शहरं
Join us  
Trending Stories
1
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
2
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
3
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
4
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
5
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
6
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
7
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
8
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
9
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
10
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
11
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
12
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
13
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
14
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
15
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
16
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
17
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
18
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
19
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
20
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास

आयटी इंजिनिअर ते खेडय़ापाडय़ात डेटा ऍनालिस्ट , समाधान ते सापडलं त्याची गोष्ट.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 09, 2020 5:15 PM

आयटी इंजिनिअर झालो. वीकेण्डर्पयत काम, मग सुटीच्या दिवशी ट्रेकबिक असं कार्पोरेट लाइफ सुरूहोतं. पण मी शोधत होतो कामाचा अर्थ..

ठळक मुद्देनिर्माणमध्ये सहभागी व्हायचं आहे?

- उमेश जाधव

देड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यात माझं गाव. 2014 साली आयटी इंजिनिअरिंग झाल्यानंतर मी एका सॉफ्टवेअर कंपनीत 18 महिने काम केलं. पहिल्या पगारासोबत आलेलं आर्थिक स्वातंत्र्य, पुण्यातलं - कार्पोरेटचं आरामदायक आयुष्य असं वर्षभर एकदम सुखात गेलं. नंतर नंतर ते करताना माङया कामाचा रिलेव्हन्स कळत नव्हता. एका मोठय़ा अमेरिकन कंपनीला विभागवार नफा-तोटा समजून घ्यायला मी दुपारी 2 ते रात्नी 12 र्पयत काम करायचो. वीकेण्डला नवीन नवीन ट्रेक्स. पण ते करूनही सोमवारी कामात उत्साह वाटायचा नाही. फक्त पैसे मिळताहेत म्हणून तेच करत राहावं हे पटलं नाही. एकदाच मिळालेलं आयुष्य मला हे असं घालवायचं नव्हतं. पोटाला भाकर, डोक्याला आव्हान आणि मनाला समाधान देणारं काय काम करायचं याचं उत्तर मी शोधत होतो. मग मला निर्माणविषयी समजलं. निर्माण प्रक्रियेत शेती, शिक्षण, रोजगार, आरोग्य या क्षेत्नातील अडचणी, सामाजिक प्रश्न यांची एकमेकांतली गुंतागुंत समजून घेता आली.माझं आयटीचं शिक्षण आणि थोडाफार अनुभव वापरून मी कुठल्या सामाजिक प्रश्नावर काम करू शकता? प्रश्न सोडवण्याच्या वेगवेगळ्या मार्गापैकी मी कुठला मार्ग निवडू? म्हणजे डोमेन आणि स्पेसिफिक रोलच्या शोधात होतो. एखाद्या प्रश्नाबद्दल अगदी खोलात जाऊन समजून घेतलं तर तो सोडवण्यात फार मदत होते. काम करताना डेटा आणि रिसर्च यांचा साधन म्हणून वापर केल्यास ते अधिक परिणामकारक होते हे पाहिलं होतं. तेव्हा सामाजिक प्रश्नांवर रिसर्च कसा करतात त्याची माहिती आणि कौशल्य शिकून घेतले. ग्रामीण भागात दर्जेदार संशोधन करण्याचा अनुभव असलेली सर्च ही संस्था एक नवीन रिसोर्स शोधत होती. निर्माणमुळे शोधग्रामची कार्य पद्धती आणि एकूणच वातावरण आवडलं होतंच. म्हणून सर्चसोबत काम करण्याचा निर्णय घेतला.गडचिरोली जिल्ह्यातील 15क् गावांमध्ये आरोग्य - व्यसनमुक्ती या विषयांवरती  विविध संशोधन प्रकल्पात डाटा सायकल मॅनेजमेण्टची कामं शिकायला मिळाली. रिसर्च मेथडॉलॉजी आणि स्टॅटिस्टिकची हे पुस्तकातून शिकण्यापेक्षा प्रत्यक्ष कामातून शिकताना मजा येते, ते अनुभवलं. कामासाठी सगळा गडचिरोली जिल्हा फिरलो, तिथलं जगणं, संस्कृती, तिथले स्थानिक प्रश्न प्रत्यक्षात पाहत होतो.प्रश्नांची गुंतागुंत समजत होती. हे करताना टीमवर्क शिकलो. चौथी पास आरोग्यदूत आणि एमडी डॉक्टर दोघांसोबत काम केलं. सर्चमध्ये 25 महिन्यात मी ग्रामीण भागात रिसर्च कसा करायचा हे तर शिकलोच; पण तो का करायचा अन् कामात तो कसा वापरायचा हे शिकलो. कुठल्याही सामाजिक प्रश्नावर काम करताना स्थानिकांची त्यातली गुंतवणूक आणि त्यांचं सबलीकरण असल्याशिवाय दुरगामी आणि शाश्वत परिणाम होत नाही हे शिकलो.पुढे घरच्या जबाबदा:यांसाठी मी जानेवारी 2019 मध्ये सर्च सोडलं. नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यात माङया गावात आठ महिने राहिलो. फक्त गावात राहून ग्रामीण मराठवाडय़ातील विविध प्रश्नांची गुंतागुंत पाहत होतो. गावागावात रिकामे पारावर बसून व्हॉट्सअॅप आणि टिकटॉक - टिकटॉक करणारे 15-20 पोरांचे टोळके दिसत होते. पंजा/बाण/घडय़ाळ/कमळाच्या राजकारणावर गप्पा करणारे एक-से-एक बहाद्दर भेटत होते. पण भवताली पाण्याचं दुर्भिक्ष. लोकांशी बोलताना एक गोष्ट जाणवली की, आपण भयानक अवस्थेत जगत आहोत, गंभीर प्रश्न आहेत हे त्यांना कळत होतं. त्याविषयी ते बोलतही; पण ते प्रश्न सोडविण्यासाठी आपण काही करू शकतो, ते कुठेच येत नव्हतं. एखाद्या गावाच्या/भागाच्या समस्या सोडविण्यात आणि विकासात तिथल्या लोकांचा सहभाग कसा वाढवता येईल? ग्रामपंचायतीच्या प्रत्येक निर्णयात लोकांचा मत असणारी खरी लोकशाही आणण्यात मी काय करू शकतो हे शोधायला सुरू केलं. 73 व्या घटना दुरु स्तीत मिळालेल्या ग्रामसभेच्या हक्कांबद्दल, त्रिस्तरीय पंचायतराज व्यवस्थेबद्दल वाचलं. तेव्हाच महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागातर्फे सुरू झालेल्या ग्रामीण सामाजिक परिवर्तन अभियानात असलेल्या एका संधीबद्दल कळालं. डाटा अॅनालिसिस स्किल्स आणि गडचिरोलीच्या अनुभवाच्या जोरावर माझी निवडही झाली, ऑगस्टमध्ये डाटा ड्रिव्हन गव्र्हन्मेण्ट कन्सलण्टण्ट म्हणून रु जू झालो.राज्यातील एक हजार गावांचा लोकसहभागातून आदर्श गाव म्हणून शाश्वत विकास करणं असं या कार्यक्र माचे ध्येय आहे. प्रत्येक ग्रामपंचायत दरवर्षी आपला विकास आराखडा बनविते. गावाचा विकास करायचा म्हणजे काय करायचं?  मिळणा:या निधीतून कुठली विकासकामं घ्यायची? शाळेचं छत दुरु स्त करायचं आधी की पांदण रस्ते/नाली बांधकाम आधी  ते  ग्रामसभेत चर्चा करून सर्वानुमते ठरवणं अपेक्षित असतं. सगळे आराखडे कागदावर बनतात. त्यातही फारच तोकडं आणि गरजेचंच नियोजन असतं. संपूर्ण गावाची नेमकी गरज घेऊन हा व्हिलेज डेव्हलपमेण्ट प्लॅन कॉम्प्रसिव्ह बनवता येईल आणि हा आराखडा डिजिटली बनवला तर त्यातील विकासकांची प्रगती ट्रॅक करण्यासाठी सोप्पं होईल, असा ठरवून आम्ही जीपीडीएस एमआयएस मॉनिटरिंग सिस्टिम बनवली.आज कार्यक्र माच्या एक हजार गावांमध्ये या एमआयएसवर विकासकामांचे नियोजन आणि मॉनिटरिंग होत आहे. कामांची प्रगती काय आणि कुठली कामे प्रलंबित आहेत ती यादी वेळोवेळी वरिष्ठ अधिका:यांना जाते. 

