शहरं
Join us  
Trending Stories
1
Achyut Potdar Death: "अरे कहना क्या चाहते हो.." डायलॉगफेम फेम ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार काळाच्या पडद्याआड
2
युद्ध थांबणार...! "खूप आनंद वाटतोय, रशियाच्या राष्ट्राध्यक्षांना फोन केला..."; झेलेन्स्की यांच्या सोबतच्या बैठकीनंतर, काय म्हणाले ट्रम्प? 
3
१००पेक्षा जास्त लोकल रद्द, नाेकरदारांचे मेगा हाल! मुंबई विद्यापीठाने परीक्षा पुढे ढकलल्या!
4
वाचवा म्हणत तरुणीची कारमधून उडी, पाठलाग सुरु असतानाच थारची रिक्षाला धडक, ५ जणांचा मृत्यू
5
आजचे राशीभविष्य, १९ ऑगस्ट २०२५: कुटुंबात वाद संभवतात, नोकरीतील वातावरण चिंताजनक असेल
6
शाळेला निघालेली मुलं पाेलिस ठाण्यात! माटुंगा येथे दोन स्कूल बस अडकल्या गुडघाभर पाण्यात...
7
अतिवृष्टीचा ४ लाख हेक्टरवरील पिकांना फटका; मुंबईसह कोकण, मराठवाड्यात पावसाचे धुमशान
8
मुंबई: वडाळ्यात बेस्ट बसच्या धडकेत टॅक्सीची वाट बघत उभ्या असलेल्या आई, मुलाचा मृत्यू
9
पावसाचा मंडे ‘ब्लॉक’! चाकरमानी स्टेशनावर अडकले, चार तासांत उपनगरात ७५ मि.मी. पाऊस
10
मुदतीत थकबाकी न भरल्यास संरक्षण नाहीच, भाडे न देणाऱ्याची हकालपट्टी निश्चित: सुप्रीम कोर्ट
11
माेफत शिका, तुम्हीही ‘एआय’ एक्स्पर्ट बना; केंद्राच्या स्वयम पोर्टलवर अनेक काेर्सेस उपलब्ध
12
मुंबई, ठाण्याची दैना; आठवड्याच्या पहिल्याच दिवशी दाणादाण; आज रेड अलर्ट तर उद्या यलाे अलर्ट!
13
मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात ‘इंडिया’कडून महाभियोगाची तयारी; मतदारयादी त्रुटींबाबत आक्रमक
14
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
15
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
16
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
17
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
18
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
19
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
20
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?

आयुष्याची इस्त्री मोडणारी भन्नाट जादू

By admin | Updated: October 14, 2016 12:56 IST

या रोडट्रिपने माझ्या डोक्यातला कचरा झाडून काढला आणि माझी नजर बदलली. माझ्या टेबलावर रोज येणाऱ्या बातम्यांपलीकडची, बातमीतली माणसं प्रत्यक्षात कशी जगतात हे शिकवलं मला या प्रवासाने !!

