शहरं
Join us  
Trending Stories
1
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
2
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
3
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
4
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
5
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
6
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 
7
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल
8
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
9
'जरा... जरा मराठी'! गोड 'कॅडबरी'च्या तोंडी मराठीचे 'धडे'; तुम्हीही म्हणाल, खूपच भारी 
10
Agni-6 Missile : मोठी तयारी! अग्नि-६ क्षेपणास्त्र किती धोकादायक? भारत चाचणी करू शकतो, २ दिवसांचा नोटम जारी
11
पालघर: मालवाहू जहाजाची मासेमारी करणाऱ्या बोटीला धडक, चार मच्छिमार पडले समुद्रात; 15 मच्छिमारांना कुणी आणले किनाऱ्यावर?
12
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
13
कोट्यवधीची रोकड, ६.७ किलो सोनं आणि..., काँग्रेसच्या आमदाराकडे सापडलं घबाड, EDची कारवाई   
14
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
15
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
16
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
17
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
18
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
19
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
20
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!

आपल्याला लाइफमध्ये काई व्हॅल्यू हाय की नाय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2019 16:32 IST

गावात रिकाम्या भटकणार्‍या तरुण पोरा-पोरींचं लाइफ बदलू शकेल अशी एक नवी किल्ली..

ठळक मुद्देकाही गावांना सापडती ती शायनिंग. तिथल्या माणसांना आहे किंमत. त्यांच्या जगण्याला आहे मान. कसा? कुठे? कशामुळे?

 

रामराम आणि हाय! (म्हणजे मराठीत हाय खाल्ली म्हन्तात ती न्हवं, इंग्रजी हाय गाइज मधला हाय)मित्रांनो, असं लिहिण्याचं कारण की, आम्ही राहतो गावात, पण डोकं भादरून घेतो शहरात. शिकतो शहरात; पण सांजच्याला घरी येतो तवा आई म्हन्ते गुरांना पाणी घाल. पतंग राहिला तिकडे अन् फिरकी, मांजा इकडे. नोकरी-नोकरी-नोकरी म्हणत बसगाडय़ा जणू येतात, अन् मागं फाइल घेऊन धावणार्‍या आमच्यासारख्या आशाळभुतांच्या गर्दीतून एखाद्यालाच नेतात. बाकी बस आधीच पॅक राहाते बघा! मग आम्ही मागे राहणारे गावात राहातो. बापाच्या शेतीत, आईच्या मातीत राहायचं स्वीकारतो. राहायचंच गावात म्हटल्यावर रडत-कुंथत कशाला राहायचं? चांगलं टेचात -रूबाबात राहावं म्हनतो. पण रूबाब म्हंजे बुलेट बाइक पाहिजे, मनगटावर अन् गळ्यात गोल्डन चैन पाहिजे. ओरिजनल नाही तर डुप्लिकेट तरी पाहिजेच पाहिजे राव! आणि ग्वागल तर डोळ्यावर राहतोच तसा आपल्या! पण येवडं करूनसुद्धा स्टेटस नाय ना भेटत आपल्याला. मग एक जास्तीचा पॅक मारतो कदी मदी! पुढार्‍यांचे मागे फिरायचे दिवसाचे पैसे मिळतात, शायनिंगपण होते, बाडीबिल्ड असेल तर जरा जास्तीचं कामबी भेटतं फाइट मारायचं. डबल शायनिंग. कधी जातीची, कधी पक्षाची! पण ही सारी शायनिंग टेम्परवारी असते हो, चार दिवसाची गर्लफ्रेंड जणू!नंतर पुढारी पुढे जातो नि आम्ही हाय तितंच राहातो. मग काय करायचं हो? प्रश्न पडतो. आपल्याला लाइफमध्ये काई व्हॅल्यू हाय की नाय? आमच्या शिक्षणाला किंमत नाही, दिसण्याला नाही, वागण्याला नाही. करतो काय मग, कालेजातून बाहेर पडल्यावर? आम्ही आमची शायनिंग शोधतो आहोत.काही गावांना सापडती ती शायनिंग. तिथल्या माणसांना आहे किंमत. त्यांच्या जगण्याला आहे मान. कसा? कुठे? कशामुळे? त्याला कारण त्यांना लोकशाही कळली आहे. या लोकशाहीत प्रत्येकालाच एक स्थान आहे, किंमत आहे; पण हे स्थान राखावे लागते, वापरावे लागते. आपण मतदानालासुद्धा जायचा आळस करतो. खरे तर मतदानापेक्षा बरेच जास्त अधिकार आपल्याला आहेत. गाडीची किल्ली आपल्याकडे आहे; पण आपण किक मारतच नाही. मात्र जे ही गाडी चालवतात, त्यांना त्यातली मजा कळते. कष्टही असतात आणि समाधानही असते. एक साधं उदाहरण सांगतो. 2005 साली माहिती अधिकार कायदा झाला. त्याच काळात जगातल्या शंभरेक देशात असा कायदा झाला. कसा काय? एक कारण तर आपल्याला माहीतच आहे. अरुणा राय, अण्णा हजारे, अरविंद केजरीवाल यांच्यासारख्या देशातल्या कैक कार्यकत्र्यानी असा कायदा व्हायलाच हवा असा आग्रह धरला. आणि दुसरे कारण असे की- जागतिक स्तरावरून आपल्यासारख्या विकसनशील देशांना निधी आणि कर्ज देणार्‍या बॅँका व संस्थांना असे लक्षात आले की, आपण जे पैसे देतो ते मधेच गायब होतात. खाली पोहोचतच नाहीत. म्हणावे तसा विकास होत नाही. जीवनमान उंचावत नाही. मधेच पैसे गायब करण्याची जी खुबी आहे, ती सरकारी कारभारातल्या गोपनीयतेमुळे आहे. इंग्रजांच्या ज्या देणग्या आपल्या सत्ताधार्‍यांनी सांभाळून ठेवल्या, त्यात शासकीय गुपिते ठेवण्याचा कायदाही आहे. जितकी सरकारी माहिती खुली, तितकी भ्रष्टाचाराची शक्यता कमी! हे लक्षात घेऊन जागतिक दबावही आपल्या सरकारवर होता. माहिती अधिकारानंतर इतरही कायद्यांमध्ये नागरिकांच्या अधिकारांवर भर दिला गेला. अनेक राज्य सरकारांनी पब्लिक सव्र्हिसेस अ‍ॅक्ट म्हणजे वेळेवर शासकीय सेवा मिळण्याचा हक्क देणारे कायदेही केले आहेत. या कायद्यांचा वापर करायला खूप जास्त डिग्य्रा घेण्याची गरज नसते, बुडाखाली बाइकही लागत नाही, हातात चैनही नको. नोकरशाहीची सारी शक्ती कायद्याने दिलेली असते. त्यामुळे जो जो नागरिक कायदा वापरून नोकरशाहीशी बोलतो, त्याच्यापुढे सरकार झुकू शकतं. इतकी पावर आहे आपल्या हातात! ती वापरली तर शायनिंग आतून येती बघा मित्नांनो. बोले तो कर के देखना भाऊ! ते तरुणांनी कसं करायचं, कायदे कसे वापरायचे, आपण आपल्याच गावात कायद्याची किल्ली वापरून विकासाचं कुलूप कसं उघडायचं याची सारी सूत्रं सांगतो. पुढच्या अंकापासून.