शहरं
Join us  
Trending Stories
1
"विधानभवनात आमदारांचे खून पडले तरी...", राज ठाकरे भडकले, महाराष्ट्रातील जनतेला संतप्त सवाल
2
'...तेव्हा राज ठाकरे-उद्धव ठाकरेंना लोक आपटू आपटू मारतील'; भाजप खासदार निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
3
Mumbai: मालवणी परिसरातून अपहरण झालेल्या तीन मुलींची सुखरूप सुटका
4
५ वर्षांनंतर पाकिस्तानला यूके उड्डाणाची मुभा मिळाली! पण 'बनावट पायलट' घोटाळ्याचा शिक्का अजूनही कायम?
5
६ महिन्यांपूर्वी लग्न मोडलं, मुलीने दुसरीकडे स्थळ बघायला सुरुवात केली; रागाने तरुण ऑफिसमध्ये पोहोचला अन्...
6
Mumbai Chawl Collapsed: वांद्र्यात तीन मजली चाळ कोसळली, अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकले, बचावकार्य सुरू
7
Share Market Today: शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात; 'या' शेअर्समध्ये दिसली मोठी घसरण
8
'शोले'मधील गब्बरचा अड्डा आहे या ठिकाणी, शूटिंगसाठी निर्मात्यांनी बनवलेला रस्ता, आता बनलंय पर्यटन स्थळ
9
१८ जुलै ते ११ ऑगस्ट बुधाचे वक्री भ्रमण; डोक्याचा ताप वाढणार, सगळ्या राशींनी घ्या 'ही' काळजी!
10
Ola-Uber Strike: "संप मागे घ्या नाही तर...; बंदूक दाखवून कॅब चालकांना धमकावले, व्हिडीओ व्हायरल!
11
दूध गरम करताना सिलेंडर फुटला, २० घरांची राखरांगोळी; महिलेचा होरपळून मृत्यू
12
राड्याच्या काही क्षण अगोदर काय घडले? पडळकर यांच्याशी चर्चा सुरू असतानाच बाचाबाची नंतर...
13
तुमची मुलगी बनेल लखपती; महिन्याला वाचवा १००० रुपये, २१ व्या वर्षी मिळतील ₹५.५ लाख
14
Padalkar Awhad: विधान भवनात देशमुखांना मारहाण, पडळकरांचा कार्यकर्ता ऋषिकेश टकले कोण?
15
पहलगाम हल्ल्यानंतर अमेरिकेने ‘TRF’बद्दल घेतला मोठा निर्णय; पाकिस्तानच्या कुरापतींना चाप बसणार!
16
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
17
आजचे राशीभविष्य, १८ जुलै २०२५: 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार लय भारी!
18
मंत्रालय, ठाणे अन् नाशिक बनले ‘हनी ट्रॅप’चे केंद्र; पटोलेंनी विधानसभेत पेनड्राइव्ह दाखविला
19
संपादकीय: धन-धान्य कृषी योजना योजना चांगली; पण...
20
पडळकर-आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये लाॅबीमध्ये तुंबळ हाणामारी, ‘म’-‘भ’च्या भाषेत शिवीगाळ

जॉब हॉपर्स नकोत? का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2019 12:55 IST

सतत नोकरी बदलणं फॅशनेबल असलं तरी फायद्याचं असेलच असं नाही.

ठळक मुद्देसतत नोकरी बदलताय? सावधान!

