शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
2
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
3
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
4
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
5
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
6
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
7
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
8
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
9
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
10
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
11
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
12
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
13
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
14
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
15
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
16
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
17
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू
18
अहमदाबाद प्लेन क्रॅशसंदर्भात बाबा रामदेव यांना वेगळाच संशय, स्पष्टच बोलले! केली मोठी मागणी
19
Maharashtra Rain Alert: कोकणाला रेड अलर्ट! मुंबई-ठाण्यासह 'या' जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा
20
Tarot Card: कष्ट करावे लागतील, तडकाफडकी कोणतेही निर्णय घेऊ नका; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!

नोकरी गेली , पगार कमी झाला, लोक  काय  म्हणतील  याची  भीती  वाटते ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2020 19:05 IST

आपलं कार्यालयातील पद मुळात पर्मनन्ट नव्हतंच कधी! पर्मनन्ट आहेत फक्त आपली कौशल्यं, बुद्धी आणि अनुभव. ते तर कुणीच हिरावून घेऊ शकत नाही.

ठळक मुद्देहा पॉज आहे. जरा शांत व्हा. थोडं थांबा. मग धावायचंच आहे थोडय़ा दिवसात. 

- डॉ. हरीश शेट्टी ( सुप्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ)

1) अचानक जॉब गेला तर काय, याचं फार टेन्शन आलंय असं अनेक तरुण म्हणतात, अनेक जण त्याच धास्तीत आहे, त्याचा ताण आला आहे, त्यांना काय सांगाल? हा ताण कसा हाताळायचा?

 मला जॉब नाही मिळणार, आणि मिळाला नाही तर माझं काही खरं नाही हे आधी मनातून काढून टाका. कोरोना संसर्गाहून अधिक वेगात पसरणारी कुठली गोष्ट असेल तर ती म्हणजे कोरोनाचं भय.आजचं भय, उद्याचंही भय. परिस्थितीकडे पाठ करून हे भय जाणार नाही हे जितकं खरं तितकंच हे भय मनातून आधी काढायला हवं हेही खरं.ते मनातून आधी काढून टाकायला हवं. ते कसं काढणार? तर अँजिओप्लास्टी जशी हृदयविकार असलेल्या रुग्णांना वाचवते, तसा योग माणसाच्या मेंदूला भयापासून वाचवतो. शिवाय व्यायाम करत राहिलं तर शरीरही तणावमुक्त राहातं. योग मेंदूला संतुलित राहायला शिकवतो.काळ कुठलाही असो, मन आणि शरीराचा संवाद होत राहायला पाहिजे. योग्य प्रमाणात व्यायाम आणि झोप पाहिजे. माइंड आणि बॉडी डिसिप्लिनही या काळात फार महत्त्वाची गोष्ट आहे. काळ खडतर आहे, हे दिसतं आहे.  मनात सतत विचार येणार, तुम्ही विचलित होणार हे नक्की. पण त्या विचारांवर ओव्हररायटिंग करा. म्हणजे स्वत:ला सांगायचं, मी यावर मात करणार! मी टिकून राहणार! मी कुठल्याही परिस्थितीचा उत्तम सामना करणार. हे असं केलं तरंच तुमचा मेंदू तुम्हाला हजारो क्रिएटिव्ह पर्याय शोधण्याची संधी देईल. मार्ग सापडतील. मन आणि शरीर यांचा एक मेलिडियस ऑर्केस्ट्रा झाला पाहिजे. तर मग हा अतिविचारानं येणारा ताण कमी होईल आणि सकारात्मक पर्याय सुचतील.अजून एक, गरज असेल तर कुणाकडेही मदत, आधार मागण्यात संकोच करू नका. आज हरेकजण आपापल्या पातळीवर लढतोय. स्वत:च्या आत आणि बाहेरही संघर्ष करतोय. तुम्ही एकटे नाही. एकमेकांना आधार द्या, आधार घ्या. यातून अधिक ताकदवान बनण्याचे, टिकून राहाण्याचे चांगले मार्ग सापडतात.

2) नोकरी तर टिकली. पगार कमी झाला, जबाबदा:या फार, पैशाची सोंगं कशी आणणार, कुठून आणायचा मानसिक धीर, असं कुणी विचारलंच तर काय सांगाल?

