शहरं
Join us  
Trending Stories
1
एपस्टीन सेक्स स्कँडल: जगभरातील नेत्यांची झोप उडाली! दोन दिवस उरले, भारतीय नेत्यांचेही नाव?
2
तुळजापुरात भाजप-मविआच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा; काग्रेस उमेदवाराचा पुतण्या गंभीर जखमी
3
बारामतीतील मुलीवर अंबाजोगाईमध्ये सामूहिक बलात्कार, बदामबाईने आधी कला केंद्रावर नेलं, नंतर लॉजवर...
4
संतापजनक...! IAS अधिकाऱ्याची गाडी तपासली; गोव्याच्या एसपींनी पोलिसांनाच दिली उठाबशांची शिक्षा...
5
निवृत्तीनंतर हातात येणार रग्गड पैसा! NPS चे नवीन नियम लागू; ५ वर्षांचा 'लॉक-इन' कालावधी संपला
6
माणिकराव कोकाटे यांचे मंत्रिपद जाणार? आज अजित पवार यांची भेट घेणार, मोठ्या निर्णयाची शक्यता
7
शिंदेसेना ही अमित शाहांची 'टेस्ट ट्यूब बेबी', त्यांचा नैसर्गिक जन्म नाही; राऊतांची बोचरी टीका
8
Video - बापमाणूस! ६० फूट खोल बोरवेलमध्ये पडलेल्या लेकीसाठी वडिलांनी लावली जिवाची बाजी
9
विमा क्षेत्रात आता १००% परकीय गुंतवणुकीला मंजुरी; सर्वसामान्यांना स्वस्त पॉलिसी आणि चांगले पर्याय मिळणार?
10
'इस्लामिक दहशतवादाविरोधात उभे राहण्याची गरज', व्हाइट हाऊसमधून ट्रम्प यांचं आवाहन; केली मोठी घोषणा
11
महायुतीत एकनाथ शिंदेंची कोंडी; मुंबईत भाजपानं शिंदेसेनेला केवळ ५२ जागांचा दिला प्रस्ताव?
12
१९ तारखेला अत्यंत स्फोटक माहिती उघड होणार, ज्यानं भाजपा नेत्यांची फजिती होईल; संजय राऊतांचा दावा
13
टीम इंडियाला मल्टीप्लेक्समध्ये पाहून सगळचे चकीत झाले...; मैदानातील सगळेच धुरंधर 'धुरंधर' पहायला गेलेले...
14
Crime: बुरखा न घातल्यानं पती संतापला, पत्नीसह पोटच्या २ मुलींना संपवलं; मृतदेह पुरले खड्ड्यात!
15
कोण आहे डोनाल्ड ट्रम्प यांची होणारी सून...! मंगळवारीच उरकला साखरपुडा, दोघे भारतातही येऊन गेलेले...
16
उद्धव-राज विरुद्ध भाजप-शिंदेसेना असाच सामना; १३८ मराठी बहुल मतदारसंघ या निवडणुकीत ठरणार निर्णायक
17
सरकार आणखी एका बँकेतील हिस्सा विकण्याच्या तयारीत; खात्यात येणार २१०० कोटी, सध्या आहे ९५% हिस्सा
18
'उद्याच्या तेजस्वी पहाटेसाठी!' रितेश देशमुखचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेतील पहिला लूक समोर
19
"महापालिका निवडणूक लुटण्याचे वाटे केले गेले"; अंजली दमानियांचा निशाणा, महायुतीवर भडकल्या
20
प्रसिद्ध दिग्दर्शक आणि पत्नीच्या हत्या प्रकरणाला नवं वळण, पोलिसांनी लेकालाच केली अटक
Daily Top 2Weekly Top 5

आपल्याला लाइफमध्ये काई व्हॅल्यू हाय की नाय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2019 16:32 IST

गावात रिकाम्या भटकणार्‍या तरुण पोरा-पोरींचं लाइफ बदलू शकेल अशी एक नवी किल्ली..

ठळक मुद्देकाही गावांना सापडती ती शायनिंग. तिथल्या माणसांना आहे किंमत. त्यांच्या जगण्याला आहे मान. कसा? कुठे? कशामुळे?

 

