शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंचा राजीनामा स्वीकारला; सदनिका घोटाळ्यात अटक वॉरंट निघताच आधी खाती काढून घेतली अन् आता…
2
आजचे राशीभविष्य, १९ डिसेंबर २०२५: आर्थिक लाभ होईल, कार्यालयात संघर्ष किंवा मतभेदाचे प्रसंग येतील
3
कोणाशी युती, कोणाला उमेदवारी; काँग्रेसचा निर्णय २५ डिसेंबरला, आघाडीबरोबरच निधीची व्यवस्थाही स्थानिक पातळीवरच 
4
'व्हीबी-जी राम जी' विधेयक लोकसभेत मंजूर; विरोधकांनी विधेयकाचे कागद फाडून भिरकावले
5
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
6
भाडे थकविणाऱ्यांची विक्रीची घरे जप्त करू; हायकोर्टाची पुनर्वसन योजनेतील विकासकांना तंबी
7
किडनी विक्री प्रकरणी कंबोडियाच्या लिंकसह प्रत्येक व्यवहार तपासणार; तांत्रिक तपासातून उघड होणार 'इंटरनॅशनल लिंक'
8
दगडातून इतिहास साकारणारे शिल्पकार राम सुतार कालवश; वयाच्या १०१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
9
खासगी विमान व्यवसाय महाराष्ट्रातून जाणार? पार्किंग, विमान उतरण्यासाठीचे स्लॉट मिळणे कठीण होत असल्याची भावना
10
१५ हजार एचआयव्ही रुग्णांनी अर्धवट सोडले उपचार; सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेसाठी गंभीर इशारा
11
विजयासाठी पैठणी, नथींचे देताहेत वाण : लकी ड्रॉमध्ये टीव्ही, फ्रिज अन् एसी सुद्धा...
12
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
13
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
14
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
15
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
16
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
17
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
18
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
19
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
20
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

मी काहीच करत नाही !

By admin | Updated: September 4, 2014 17:21 IST

कुणी जग बदलयाचा प्रयत्न करतय , कुणी समाज. कुणी व्यवस्था आणि आम्ही ?

विनोद कटारे, औरंगाबाद
 
देशात सगळीकडे बरंच काही, ब-याच जणांसाठी बदलतंय. पण आमच्यासाठी काहीही बदलत नाहीये. म्हणायलाच तरुणांचा देश, तरुणांचा संताप, 50 टक्के जनता तरुण, पण इथं आमच्या आयुष्यात बदलत काही नाही.
काहीजण करतातही बदलांसाठी प्रयत्न. रस्त्यावर उतरतात, जाब विचारतात, माहिती मिळवतात, हक्क मागतात. पण काहीजण मात्र फक्त शांत बसतात. सहानुभूती व्यक्त  करतात. 
त्या शांत बसणा-यातला मी ‘एक’.
काय करतो मी, मला देशातले बरे वाईट बदल दिसतात. बलात्काराच्या घटना दिसतात. दलितांवरचे अत्याचार दिसतात. शोषण दिसतं. गरिबी, लाचारी दिसते. ते सारं नुस्तं दिसत नाही, तर जाणवतंही.
पण हे सारं दिसूनही मी रस्त्यावर नाही उतरु शकतं. मी नुस्ता पाहतो. माङयासारखेच अनेक तरुण आहेत ज्यांनी अवतीभोवतीच्या परिस्थितीची माहिती आहे. पण त्या परिस्थितीला विरोधही ते करु शकत नाहीत. ते काहीच करु शकत नाहीत.
कारण जग बदलायच्या प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी ¨हंमत लागते ती आपल्यात आहे हे आम्हाला पक्कं माहिती आहे. पण त्या हिमतीचं करायचं काय, आम्ही पार अडकलोय आमच्याच जबाब दा-यांमध्ये.
जगाचा विचार मग करू, आधी स्वत:चे प्रश्न सोडवू, आधी आहे त्या कटकटी निस्तरू म्हणत आम्ही आमच्याच आयुष्यातले गुंते सोडवतो आहोत. काही गोष्टी ऐकायला, बोलायला ब:या वाटतात. पण प्रत्यक्षात कोणी त्या करत नाहीत, कारण आपले प्रश्न सोडवू लागायला, मदतीलाही कुणी येत नाही. आपलं आयुष्य एका वतरुळासारखं, त्यातून बाहेर पडण्याचाच मार्ग सापडत नाही.
आम्ही आमच्या जगण्याचे, रोजीरोटीचे प्रश्न सोडवण्यातच इतके दमतोय की बाकी काही करायला त्रणच उरत नाही. 
मग आम्ही काय समाजात बदल घडवणार? काय देश बदलणार ? आम्ही फक्त सहानुभूतीच दाखवतो, जे कुणी आमच्यासारखे पिचलेले आहेत, त्यांच्यासाठी !
आणि पुरे पडतोय अपेक्षांना. घरच्यांच्या नोकरीच्या, करिअरच्या, चांगल्या पगाराच्या नोकरीच्या अपेक्षा पु-या करता करताच जीव जातोय. काय रस्त्यावर उतरता आणि व्यवस्था तोडतामोडता?
घरच्यांची जबाबदारी आहेच, कुटुंबाचा चरितार्थ चालवायचा आहेत, बहीण-भावाची जबाबदारीही आहेच अनेकांवर. हेच सारं धड जमत नाही म्हणून अवतीभोवतीची माणसं नाराज असतात. त्यांच्या नाराजीलाही उत्तरं सापडत नाहीत. मग सांगा, कितीही वाटलं तरी कसं सामील व्हायचं बदलाच्या प्रक्रियेत. कसं नी काय सांगायचं स्वत:ला?