त्याने प्रलंबित असलेली कामे लवकर होतात. विकासकामांच्या नियोजनात ग्रामसभेचा सहभाग, विकासकामांच्या खर्चात पारदर्शकता आली हे मी पाहतोय. कामात मला ग्रामपंचायत ते मंत्नालयार्पयत असलेली सरकारी यंत्नणा पाहायला मिळाली. मोबाइलमुळे माहिती तंत्नज्ञान/इंटरनेट सगळीकडे पोहोचलंय; परंतु ग्रामविकासाच्या कामांत माहिती विश्लेषणाचा वापर अजून हवा तितका झालेला नाही. तो व्हायला हवा असं वाटतं.प्रत्येकजण समाजाला काहीतरी देऊ शकतो, फक्त त्याची गरज कुठेय आणि मी कसं करू ते समजून घेतलं पाहिजे. मी त्याच वाटेवरचा प्रवासी आहे.

 

निर्माणमध्ये सहभागी व्हायचं आहे?तरुणांना अर्थपूर्ण जगण्याचा शोध घ्यायला मदत करणा:या निर्माण या उपक्रमाच्या अकराव्या बॅचसाठीची निवड प्रक्रि या सुरू झाली आहे. त्यात सहभागी व्हायची इच्छा असेल तर http://nirman.mkcl.org  या संकेतस्थळावर उपलब्ध असलेला अर्ज भरता येईल.अधिक माहितीही याच संकेतस्थळावर मिळू शकेल.