रामराम आणि हाय! (म्हणजे मराठीत हाय खाल्ली म्हन्तात ती न्हवं, इंग्रजी हाय गाइज मधला हाय)मित्रांनो, असं लिहिण्याचं कारण की, आम्ही राहतो गावात, पण डोकं भादरून घेतो शहरात. शिकतो शहरात; पण सांजच्याला घरी येतो तवा आई म्हन्ते गुरांना पाणी घाल. पतंग राहिला तिकडे अन् फिरकी, मांजा इकडे. नोकरी-नोकरी-नोकरी म्हणत बसगाडय़ा जणू येतात, अन् मागं फाइल घेऊन धावणार्‍या आमच्यासारख्या आशाळभुतांच्या गर्दीतून एखाद्यालाच नेतात. बाकी बस आधीच पॅक राहाते बघा! मग आम्ही मागे राहणारे गावात राहातो. बापाच्या शेतीत, आईच्या मातीत राहायचं स्वीकारतो. राहायचंच गावात म्हटल्यावर रडत-कुंथत कशाला राहायचं? चांगलं टेचात -रूबाबात राहावं म्हनतो. पण रूबाब म्हंजे बुलेट बाइक पाहिजे, मनगटावर अन् गळ्यात गोल्डन चैन पाहिजे. ओरिजनल नाही तर डुप्लिकेट तरी पाहिजेच पाहिजे राव! आणि ग्वागल तर डोळ्यावर राहतोच तसा आपल्या! पण येवडं करूनसुद्धा स्टेटस नाय ना भेटत आपल्याला. मग एक जास्तीचा पॅक मारतो कदी मदी! पुढार्‍यांचे मागे फिरायचे दिवसाचे पैसे मिळतात, शायनिंगपण होते, बाडीबिल्ड असेल तर जरा जास्तीचं कामबी भेटतं फाइट मारायचं. डबल शायनिंग. कधी जातीची, कधी पक्षाची! पण ही सारी शायनिंग टेम्परवारी असते हो, चार दिवसाची गर्लफ्रेंड जणू!नंतर पुढारी पुढे जातो नि आम्ही हाय तितंच राहातो. मग काय करायचं हो? प्रश्न पडतो. आपल्याला लाइफमध्ये काई व्हॅल्यू हाय की नाय? आमच्या शिक्षणाला किंमत नाही, दिसण्याला नाही, वागण्याला नाही. करतो काय मग, कालेजातून बाहेर पडल्यावर? आम्ही आमची शायनिंग शोधतो आहोत.काही गावांना सापडती ती शायनिंग. तिथल्या माणसांना आहे किंमत. त्यांच्या जगण्याला आहे मान. कसा? कुठे? कशामुळे? त्याला कारण त्यांना लोकशाही कळली आहे. या लोकशाहीत प्रत्येकालाच एक स्थान आहे, किंमत आहे; पण हे स्थान राखावे लागते, वापरावे लागते. आपण मतदानालासुद्धा जायचा आळस करतो. खरे तर मतदानापेक्षा बरेच जास्त अधिकार आपल्याला आहेत. गाडीची किल्ली आपल्याकडे आहे; पण आपण किक मारतच नाही. मात्र जे ही गाडी चालवतात, त्यांना त्यातली मजा कळते. कष्टही असतात आणि समाधानही असते. एक साधं उदाहरण सांगतो. 2005 साली माहिती अधिकार कायदा झाला. त्याच काळात जगातल्या शंभरेक देशात असा कायदा झाला. कसा काय? एक कारण तर आपल्याला माहीतच आहे. अरुणा राय, अण्णा हजारे, अरविंद केजरीवाल यांच्यासारख्या देशातल्या कैक कार्यकत्र्यानी असा कायदा व्हायलाच हवा असा आग्रह धरला. आणि दुसरे कारण असे की- जागतिक स्तरावरून आपल्यासारख्या विकसनशील देशांना निधी आणि कर्ज देणार्‍या बॅँका व संस्थांना असे लक्षात आले की, आपण जे पैसे देतो ते मधेच गायब होतात. खाली पोहोचतच नाहीत. म्हणावे तसा विकास होत नाही. जीवनमान उंचावत नाही. मधेच पैसे गायब करण्याची जी खुबी आहे, ती सरकारी कारभारातल्या गोपनीयतेमुळे आहे. इंग्रजांच्या ज्या देणग्या आपल्या सत्ताधार्‍यांनी सांभाळून ठेवल्या, त्यात शासकीय गुपिते ठेवण्याचा कायदाही आहे. जितकी सरकारी माहिती खुली, तितकी भ्रष्टाचाराची शक्यता कमी! हे लक्षात घेऊन जागतिक दबावही आपल्या सरकारवर होता. माहिती अधिकारानंतर इतरही कायद्यांमध्ये नागरिकांच्या अधिकारांवर भर दिला गेला. अनेक राज्य सरकारांनी पब्लिक सव्र्हिसेस अ‍ॅक्ट म्हणजे वेळेवर शासकीय सेवा मिळण्याचा हक्क देणारे कायदेही केले आहेत. या कायद्यांचा वापर करायला खूप जास्त डिग्य्रा घेण्याची गरज नसते, बुडाखाली बाइकही लागत नाही, हातात चैनही नको. नोकरशाहीची सारी शक्ती कायद्याने दिलेली असते. त्यामुळे जो जो नागरिक कायदा वापरून नोकरशाहीशी बोलतो, त्याच्यापुढे सरकार झुकू शकतं. इतकी पावर आहे आपल्या हातात! ती वापरली तर शायनिंग आतून येती बघा मित्नांनो. बोले तो कर के देखना भाऊ! ते तरुणांनी कसं करायचं, कायदे कसे वापरायचे, आपण आपल्याच गावात कायद्याची किल्ली वापरून विकासाचं कुलूप कसं उघडायचं याची सारी सूत्रं सांगतो. पुढच्या अंकापासून.