शहरं
Join us  
Trending Stories
1
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
2
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
3
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
4
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
5
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
6
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 
7
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल
8
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
9
'जरा... जरा मराठी'! गोड 'कॅडबरी'च्या तोंडी मराठीचे 'धडे'; तुम्हीही म्हणाल, खूपच भारी 
10
Agni-6 Missile : मोठी तयारी! अग्नि-६ क्षेपणास्त्र किती धोकादायक? भारत चाचणी करू शकतो, २ दिवसांचा नोटम जारी
11
पालघर: मालवाहू जहाजाची मासेमारी करणाऱ्या बोटीला धडक, चार मच्छिमार पडले समुद्रात; 15 मच्छिमारांना कुणी आणले किनाऱ्यावर?
12
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
13
कोट्यवधीची रोकड, ६.७ किलो सोनं आणि..., काँग्रेसच्या आमदाराकडे सापडलं घबाड, EDची कारवाई   
14
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
15
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
16
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
17
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
18
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
19
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
20
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!

अपडेट राहा, नाहीतर बाजूला व्हा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2019 13:45 IST

एकेकाळी जातं घरची लक्ष्मी होतं, आज घरात जातं आहे का? ते का अडगळीत गेलं? - उपयुक्तता संपली म्हणून! आपली उपयुक्तताही अशीच संपली तर?

ठळक मुद्देहायर अ‍ॅण्ड फायर जमाना आहे.

