शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...
2
ज्या DSP नं गोळीबाराचा आदेश दिला, त्याला Gen-Z आंदोलनकांनी बेदम मारहाण करत संपवलं! आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू
3
Breaking: महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती! निकाल जाहीर, एनडीएला जादा मते मिळाली
4
इस्रायलनं संपूर्ण मध्यपूर्वेलाच बनवलं युद्धभूमी, आता 'या' देशावर केली बॉम्बिंग...! कारण काय?
5
मद्य धुंद ट्रकचालकाने मेंढ्यांसह मोटरसायकल चालकाला चिरडले, एक ठार, एक जखमी; आष्टा-इस्लामपूर मार्गावरील घटना
6
Sediqullah Atal First Fifty of Asia Cup 2025 : पहिल्या नबंरला येऊन ठोकली पहिली फिफ्टी!
7
Video: नेपाळच्या माजी पंतप्रधानांच्या पत्नीला जिवंत जाळले; आंदोलकांनी सर्व सीमा पार केल्या
8
VinFast VF6: टाटा गपगार होणार! विनफास्टने दोन स्वस्त ईव्ही लाँच केल्या; किंमत १६.४९ लाखांपासून...
9
कतारची राजधानी दोहा हादरली! इस्रायलचा हमास नेत्यांवर हल्ला; शांतता प्रयत्नांना धक्का
10
नेपाळची लोकसंख्या किती? किती हिंदू? किती मुस्लीम? जाणून घ्या सर्व धर्मांसंदर्भात सविस्तर
11
१३ खासदारांनी मतदान केलेच नाही! उपराष्ट्रपती पदासाठी किती मतदान झाले, मोजणी सुरु
12
१० वर्षांपासून गर्लफ्रेंडला फसवत होता बॉयफ्रेंड; पाळीव कुत्र्याने 'अशी' केली पोलखोल!
13
बाप रे बाप...! एवढ्या संपत्तीचे मालक आहेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली; स्विस बँकतही आहेत कोटीच्या कोटी...!
14
लडाखच्या सियाचीनमध्ये हिमस्खलन, तीन लष्करी जवान शहीद, अनेकजण ढिगाऱ्याखाली, मदतकार्य सुरू
15
योगायोग की मोठं षडयंत्र? गेल्या ४-५ वर्षात भारताच्या शेजारील ४ राष्ट्रांमध्ये 'सत्तापालट'
16
नेपाळचे उपपंतप्रधान बिष्णू प्रसाद यांना निदर्शकांची पाठलाग करून मारहाण, व्हिडीओ व्हायरल
17
पितृपक्ष २०२५: पितृपक्षाच्या संकष्टीला करतात साखर चौथेच्या गणपतीची स्थापना पण, विसर्जन कधी?
18
IND vs PAK : सूर्यकुमार यादवचा आक्रमक बाणा; पाकचा सलमान रिप्लाय देताना उगाच वाकड्यात शिरला (VIDEO)
19
१९९० सालचे जनआंलोदन; नेपाळच्या राजाला सोडावे लागले आपले सिंहासन, असा झाला राजेशाहीचा अंत...
20
आजची तारीख महत्त्वाची, ९९९ चा महायोग; मंगळाचे प्राबल्य, झोपण्यापूर्वी आठवणीने करा 'हे' काम

मी काहीच करत नाही !

By admin | Updated: September 4, 2014 17:21 IST

कुणी जग बदलयाचा प्रयत्न करतय , कुणी समाज. कुणी व्यवस्था आणि आम्ही ?

विनोद कटारे, औरंगाबाद
 
देशात सगळीकडे बरंच काही, ब-याच जणांसाठी बदलतंय. पण आमच्यासाठी काहीही बदलत नाहीये. म्हणायलाच तरुणांचा देश, तरुणांचा संताप, 50 टक्के जनता तरुण, पण इथं आमच्या आयुष्यात बदलत काही नाही.
काहीजण करतातही बदलांसाठी प्रयत्न. रस्त्यावर उतरतात, जाब विचारतात, माहिती मिळवतात, हक्क मागतात. पण काहीजण मात्र फक्त शांत बसतात. सहानुभूती व्यक्त  करतात. 
त्या शांत बसणा-यातला मी ‘एक’.
काय करतो मी, मला देशातले बरे वाईट बदल दिसतात. बलात्काराच्या घटना दिसतात. दलितांवरचे अत्याचार दिसतात. शोषण दिसतं. गरिबी, लाचारी दिसते. ते सारं नुस्तं दिसत नाही, तर जाणवतंही.
पण हे सारं दिसूनही मी रस्त्यावर नाही उतरु शकतं. मी नुस्ता पाहतो. माङयासारखेच अनेक तरुण आहेत ज्यांनी अवतीभोवतीच्या परिस्थितीची माहिती आहे. पण त्या परिस्थितीला विरोधही ते करु शकत नाहीत. ते काहीच करु शकत नाहीत.
कारण जग बदलायच्या प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी ¨हंमत लागते ती आपल्यात आहे हे आम्हाला पक्कं माहिती आहे. पण त्या हिमतीचं करायचं काय, आम्ही पार अडकलोय आमच्याच जबाब दा-यांमध्ये.
जगाचा विचार मग करू, आधी स्वत:चे प्रश्न सोडवू, आधी आहे त्या कटकटी निस्तरू म्हणत आम्ही आमच्याच आयुष्यातले गुंते सोडवतो आहोत. काही गोष्टी ऐकायला, बोलायला ब:या वाटतात. पण प्रत्यक्षात कोणी त्या करत नाहीत, कारण आपले प्रश्न सोडवू लागायला, मदतीलाही कुणी येत नाही. आपलं आयुष्य एका वतरुळासारखं, त्यातून बाहेर पडण्याचाच मार्ग सापडत नाही.
आम्ही आमच्या जगण्याचे, रोजीरोटीचे प्रश्न सोडवण्यातच इतके दमतोय की बाकी काही करायला त्रणच उरत नाही. 
मग आम्ही काय समाजात बदल घडवणार? काय देश बदलणार ? आम्ही फक्त सहानुभूतीच दाखवतो, जे कुणी आमच्यासारखे पिचलेले आहेत, त्यांच्यासाठी !
आणि पुरे पडतोय अपेक्षांना. घरच्यांच्या नोकरीच्या, करिअरच्या, चांगल्या पगाराच्या नोकरीच्या अपेक्षा पु-या करता करताच जीव जातोय. काय रस्त्यावर उतरता आणि व्यवस्था तोडतामोडता?
घरच्यांची जबाबदारी आहेच, कुटुंबाचा चरितार्थ चालवायचा आहेत, बहीण-भावाची जबाबदारीही आहेच अनेकांवर. हेच सारं धड जमत नाही म्हणून अवतीभोवतीची माणसं नाराज असतात. त्यांच्या नाराजीलाही उत्तरं सापडत नाहीत. मग सांगा, कितीही वाटलं तरी कसं सामील व्हायचं बदलाच्या प्रक्रियेत. कसं नी काय सांगायचं स्वत:ला?