शहरं
Join us  
Trending Stories
1
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
2
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
3
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
4
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
5
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
6
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
7
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
8
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
9
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
10
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
11
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
12
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
13
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
14
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
15
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
16
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
17
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
18
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
19
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरात मदतीला धावली मुलींचीही व्हाइट आर्मी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2019 07:00 IST

देशातल्या पहिल्या रेस्क्यू टीममधल्या प्रशिक्षित अशा या तरुण मुली. प्रशिक्षणानंतर तीनच महिन्यात त्यांना महापुरात उतरावं लागलं; पण त्या डगमगल्या नाहीत. उलट खंबीरपणे पुरात मदतीला उभ्या राहिल्या.

ठळक मुद्देआर्मी, आपत्ती व्यवस्थापन आणि लढवय्ये कोल्हापूरकर तरुण यांच्या सोबत या ‘आपदा सखी’ आणि व्हाइट आर्मी या संघटनेतील मुली उभ्या होत्या.

- इंदुमती गणेश 

कोल्हापुरातील कुंभी, कासारी, भोगावती, पंचगंगा अशा 15 नद्यांना आलेला महापूर. शेकडो गावं पाण्यानं गिळल्यासारखी. आणि माणसं हतबल. आर्मी आली आणि मग जवान बोटीतून चार-चार नागरिकांना गावातून बाहेर काढू लागले.त्या जवानांबरोबर दिसल्या पांढर्‍या कपडय़ातल्या काही मुली. जवानांच्या  खांद्याला खांदा लावून रेस्क्यू ऑपरेशनमध्ये उतरलेल्या या तरुण मुलींच्या गटाचं नाव आहे ‘आपदा सखी’. म्हणजेच देशातील पहिली महिला रेस्क्यू टीम. या ‘आपदा सखीं’नी पुरुषांच्या बरोबरीने नव्हे, तर अनेकदा  त्यापुढे जाऊन आपल्या क्षमता सिद्ध केल्या. पाण्यात सतत काम करकरून या मुलींच्या पायांना खत लागले आहे. हातापायांना जखमा झाल्या. दिवसरात्न पाण्यात राहून थंडी-तापानं काहींना गाठलं, तर कुणाच्या रक्तदाबाच्या तक्रारी सुरू झाल्या. मात्र अशा परिस्थितीतही त्यांनी आपलं काम एका क्षणासाठीही थांबविले नाही. औषधे घ्यायची, काहीवेळ विश्रांती घ्यायची आणि पुन्हा पाण्यात उतरायचं. त्यांच्या या शौर्याला कोल्हापूरच्या आपत्ती व्यवस्थापन यंत्नणेनेही सलाम केला आहे.  मुली नाजूक असतात, त्यांना अवजड कामं झेपायची नाहीत, पुरुषांच्या तुलनेत ताकदीची कामं त्या करू शकत नाहीत आणि पुरासारख्या आपत्तीत त्या काय काम करणार अशा जेवढय़ा म्हणून संशयशंका लोकांना असतील तेवढय़ा सार्‍या या मुलींच्या हिमतीनं आणि कामानं पंचगंगेच्या पात्नात विसर्जित झाल्या. या कोल्हापूरच्या तरुणींनी हजारो नागरिकांचे प्राण वाचवले आहेत. कळा सुटलेली गरोदर महिला, बोटीतच जन्मलेलं बाळ, काही दिवसांपूर्वी या जगात आलेली निरागस बाळं, अंगावरच्या कपडय़ांनिशी घराबाहेर पडलेल्या महिला, वृद्ध, महापुराच्या धास्तीनेच हृदयविकाराचा झटका आलेले अत्यवस्थ रुग्ण, तर कुणाचा झालेला मृत्यू.. या सार्‍यांच्या मदतीला या मुली धावल्या. आर्मी, आपत्ती व्यवस्थापन आणि लढवय्ये कोल्हापूरकर तरुण यांच्या सोबत या  ‘आपदा सखी’ आणि व्हाइट आर्मी या संघटनेतील मुली उभ्या होत्या. त्यांच्या कामाची नोंद घेत, त्यांच्या हिमतीचं कौतुक करणं तर भागच आहे.

***

व्हाइट आर्मी काम कशी करते?

व्हाइट आर्मी या संघटनेत 2008 सालापासून मुली कार्यरत आहेत; तर कोल्हापूर आपत्ती व्यवस्थापनाच्या वतीने मार्च आणि मे महिना अशा दोन टप्प्यांत 93 मुलींना आपत्ती व्यवस्थापनाचे धडे देण्यात आले. प्रशिक्षणानंतर तिसर्‍या महिन्यातच या मुलींना प्रत्यक्ष कामात उतरावं लागलं. कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले, शिरोली, कागल, करवीर या तालुक्यांच्या ठिकाणी या मुलींना पोस्टिंग देण्यात आलं होतं.  सैन्यदल आणि ‘एनडीआरएफ’च्या टीम कोल्हापुरात दाखल होण्यापूर्वीच या मुलींनी नागरिकांची सुटका करण्याचं काम सुरू केलं होतं. गावातून सुटका झालेल्या नागरिकांना बोटीतून खाली उतरवून घेणं, बोटीत बसवणं, महिला-लहानग्या बाळांना, मुलांना खांद्याभर पाण्यातून बाहेर काढणं, त्यांना वाहनार्पयत नेऊन सोडणं,  एखादा रु ग्ण असेल तर काठी आणि कापडाची झोळी करून रुग्णवाहिकेर्पयत नेणं, अगदी बोटीतून मृतदेह बाहेर काढण्यार्पयतची सगळी कामं या ‘आपदा सखीं’नी न डगमगता केली आहेत. वरून धो-धो पाऊस पडायचा; त्यातच पहाटे पाच वाजता त्यांचं काम सुरू व्हायचं ते मध्यरात्नी एक-दोन वाजता संपायचं. मोठय़ा हिमतीनं ही व्हाइट आर्मी पुरात उभी राहिलेली दिसली.

***आम्ही सगळ्या महाविद्यालयीन विद्यार्थिनी आहोत. पूर आल्यानंतर सगळ्याजणी पाण्यात रेस्क्यू ऑपरेशनसाठी उतरलो. हे सगळं करताना देशसेवा आणि समाजसेवेची भावना होती. आपणही कमी नाही, उत्तम काम करू हा आत्मविश्वासही या कामानं आला. 10 दिवस पाण्यात राहिल्यानं आम्ही सगळ्या आता आजारी पडलो आहोत; पण तरी काम थांबलेलो नाही.- शुभांगी घराळे ( सदस्य, व्हाइट आर्मी)

***

नागरिकांना वाचवायचं हे एकच ध्येय आमच्यासमोर होतं.  मुली आहोत म्हणून कुठेही डगमगलो नाही, कमी पडलो नाही. देशातील पहिली महिला रेस्क्यू टीम म्हणून आम्ही केलेल्या कामाचं आणि अनेकांना वाचवण्याचं समाधान कमावलं हेच मोठं आहे. - पवित्रा  डांगे ( सदस्य, व्हाइट आर्मी)

 

( इंदुमती लोकमतच्या कोल्हापूर आवृत्तीत वार्ताहर आहे.)

टॅग्स :Kolhapur Floodकोल्हापूर पूर