शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

शहरी निसर्गाची ओळख

By अोंकार करंबेळकर | Updated: April 27, 2018 19:58 IST

निसर्ग पहायला आपण निसर्गरम्यस्थळी जातो.. कशाला? आपल्या अवतीभोवतीही निसर्ग असतोच की..

शहरात कसला आलाय निसर्ग. निसर्ग म्हटलं की डोंगर पाहिजेत, नद्या पाहिजेत, भरपूर पक्षी-प्राणी हवेत, गवत हवे वगैरे वगैरे अशा समजुती आपल्याकडे असतात. शहरामध्ये काही नसतंच असं अनेकांना वाटतं; पण ही समजूत एका मुंबईकर मुलीने मोडीत काढली आहे. आपल्याकडच्या शहरांमध्येही कित्येक वर्षे जुनी झाडे आहेत, वेगवेगळ्या जातींचे दुर्मीळ वृक्ष मुंबई-पुण्यासारख्या शहरांमध्ये बागांमध्ये किंवा रस्त्यांच्या दुतर्फा लावलेले आहेत. काही वृक्ष ब्रिटिशकालीनसुद्धा आहेत. रोज येता-जाता आपण या झाडांकडे पाहात असतो; पण त्यांच्याबद्दल आपल्याला काहीच माहिती नसते. ऋतुचक्रानुसार ठरावीक काळात त्यांना बहर येतो, फळं, शेंगा लागतात, पानं गळतात याची काहीच माहिती आपण घेत नाही.गौरी गुरवला मात्र हेच खटकत होतं. शहरातील लोकांना त्यांच्या आजूबाजूच्या वृक्षांची ओळख करून देण्यासाठी ती शहरामध्येच नेचर ट्रेल आयोजित करते. त्या कामात तिची मैत्रीण श्रेया भानपही आघाडीवर असते.गौरीचं शिक्षणच मुळी पर्यावरण विषयाशी संबंधित होतं. निसर्गाची आवड लहानपणापासूनच, तिच्या या आवडीला आणि तिने निवडलेल्या क्षेत्राचा घरातील लोकांचाही पाठिंबा होताच त्यामुळं तिला पुढची वाटचाल सोपी गेली. एम.एस्सी. बॉटनी झाल्यावर तिने बीएनएचएसतर्फे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या निसर्ग माहिती केंद्रात प्रकल्प अधिकारी म्हणून कामाला सुरुवात केली. त्यावेळेस या केंद्राला भेट देणाऱ्या शाळा-महाविद्यालयांतील मुलांना पर्यावरणाची तसेच उद्यानातील प्रजातींची माहिती देणं, त्यांची ओळख करून देणं आणि त्यांच्यापर्यंत पर्यावरण संवर्धनाचा संदेश पोहोचवणं असं तिच्या कामाचं स्वरूप होतं. गौरीलाही हे माहिती देण्याचं काम आवडलं आणि मुलांच्या प्रतिसादामुळे ते अधिकच शक्य झालं. त्यानंतर २००८ साली तिनं डब्ल्यूडब्ल्यूएफ-इंडिया (विश्व प्रकृती निधी) या संस्थेत सहाय्यक शिक्षण अधिकारी या पदावरती काम सुरू केलं आणि त्यानंतर वरिष्ठ शिक्षण अधिकारी पदावर २०१५ पर्यंत तिने काम केलं. हे कामसुद्धा महाराष्ट्रातील शाळा-महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांपासून सामान्य लोकांपर्यंत पर्यावरणाची माहिती देण्याचं होतं. मुलांसाठी माहितीपर वेगवेगळ्या कार्यशाळा घेणं, निसर्गभ्रमंती, निसर्गशिबिरं भरवणं, स्लाइड शोच्या माध्यमातून मुलांना माहिती देणं असं तिच्या आवडीचंच काम होतं. आता गेली तीन वर्षे श्रेयाबरोबर तिने ओयकोइसेन्स या फर्मतर्फे स्वतंत्र काम सुरू केलं आहे.कॉलेजमध्ये शिकत असतानाच तिला सर्वांबरोबर आजूबाजूच्या झाडांचं निरीक्षण व अभ्यास करण्याची संधी मिळाली. त्यामुळे तिला झाडांची वैशिष्ट्ये, त्यांची रचना, आकार, पाने-फुले यांची माहिती गोळा करण्याची आवडच निर्माण झाली आणि त्याची सवय लागली. प्रत्येक वृक्षाच्या संबंधी काही गोष्टीही आपल्याकडे पूर्वापार चालत आल्या आहेत. त्याचा उपयोग करून झाडांची माहिती लोकांना करून देणं तिला मस्त वाटली. तिनं हेच काम पुढे न्यायचं ठरवलं. नवीन पिढी ही माहिती ऐकायला उत्सुक असते असा तिचा अनुभव आहे. आपल्या राहाण्याच्या आसपासच्या प्रदेशातच असणाºया जैवविविधतेबाबत त्यांना आणखी माहिती घ्यायला आवडतं हे तिच्या लक्षात आलं. शहरांमधील वृक्षसंपदा हीसुद्धा महत्त्वाची आहे, शहरांमधील तो आॅक्सिजनचा मोठा स्त्रोत आहे. प्रदूषण कमी होण्यासाठी त्यांचा मोठा आधार असतो. शहरातील धकाधकीच्या जीवनामध्ये रिफ्रेश होण्यासाठी वृक्षांचा आधार घेणं कधीही चांगलंच.शहरातील वनराजीबद्दल बोलताना ती सांगते, सर्व लोकांनी एकत्र येऊन ही वृक्षसंपदा टिकवणं गरजेचं आहे. आपल्या आसपासच्या जैवविविधतेची एक सूची तयार केली पाहिजे. नक्की कोणतं झाड कोठे आहे, त्याची जागा कोणती हे, ते निरोगी आहे की नाही आपल्याला माहिती हवं. ही माहिती असल्यामुळं विनाकारण होणारी वृक्षतोड थांबवता येईल. बहुतांशवेळा लोकांच्या अज्ञान आणि दुर्लक्षामुळं झाडांची तोड होते. यासाठी झाडांची माहिती असणं आवश्यक आहे असं तिचं मत आहे.

कचरा कमीच केला तर..शहरी पर्यावरणाचा विचार करताना कचऱ्याचा मोठा प्रश्न सर्वदूर दिसतो. याबद्दल गौरी सांगते, आपल्या घरातील कचरा बाहेर नेऊन टाकणं आणि शहरातील कचरा शहराबाहेर नेऊन टाकणं यामुळे हा प्रश्न सुटणार नाही. तर मुळातच कचरा कमी केल्याने, त्याचा पुनर्वापर कमी केल्यामुळे ती समस्या सोडवण्यास मदत होऊ शकते, पैसे आहेत म्हणून मी वाट्टेल ते खरेदी करीन आणि टाकून देईन ही वृत्ती पर्यावरणपूरक नाही, असं तिला वाटतं.