- ओंकार करंबेळकरबिझवादा विल्सन. हे नाव मी वाचलेलं होतं. मैला वाहून नेणाऱ्या लोकांच्या प्रश्नांसंदर्भात केलेल्या कामासाठी त्यांना मॅगसेसे पुरस्कार मिळाला हे रोजच्या धबडग्यातल्या बातमीनं मला सांगितलं होतं..आमच्या प्रवासात मदुराईत मुक्कामी होतो. स्थानिक इंग्रजी वर्तमानपत्रात बातमी वाचली की, एका सफाई कामगाराचा गटारीत श्वास गुदमरून मृत्यू झाला. त्यावेळी त्याची पत्नी गरोदर होती..या दोन बातम्या; एरवी त्या बातम्यातलं वास्तव, त्यांचं गांभीर्य मला जाणवलंही नसतं. बातम्यांसारख्या बातम्या. शहरी आयुष्यात आपल्याला या प्रश्नांची कल्पनाही नसते, त्याची धग बसत नाही किंवा अशा गोष्टींकडे पाहताना आपले डोळे आपोआप झाकले गेलेले असतात.मात्र मदुराईहून पुढे होसूर-बेंगळुरूच्या दिशेनं निघालो आणि त्या वाटेवर थोडंसं आता ‘केजीएफ’ अर्थात कोलार गोल्ड फार्म्स हे गाव आहे असं कळलं. एकेकाळी सोन्याच्या खाणी होत्या. त्या आता बंद झालेल्या आहेत. पण त्या गावचेच आहेत बिझवादा विल्सन हे कळलं. आणि आम्ही त्या गावात पोहचलो. त्या गावात ना त्यांच्या संस्थेचं कार्यालय होतं, ना कुठल्या स्वयंसेवी संस्थेचे फलक, ना कार्यकर्ते. एक बाबूलाल म्हणून गृहस्थ भेटले ते आम्हाला विल्सन यांच्या घरी घेऊन गेले..तिथं भेटले त्यांचे भाऊ, वहिनी, पुतण्या, सून. त्यांना हिंदी, इंग्रजी येत नव्हतं. पण त्यांच्या घरची सून विदर्भातल्या वाशीमची होती. राणी नाव तिचं. विल्सन यांचे भाऊ जे सांगत होते ते राणीनं आम्हाला मराठीत रूपांतर करून सांगितलं. पण सांगताना त्या मुलीच्या डोळ्यात पाणी होतं. हे विल्सनकाकाही स्वत: हातानं मैला वाहण्याचं काम करत होते. केजीएफमधल्या मैलावाहू जगातलं सत्य ते सांगत होते, मैला वाहणं हेच आपलं काम असं वाटणाऱ्या माणसांना त्यातून बाहेर काढणं किती अवघड होतं हे जे सांगत होते ते ऐकताना आमचाही श्वास कोंडत होता. पोटात तुटत होतं इतकं ते असह्य होतं..सफाई कामगारांचं जग, त्यांचे प्रश्न, त्यांनी उचललेली लोकांची घाण, वाट्याला आलेली कुचंबणा आणि गरिबी हे सारं यानिमित्तानं मला प्रत्यक्ष कळलं..माझी नजर बदलली आणि बातमीपलीकडची, बातमीतली माणसं कशी जगतात हे समजून घेण्याचा एक मोठा धडाच मी इथं शिकलो..मुंबईत आॅफिसात बसून काम करताना, रोजच्या बातम्यांचा ढीग वाचताना माझ्या एक लक्षात येत होतं की, हा देश एकसारखा उभा-आडवा सपाट नाही. पण बातम्यांमधून समजणारा भारत आणि बातमीत न येणारा भारत यात किती अंतर असतं हे मला प्रत्यक्ष रस्त्यावर उतरलो तेव्हाच कळलं. हा प्रवास करण्यापूर्वी आठवड्याकाठी येणारी नवी पुस्तकं, सिनेमे, फारसा बदल न होणारं एकसुरी रुटीन हे सारं माझ्याही एकप्रकारची स्थिरता आलेल्या जगण्याचा भाग होतं. तसंही आपण सारेच काहीच नवं न घडणारं आयुष्य शहरांमध्ये जगत असतो. ऐन तारुण्यात आयुष्याची घडी बसविण्यासाठी आणि ती घडी कायम राहण्यासाठीची धडपड आपण चालवलेली असते. वरपांगी स्थिर वाटणारी एक घडी मलाही बसवावी लागलीच होती. ती घडीच नाही तर त्या घडीवरची इस्त्री मोडली ती या प्रवासात ! प्लॅनिंग करून, ठरल्या गोष्टी ठरल्या वेळेत आपल्या अपेक्षेप्रमाणेच घडण्याची, होण्याची सवय झालेल्या मनाला अनिश्चिततेतली गंमत कळली. अनिश्चिततेत किती थ्रिल असतं हे प्रवासात पहिल्याच दिवसापासून कळत गेलं. रोजचा कोरा दिवस वाट्याला येणं आणि संध्याकाळ होता होता आपल्याला माहितीही नसलेले रंग त्या कोऱ्या दिवसात भरून हसणं हे किती सुखावह असू शकतं, हे शब्दात सांगणं जरा अवघड आहे.एक नक्की, ऐकीव माहिती, वाचलेली माहिती आणि वस्तुस्थिती यातलं खरंखोटं प्रवासात रोज लक्षात यायला लागलं. विकास म्हणजे पसरत चाललेली शहरं, रस्ते, गाड्या, खर्च करायला भरपूर पैसा किंवा आराम करण्याची साधनं असा विचार बहुतेक वेळेस केला जातो, तो किती वरवरचा आहे हे रस्त्यावरच्या माणसांशी बोलताना जाणवत राहिलं.आणि त्यातूनच उमगलं, की आताशा आपली खेडी जास्त वेगानं बदलू लागली आहेत. बदलांकडे, नव्या विचारांकडे, तंत्रज्ञानाकडे तरुण पिढी कशी पाहते याची उत्तरं जागोजागी भेटलेल्या, हातात स्मार्टफोन आणि सदैव आॅनलाइन असणाऱ्या अनेकांनी दिली. काहींनी तर मलाच बसल्याबसल्या यू ट्यूबवरचे व्हिडीओ दाखवण्यापासून जीपीएस कसं काम करतं हे जरा समजावून सांगितलं. अनोळखी माणसालाही सांगावं समजावून इतकी तंत्रज्ञानाची क्रेझ मोठी दिसते. तंत्राची भाषा अशी बोलते पण दक्षिण भारतात खरी समस्या येते ती म्हणजे भाषेची. इंग्रजी शिक्षण आणि हिंदी सिनेमामुळे आताशा थोडी स्थिती बदलली असली, तरी सामान्य माणसांशी संवाद साधताना अडचणी आल्याच. एकाच देशात राहून दुसरी प्रादेशिक भाषा शिकण्याचा प्रयत्न आपल्याकडून होत नाही. हिंदीबरोबर एखादी प्रादेशिक भाषा आपण शिकलो तर कदाचित आपण आपला देश अधिक चांगला समजून घेऊ असं परत आल्यावर मला जाणवत राहिलं.भारत प्रवास नावाच्या या रस्त्यावरच्या शाळेत मला शेकडो गुरू भेटले. प्रवास आणि अनुभव यांनी खरंतर आपल्याला काय येत नाही, काय माहिती नाही याचीच जाणीव करून दिली. आपलीच माणसं, आपला देश समजून घेण्यासाठी ही जाणीव यापुढे मदत करत राहील, अशी आता खात्री वाटते..( लेखक लोकमतच्या मुंबई आवृत्तीत उपसंपादक आहेत.)onkark2@gmail.com