शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
3
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
4
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
5
क्रिकेटच्या देवाकडून जेमी-हरमनप्रीतला शाब्बासकी! ऐतिहासिक विजय युवी, एबी आणि गंभीरलाही भावला
6
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
7
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
8
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
9
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
10
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
11
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
12
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
13
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
14
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
15
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
16
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
17
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
18
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
19
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
20
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा

मी काहीच करत नाही !

By admin | Updated: September 4, 2014 17:21 IST

कुणी जग बदलयाचा प्रयत्न करतय , कुणी समाज. कुणी व्यवस्था आणि आम्ही ?

विनोद कटारे, औरंगाबाद
 
देशात सगळीकडे बरंच काही, ब-याच जणांसाठी बदलतंय. पण आमच्यासाठी काहीही बदलत नाहीये. म्हणायलाच तरुणांचा देश, तरुणांचा संताप, 50 टक्के जनता तरुण, पण इथं आमच्या आयुष्यात बदलत काही नाही.
काहीजण करतातही बदलांसाठी प्रयत्न. रस्त्यावर उतरतात, जाब विचारतात, माहिती मिळवतात, हक्क मागतात. पण काहीजण मात्र फक्त शांत बसतात. सहानुभूती व्यक्त  करतात. 
त्या शांत बसणा-यातला मी ‘एक’.
काय करतो मी, मला देशातले बरे वाईट बदल दिसतात. बलात्काराच्या घटना दिसतात. दलितांवरचे अत्याचार दिसतात. शोषण दिसतं. गरिबी, लाचारी दिसते. ते सारं नुस्तं दिसत नाही, तर जाणवतंही.
पण हे सारं दिसूनही मी रस्त्यावर नाही उतरु शकतं. मी नुस्ता पाहतो. माङयासारखेच अनेक तरुण आहेत ज्यांनी अवतीभोवतीच्या परिस्थितीची माहिती आहे. पण त्या परिस्थितीला विरोधही ते करु शकत नाहीत. ते काहीच करु शकत नाहीत.
कारण जग बदलायच्या प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी ¨हंमत लागते ती आपल्यात आहे हे आम्हाला पक्कं माहिती आहे. पण त्या हिमतीचं करायचं काय, आम्ही पार अडकलोय आमच्याच जबाब दा-यांमध्ये.
जगाचा विचार मग करू, आधी स्वत:चे प्रश्न सोडवू, आधी आहे त्या कटकटी निस्तरू म्हणत आम्ही आमच्याच आयुष्यातले गुंते सोडवतो आहोत. काही गोष्टी ऐकायला, बोलायला ब:या वाटतात. पण प्रत्यक्षात कोणी त्या करत नाहीत, कारण आपले प्रश्न सोडवू लागायला, मदतीलाही कुणी येत नाही. आपलं आयुष्य एका वतरुळासारखं, त्यातून बाहेर पडण्याचाच मार्ग सापडत नाही.
आम्ही आमच्या जगण्याचे, रोजीरोटीचे प्रश्न सोडवण्यातच इतके दमतोय की बाकी काही करायला त्रणच उरत नाही. 
मग आम्ही काय समाजात बदल घडवणार? काय देश बदलणार ? आम्ही फक्त सहानुभूतीच दाखवतो, जे कुणी आमच्यासारखे पिचलेले आहेत, त्यांच्यासाठी !
आणि पुरे पडतोय अपेक्षांना. घरच्यांच्या नोकरीच्या, करिअरच्या, चांगल्या पगाराच्या नोकरीच्या अपेक्षा पु-या करता करताच जीव जातोय. काय रस्त्यावर उतरता आणि व्यवस्था तोडतामोडता?
घरच्यांची जबाबदारी आहेच, कुटुंबाचा चरितार्थ चालवायचा आहेत, बहीण-भावाची जबाबदारीही आहेच अनेकांवर. हेच सारं धड जमत नाही म्हणून अवतीभोवतीची माणसं नाराज असतात. त्यांच्या नाराजीलाही उत्तरं सापडत नाहीत. मग सांगा, कितीही वाटलं तरी कसं सामील व्हायचं बदलाच्या प्रक्रियेत. कसं नी काय सांगायचं स्वत:ला?