहे.आर्थिकच नाही तर विविध कामांसाठीची मदतही ते करत आहेत. गणपती मंडळ कार्यकत्र्याचा हा चेहरा अधिक विधायक आणि उमेद मनाशी धरावी असा आहे.

**********

पूरग्रस्तांना घरे बांधून देणार कोल्हापुरातील प्रत्येक गणेश मंडळं व तालीम संस्था किमान 21 हजारांची वर्गणी पूरग्रस्तांसाठीचा निधी म्हणून देणार आहेत. कोल्हापूरकरांसह आलेल्या मदतीतून पूरग्रस्तांना दोन महिने पुरेल इतके अन्न, धान्य व जीवनावश्यक साहित्य देण्यात आले आहे. आता प्रश्न आहे तो पडलेल्या घरांचा. म्हणूनच एकटय़ा मंगळवार पेठेतील 17 तालमी आणि 130 मंडळांनी मिळून किमान 15 पूरग्रस्तांना घरे बांधून देण्याचा संकल्प केला आहे. शहरात साडेतीन हजार तरुण मंडळे नोंदणीकृत आहेत. या सर्व मंडळांच्या सहभागातून किमान तीन कोटी रुपये जमा झाल्यास दीडशेहून अधिक पूरग्रस्तांची घरे बांधणं शक्य आहे, अशी माहिती पाटाकडील तालीम मंडळाचे सदस्य विजय देवणे यांनी दिली. 

(लेखिका लोकमतच्या कोल्हापूर  आवृत्तीत वार्ताहर आहेत.)