शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
4
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
5
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
6
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
7
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
8
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
9
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
10
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
11
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
12
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
14
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
15
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
16
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
17
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
18
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
19
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
20
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."

आदिवासी तारुण्यासाठी नव्या तंत्रस्नेही जगात उघडणारी एक खास खिडकी-गोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2020 17:56 IST

कोरोनाकाळात सारं जग ऑनलाइन जात असताना ज्यांच्या हातात तंत्रज्ञान नाही ते मागे पडतील का? - तर तसं होऊ नये म्हणून केंद्र सरकारने आदिवासी तरुणांसाठी एक खास उपक्रम सुरूकेला आहे..

- निशांत वानखेडे

आताचे युग हे तंत्रज्ञानाचे आहे, हे नव्याने सांगायला नको. जो तंत्रस्नेही असेल तोच या काळात टिकेल, असे म्हणणो अतिशयोक्ती ठरणार नाही. कोरोनाने ही वेळ थोडी लवकर आणली, हे नक्की. पण मग जंगल-पहाडात, दुर्गम भागात राहणारा आदिवासी तरु ण या तंत्रज्ञानाच्या युगात पुन्हा मागे पडेल का? - हा प्रश्न आहेच.गेल्या कित्येक पिढय़ा दुर्गम भागात जगणा:या आदिवासी समाजाच्या नव्या पिढीतील तरुणाला आता कुठे शहरी धावपळीची ओळख होऊ लागली आहे. डिजिटल जगाची ओळख सांगणारे स्मार्टफोन आता कुठे त्यातील थोडय़ांच्या हातात पोहोचायला लागले आहेत. अशात वेगाने बदलणा:या घडामोडी त्यांच्या हातातून निसटतात की काय, असे वाटणारच. बदलत्या परिस्थितीत डिजिटल साहित्य हे रोजगाराचे महत्त्वाचं माध्यम झालं असताना ही साधनं आदिवासी तारुण्याशीही जोडली गेली पाहिजेत, ते गरजेचं आहे.त्यासाठीच केंद्र सरकारच्या आदिवासी कल्याण मंत्रलयाकडून एक उपक्रम सुरू करण्यात आला आहे. त्याला ‘फेसबुक’ची जोड मिळाली आहे. ‘गोइंग ऑनलाइन अॅज लीडर’ अर्थात ‘गोल’ असं या कार्यक्र माचं नाव आहे.या कार्यक्रमातून शासनाचा नेमका ‘गोल’ काय आहे, याविषयी प्रा. डॉ. केशव वाळके यांच्याकडून माहिती जाणून घेतली. डॉ. केशव वाळके हे मातृसेवा संघ समाजकार्य महाविद्यालयाचे प्राध्यापक आहेत. केंद्र शासनाच्या या उपक्रमाविषयी माहिती मिळाल्यानंतर त्यांनी आदिवासी तरुणांना सहभागी करण्यासाठी स्वत:हून ‘गोल’चा प्रचार करणं सुरूकेलं. 60- 70आदिवासी तरुणांची या उपक्रमासाठी नोंद केली असून, 31 जुलैर्पयत 2क्क् तरु णांना यात सहभागी करून घेण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

‘गोल’ नेमकं काय आहे?ग्रामीण आदिवासी तरुणांना डिजिटल साक्षर करणो, तंत्रस्नेही बनविणो आणि त्या माध्यमातून विविध क्षेत्रतील रोजगाराचे, नेतृत्वगुण विकसित करण्याचं प्रशिक्षण दिलं जाणार आहेत.फेसबुकच्या सहकार्याने केंद्रीय आदिवासी मंत्रलयाद्वारे हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. देशातील पाच हजार आदिवासी युवकांना डिजिटली प्रशिक्षित करण्याचं या उपक्रमाचं लक्ष्य आहे.हा संपूर्ण  उपक्रम ऑनलाइन चालणार आहे. आदिवासी तरुणांना ऑनलाइन नोंदणी करायची आहे. नोंदणीनंतर निवडलेल्या तरुणांना सात महिने ऑनलाइन मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या मार्गदर्शनासाठी देशातील 25क्क् मेंटारची नियुक्ती करण्यात येत आहे. हे मेंटार कृषीपासून उद्योग क्षेत्र, समाजकारण ते राजकारण आणि आयटीआयपासून आयटीपर्यंतच्या क्षेत्रचे जाणकार असतील. एक मेंटार (प्रेरक) दोन आदिवासी युवकांना त्यांनी निवडलेल्या विषयावर मार्गदर्शन करेल. हे मेंटार प्रत्येक आठवडय़ाला दोन तास मार्गदर्शन करतील. म्हणजे महिन्यात आठ तास आणि सात महिन्यात 52 तासांचे प्रशिक्षण होईल. यात महत्त्वाची म्हणजे ज्या आदिवासी तरुणाकडे स्मार्टफोन नाही त्यांना फेसबुककडून स्मार्ट फोन आणि वर्षभरासाठी इंटरनेटची व्यवस्था मोफत दिली जाणार आहे.सात महिन्याचे प्रशिक्षण संपल्यानंतर त्यांनी निवडलेल्या क्षेत्रतील कंपनी, एखादी संस्था किंवा इतर ठिकाणी दोन महिने इंटर्नशिप (आंतरवासिता) करण्याची संधी प्रशिक्षणार्थी तरुणांना मिळेल. 18 ते 35 वयोगटातील कोणताही तरुण ‘गोल’च्या प्रशिक्षणात सहभागी होऊ शकेल. त्यासाठी शिक्षणाची कुठलीही अट नाही. चौथा-पाचवा वर्ग शिकलेला तरुणही या कार्यक्रमाद्वारे प्रशिक्षण घेऊ शकतो. प्रशिक्षणार्थीना प्रमाणपत्र, औद्योगिक भेट आणि अन्य गोष्टींचा लाभ दिला जाणार आहे.डॉ. केशव वाळके यांच्या मते, ‘गोल’ उपक्रमातून विविध विषयाचे मार्गदर्शन देण्यात येणार आहे. आजही अनेक आदिवासी तरु णांचे शेती हेच उदरनिर्वाहाचे साधन आहे. मात्र या कृषिक्षेत्रतही नवीन काही शिकण्याची संधी गोलमध्ये मिळेल. ज्यांना उद्योग करण्याची इच्छा असलेल्यांसाठी स्टार्टअपचे मार्गदर्शन. कृषी, शिक्षण, आरोग्य, तंत्रज्ञान, राजकारण अशा आदिवासी तरुणांनी निवडलेल्या कोणत्याही विषयाचे मेंटारद्वारे मार्गदर्शन मिळेल आणि इंटर्नशिप करण्याची संधी त्यांना मिळेल. त्यानंतर एकतर ते स्वत: काही करतील किंवा सोबतच्या इतर तरुणांना मार्गदर्शन करतील. त्यांच्यात लीडरशिपच्या क्वालिटी निर्माण होतील.अर्थात दुर्गम भागात इंटरनेट कव्हरेज मिळेल काय, मेंटारशी त्यांचा संवाद नियमित होईल काय, या प्रशिक्षणाचा तरुणांना लाभ होईल का, असे प्रश्न आजही आहेत; पण एका नव्या उपक्रमाची सुरुवात होते आहे, त्याला यश लाभलं तर उत्तमच आहे.अधिक माहितीसाठी ही साइट पहा.https://goal.tribal.gov.in/(निशांत लोकमतच्या नागपूर आवृत्तीत वार्ताहर आहे.)