शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

आपल्याला अन्नच मिळालं नाही तर?,असं कोणालाही विचारलं, तर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2017 12:32 IST

२००९ पासून या जागतिक संस्थांचे लक्ष पहिल्यांदा ‘जगातला अन्नधान्याचा तुटवडा’ या विषयाकडे वळलं.

- प्रज्ञा शिदोरे 

भारताला भेडसावणारे महत्त्वाचे ५ प्रश्न कोणते?- असं कोणालाही विचारलं, तर भारतातील अन्नधान्याचा तुटवडा किंवा शेतीचा प्रश्न, शेतीला बाजारभाव न मिळणे या संबंधीचा प्रश्न हा पहिल्या तीनात नक्कीच असेल.अर्थात, असं आपल्यालाच वाटतं असं नाही तर आता वर्ल्ड बँक, युनायटेड नेशन्स फूड प्रोग्रॅम अशा संस्थाही या प्रश्नाबाबत सजग झालेल्या आहेत.२००९ पासून या जागतिक संस्थांचे लक्ष पहिल्यांदा ‘जगातला अन्नधान्याचा तुटवडा’ या विषयाकडे वळलं. या प्रश्नाचं मूळ होतं ते ‘आपण २०५० साली जगाच्या ९ अब्ज लोकसंख्येला कसे अन्नधान्य पुरवणार?’ या प्रश्नात. याला इतिहास होता तो २००८ सालच्या मंदीचा.२००८ साली जगभरातल्या अन्नधान्याच्या किमती प्रचंड प्रमाणात वाढल्या. लोकांचे हाल होत होते. जगभरातल्या नेत्यांना आपलं या विषयाकडे लक्ष आहे आणि आपण त्यासाठी पावलं उचलतो आहोत, हे दाखवायचं होतं. त्यामुळे अनेक आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर या विषयाची चर्चा भलतीच रंगात आली.हे सगळं समजायला जरा अवघड आहे असं वाटलं ना?असंही वाटेल की २०५० अजून लांब आहे, आपला काय संबंध या प्रश्नाशी?पण, आपण जर या प्रश्नाचा सूर बदलला तर कदाचित हा प्रश्न आपल्याला नीट समजू शकेल.अमेरिकास्थित सारा मेनकर यांनी या प्रश्नाची उकल करायचं ठरवलं. सारा या खरं तर आंतरराष्ट्रीय बाजारपेठांच्या विश्लेषक. आपली घसघशीत पगाराची वॉलस्ट्रीट वरची नोकरी सोडून त्यांनी या प्रश्नाचा छडा लावण्याची तयारी सुरू केली. आणि ग्रो इंटेलिजंट नावाची एक संस्था सुरू केली. त्यांनी या प्रश्नावर काम सुरू केलं. त्यांच्या अभ्यासानुसार जर आपण आत्ताच काही दूरगामी बदल आखले नाही तर अन्नधान्याचं हे संकट यायला आपल्याला २०५० ची वाट बघायला लागणार नाही. पुढच्या काहीच वर्षांत, म्हणजे साधारण अजून दहाएक वर्षात आपल्याला हे संकट भेडसावणार आहे, असं त्या म्हणतात.त्यांच्या मते, या प्रश्नाची उकल करण्यात सर्वात मोठा अडथळा आहे तो आकड्यांचा. आणि आकडे नसल्यामुळे आपल्या राज्यकर्त्यांना आपल्या देशातल्या/राज्यातल्या अन्नधान्याच्या समस्येवर उत्तरे शोधता येत नाहीत. त्यांनी सांगितलेल्या आकड्यांनुसार २०२७ पर्यंत जगात २१३ ट्रिलियन कॅलरिजचा (उष्मांकाचा) तुटवडा भासणार आहे. ५० वर्षांपूर्वी देश अन्नधान्य निर्यात करत नव्हते; पण जागतिकीकरणाच्या रेट्यात आपण आपली खाद्यसंस्कृती बदलली. आणि नेमक्या गरीब देशांना अन्नधान्याचा तुटवडा भासू लागला. याबरोबरच जगात लोकांचा मांसाहार वाढला. मांसाहारासाठी, प्राण्यांना वाहवण्यासाठी आणि खूप संसाधनं खर्ची घालावी लागणार.हा तुटवडा कसा भरून काढायचा? त्यासाठी आपण काही करू शकतो का?ते काय?हे समजून घेण्यासाठी टेड टॉकवरचं हे भाषण नक्की ऐका. सारा आपल्या मांडणीमध्ये भारतातील हरितक्र ांतीचे उदाहरण देतात आणि म्हणतात की, या हरितक्रांतीचे तोट्यापेक्षा फायदेच अधिक दिसत आहेत. यामुळेच भारतावर १९६० नंतर अन्नधान्य एवढ्या मोठ्या प्रमाणात आयात करण्याची वेळ नाही आली. यामुळेच एवढी अधिक लोकसंख्या असूनही स्वातंत्र्यानंतर भूकबळीचे प्रमाण भारतात कमीच आहे. अशी हरितक्रांती आफ्रिकेच्या एकाही देशात नाही झाली. आणि आज आफ्रिका दरवर्षी सर्वाधिक प्रमाणात अन्नधान्य आयात करत असते.फूड क्रायसिस नक्की काय असतो?सारा हे एक उदाहरण सांगतात, आजही आपल्या देशात दर चौथा माणूस उपाशी आहे. आणि तो का? हे समजून घेण्यासाठी ‘वर्ल्ड फूड प्रोग्रॅम’चा ‘ग्लोबल रिपोर्ट आॅन फूड क्र ायसिस’ म्हणजेच अन्नसंकटाविषयीचा जागतिक अहवाल नक्की वाचा. याच वर्षी मार्च महिन्यात प्रकाशित झालेल्या या अहवालामध्ये जागतिक अन्नसंकटाविषयीची आकडेवारी आपल्याला वाचायला मिळेल. संपूर्ण अहवाल हा तब्बल १४७ पानांचा आहे; पण पटकन माहीत करून घेण्यासाठी त्याचं १६ पानी संक्षिप्त स्वरूप नक्कीच तुम्हाला वाचता येईल. यामध्ये जगातील कोणते देश अन्नसुरक्षेमध्ये सर्वात मागे आहेत त्याची उत्तम मांडणी केली आहे. त्याबरोबरच आंतरराष्ट्रीय संस्थांनी हा विषय कसा हाताळावा, या विषयीची माहितीसुद्धा दिली आहे.अन्नसंकट आज भारताला जरी भेडसावताना दिसत नसलं तरीही त्याची सुरुवात शेतकºयांच्या प्रश्नापासून झाली आहे मित्रांनो. आज देशात कित्येक हजार शेतकºयांनी आत्महत्या केल्या आहेत. यामागची जागतिक स्तरावरची कारणे समजून घेण्यासाठी हा टेड टॉक आणि वर्ल्ड फूड प्रोग्रॅमचा २०१७ साली प्रकाशित झालेला अहवाल नक्की वाचा!