विकास बांबल 

माझ्या लहानपणी आमच्या घरी, घराच्या एका कोपर्‍यात जातं होतं. आमची आजी, आई त्यावर तूर भरडायची, डाळ तयार करायची. मी तर असं ऐकलं की, तेव्हा चक्की वगैरे काही नव्हतं. जात्यावरचं गहू-ज्वारीपण दळायचे. आम्ही नंतर काही कारणास्तव भाडय़ाच्या घरात राहायला गेलो तरी आईने जातं काढून सोबत घेतलं. जिथे हाताला काम मिळेल ते आमचं गाव असाच आमचा त्याकाळी मुक्कामाचा पत्ता होता.दोन-तीन घरं बदलली असेल, पण आईने सोबत जातं घेतलंच. भक्कम वजनाचं जातं होतं. आता त्यावर ती पूर्वीएवढं कामसुद्धा करत नव्हती तरीसुद्धा जातं आईला पाहिजेच होतं.काळ बदलला, दिवस लोटले आता आमचं स्वतर्‍चं मोठं घर आहे. भाडय़ाच्या सगळ्याच घरांत जातं बसवून शकत नव्हतो; पण आता घरात मोठी ऐसपैस जागा आहे. पण जातं मात्न गच्चीवर अडगळीच्या सामानात टाकून दिलेलं आहे.कदाचित आम्ही ते जातं सोबत आणलंसुद्धा नसतं, पण आईचं जात्यावर प्रेम आहे त्यामुळे ते आणावं लागलं. मात्र त्याचा काही रोज उपयोग नव्हता त्यामुळे ते ठेवून द्यावं लागलं. असं फक्त आमच्याच घरी झालं का?तर नाही. अनेक घरात जातं होतं, ते कालबाह्य झालं. एकेकाळी हे जातं म्हणजे लक्ष्मी. त्याला चुकून जरी पाय लागला तरी मोठी चूक होत असे. घरातले रागवत. पण आज त्याची जागा अडगळीच्या खोलीत आहे. कधीतरी ते पूजतही असतील; पण केवळ उपचार म्हणून. एरव्ही ते गच्चीत एका कोपर्‍यात पडून राहतं. धूळ आणि जाळीजळमटी लागतात त्याला.हे सारं काय आहे?जातं म्हणा, पाटा-वरवंटा म्हणा या सार्‍या गोष्टी जीवनावश्यक गोष्टी होत्या. मग आज त्यांची गरज का संपली?यावरून एक गोष्ट लक्षात येतं की, जात्याची जागा तोवर होती जोवर त्याच्यामध्ये माणसाच्या त्या वेळच्या गरज पूर्ण करण्याची क्षमता होती. त्याशिवाय काम होत नसे. मदत म्हणून तेच वापरलं जायचं. पण आज जात्याला पर्याय उपलब्ध झाले. मिक्सर तर घरोघरी आले. चक्की (दळणकेंद्र) गल्लोगल्ली झाली. चक्की, मिक्सर आल्यापासून जात्याचं महत्त्व कमीच झालं. आता तर त्यापुढे जात चक्कीवरही न जाता अनेक घरात डायरेक्ट पीठच यायला लागलं. म्हणजे चक्की हवीच हा नियमही काही सर्वकाळ सत्य उरला नाही. जे या यंत्राचं तेच माणसांचंही होतच ना. शेवटी आपण ‘अपडेट’ होणं, कालानुरूप बदलणं याची चर्चा करतो ते नेमकं काय आहे. मनुष्याच्या बाबतीत ही हाच नियम थोडय़ाफार फरकाने लागू होतो. जोवर मनुष्यामध्ये कुणाची गरज पूर्ण करण्याची क्षमता आहे तोवर जगात त्याला किंमत आहे. एकदा का आपली गरज पूर्ण करण्याची क्षमता संपली की त्या जात्यासारखं अडगळीच्या ठिकाणी जाऊन पडावं लागेल.त्या जात्याचं तरी नशीब चांगलं आहे की माझ्या आईच त्या जात्यावर, जात्यावरचं नव्हे तर तिने स्वतर्‍च्या कमाईवर घेतलेल्या प्रत्येक वस्तूवर तिचं प्रेम आहे म्हणून त्या वस्तूंची घरात अडगळीची का असेना पण जागा आहे.पण नव्या अत्यंत व्यावसा¨यक जगात अशा भावनांना मोल नसतं. हायर अ‍ॅण्ड फायरचा जमाना आहे. तुमची उपयुक्तता सिद्ध करा नाहीतर बाजूला व्हा, पर्याय आहेत असं चित्र सर्वत्र आहे.आपल्याविषयी आपलं कुटुंब सोडलं तर या जगाला माया आहे का? आणि असली तरी ती कुठर्पयत सीमित आहे हे आपण जाणतोच. कारण कुटुंबासाठी आपण अख्ख जग असतो तर जगासाठी आपण केवळ एक व्यक्ती असतो. आज आपण कुणाच्या कामी येतो, आपल्याजवळ काही तरी आहे म्हणून आपली किंमत आहे. अर्थात कुटुंबाला तरी आपण प्रेम, वेळ, आपलं सहकार्य देतोय का हे तपासून पाहिलं पाहिजे. नाहीतर कुटुंब तरी आपल्याला कितीकाळ बांधून घालेल?पेनाची रिफिल एकदा संपली की पेन फक्त खिशाला शोभा बनून राहातो किंवा फेकून दिला जातो. त्याची उपयुक्तता संपते. अशा अनेक गोष्टी आपल्या आवतीभोवती आहेत, मग आपण तरी अपवाद का असू?यावरून आपण एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे. एकदा का आपली गरज पूर्ण करण्याची क्षमता संपली की आपण बाजूला केले जाऊ. एखाद्या अडगळीच्या ठिकाणी जाऊन पडावं लागेलं.त्यामुळे आयुष्यात गर्दीचा भाग न होता स्वतर्‍च पर्याय नसणारं एकमेवाद्वितीय असं व्यक्तिमत्त्व घडवावे लागेल. ज्या दिवशी आपल्याला पर्याय म्हणून कोणी उपलब्ध झालं त्या दिवसापासून आपले मूल्य घटलेच म्हणून समजा. आणि हे असंच होणार असेल तर आपण एकच करू शकतो. ते म्हणजे बदलू शकतो. कालानुरूप जगू शकतो. आपले स्किल बदलू शकतो. स्वभाव, वृत्ती बदलू शकतो. माणसांना जोडून राहू शकतो. नवीन बदल आत्मसात करणं, तंत्नज्ञान अवगत करणं हेच अपडेट आणि कालसुसंगत राहण्यासाठीचे मार्ग आहेत. स्वतर्‍ला नवनवीन तंत्नज्ञान आणि बदलांचं रिफिलिंग सतत करत राहू. तरच आपण नव्या काळात आनंदानं जगू. कायम काळासोबत चालू! अडगळीत जाणार नाही.