शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
2
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
3
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
4
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
5
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
6
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
7
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
8
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा
9
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
10
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?
11
पाकला पुन्हा मिळाली आर्थिक मदत; भारतासोबतच्या तणावादरम्यान IMF ने दिले ₹8400 कोटी
12
तुर्कस्तान आणि अझरबैजानला विमाने पाठवणार का? इंडिगो कंपनीने दिली मोठी अपडेट
13
Tejasvee Ghosalkar : "भाजपात जाण्याबाबत मी..."; तेजस्वी घोसाळकरांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट
14
Surya Gochar 2025: सूर्य होणार अधिक प्रखर, मात्र 'या' राशींसाठी ठरणार सुखकर; कसा ते पहा!
15
'तुझा मुलगा जिन्न आहे' मांत्रिकाचं ऐकून १२ वर्षांनी झालेल्या मुलाला कालव्यात फेकलं!
16
भारतात Trump Towerचा जलवा, ८ ते १५ कोटींचे फ्लॅट्स; १२५ कोटींचं पेंटहाऊस, पहिल्याच दिवशी सोल्ड आऊट
17
ICC Test Rankings : 'तलवारबाज' जड्डूचा मोठा पराक्रम! टेस्टमध्ये अव्वलस्थान कायम राखत सेट केला नवा विक्रम
18
३६ युद्धनौका, ७ विनाशिका, फ्रिगेट आणि पाणबुड्या..., त्या रात्री नौदलाने केली होती कराची बेचिराख करण्याची तयारी   
19
Mumbai: मुंबईतील महिलेची सातव्या मजल्यावरून उडी, सुसाईड नोटमध्ये लिहिले मृत्युचे कारण
20
दहशतवादी मसूद अजहरला पाकिस्तानी सरकार १४ कोटी रुपये देणार? कारण ऐकून व्हाल हैराण!

कासरा आवळलेलाच !

By admin | Updated: February 4, 2016 20:45 IST

आईवडील स्वातंत्र्य देतात, पण ते नियंत्रित. कासरा फक्त लांब सोडतात आणि पूर्वीसारखंच मुलांना बंधनात ठेवतात, असं सांगणारं एका मित्रचं पत्र ‘ऑक्सिजन’ने प्रसिद्ध केलं होतं. त्याला आलेल्या या काही निवडक प्रतिक्रिया.

 

 
आईवडील स्वातंत्र्य देतात, पण ते नियंत्रित. कासरा फक्त लांब सोडतात आणि पूर्वीसारखंच मुलांना बंधनात ठेवतात, असं सांगणारं एका मित्रचं पत्र ‘ऑक्सिजन’ने प्रसिद्ध केलं होतं.
त्याला आलेल्या या काही निवडक प्रतिक्रिया.
 
 
प्रेमाचा पहारा
लग्नानंतर मी बंदी झालेय !
 
मी  प्रेमात पडले. घरी सांगितलं. आंतरजातीय लग्न. त्याच्या घरच्यांचा विरोध. पण माङया आईबाबांनी पुढाकार घेऊन लग्न लावून दिलं.
लग्नानंतर आम्ही त्याच्या आईबाबांच्या घराजवळच घर घेतलं. आता लग्नाला वर्ष झालं. त्यांची अपेक्षा आहे मी त्यांच्याकडच्या सगळ्या चालीरिती शिकाव्या. त्या शिकले. सासरी पडेल ते काम केलं.
आता तो म्हणतो, माझ्या घरच्यांना तुझं शिक्षण सुरू असणं मान्य नाही. ते तू सोड. तसंही शिकून तू कुठं नोकरी करणारेस? पण हे असं पंजाबी ड्रेस घालून कॉलेजात जाणं काही बरं दिसत नाही.
त्यावरून भांडणं. आता तर शिक्षण सोड नाही तर मला, अशी धमकीही मिळाली आहे.
आता वाटतं, आईबाबांनी आणलेली स्थळं नाकारून, स्वतंत्र निर्णय घेऊन, लव्ह मॅरेज करून मी काय मिळवलं?
- अनामिका
 
