शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

स्वातंत्र्यापूर्वीची वसाहत खिळखिळी

By admin | Updated: August 31, 2014 01:09 IST

मारूती कदम ,उमरगा जनतेची सुरक्षा करणाऱ्या येथील पोलिस कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानासाठी १९३० साली उभारण्यात आलेली घरे खिळखिळी झाली असून, यामुळे कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांचे जीव धोक्यात आले आहेत.

मारूती कदम ,उमरगाजनतेची सुरक्षा करणाऱ्या येथील पोलिस कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानासाठी १९३० साली उभारण्यात आलेली घरे खिळखिळी झाली असून, यामुळे कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांचे जीव धोक्यात आले आहेत.येथील राष्ट्रीय महामार्गालगत नगर पालिकेच्या शेजारी पोलिस कर्मचाऱ्यांच्या निवासासाठी १९३० साली चुनखडीच्या सहाय्याने ४८ घरांची उभारणी प्रशासनाच्या वतीने करण्यात आली. त्यानंतर २०१२ साली १२ घरे बांधण्यात आली. एकूण दोन एकर जागेच्या परिसरात ६० घरांची उभारणी करण्यात आली आहे. त्याकाळी मर्यादित कुटुंब संख्या समजून घेवून बांधण्यात आलेली घरे पोलिस कर्मचाऱ्यांसाठी तुटपूंजी पडू लागली आहेत. शिवाय देशाच्या स्वातंत्र्यापूर्वी उभारण्यात आलेल्या या घरांच्या भिंतीचे बांधकाम खिळखिळे झाले आहे. एकूणच जनतेची सुरक्षा करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानाचा प्रश्न गंभीर झाल्याने पोलिस कर्मचारी त्रस्त झाले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने या जागेत नवीन पोलिस कर्मचारी वसाहत उभारण्याची गरज निर्माण झाली आहे.पाठपुरावा सुरुयेथील पोलिस कर्मचारी वसाहतीची दुरवस्था झाली आहे. या घरात पोलिस कर्मचाऱ्यांना राहणे त्रासदायक झाले आहे. पालिकेच्या नळपट्टीचा भरणा करुनही एकाही घराला पालिकेने अद्याप नळ कनेक्शन केले नाही. वसाहतीच्या उभारणीबाबत वेळोवेळी सार्वजनिक बांधकाम विभागाशी लेखी पत्रव्यवहार करुनही उपयोग होत नाही. आमच्याकडे दुरुस्तीसाठी व बांधकामासाठी बजेट नाही हे एकच उत्तर गेल्या अनेक वर्षापासून दिले जात आहे. याबाबत नूतन पोलिस अधीक्षक अभिषेक त्रिमुखे यांनाही माहिती देण्यात आली असून, सहाय्यक पोलिस अधीक्षक एम. राकेश कलासागर व पोलिस ठाण्याच्या वतीने पाठपुरावा सुरु असल्याची माहिती पोलिस निरीक्षक सुनिल निकाळजे यांनी दिली.