आता हे जरा ओल्ड फॅशन्ड वाटेल तरुण मित्नांना, पण कुटुंबाचा आधार कायम घट्ट धरून ठेवा. तुमचा जॉब याच काळात नाही कधीही जाऊ शकतो; पण कुटुंब कायम सोबतीला असतं. इट इज अ पर्मनन्ट एंटिटी. कुटुंबातल्या सदस्यांसोबतची इमोशनल साखळी तुम्ही टिकवून ठेवली पाहिजे. चांगल्या मित्नांच्याबाबतही हेच म्हणता येईल. एकमेकांना जगवा, तगवा.नोकरी नसेल तर उद्योग करा, उद्योग शक्य नसेल, लघुउद्योग करा. ऑनलाइन काही न काही काम करा. माङया ओळखीत काही तरु ण मित्न आहेत, जे ऑनलाइन पेंटिंग्ज विकतात. स्वत:ची चित्र नाही. ते फक्त चित्नकार आणि ग्राहकांमधला दुवा बनलेत. चित्रंचं मार्केटिंग हे आपण कधी ऐकलं होतं का; पण त्यांनी शोधून काढलं.अशा अनेक गोष्टी तुम्ही शोधू शकाल. हे तितकंसं सोपं नसेल, नाही. पैशाची सोंगं नाहीच आणता येत. काटकसर करावीच लागेल; पण तगून राहावं लागेल. त्रस होईल, पण जमेल. जमवावंच लागेल.भारताचा इतिहास पाहा. जास्त मागे जायला नको. अगदी गेल्या पन्नास वर्षात पाहा. सातत्याने नैसर्गिक आपत्ती येतच आहेत. दुष्काळ, महापूर, चक्र ीवादळं. त्या-त्या राज्यातले लोक मोडून न पडता परत परत नव्यानं उभे राहिले. निसर्गाशी, आयुष्याशी शक्य तितकं जुळवून घेत त्यांनी सतत नव्यानं स्वत:ला शोधलं. दुष्काळ आले, निघूनही गेले. लोकांनी खचून न जाता तग धरला. हे कधीतरी संपणार आणि आपलं जीवन पुन्हा सुरू होणार याची त्यांना खात्नी होती.नोकरी गेली तर गेली, पगार कमी झाला तर झाला. कुणी विचारलंच तर हे न संकोचता जगाला सांगा. त्यात कमीपणा काही नाही. चूक काही नाही आपली. उलट जवळच्या माणसांना हे सांगितलं तर त्यातून मदत मिळेल.  सध्या सगळे कमी-अधिक याच अवस्थेतून जात आहेत.  आपलं कार्यालयातील पद हे कधीच आपल्या माणूसपणापेक्षा मोठं नव्हतं. आजही  नाही. नसू द्या, ते मुळात पर्मनन्ट नव्हतंच कधी! पर्मनन्ट आहेत तुमची कौशल्यं, बुद्धी आणि अनुभव. ते तर कुणीच हिरावून घेऊ शकत नाही. आता जरा कठीण काळ आहे तर केक-आंबा न खाता केळी खा. दिवस चांगले असोत की वाईट. शेवटी स्वीकार, समायोजन तर कुठल्याही परिस्थितीत पाहिजेच. ते शिकण्याची ही संधी आहे. आयुष्य पुढं जातच असतं. तुम्ही नका थांबू. हे सगळं नॉर्मलच आहे.  न्यू नॉर्मलचा हा एक भाग आहे. तरुण तर नवनवीन गोष्टींना अॅडॉप्ट करण्याबाबत जास्त हुशार असतात.मन घाबरेल, जास्तच अस्वस्थ होईल, तेव्हा ज्योतिषाकडे न जाता मानसोपचारतज्ज्ञ शोधा. शरीराच्या एखाद्या अवयवासारखं मनही फ्रॅक्चर होऊच शकतं की!  फॅमिली डॉक्टरसारखाच फॅमिली सायकॉलॉजिस्टही शोधा.कुठलीच गोष्ट आयुष्य थांबेल, संपेल इतकी महत्त्वाची नसते. हे ही दिवस जातील.

3) घरचे म्हणतात लग्न कर, आता आर्थिक स्थिती अशी की कसं करणार लग्न? त्यात एकटेपणा आहे तो वेगळाच.

हो, सध्या असे अनेक जण माङयाकडे हा प्रश्न घेऊन यायला लागलेत. त्यात तरु णांसह पालकही आहेत. लग्न हा एक मस्त, महत्त्वाचा टप्पा आहे खरा; पण सध्या महत्त्वाचे वाटणारेही टप्पे थोडे पुढे ढकलताच येतील. उद्या चांगला असण्यासाठी आज थोडंसं थांबताच येईल.  घराच्या एका खोलीत आग लागली असेल तर दुस:या खोलीची आपण रंगरंगोटी नाही न करत बसत? तसंच आहे हे. आजचे महत्त्वाचे प्रश्न पाहा. लग्नाचं मग पाहा. ठरलं असेल तर काही काळ पुढे ढकला.  जरा प्री-वेडिंग मैत्नीची मज्जा घ्या. काही आभाळ कोसळत नाही. फक्त कुठलाही निर्णय समाजाचा दबाव घेऊन करू नका. समाज, त्याची धोरणं काळानुसार बदलतच राहातात. तुम्ही आनंदी नसाल, तर त्यांचं दडपण घेऊन का जगायचं?शिक्षण, नोकरी, लग्न.. काहीही असेल. हे आयुष्यातलं एक वर्ष जरा आराम करा. जरा  पॉज व्हा. 

4. सध्या तुमच्याशी जी तरुण मुलं बोलतात, त्यांना कोरोना काळात कुठले ताण जास्त छळताना दिसतात?

बरेच मुलं सांगतात, मी कॉलेजला जाऊ शकत नाही, मित्नांना भेटू शकत नाही, माझं शिक्षण, परीक्षा, फ्यूचर यांचं काय होईल? असे एक ना हजार प्रश्न तरुण मुलं सध्या फोन, ई-मेल, व्हॉट्सअॅपवरही विचारतात.अनेक जोडपी लग्न करून परदेशात जाणार होती. कुणाला विदेशातल्या मोठय़ा विद्यापीठात शिकायला मिळणार होतं. सगळ्यावर तात्पुरतं पाणी फिरलंय. अनेकांमध्ये याच्या टोकाच्या प्रतिक्रियाही दिसतात. स्वत:वर किंवा कुटुंबावर राग काढला जातो, लहान-मोठी हिंसाही घडताना दिसते. अशा काळातच योग्य ऐकणारा कोणी मिळणं, सोबतच समुपदेशनही होणं गरजेचं आहे. नसता अनेक जण यातून दीर्घकाळ नैराश्यात जाण्याचा धोका असू शकतो. त्यामुळे आधी म्हटलं तेच, हा पॉज आहे. जरा शांत व्हा. थोडं थांबा. मग धावायचंच आहे थोडय़ा दिवसात. 

मुलाखत आणि शब्दांकनशर्मिष्ठा भोसले