नावाचं स्वातंत्र्य बाकी नजरकैद
 
मी माझ्या ममीपपांची एकुलती एक मुलगी. तेही टिपिकल सांगतात, आम्हाला एकच मुलगी आहे असं वाटतच नाही. तू आमचा मुलगाच आहे.
मला वाटतं, मुलीला मुलगा मानण्यात त्यांनी समाधान मानलंय. आतून आपल्याला मुलगा नाही याचं त्यांना काहीतरी दु:ख असणारच !
पण तो वेगळा विषय.
तर मला घरात स्वातंत्र्य आहे की नाही, तर आहे. मला मित्र आहेत, मैत्रिणी आहेत. हवे ते कपडे घालता येतात. हवं तिथं जाता येतं.
पण हे सारं असताना मी नजरकैदेत असते.
त्या जाहिरातीतल्या मुलीसारखं. तिचे वडील तिला सायकल घेऊन देतात. पण ती सायकल चालवत असताना लपून पाहतात की, ही पडत तर नाही?
आमच्याकडेही तेच आहे.
सतत आईची सोबत. मी येते ना बाहेर तुङयाबरोबर. तू मैत्रिणीकडे कशाला जातेस? त्यांनाच आपल्याकडे बोलव. सगळ्यांचे नंबर माङया मोबाइलमध्ये सेव्ह कर. लॅण्डलाइनही कर.
वर सांगतातही की, हे सारं जमाना वाईट आहे म्हणून; बाकी आमचा तुङयावर पूर्ण विश्वास आहे.
त्यांची काळजी मला समजते, पण हे असं आडून आडून माङयावर लक्ष ठेवणं मला आवडत नाही, हे त्यांना कसं सांगणार?
- प्रांजली 
बोरिवली
 
तुझं तू बघ असं कसं म्हणता?
 
माझ्या मित्रंना वाटतं की, माझे आईबाबा फार चांगले आहेत. ते मला सगळी मोकळीक देतात.
ते खरंही आहे. कारण त्यांना काहीही विचारा ते म्हणतात, तुला हवं ते कर ! निर्णय तुझा. अनेकदा मलाच विचारायला येतात की, आता पुढे तू काय करणार आहेस?
मी कुठं जातो, कुणाला भेटतो, काय करतो यावर काही रोकटोक नाही. माझ्या मित्रंना माझा हेवा वाटतोच. पण त्यांची माझ्या आईबाबांशी चांगली दोस्तीही आहे. ते मित्रंनाही सल्लेबिल्ले देतात.
आता या सा:यात मला त्रास होण्यासारखं काय आहे?
पण मला होतो. त्रास होतो म्हणण्यापेक्षा भीती वाटते. प्रेशर येतं.
सगळी जबाबदारी आपली. काही चूक करण्याची मुभाच नाही. त्यांना वाटतं आपला मुलगा जे करेल ते योग्यच करेल.
पण असं कसं होईल? माझ्या अनुभवाच्या जोरावर माझे निर्णय चुकूही शकतात.
मला वाटतं, त्यांनी म्हणावं की निर्णय घे तू, आम्ही सोबत आहोत.
पण त्यांचं तसं नाही. ते म्हणतात तुझं तू ठरव. या पूर्ण स्वातंत्र्याचं किती प्रेशर येतं हे माङया मित्रंना कसं कळणार?
मला मात्र सतत स्वत:ला सिद्ध करत राहावं लागतं.
काही चुकलं की आईबाबा बोलून दाखवत नसले तरी अप्रत्यक्षपणो त्यांचा टोन एकच असतो, आम्ही तुला एवढी मोकळीक दिली तरी तुला संधीचं सोनं करता येत नाही.
अशावेळी काय होतं माझं काय सांगणार?
मला वाटतं, आईबाबांनी स्वातंत्र्य द्यावं, पण चार पाऊलं सोबतही चालावं. चुकलं तर सावरावं, रागवावं, सल्ले द्यावेत, निर्णय घ्यायला मदतही करावी.
तुझं तू बघ, ही काही योग्य स्ट्रॅटेजी नव्हे !
- अमित
पुणो
 
आमच्या डोळ्यादेखत तो गेला.
 
दोन वर्षापूर्वीची गोष्ट.
मी आणि माङो काही मित्र पिकनिकला गेलो होतो. अलिबागच्या समुद्रावर.
खूप मजा केली. आमच्यातल्या काहींनी ठरवलं की दिवस मावळल्यावर पोहायला जाऊ. काहीजण गेले. काही काठावर बसून राहिले.
एकदम पाणी भरायला लागलं.
पोहायला गेलेले काही भराभरा बाहेर आले. पण एक दोस्त आलाच नाही.
आमच्या डोळ्यांदेखत तो गटांगळ्या खात बुडाला.
आम्ही काहीच करू शकलो नाही.
आजवर त्याच्या आईबाबांना मी तोंड दाखवू शकलेलो नाही.
त्यानंतर पुढचं वर्षभर मी घराच्या बाहेर पडलो नाही. कुणाशी बोललो नाही.
मानसोपचार घेतले फक्त.
आता विचार करतोय की चूक नक्की कुणाची होती?
उत्तर येतं- आमचीच.
आम्ही का गेलो रात्रीचे पाण्यात?
त्यांना थांबवलं का नाही?
का नको ते धाडस केले, कसला माज दाखवला?
आता जेव्हाही पेपरात अशा बुडून मरण्याच्या बातम्या येतात तेव्हा मी हादरतो. रडतो. पण काहीच करू शकत नाही.
माझं सर्व मित्रंना एकच सांगणं आहे,
असं धाडस करू नका.
जीव एकदा गेला की परत येत नाही.
स्वत:ला सांभाळा. मरू नका.
- एक मित्र