- नितांत पाटील

नेक्स्ट बेस्ट ऑपॉच्र्युनिटी.हे सध्या मिलेनिअल्स पिढीच्या म्हणजे तरुण मुलांच्या जगातले महत्त्वाचे शब्द आहेत. एकदा नोकरीला चिकटलं आणि तिथंच आयुष्य काढलं हे तर आता कालबाह्य प्रकरण झालं. आता नवीन शब्द आहे, जॉब हॉपिंग. सतत-पटापट नोकर्‍या अनेकजण बदलतात. त्यातून त्यांना भराभर प्रमोशन मिळतं, पगार वाढतो, आपल्याला मार्केटमध्ये किंमत आहे असंही वाढतं. त्याउलट जे एकाच कंपनीत अनेक वर्षे काम करतात, तिथल्या मालकांनाही वाटायला लागतं की एवढे लोक नोकर्‍या बदलत असताना या व्यक्तीनं नोकरी बदलली नाही, म्हणजे याचं स्किल कमी असणार किंवा याला बाहेर कुणी नोकरीवर ठेवत नसणार, त्यामुळे त्याची पगारवाढ आणि एकूण करिअरवाढही मंदावते.प्रत्यक्षात हे खरं नसतं, एकाजागी उत्तम काम करणारी माणसंही आपल्या कामात परफेक्शन कमावतात, विषयतज्ज्ञ असतात आणि चारदोन हजार रुपये पगार वाढतो म्हणून आहे त्या कंपनीला सोडत धावत सुटत नाही. अर्थात असा विचार करणारे थोडेच, सध्या काळ आहे तो जॉब हॉपिंगचा. तीन वर्षापेक्षा जास्त काळ एकाच ठिकाणी नोकरी करणं हेच अनेक मुलांना आउटडेटेड वाटतं. आपण ‘सडतोय’ एकाच जागी असा फील येतो. सेन्ससवाइड या कंपनीने अलीकडेच केलेल्या सव्र्हेनुसार 56 टक्के लोक सांगतात की, त्यांनी गेल्या 16 महिन्यांत एक ते तीनदा नोकरी बदलली आहे. अर्थात हे सारे नोकरदार आयटी, टेलिकॉम या क्षेत्रातले अधिक प्रमाणात आहेत. जुलै ते ऑगस्ट 2018 या काळात हा सव्र्हे करण्यात आला. या सव्र्हेत सहभागी झालेल्या 85 टक्के तरुण नोकरदारांना वाटतं की किती काळ नोकरी एकाच कंपनीत केली याला काही महत्त्व नाही. किती स्किल आहे, किती संधी मिळाली, किती पगार वाढला आणि पद वाढलं  याला जास्त महत्त्व आहे. त्यामुळे 60 टक्के तरुणांना असं वाटतं की, नोकरी बदलली तरच पगार चटकन वाढतो अन्यथा वाढत नाही. 43 टक्के तर आवजरून सांगतात की सतत नाही पण ठरावीक काळानंतर नोकरी बदलली तर आपल्या रेझ्युमची ताकद वाढते. मात्र का बदलतात हे तरुण नोकर्‍या?तर त्याची साधारण तीन कारणं दिसतात. एक म्हणजे नव्या नोकरीत वाटलं होतं तसं, अपेक्षेप्रमाणे काम वाटय़ाला आलं नाही. दुसरं म्हणजे जिथं काम करतो, तिथलं वातावरण चांगलं नाही, प्रोफेशनल नाही आणि तिसरं आणि सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे चांगली, नव्या कामाची, जास्त पगाराची नोकरी मिळाली.हे चित्र एकीकडे, दुसरीकडे मात्र आता हे जॉब होपर्स नोकरी देणार्‍यांच्या डोक्याला ताप होऊन बसले आहेत. त्यामुळे या सव्र्हेत सहभागी 87 टक्के नोकरी देणारे, व्यवस्थापनातले लोक सांगतात की, जे पटापट नोकर्‍या बदलतात असं रेझ्युममध्ये दिसतं, त्यांना आता आम्ही मुलाखतीलाच बोलावत नाही, नोकरी देण्याचा तर प्रश्नच नाही.जॉब हॉपिंग करणं चांगलं की वाइट यावरची चर्चा निरंतर सुरूच राहणार आहे, त्याचे फायदे-तोटेही आहेतच; पण ते करतानाही यापुढे तारतम्य ठेवावं लागेल, हे उघड दिसतं आहे.